जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
- जामनेर महामार्गावर काळाचा घाला; सावळदबारा येथील पती-पत्नी जागीच ठार १ वर्षाची चिमुकली चमत्कारिकरित्या बचावली सोयगांव , *बातमी सोयगाव* जामनेर–महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमीजवळ दि. २२ च्या रात्री अंदाजे ९ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. या अपघातात सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील रहिवासी पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या सोबत असलेली एक वर्षाची चिमुकली मुलगी सुदैवाने बचावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय ३५) व सोनाली गोपाल खडके (वय ३०, रा. सावळदबारा, ता. सोयगाव) हे दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांचा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जामनेर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.1
- विकास लवांडे यांच्या विधानाचे सिल्लोडमध्ये तीव्र पडसाद; कार्यवाही साठी वारकरी संप्रदायाचे तहसीलदारांना निवेदन.... राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय आणि महाराज मंडळींविरुद्ध केलेल्या वादग्रस्त विधानांचे सिल्लोड तालुक्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानांमुळे वारकरी परंपरेची जाणीवपूर्वक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत, समस्त वारकरी संप्रदाय व महाराज मंडळींच्या वतीने आज तहसीलदार अंकिता दहिभाते यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. निवेदनानुसार, विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील महाराज मंडळी एका विशिष्ट राजकीय पक्षाचा अजेंडा राबवत असल्याचा दावा केला होता. तसेच संप्रदायातील महाराजांना 'प्रतिगामी' संबोधून त्यांच्या 'आचार्य' या पदव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या विधानांमुळे वारकरी समाजात संतापाची लाट उसळली असून, महाराज मंडळी राजकीय प्रचार करत असल्याचा दावा पूर्णतः निराधार असल्याचे वारकरी संप्रदायाने म्हटले आहे. संप्रदायात वर्षानुवर्षे चालत आलेल्या पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे लवांडे यांच्या अल्पज्ञानाचे लक्षण असून, कीर्तन-प्रवचनांच्या माध्यमातून समाजविघातक वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप हा संतांच्या मूळ शिकवणीचा अपमान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विकास लवांडे यांनी केलेले आरोप राजकीय सूडबुद्धीने प्रेरित असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रशासनाने यावर कडक कायदेशीर कारवाई न केल्यास आगामी काळात समस्त साधू-संत आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने 'चक्का जाम' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वारकरी मंडळींनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विभागीय आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनाही माहितीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी वारकरी संघांचे सचिव कृष्णा लहाने, माणिक महाराज,नामदेव महाराज पल्हाळ,वामन महाराज, अजबराव महाराज मिरगे, महामंडलेश्वर सदाशिव शास्त्री मंगरूळकर,दिगंबर दादा, संदीप महाराज काकडे, शिवराम साखळे, दादाराव महाराज राऊत,गणेश महाराज,समाधान महाराज बसंते, भगवान महाराज भोरकडे, नारायण महाराज, पुंडलिक महाराज, नागेश महाराज, कचरू महाराज चाथे,कैलास महाराज, रघुनाथ महाराज, मधुकर महाराज, पुरुषोत्तम महाराज तसेच सिल्लोड तालुक्यातील वारकरी मंडळी, महाराज आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत..2
- 3 Talaq par Asaduddin Owaisi ka bada bayan 🔥 Sach samne aa gaya! Full reaction dekho 👀1
- सिल्लोड येथील तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय येथील कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले असल्याने अनेक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे यामुळे अनेक नागरिक शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारत आहे मात्र अधिकारी संपला गेले असल्याने कार्यालयात शुभ सकाळ आहे1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- पुन्हा एकदा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड चर्चेत आले आहेत, पण यावेळी कारण ठरलंय एक पुस्तक. 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत आमदार संजय गायकवाडांनी थेट पुस्तकाच्या प्रकाशकाला फोन करून शिवीगाळ केल्याचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. नक्की काय आहे हे प्रकरण आणि हा वाद नेमका का उफाळून आलाय? पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये."घटना अशी आहे की, नुकत्याच एका लग्नसमारंभात आ. संजय गायकवाड यांच्या पत्नी आणि बुलढाण्याच्या नगराध्यक्ष सौ. पूजाताई गायकवाड यांना भेट म्हणून 'शिवाजी कोण होता?' हे पुस्तक देण्यात आलं. घरी आल्यावर जेव्हा त्यांनी हे पुस्तक वाचलं, तेव्हा त्यांना पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप आला. शीर्षकात 'छत्रपती शिवाजी महाराज' असा उल्लेख का नाही? आणि हे नाव एकेरी का? असा सवाल करत आ. गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना रात्री उशिरा फोन लावला."सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या ऑडिओ क्लिपमध्ये आमदार गायकवाड अत्यंत आक्रमक भाषेत बोलताना ऐकू येत आहेत. त्यांनी केवळ शीर्षकावर आक्षेप घेतला नाही, तर प्रकाशकाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या ऑडिओवरून स्पष्ट होतेय. एका लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे भाषेचा वापर करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- नमस्कार मित्रांनो... बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा एक नाव जोरदार चर्चेत आले आहे... ते नाव म्हणजे माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा! जनतेशी थेट नाळ जोडणारा, गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारा आणि कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा नेता म्हणून सानंदा यांची ओळख निर्माण झाली आहे. खामगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी केलेल्या कामांची चर्चा आजही नागरिकांमध्ये होताना दिसते. गरीब, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सानंदा यांची कार्यशैली ही शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध मानली जाते. वेळेचे महत्त्व, संघटनेची ताकद आणि कार्यकर्त्यांचा सन्मान हे त्यांच्या नेतृत्वाचे मुख्य गुण मानले जातात. अलीकडच्या काळात त्यांच्या राजकीय हालचालींना पुन्हा वेग आला आहे. मुंबईतील देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार तसेच खासदार पार्थ पवार यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांची भूमिका चर्चेत राहिली. सध्या ते बारामती येथे सुनेत्राताई पवार यांच्या प्रचारासाठी सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पक्षात त्यांच्यावर असलेला विश्वास अधिक दृढ झाल्याचे बोलले जात आहे. इतकेच नाही... आगामी विधान परिषद निवडणुकीत त्यांचे नावही चर्चेत असून, मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. समर्थक काय म्हणतात? सानंदा म्हणजे गरीबांचा आधार... कार्यकर्त्यांची ताकद... आणि बुलढाणा जिल्ह्याचा दमदार आवाज! एकूणच काय तर... राणा दिलीपकुमार सानंदा यांची राजकीय गाडी आता पुन्हा वेगाने धावताना दिसत आहे... आणि आगामी काळात ते मोठी भूमिका बजावतील, अशी चर्चा रंगली आहे.1
- 😡 Owaisi Ka Powerful Debate Reaction 🔥💥1