Shuru
Apke Nagar Ki App…
वारसा भिमाचा फेस्टिव्हिल २०२६ मध्ये संजय गाडेंची तलवारबाजी,आ. शशिकांत शिंदेंची फटकेबाजी आणि खा. उदयनराजेंची कोपरखळी.
संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया
वारसा भिमाचा फेस्टिव्हिल २०२६ मध्ये संजय गाडेंची तलवारबाजी,आ. शशिकांत शिंदेंची फटकेबाजी आणि खा. उदयनराजेंची कोपरखळी.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सांगलीत प्रेम विवाहाचा करूण अंत; विट्यात पत्नीचा खून अनैतिक संबंधाची झालरं! विटा पोलीस पतीच्या शोधात!1
- काटेवाडीमध्ये आमदार रोहित पवार यांच्यासमोर देवांश लखन पाथरकर या चिमुकल्याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर भावनिक भाषण केलं.. रोहित पवार यांनी या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत देवांशचं भाषण एकदम ओक्के अशा शब्दात कौतुक केलंय.. या निरागस चिमुकल्याच्या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आजही आबालवृद्धांच्या मनात अजितदादांचं स्थान अबाधित असल्याची प्रचिती या निमित्तानं आली..1
- Post by मन्सूर शेख1
- रायगड जिल्ह्यातील काशिद येथे नदीपात्र व समुद्र किनारी सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकामामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देवेन चंद्रकांत गाभावाला (मुंबई) यांच्या वतीने काशिद नदीपात्रात अतिक्रमण करून वाढीव बांधकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. सदर बांधकामामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण होत असून भविष्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पावसाळ्यात नदीचा मार्ग बदलल्यास आजूबाजूच्या वस्त्यांना व शेतीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. याशिवाय, हे बांधकाम किनारी नियमन क्षेत्र (CRZ) नियमांचे उल्लंघन करत असल्याचेही सांगितले जात आहे. समुद्र किनाऱ्यालगत कोणतेही बांधकाम करताना पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असताना, येथे ते नियम धाब्यावर बसवले जात असल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची शक्यता असून स्थानिक जैवविविधतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून सदर प्रकरणाची चौकशी करावी व अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणी महसूल विभाग तसेच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी पाहणी करून सत्यस्थिती समोर आणणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत. प्रशासनाकडून यावर कोणती भूमिका घेतली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.4
- 🚨 मुंब्रा ग्राउंड का बड़ा सवाल! क्या सच में 175 करोड़ खर्च हुए या फिर ये एक बड़ा घोटाला है? 🤔 जहां बच्चों के लिए सुरक्षित मैदान होना चाहिए, वहां टूटी जालियों में खेलते नजर आ रहे हैं मासूम बच्चे… ⚠️ जिम्मेदार कौन? ⚠️ जांच कब होगी? 📍 मुंब्रा के इस ग्राउंड की जमीनी हकीकत कई सवाल खड़े कर रही है। क्या सिर्फ कागजों में विकास हुआ है या असल में भी कुछ बदला है? 🎥 पूरी रिपोर्ट देखें और अपनी राय जरूर दें 👇 कमेंट में बताएं आपके हिसाब से ये लापरवाही है या घोटाला?1
- “आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या काळात अनेक परंपरा हरवत चालल्या आहेत… मात्र काही कुटुंबे अशी आहेत जी आपली सामाजिक आणि वैचारिक बांधिलकी आजही जपून ठेवतात. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे वाघमारे परिवाराची… गेल्या तब्बल ४० वर्षांपासून हा परिवार एकट्याने भीमोत्सव साजरा करत आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट…” मुंबई : सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या भीमोत्सवाला देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केले जाते. मात्र, या उत्सवाला केवळ मोठ्या गर्दीची किंवा भव्य आयोजनाची गरज नसते, तर त्यामागे असते ती खरी निष्ठा आणि विचारांप्रती असलेले समर्पण. याच विचारांची जपणूक करत वाघमारे परिवार गेल्या ४० वर्षांपासून एकट्याने भीमोत्सव साजरा करत आहे. या परिवाराने कोणत्याही मोठ्या संघटनेचा किंवा आर्थिक पाठबळाचा आधार न घेता स्वतःच्या कष्टावर आणि श्रद्धेवर ही परंपरा अखंडपणे जपली आहे. दरवर्षी भीम