Shuru
Apke Nagar Ki App…
परभणीच्या पोलीस मुख्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पोलीस दलातील 31 वाहनांच लोकार्पण
Mohsin ahmed khan
परभणीच्या पोलीस मुख्यालयात पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते पोलीस दलातील 31 वाहनांच लोकार्पण
More news from Maharashtra and nearby areas
- नारीशक्ती वंदन विधेयक संसदेत विरोधकांनी हाणून पाडल्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. येत्या काळात नारीशक्ती विरोधकांना चोख प्रतित्तर देईल, असा विश्वास व्यक्त केला.1
- Post by Jafar tarodekar1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक २३ एप्रिल रोजी नांदेड: स्थानिक प्रशासनाच्या कमालीच्या दुर्लक्षामुळे नांदेडकरांना आता आपल्या प्राणांची भीती वाटू लागली आहे. वारंवार तक्रारी करूनही नाल्यांवरील झाकणे बसवली जात नसल्याने, शहरात अपघातांची मालिका सुरूच आहे. मालेगाव रोडवरील जैन मंदिराजवळ आज पुन्हा एक गाय उघड्या नाल्यात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाव रोड परिसरातील नाल्यांवर गेल्या अनेक दिवसांपासून झाकणे नाहीत. आज सकाळी एक गाय या नाल्यात पडली आणि गंभीर जखमी झाली. स्थानिक नागरिक, व्यापारी, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत महापालिका प्रशासनाला आणि फायर ब्रिगेडला पाचारण केले. अथक परिश्रमानंतर या गाईला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. नागरिकांचा रोष: प्रशासन झोपले आहे का? या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. "महानगरपालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना वारंवार विनंती करूनही या नाल्यावर झाकण का बसवले जात नाही?" असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. यापूर्वीही याच ठिकाणी लहान मुले, वृद्ध नागरिक आणि अनेक मुकी जनावरे पडून जखमी झाली आहेत. प्रशासकीय कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह एकीकडे स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे साध्या नाल्यांवरील झाकणेही बसवता येत नाहीत, यावरून प्रशासकीय अनास्था दिसून येते. नागरिकांच्या आणि मुक्या जनावरांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबणार कधी? झोपलेले अधिकारी आणि कर्मचारी आतातरी जागे होणार का? अशा प्रश्नांची सरबत्ती सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे. जर भविष्यात अशा उघड्या नाल्यांमुळे एखादा मोठा अनर्थ घडला, तर त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.1
- छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – बजाजनगर परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील साई श्रद्धा पार्कमध्ये आज (दि. २२ एप्रिल २०२६) दुपारी एका महिलेची तिच्याच घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत महिलेचे नाव साधना महेंद्र सोनपेटकर (वय ४०) असे असून आरोपी महिला शैला सोनार (वय ४५) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी शैला सोनार ही अचानक साधना सोनपेटकर यांच्या घरी घुसली आणि सोबत आणलेल्या धारदार चाकूने त्यांच्यावर सपासप वार केले. हल्ला अत्यंत भीषण असल्याने साधना यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपी महिलेला पोलिसांनी रंगेहात पकडले. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि एक एअरगन (पिस्तूल) जप्त केली आहे. झटापटीदरम्यान आरोपी शैला सोनार हिला देखील किरकोळ दुखापत झाली असून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात ही हत्या वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात असला तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.1
- साखळी भीषण अपघातात ११ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू व्हिडिओ भाग २ उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक रस्ते अपघात घडला असून, या दुर्घटनेत तब्बल ११ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. एक भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरून जात असलेल्या बोलेरोसह इतर काही वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की बोलेरो वाहनाला तत्काळ आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण आगीत बोलेरोमधील ११ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. त्याचा भाग 2 व्हिडिओ1
- नांदेड : आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून नांदेड शहरात आज सकाळपासून वातावरण तापलेले दिसून आले. विविध समाजघटकांच्या वतीने उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली असून, हे आंदोलन मोठ्या प्रमाणावर आणि जोरदार पद्धतीने सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या देशात भाजपची सत्ता असतानाही आरक्षणाचे उपवर्गीकरण होत नसल्यामुळे संबंधित समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. आंदोलनस्थळी उपोषणकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला. आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की, आरक्षणाचा लाभ सर्व घटकांपर्यंत समतोलपणे पोहोचण्यासाठी उपवर्गीकरण अत्यावश्यक आहे. मात्र, याबाबत अद्याप ठोस निर्णय होत नसल्याने त्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. या उपोषणामुळे नांदेड शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आगामी काळात या आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे1
- Post by Mohsin ahmed khan1
- क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात आज गुरुवार 23 एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, या जयंती महोत्सवात धम्मदेसना पुज्यभन्ते मोग्गलायन , पुज्यभन्ते एस संघमित्र यांनी दिली, यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे चौधरी, टेहरे मॅडम, कुपटेकर, लहामगे, शेळके, उक्कडगावकर, कुलकर्णी, माकळे, प्रदीप वावळे, आशाबाई मालसमीनदर , द्वारकाबाई गंडले, संयुक्त जयंती उत्सव समितीचे , बबन अंभोरे, मारुती शिंदे, राजू पाचपोर, आकाश खिल्लारे,आदींसह सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी कंत्राटदार उपस्थित होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा गेव्हारे मॅडम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन इंजिनीयर दीपक कुपटेकर यांनी केली1
- साखळी भीषण अपघातात ११ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक रस्ते अपघात घडला असून, या दुर्घटनेत तब्बल ११ जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. एक भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने रस्त्यावरून जात असलेल्या बोलेरोसह इतर काही वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की बोलेरो वाहनाला तत्काळ आग लागली. काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या भीषण आगीत बोलेरोमधील ११ जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला.1