Shuru
Apke Nagar Ki App…
नंदकिशोर साखरकर
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by नंदकिशोर साखरकर1
- *माहिती लपवल्याने संताप, मंठा तालुक्यात संभाजी ब्रिगेडचा एल्गार1
- तथागतांच्या शांतीचा संदेश आणि महामानवाच्या अस्थिधातूंचे दर्शन; बुलढाण्यात निघाली भव्य धम्म शांती रॅली.1
- मंठा तालुक्यातील टकले पोखरी येथे शॉर्टसर्किटमुळे शेतात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. टकले पोखरी येथील शेतकरी मनोहर लिंबाजी टकले यांच्या गट क्रमांक 135 मधील शेतात अचानक शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीने काही वेळातच विकराळ रूप धारण करत शेतातील साहित्य जळून खाक झाले. या दुर्घटनेत तुषार संच, ठिबक संच तसेच पेरणीसाठी नुकतेच आणलेले सुमारे 35 बॅग रासायनिक खत जळून पूर्णतः नष्ट झाले. याशिवाय शेतीसाठी वापरण्यात येणारे अवजारे, पेट्रोल फवारणी यंत्र आणि पत्र्याचे शेडही आगीत जळून खाक झाले आहे. या आगीमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, नुकसानीचा आकडा मोठ्या प्रमाणावर असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी तत्काळ मदत करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सदर घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, प्रशासनाकडून पंचनामा करून शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.1
- खामगाव : लग्नाची खरेदी करण्यासाठी आलेल्या एका शेतकरी कुटुंबाची गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला खामगाव शहर पोलिसांनी २४ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून १ लाख २८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. खामगांव तालुक्यातील निरोड येथील रहिवासी विठ्ठल मंठाजी मार्कंड हे शेती करतात. भावाच्या मुलीचे लग्न असल्याने ते सहकुटुंब खामगाव शहरात खरेदीसाठी आले होते. मुख्य बाजारपेठेत गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पत्नीच्या पर्समधून ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. कष्टाच्या पैशातून घेतलेले दागिने चोरीला गेल्याने मार्कंड कुटुंब हवालदिल झाले होते.विठ्ठल मार्कंड यांच्या तक्रारीवरून खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 'मिशन परिवर्तन' अंतर्गत तपासाची चक्रे वेगाने फिरवत, तांत्रिक माहिती आणि गोपनीय खबऱ्यांच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. या तपासात सतीष नंदु शेळके (वय ३२, रा. असोला रोड, सिंदखेड राजा) याचे नाव निष्पन्न झाले. तो अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे धाव घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण मुद्देमाल १ लाख २८ हजार १९९ रुपये जप्त करण्यात आला. ही धाडसी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या आदेशानुसार करण्यात आली. या पथकात सपोनि विकास पाटील, पोहेकॉ भिमराव वानखेडे, प्रदिप मोठे, सागर भगत, पोकों अंकुश गुरूदेव, राहुल थारकर, राम धामोडे आणि गणेश कोल्हे यांचा समावेश होता. लग्नाचे दागिने परत मिळाल्याने मार्कंड कुटुंबाने पोलिसांचे आभार मानले आहेत.1
- निर्भिड पत्रकार गजानन धंदरे साहेब यांचा वाढदिवस साजरा.... राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वतीने....फळे व बिस्किटे चे वाटप1
- बुलढाणा पुलिस अधीक्षक निलेश तांबे का संदेश जनगणना के ताल्लुक से1
- संभाजी ब्रिगेडच्या जनआंदोलनाचा दुसरा दिवस मंठा तालुक्यातील ग्रामपंचायत मधील ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत वारंवार मागणी करूनही उपलब्ध करून न दिल्यामुळे तसेच माहिती दडविण्याच्या प्रकाराविरोधात आज दिनांक १ मे, महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने पंचायत समिती मंठा कार्यालयासमोर तीव्र आंदोलनास सुरुवात करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले असून, १३ एप्रिल व २४ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या निवेदनांनंतरही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, मंठा तालुक्यातील काही ग्रामपंचायत अधिकारी मुख्यालयी वास्तव्यास नसतानाही ग्रामसभेचे ठराव लपवून किंवा खोटे सादर करून भाडे भत्ता घेत आहेत. हा प्रकार केवळ प्रशासकीय गैरव्यवहार नसून आर्थिक अनियमितता असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. यास पंचायत समिती स्तरावरून पाठीशी घालण्यात येत असल्याचाही आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. माहितीचा अधिकार अधिनियम २००५ व भारतीय संविधानातील कलम १९(१)(अ) नुसार नागरिकांना माहिती मिळविण्याचा अधिकार असताना देखील संबंधित प्रशासनाने माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने हा संघर्ष उभा राहिल्याचे सांगण्यात आले. संभाजी ब्रिगेडने प्रशासनास अंतिम इशारा देत तात्काळ ग्रामसभेतील ठरावांच्या सत्यप्रत उपलब्ध करून देणे, दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करणे तसेच माहिती दडविणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, आंदोलन शांततामय व लोकशाही मार्गाने सुरू असले तरी प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी पंचायत समिती प्रशासन जबाबदार राहील, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.1