Shuru
Apke Nagar Ki App…
चंद्रपूर शहरात आंबेडकरी जनतेचा भव्य आक्रोश मोर्चा, दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन चंद्रपुरात आज दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन अंतर्गत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आयोजित मोर्च्यात आंबेडकरी जनतेतर्फे 9 मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रमुख मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर या संस्थेमध्ये एकाच परिवारातील तसेच नातेसंबंधातील रक्त नात्याचे सदस्य नसावे व त्यात जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी सर्वानुमते निवडलेले अथवा पाठविलेल्या समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.
News34
चंद्रपूर शहरात आंबेडकरी जनतेचा भव्य आक्रोश मोर्चा, दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन चंद्रपुरात आज दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन अंतर्गत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आयोजित मोर्च्यात आंबेडकरी जनतेतर्फे 9 मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रमुख मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर या संस्थेमध्ये एकाच परिवारातील तसेच नातेसंबंधातील रक्त नात्याचे सदस्य नसावे व त्यात जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी सर्वानुमते निवडलेले अथवा पाठविलेल्या समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- चंद्रपूर शहरात आंबेडकरी जनतेचा भव्य आक्रोश मोर्चा, दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन चंद्रपुरात आज दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन अंतर्गत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आयोजित मोर्च्यात आंबेडकरी जनतेतर्फे 9 मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रमुख मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर या संस्थेमध्ये एकाच परिवारातील तसेच नातेसंबंधातील रक्त नात्याचे सदस्य नसावे व त्यात जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी सर्वानुमते निवडलेले अथवा पाठविलेल्या समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.1
- शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’ शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’1
- अबब!! निष्टी येथील शेतकऱ्याच्या शेतात आढळला अकरा फुट लांबीचा अजगर ११ फुट अजगर सर्पमित्रांनी शिताफीने पकडले भिवापूर (प्रतिनिधी ) निष्टी ता. पवनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ११ फुट अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याबाबत शेतकऱ्याने सर्पमित्रांला बोलविले. यावेळी सर्पमित्र दुर्गेश बडघरे यांच्या टिमने अतिशय काळजीपुर्वक ११ फुट अजगर यास पकडले आणि वनविभाच्या सुचनेनुसार पुल्लरच्या जंगलात सोडण्यात आले. भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेला निष्टी ता. पवनी येथील शेतकरी भगवान चट्टे यांच्या शेतात काल सकाळी ९ वाजता भव्य मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे शेतकरी चांगलाच भयभीत झाला. त्याने भिवापूर येथील सर्पमित्रांना पाचरण केले. ११ फुट अजगर सर्पमित्र दुर्गेश बडघरे , जाकीर सय्यद, कृणाल रोहनकर, प्रदीप मडावी यांनी मोठया शिताफीने पकडून त्यास उमरेड कऱ्हाडला अभयारण्य कार्यालयात याबाबतची नोंद केली. या अजगराचे वजन २१ किलो होते. त्याचे वय ५ ते ७ वर्षे इतके सांगण्यात आले. हा बिनविषारी होता अशी माहिती आहे. हा भव्य अजगर पुल्लरच्या जंगलात वनविभाग माध्यमातून अधिवासात सोडण्यात आले.1
- गावाच्या विकासा करीता काम करण्याचे प्रयत्न - शितल राजुरकर ग्रामपंचायतीला बदनाम करण्याचे प्रयत्न भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.1
- वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर मध्ये गोवंशतकरीचा पडदाफाश ठाणेदार संगीता हिलोंडे यांच्या धडक कारवाई ने तस्करांचे धाबे दणाणले *ब्रेकिंग न्यूज - वर्धा* *वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले* गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध जनावर वाहतुकीला आळा; पहाटेच्या सुमारास सापळा रचून वाहन जप्त वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या जनावरांच्या अवैध तस्करीला अखेर आळा बसला आहे. याबाबत बजरंग दलाच्यावतीने अनेकदा तक्रारी केल्या होत्या तसेच वृत्तपत्रांमध्ये देखील या बाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत