Shuru
Apke Nagar Ki App…
Nagesh Awachar
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Sharad Dayedar1
- दारव्हा पंचायत समिती परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारण्यासाठी जी.प. यवतमाळ अंतर्गत तब्बल १३ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले. मात्र ही व्यवस्था सध्या धूळ खात पडलेली असून नागरिकांना तिचा कोणताही लाभ मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ चा फलक परिसरात लावण्यात आला आहे. तरीही प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू नसल्याने ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना फेब्रुवारी आणि मार्च महिने उलटून गेले तरी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत असून, “उन्हाळ्यात नाही तर मग पावसाळ्यात थंड पाणी देणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. योजनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या छायाचित्रांसह फलक लावलेले असताना प्रत्यक्षात सुविधा बंद असल्यामुळे हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद विठ्ठलराव मुधाने (लोकसभा अध्यक्ष, यवतमाळ-वाशीम) यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती दारव्हा येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी घनश्याम चव्हाण, गजानन चव्हाण, राजू पेटकर, निलेश राठोड, गणेश राठोड, जे. एन. कांबळे, सौरव चव्हाण, प्रशांत ठाणे, दशरथ शेंदूरकर, योगेश भभूतकर, सदानंद खिल्लारे, ज्ञानेश्वर मेश्राम, शंकर धवणे, पी. एस. बरडे, रविंद्र गजभिये, संतोष इंगोले, नामदेव घोडाम, अशोक मुजमुले, पी. व्ही. निचळे, राहुल मुधाने, अजाबराव ढवळे, अमोल रुणवाल, एकनाथ तायडे, अरुण सोनोने, अंकुश उजवणे, ओम कटके आदींच्या सह्या असलेले निवेदन सादर करण्यात आले.1
- Post by Amravati News Update1
- जळका पटाचे येथे गाड्या ओढण्याची अनोखी धार्मिक परंपरा भक्तिभावात संपन्न प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे धामणगांव रेल्वे तालुक्यातील जळका (पटाचे) येथे हनुमान जयंतीच्या पौर्णिमेनिमित्त दरवर्षी पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा भव्य गाड्या ओढण्याचा धार्मिक सोहळा यंदाही भक्तिभाव व उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षांपासून अखंड सुरू असलेली ही अनोखी परंपरा आजही गावकऱ्यांनी श्रद्धेने जपून ठेवली असून या सोहळ्यासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला गावातील आराध्य दैवत श्री लक्ष्मी माता व तेलंगा माता देवस्थान परिसरात विशेष धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. चैत्र महिन्यातील या पवित्र रात्री पारंपरिक बंडीगाड्या ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडतो. गावातीलच नव्हे तर परिसरातील तसेच दूरवर वास्तव्यास असलेले ग्रामस्थही या दिवशी खास गावात येऊन उत्सवात सहभागी होतात. या परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे गाड्यांना कोणत्याही प्रकारचे बैल किंवा यंत्रसामग्री जोडलेली नसते. दहा ते त्यापेक्षा अधिक बंड्या एकमेकांना बांधून त्यावर मोठ्या संख्येने भाविक बसवले जातात. प्रत्येक बंडीवर सुमारे २५ ते ३० तसेच काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक भाविक बसलेले असतानाही गाड्या पुढे सरकत असल्याने हा सोहळा पाहणाऱ्यांसाठी विशेष आकर्षण ठरतो. गावकऱ्यांच्या श्रद्धेनुसार भगत श्री पंडित दामाजी कंगाले यांच्या अंगात देवीचा संचार होऊन गाड्या पुढे सरकतात, अशी मान्यता आहे. पिढ्यान्पिढ्या त्यांच्या कुटुंबीयांनी देवीची सेवा केल्यामुळे ही दैवी शक्ती त्यांच्या परिवाराला लाभल्याचा भाविकांचा विश्वास आहे. त्यामुळे हा सोहळा केवळ परंपरा नसून श्रद्धा, भक्ती आणि आध्यात्मिक एकतेचे प्रतीक मानला जातो. उत्सवानिमित्त लक्ष्मी माता व तेलंगा माता पूजन, धार्मिक विधी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर समिती व भक्तगण यांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला. हनुमान जयंतीनंतरच्या दिवशी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण गावातील सर्व समाजबांधव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात, ही या परंपरेची खरी ताकद आहे. श्रद्धा, परंपरा आणि ग्रामएकतेचे प्रतीक असलेली जळका पटाचे येथील गाड्या ओढण्याची अनोखी प्रथा आजही भाविकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे.1
- उमरखेड तालुका के डेली पत्रकारों की SDO के जरिए मुख्यमंत्री से रिक्वेस्ट उमरखेड पुलिसवालों ने धदास 007 YouTube चैनल के एडिटर अमित देशमुख के खिलाफ कार्रवाई की है। उन्होंने शहर और तालुका में गैर-कानूनी धंधों को रोकने और कानून-व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस सुपरिटेंडेंट से शिकायत की थी। उमरखेड तालुका के डेली अखबारों के प्रतिनिधियों ने सब-डिविजनल अधिकारियों के जरिए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक मेमोरेंडम भेजा है, जिसमें पुलिस द्वारा दर्ज किए गए कई गंभीर अपराधों को वापस लेने की मांग की गई है। पूरी जानकारी इस तरह है: 12 मार्च को रात 9:30 बजे, धदास 007 YouTube चैनल के एडिटर अमित देशमुख को एक व्यक्ति का फोन आया जो पत्रकार बनकर शिकायत दर्ज कराने उमरखेड पुलिस स्टेशन आया था। थानेदार शंकर पांचाल और उसके कुछ साथियों ने अमित के खिलाफ जातिगत झगड़े कराने की साजिश रची। यू ट्यूब चैनल के माध्यम से सोशल मीडिया पर खबरें फैलाने वाले देशमुख के खिलाफ सरकारी काम में व्यवधान डालने जैसे गंभीर प्रकृति के अपराध आधी रात को ही दर्ज किए गए हैं। समाचार पत्र में अवैध कारोबार के खिलाफ खबर प्रकाशित करने वाले प्रतिनिधियों के खिलाफ भी इसी तरह के झूठे आरोप दर्ज होने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता है। उमरखेड तालुका के दैनिक समाचार पत्रों के प्रतिनिधियों ने उप विभागीय अधिकारी सखाराम मुले के जरिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को ज्ञापन भेजकर अमित देशमुख के खिलाफ निष्पक्ष जांच और आरोप वापस लेने की मांग की है। इस दौरान दैनिक समाचार पत्र वार्ताहार एसोसिएशन के अध्यक्ष साहेबराव धात्रक, महात्मा फुले पत्रकार संघ के अध्यक्ष संतोष मुडे, विभागीय क्षेत्रीय दैनिक पत्रकार संघ की अध्यक्ष श्रीमती सविता चंद्रे उपस्थित थीं। विशाल माने, अरुण बेले, भीमराव नागरे, अविनाश मुन्नारवार, अजरउल्लाह खान, ज्ञानेश्वर ठाकरे, संभाजी भोईर, वसंत देशमुख, ताहिर मिर्जा, संतोष कलाने, संजय देशमुख, विजय अडे, दत्तात्रेय देशमुख, राजू गायकवाड़, स्वप्निल मग रे, सुनील ठाकरे और अन्य लोगों के पिटीशन पर सिग्नेचर हैं।1
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by JKV NEWS 241
- Post by Sharad Dayedar1