Shuru
Apke Nagar Ki App…
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे आज पशु लसीकरण आणि लंपी रोगावर निदान शिबिर पार पडले आहे.
Ramesh Mulgir
पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे आज पशु लसीकरण आणि लंपी रोगावर निदान शिबिर पार पडले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पाथरी तालुक्यातील वाघाळा येथे आज पशु लसीकरण आणि लंपी रोगावर निदान शिबिर पार पडले आहे.1
- दिल्लीत विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला पाथरीमध्ये कडकडीत प्रतिसाद मिळाला आहे. या घटनेच्या विरोधात पाथरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.1
- दिल्लीमध्ये घडलेल्या घटनेच्या विरोधात आणि लोकशाहीवर झालेल्या लाठीच्या प्रहाराच्या निषेधार्थ परभणीत वंचित बहुजन आघाडीने एल्गार पुकारला आहे. दिल्लीतील या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडी परभणीत आक्रमक झाली आहे.1
- जालना जिल्ह्यातील मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने ओबीसी सेलच्या सरचिटणीसपदी सारिका वरणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे सत्कार करण्यात येत आहेत.1
- हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये वानरांच्या टोळ्यांमुळे खरीप हंगामातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. परिसरामध्ये पेरणी केलेल्या कोवळ्या सोयाबीन पिकात वानर हैदोस घालत असून वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान केले जात आहे. या प्रकारामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामातील पिके वाचवण्यासाठी या वानरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे.1
- छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी श्री क्षेत्र औंढा नागनाथ येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वराचे विधिवत दर्शन घेऊन पूजा-अर्चा केली. या वेळी मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दर्शनानंतर विभागीय आयुक्तांनी मंदिर परिसराची पाहणी केली. या पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी श्री क्षेत्र नागेश्वर मंदिर बाह्य विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांची सविस्तर माहिती दिली. भाविकांसाठी आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे, परिसराचे सुशोभीकरण, पायाभूत सुविधा बळकट करणे तसेच धार्मिक पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती आयुक्तांना देण्यात आली. विकासकामांचा आढावा घेताना विभागीय आयुक्तांनी कामांची गुणवत्ता, नियोजन आणि वेळेत पूर्णत्व यावर भर देत संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना दिल्या. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार हरिष गाडे, मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापक सुरेंद्र डफाळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.2
- दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थी आंदोलनाचे तीव्र पडसाद जालन्यात उमटले असून, मुसळधार पावसाची तमा न बाळगता शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन छेडले. हातात विविध मागण्यांचे फलक आणि बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर लक्ष वेधत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली आणि सरकारविरोधात घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाला नेताजी सुभाष चंद्र बोस सेनेने जाहीर पाठिंबा दिला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रतन लांडगे यांनी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत केंद्र सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. दरम्यान, आंदोलनादरम्यान काही आंदोलकांनी आत्मदहनाचा इशारा दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आणि सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवून BARकाईने लक्ष ठेवण्यात आले. भर पावसात झालेल्या या आक्रमक आंदोलनामुळे दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाचे पडसाद आता राज्यभर उमटू लागल्याचे चित्र असून, विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकार आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याचा जालन्यातील डेमोक्रेटिक लॉयर्स असोसिएशनने तीव्र निषेध केला आहे. या प्रकरणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन पाठवून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे. लोकशाही मार्गाने आपल्या मागण्या मांडणाऱ्या विद्यार्थ्यांचे दमन करण्याऐवजी त्यांना न्याय देण्यात यावा आणि लाठीहल्ल्याची कृती ही लोकशाही मूल्यांवर घातलेला आघात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्या, NEET आणि IIT-JEE परीक्षांमधील पेपरफुटीचे प्रकार तसेच शिक्षणाच्या वाढत्या खर्चामुळे विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक व मानसिक ताण याविरोधात हे आंदोलन उभारण्यात आले होते. शिक्षण सुधारक आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या शांततामय आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असताना विद्यार्थ्यांवर दमनशाहीचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून विद्यार्थ्यांना त्वरित न्याय देण्याची मागणी असोसिएशनने केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्यात आलेल्या या निवेदनावर डेमोक्रॅटिक लॉयर्स असोसिएशनचे ॲड. शिवाजीराव आदमाने, ॲड. किशोर राऊत, ॲड. माणिकराव बनसोडे, ॲड. कल्पना त्रिभुवन, ॲड. राहुल चव्हाण, ॲड. डी. के. कुलकर्णी, ॲड. वैभव खरात, ॲड. राम गव्हाणे, ॲड. जाधव सर, ॲड. लक्ष्मण उडान, ॲड. उमर परसूवाले, ॲड. सविता भास्कर, ॲड. शारजा शेख, ॲड. सरिता गजरे, ॲड. आयज सुभानी, ॲड. ज्ञानेश्वर कोरडे, ॲड. एस. आर. जऱ्हाड, ॲड. आर. जी. डुरे आणि ॲड. शरद कुलकर्णी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी हा लढा येत्या काळात अधिक तीव्र करण्याचा इशाराही विधिज्ञांनी दिला आहे.1