अखेर आज पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीला 2 वाजेच्या सुमारास अल्लीपूर मार्गावरून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपली टीम तयार केली आणि अल्लीपूर जवळ सोनेगाव स्टेश सापळा रचला. बुलेरो मालवाहतूक गाडी MH 30 आरडी 63 व पाहणी करण्याकरता एक कार MH 5925 अंधाराचा फायदा घेत येणाऱ्या संशयित वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या वाहनाला चारही बाजूंनी घेरून पकडण्यात यश आले. माल वाहतूक बुलेरो गाडीमध्ये एकूण नऊ जनावरे कत्तलीसाठी नेत होते त्या जनावरांमध्ये दोन गाय कालवड गोरे तीन कालवड चार एकूण नऊ जनावर वाहनात निर्दयतेने कोंबून जनावरे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करून त्यातील जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत दोन्ही गाडीमध्ये असलेले एकूण चार आरोपी फरार आल्याची प्राथमिक माहिती आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संगीत हेलोंडे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक वर्षात तांदूळकर जमादार अजय रिठे पोलीस शिपाई अजय वानखेडे पंकज कापसे पोलीस शिपाई दिनेश खराबे यांनी केली आहे . जप्त केलेले वाहन पोलीस स्टेशनला लावले आहे व नऊ जनावरे वर्धा येथील करुणा आश्रम मध्ये सोडण्यात आली आहे या धडक कारवाईमुळे अल्लीपूर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावकऱ्यांनी ठाणेदार संगीता हेलोंडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून अल्लीपूर परिसरातून अवैध जनावर वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आज पहाटे आम्ही केलेल्या कारवाईत वाहन पकडले असून पुढील तपास सुरू आहे. अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी यावेळी सांगितले. सदर कारवाई या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.1
- डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, पुसद वसंत नगर पोलीसांची कारवाई डीजे वाजण्यापूर्वीच पोलिसांनी केला जप्त, गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे व कर्णकर्कश आवाजावर बंदी असताना नियमांचे उल्लंघन करणारे वाहन पुसद वसंतनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहनात डीजेचे १० मोठे स्पीकर बॉक्स व बँजोचे साहित्य जप्त केले १४ सप्टेंबर रोजी दुपारी नवीन पुसद येथील एका मंडळाकडे डीजे वाजविण्यासाठी जात असताना एमएच २९ एम बारा ७१ क्रमांकाचे वाहन पोलिसांच्या निदर्शनास आले. चालक नारायण पांढरे व मालक नरेश खंडागळे यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.ही कारवाई परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.1
- जि. प. उच्च प्रा शा भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग जि प भोजापूर येथे मुलांच्या सहकार्याने फुलली परसबाग पवनी: जि प प्रा शा भोजापूर येथे तब्बल १६० रोपांची परसबाग तयार करण्यात आली मु अ पडवाल सर व राहुल पाटील सर यांच्या परिश्रमाने व वर्ग ४ थी च्या सहकार्याने परसबाग फुलली आहे.1
- 17 अतिक्रमण धारकांचे पक्के घरे असल्याची सरपंच राजुरकर यांची माहिती पत्रपरिषदेत दाखविले पक्के घरांचे फोटो व कागदपत्रे अतिक्रमण धारकांनी झोपडी ( कुणीही राहत नाही ), गुराचा गोठा तयार केला भिवापूर (shuru ॲप ) नांद गाव हे भिवापूर तालुक्यातील मोठे गाव असून येथिल शासकीय जागेवर १७ लोकांनी अतिक्रमण करून ती जागा आपला ताब्यात केली आहे. यातील चार जण ओबीसी, एक जण एन. टी व इतर आदिवासी कुटूबियांचे अतिक्रमण आहे. सदरची जागा झुडपी जंगल नसून ती जागा महसूल गाव नमुना 1 ( क ) नुसार ग्राम पंचायतीला हस्तांतरीत झाली आहे. त्यावर १७ जणांचे गावठाणात मालकी हक्काचे पक्के घर असतांना त्यांनी शासकीय जागेवर बरेच जणांनी गुरांचा गोठा, झोपडी ( कुणीही राहत नसलेली ) अतिक्रमण केले असल्याची सरपंच राजूरकर यांनी पत्रपरिषदेत माहीती दिली. अतिक्रमण धारकांच्या घराचे फोटो सरपंच शितल राजुरकर यांनी आदिवासीची घरे तोडण्यात आलेले वृत्त खोटे आहे. याबाबत ग्रामसभेत अतिक्रमण हटविण्या बाबत दोनदा ग्रामसभेत ठराव घेण्यात आला आहे. सदरची जागा स्मशानभुमी परिसरातील असून ती स्मशानभुमी करीता अपुरी पडत असून स्मशानभुमी करीता प्रास्तावित आहे. याठिकाणी नरेगा मधून वृक्ष लागवड, सिमेन्ट खुर्ची, हॅन्डपंप ची व्यवस्था करण्याचे प्रस्तावित असून नागरीकांच्या सोईकरीता राहणार आहे. पत्रपरिषदेत नांद ग्रामपंचायतचे उपसरपंच मोहन धारणे, सदस्य ज्योतीताई बांगरी, तेजवंताताई देवके, विजय रामटेके, आशिष शिवरकर, रविंद्र धाडसे उपस्थित होते.1