Shuru
Apke Nagar Ki App…
दि. 14 एप्रिल परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व महामानवाला अभिवादन
Ramesh Mulgir
दि. 14 एप्रिल परभणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन व महामानवाला अभिवादन
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Ramesh Mulgir1
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक - प्रदीप भाऊ वावळे1
- परभणी, दि. १४ एप्रिल : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज मंगळवारी परभणी येथील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच हजारो भीम अनुयायी व नागरिकांनी येथे हजेरी लावत महामानवाला अभिवादन केले. यावेळी उपस्थित बांधवांनी सामूहिक बुद्ध वंदना म्हणत परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. तसेच भिमसैनिकांनी घोषणाबाजी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करत मानवंदना दिली.1
- Post by Mohsin ahmed khan1
- मंठा (जि. जालना) — मंठा तालुक्यातील नाफेड खरेदी केंद्रांवर सोयाबीन, हरभरा व तूर खरेदी प्रक्रियेदरम्यान शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब खवणे यांनी तहसीलदार यांना सविस्तर निवेदन सादर करून तात्काळ चौकशी व कडक कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित खरेदी केंद्रांवर हमाली व चाळणीच्या नावाखाली प्रति क्विंटल ₹140/- इतकी रक्कम शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने वसूल केली जात आहे. प्रत्यक्षात, किमान आधारभूत किंमत (MSP) अंतर्गत होणाऱ्या खरेदी प्रक्रियेमध्ये हमाली, चाळणी, साठवणूक यांसारखे सर्व खर्च शासनाकडून संबंधित खरेदी संस्थांना दिले जातात. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे अतिरिक्त रक्कम वसूल करणे हे नियमबाह्य व बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, चाळणी प्रक्रियेदरम्यान खाली पडणारा शेतमाल तसेच धान्य उतरवताना होणारी गळती ही देखील केंद्राकडून अनधिकृतपणे घेतली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत असून त्यांच्या मालकी हक्कावर अतिक्रमण होत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. या सर्व प्रकारांमुळे शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या MSP चा पूर्ण लाभ मिळत नसून आर्थिक फसवणूक होत आहे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे उघड उल्लंघन होत असल्याने हा प्रकार भारतीय दंड संहितेअंतर्गत फसवणूक व अपहाराच्या गुन्ह्यांत बसणारा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडे सर्व नाफेड खरेदी केंद्रांची तात्काळ संयुक्त चौकशी करावी, शेतकऱ्यांकडून वसूल केलेली ₹140/- प्रति क्विंटल रक्कम परत करावी, चाळणीदरम्यान खाली पडणारा शेतमाल शेतकऱ्यांना परत देण्याबाबत सक्त आदेश द्यावेत, संबंधित केंद्र चालक, ठेकेदार व जबाबदार अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभी करावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल न घेतल्यास संभाजी ब्रिगेड व शेतकरी बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.1
- जालन्यात गोदापात्रात शेतकऱ्यांचे सुरू असलेले जलसमाधी आंदोलन स्थगित सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि गोदावरी नदीच्या महापुरामुळे मोठे नुकसान सहन करावे लागलेल्या शेतकऱ्यांनी आता शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. गुंज बुद्रुक येथे शेकडो शेतकरी सोमवारी सकाळपासून थेट गोदावरीच्या पाण्यात उतरले आणि जलसमाधी आंदोलन सुरू केले. युवा शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू केलं होतं मागण्या मान्य; आंदोलन स्थगित दरम्यान, प्रशासनाकडून मागण्यांच्या पूर्ततेबाबत लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर युवा शेतकरी संघर्ष समितीने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. घनसावंगी चे तहसीलदार रमेश पागोटे व गटविकास अधिकारी प्रदीप यांच्या मार्फत संबंधित पत्र स्वीकारण्यात आले. या निर्णयानंतर शेतकरी व ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत “शेतकरी एकजुटीचा विजय असो” अशा घोषणा दिल्या. गुंज परिसरातील या आंदोलनाने प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले असून, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.1
- Post by अशोक दगडू वाघमारे3
- दिव्यांग संघटनेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी1