Shuru
Apke Nagar Ki App…
बुलढाणा पुलिस अधीक्षक निलेश तांबे का संदेश जनगणना के ताल्लुक से
नज़ीर रज़वी
बुलढाणा पुलिस अधीक्षक निलेश तांबे का संदेश जनगणना के ताल्लुक से
More news from महाराष्ट्र and nearby areas
- बुलढाणा पुलिस अधीक्षक निलेश तांबे का संदेश जनगणना के ताल्लुक से1
- खामगाव : लग्नाची खरेदी करण्यासाठी आलेल्या एका शेतकरी कुटुंबाची गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला खामगाव शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून १ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. खामगांव तालुक्यातील निरोड येथील रहिवासी विठ्ठल मंठाजी मार्कंड हे शेती करतात. भावाच्या मुलीचे लग्न असल्याने ते सहकुटुंब खामगाव शहरात खरेदीसाठी आले होते. मुख्य बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या पर्समधून ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. कष्टाच्या पैशातून घेतलेले दागिने चोरीला गेल्याने मार्कंड कुटुंब हवालदिल झाले होते.विठ्ठल मार्कंड यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 'मिशन परिवर्तन' अंतर्गत तपासाची चक्रे वेगाने फिरवत, तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. या तपासात सतीष नंदु शेळके (वय ३२, रा. असोला रोड, सिंदखेड राजा) याचे नाव निष्पन्न झाले. तो अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल १ लाख २८ हजार १९९ रुपये जप्त करण्यात आला. ही धाडसी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या पथकात सपोनि विकास पाटील, पोहेकॉ भिमराव वानखेडे, प्रदिप मोठे, सागर भगत, पोकों अंकुश गुरूदेव, राहुल थारकर, राम धामोडे आणि गणेश कोल्हे यांचा समावेश होता. लग्नाचे दागिने परत मिळाल्याने मार्कंड कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले आहेत.1
- निर्भिड पत्रकार गजानन धंदरे साहेब यांचा वाढदिवस साजरा.... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने....फळे व बिस्किटे चे वाटप1
- Post by Sachin kadukar1
- तथागतांच्या शांतीचा संदेश आणि महामानवाच्या अस्थिधातूंचे दर्शन; बुलढाण्यात निघाली भव्य धम्म शांती रॅली.1
- Post by नंदकिशोर साखरकर1
- Post by Mushraf Tadvi1
- खामगाव ; भारतीय संस्कृती आणि शांततेचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त (बुद्ध पौर्णिमा) खामगाव शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या औचित्याने शहरात भव्य कॅन्डल मार्च काढण्यात आला, ज्यामध्ये मोठ्या संख्येत बौद्ध अनुयायी आणि शांतताप्रेमी नागरिकांनी सहभाग नोंदवला.संध्याकाळी कॅन्डल मार्चला सुरुवात झाली. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केलेले अबालवृद्ध हातामध्ये पेटत्या मेणबत्त्या घेऊन शिस्तबद्ध पद्धतीने मार्गावरून चालत होते. 'बुद्धं शरणं गच्छामि', 'धम्मं शरणं गच्छामि' आणि 'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो' अशा घोषणांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या बुद्धांच्या विचारांचे दर्शन या मार्चमधून घडले. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शहरातील विविध मंडळ बुद्ध विहारांमधून अनुयायी एकत्र आले होते.कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खामगाव पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता."आजच्या धावपळीच्या आणि अशांततेच्या काळात बुद्धांचे विचारच जगाला तारणारे आहेत. खामगावातील या कॅन्डल मार्चच्या माध्यमातून आम्ही शांतता आणि बंधुत्वाचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे," अशी भावना एका आयोजकाने व्यक्त केली.रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या सोहळ्याची सांगता सामूहिक बुद्ध वंदनेने करण्यात आली. या उपक्रमामुळे खामगाव शहरात सामाजिक सलोख्याचे दर्शन घडले.1