जयंतीनिमित्त ते घरात तसेच परिसरात स्वच्छता, सजावट, विचारांचे प्रबोधन आणि सामाजिक संदेश देणारे उपक्रम आयोजित करतात. विशेष म्हणजे, या परिवाराचा हा उपक्रम केवळ साजरा करण्यापुरता मर्यादित नसून, समाजात जागृती निर्माण करण्याचे कामही करतो. लहान मुलांना बाबासाहेबांचे विचार समजावून सांगणे, वाचनाची सवय लावणे आणि समतेचा संदेश पोहोचवणे हे त्यांच्या उपक्रमांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. आजच्या काळात जिथे अनेक कार्यक्रम केवळ दिखाव्यासाठी केले जातात, तिथे वाघमारे परिवाराची ही साधी पण अर्थपूर्ण परंपरा समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ विचारांप्रती असलेले प्रेम आणि आदर यामुळे त्यांनी ही परंपरा जिवंत ठेवली आहे. स्थानिक नागरिकांमध्येही या उपक्रमाबद्दल आदराची भावना असून, अनेकजण या परिवाराच्या कार्याचे कौतुक करत आहेत. “एकट्याने इतकी वर्षे परंपरा जपणे ही खरोखरच मोठी गोष्ट आहे,” अशी चर्चा व्यक्त होत आहे.1
- Post by संजय गाडे साहेब जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया1
- रायगड - अमुलकुमार जैन एकीकडे निसर्ग संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यात भूमाफियांनी कायद्याचा धाक पूर्णपणे सोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मौजे कोलमांडला (ताराबंदर) येथे राष्ट्रीय हरित लवाद (NGT) आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांना उघडपणे हरताळ फासत पुन्हा एकदा अनधिकृत माती भराव सुरू झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, रविवार दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास ताराबंदर येथील कांदळवन क्षेत्रात पोकलेन आणि जेसीबी (JCB) मशीनच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणावर माती भराव करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले होते. हे ठिकाण आधीच पर्यावरणीय वादाच्या भोवऱ्यात असून, येथे कांदळवन कत्तल झाल्याचा ठपका ठेवत NGT ने पुनर्लागवडीचे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. "फॉरेस्टची परवानगी आहे!" – कंत्राटदाराची अरेरावी स्थानिक ग्रामस्थांना या अनधिकृत कामाचा सुगावा लागताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याचे पाहून संबंधित कंत्राटदार आणि कामगारांनी आक्रमक पवित्रा घेतला. “हे काम फॉरेस्टच्या (वनविभाग) परवानगीने सुरू आहे,” असा खोटा दावा करत त्यांनी ग्रामस्थांना दडपण्याचा आणि भीती घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांच्या ठाम विरोधापुढे कंत्राटदाराने अखेर नमते घेत तेथून पळ काढला आणि मशिनरी एका कंपाऊंडमध्ये लपवून ठेवल्या. प्रशासनाचे 'अर्थपूर्ण' मौन? या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, फणसाड वन्यजीव विभागाच्या RFO (परिक्षेत्र वन अधिकारी) यांना ग्रामस्थांनी तातडीने माहिती देऊनही त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. वारंवार संपर्क करूनही अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. "ज्या ठिकाणी कोट्यवधींचा दंड आकारला गेला आहे, गुन्हे दाखल आहेत, तिथे पुन्हा भराव होतोच कसा? यामागे नक्की कोणाचे वरदहस्त आहेत?" > — संतप्त सवाल, ताराबंदर ग्रामस्थ. पार्श्वभूमी आणि कारवाईची मागणी दंडात्मक कारवाई: यापूर्वीच याच जागेवर झालेल्या अनधिकृत भरावामुळे महसूल विभागाने कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. गुन्हे दाखल: वनविभागामार्फत याआधी गुन्हे नोंदवण्यात आलेले आहेत. न्यायालयीन लढा: NGT ने येथे कांदळवन पुनरुज्जीवनाचे आदेश दिले आहेत. ताराबंदर ग्रामस्थ मंडळाने आता आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित दोषींवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई न झाल्यास पुन्हा एकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. संवेदनशील किनारी भागात सुरू असलेला हा 'पर्यावरणीय दहशतवाद' थांबणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.2
- 14 April Dr Babasaheb Ambedkar Jayanti Goregaon mein Republican party of India ke Reshma Khan aur Ramesh payakrao Ne Milkar Ek program ka intejaam Kiya jismein Seema Thi Ramdas Athavale Bhi Aaye The1