Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धावत्या बसला आग प्रकरणी ५ कर्मचाऱ्यांवर निलंबन नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे पळसे टोलनाक्यावर धावत्या एसटी बसला आग लागल्याच्या प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोलापूरहून नाशिककडे येणाऱ्या बसला अचानक आग लागली होती. चालक विलास चोले यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आग विझवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. नाशिक विभागातील बस पेटण्याची ही तिसरी घटना होती. याप्रकरणी हेड मॅकेनिक, सहायक, असीस्टंट वर्कशॉप सुपरवायझर, हेल्पर व इलेक्ट्रीशीयन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.या घटनेची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
Kapil Katyare
नाशिक:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धावत्या बसला आग प्रकरणी ५ कर्मचाऱ्यांवर निलंबन नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे पळसे टोलनाक्यावर धावत्या एसटी बसला आग लागल्याच्या प्रकरणी पाच कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. सोलापूरहून नाशिककडे येणाऱ्या बसला अचानक आग लागली होती. चालक विलास चोले यांनी प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. आग विझवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. नाशिक विभागातील बस पेटण्याची ही तिसरी घटना होती. याप्रकरणी हेड मॅकेनिक, सहायक, असीस्टंट वर्कशॉप सुपरवायझर, हेल्पर व इलेक्ट्रीशीयन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.या घटनेची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करण्यात आली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नालंदा दुष्कर्म में न्याय दिलाने पहुंचे पासवान नेता और पुलिस में हुई भिड़ंत,पीड़ित से मिलने को रोका.1
- नाशिक:दिंडोरी शहरात स्नेहसंमेलनावरून परतत असताना कार उघड्या विहिरीत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ७ विद्यार्थी व २ पालकांचा समावेश आहे. रात्री १० वाजता शिवाजीनगर भागात हा अपघात झाला. अग्निशमन व आपत्ती पथकाने तीन क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली. गुदमरून व बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.1
- येवला शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. मात्र, वाहतूक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात येत असून, शनिवारी गोपीनाथ मुंडे चौक हुडको कॉर्नर ते विंचूर चौफुलीपर्यंत अवजड वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात घेतलेल्या बैठकीनंतर हे निर्बंध लादण्यात आले होते. परंतु, भरदिवसा पोलीसच ही वाहने सोडत असल्याचा आरोप करत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर परिस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे गट) जिल्हा उपप्रमुख अमोल शिंदे व गटनेते गणेश शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरून वाहतूक सुरळीत केली. यावेळीशिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अमोल शिंदे व शिवसेना गटनेते गणेश शिंदे तसेच शिंदे फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अडकलेल्या प्रवाशांना पिण्याच्या पाण्याचे वाटप करून दिलासा दिला. प्रशासकीय नियोजनाचा फज्जा उडाला असून, आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या यंत्रणेवर जिल्हाधिकारी आता काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- ठाणे:मुरबाड तालुक्यातील टोकावडे मोरोशी, शिरोशी ,धसई विभागात गुरुवारी (तारीख २ एप्रिल) सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार वारा वादळ व पाऊस पडला यामुळे या विभागातील विट उत्पादक, भाजीपाला व आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या मोठ्या प्रमाणात पडून मोरेश्वर मोरे (खेड ) प्रकाश पवार (टोकावडे ) सुभाष भोईर (सोनावळे ) ह्या व इतर आंबा, चिकू उत्पादकांचे फार मोठे नुकसान झाले आहे तसेच वीट उत्पादकांचे मातीच्या विटा भिजल्याने व भाजीपाला उत्पादकांचे फार मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी सांगितले आहे - वरील सर्व नुकसानीची माहिती तात्काळ व्हाट्सअपद्वारे ठाणे जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे, मुरबाड कृषी अधिकारी संदीप केणे, तहसीलदार अभिजीत देशमुख ,नायब तहसीलदार अमोल शिंदे यांना प्रकाश पवार यांनी व्हाट्सअप व फोनद्वारे कळवून झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे मागणी केली आहे.4
- चोंढे बु.ता.शहापुर येथे हनुमान जयंती उत्साहात संपन्न ,सर्व ग्रामस्थ ऐकञ येवून हनुमान जयंतीचा कार्यक्रम अगदी यशस्वीपणे सर्व तरुन वर्गाने पार पाडला या कार्यक्रमात सकाळी हनुमंताचे अभिषेक,रामनाम जप, सायंकाळी पालखी सोहळा संपन्न झाला.या पालखी सोहळ्यात राम,लक्षमण ,सिता,व हनुमान यांचे देखावे हे कार्यक्रमाचे केंद्र बिंदु ठरले.व संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कार्यक्रमासाठी आलेले सर्व नागरीकांना सुंदर भोजन व्यवस्था केली होती तसेच खातळेकर महाराज आळंदी यांची किर्तन सेवा ,व ग्रामस्थांचे जागर भजन होवून कार्यक्रमाची सांगता झाली.3
- Post by Sachin Waghe1
- नशे में ‘हंगामा क्वीन’ बनी युवती: टोल प्लाजा पर तोड़ी बैरिकेडिंग, वायरल वीडियो ने खोली पोल" झाँसी :- झाँसी के लुहारी टोल प्लाजा पर उस वक्त तमाशा बन गया जब नशे में धुत एक युवती ने सरेआम हंगामा काटते हुए मर्यादा की सारी सीमाएं लांघ दीं। अपने आपको, लड़की हूँ, लड़ सकती हूँ की ब्रैंड एम्बेसडर समझ कर सड़क पर उतरी इस “पापा की परी” ने, न सिर्फ राहगीरों को परेशान किया, बल्कि टोल की बैरिकेडिंग तक तोड़ डाली। बताया जा रहा है कि युवती अपनी महिला डांसर साथियों के साथ कार्यक्रम से लौट रही थी और मोबाइल गुम होने के शक में बेकाबू हो गई। लेकिन सवाल ये है कि क्या नशा अब बदतमीजी का लाइसेंस बन चुका है? वीडियो वायरल होते ही यह मामला चर्चा में आ गया है। हैरानी की बात ये कि घटना के बाद भी कोई शिकायत दर्ज नहीं हुई, लेकिन अब पुलिस हरकत में आई है। #viralvideo #breakingnews #viral #FYPIndia #istagram1
- ठाणे:शहापूर तालुक्यातील मौजे नांदगाव येथे हनुमान जन्मोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाला प्रथमच संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र येऊन हनुमान जन्मोत्सव साठी मोठी तयारी केली होती ,प्रत्येक घराच्या समोर रांगोळ्या काढून ,रस्ते सुंदर पद्धतीने स्वच्छ केले होते. सकाळी अभिषेक व रात्री पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते, यावेळी गावातील बाळ गोपाळ यांनी राम सीता लक्ष्मण ,हनुमंत व वानर सेनेचे मुखवटे धारण करून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. गावातील सर्व देवस्थानाची भेट घेऊन पालखी सोहळ्याची हनुमान मंदिर येथे सांगता करण्यात आली. या सोहळ्यास गावातील अबाल वृद्ध तरुण व बाहेरगावी असलेले असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोहळा अभूतपूर्वक करण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या सर्व तरुण वर्गाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.1