Shuru
Apke Nagar Ki App…
धुळ्यात श्रीराम फाउंडेशनच्या वतीने वराह जयंती पूजन सोहळा संपन्न झाला.
नव दर्पण
धुळ्यात श्रीराम फाउंडेशनच्या वतीने वराह जयंती पूजन सोहळा संपन्न झाला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जळगांव पाचोरा में पत्रकार पर हमले का आरोप | निष्पक्ष जांच की मांग1
- "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" "नवापूर स्थानकावर टॉयलेटला ठोकले 'कुलूप'; हक्काच्या सुविधेसाठी महिला प्रवाशांची ससेहोलपट!" नवापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सुविधांसाठी प्रशासनाने टॉयलेट (शौचालय) बांधले खरे, परंतु ते वापरण्यायोग्य नसल्याने अथवा त्याला नेहमी कुलूप ठोकलेले असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वरील या सुविधेकडे रेल्वे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष झाले असून, ऐन प्रवासाच्या वेळी महिला आणि वृद्ध प्रवाशांची तुफान ससेहोलपट होत आहे. कुलूपबंद सुविधा, प्रवाशांची अडचण: नवापूर स्थानकातून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. परंतु प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि ३ वर बनवण्यात आलेले स्वच्छतागृह नेहमी कुलूपबंद स्थितीत पहायला मिळते. 'टॉयलेट असूनही वापरता येत नाही' अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. महिला व वृद्धांना मोठा मनस्ताप: लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान ट्रेनची वाट पाहणाऱ्या महिला प्रवाशांना, लहान मुलांना आणि वयोवृद्धांना प्रातर्विधी व स्वच्छतेसाठी कुठे जावे, असा गंभीर प्रश्न पडला आहे. प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे महिलांना प्रचंड संकोच आणि त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्वच्छतेचा फज्जा आणि दुर्गंधी: एका बाजूला टॉयलेटला कुलूप असल्याने परिसर अस्वच्छ राहतो, तर दुसऱ्या बाजूला उघड्यावर जाण्याशिवाय प्रवाशांकडे पर्याय उरत नाही, ज्यामुळे स्टेशन परिसरात अस्वच्छता पसरत आहे. प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष: प्रवाशांनी यासंदर्भात अनेकदा तोंडी तक्रारी करूनही रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही. "अशा सुविधा जर बंदच ठेवायच्या असतील तर त्या बांधल्या कशासाठी?" असा संतप्त सवाल स्थानिकांकडून आणि प्रवाशांकडून विचारला जात आहे. प्रवाशांची मागणी: नवापूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म १ आणि ३ वरील कुलूपबंद टॉयलेट्स तात्काळ उघडून ते स्वच्छ व वापरायोग्य करण्यात यावेत. प्रशासनाने याप्रकरणी लवकरात लवकर योग्य ती पावले न उचलल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिक प्रवाशांनी दिला आहे.3
- कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त*....... * कारची काचा फोडून चोरलेले सहा लाख रुपये केले जप्त* -------------------------- -:बदनापूर पोलिसांची कारवाई बदनापूर शहरातील SBI बँकेतून दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी - नामे विष्णु कुंडलीकराव कोल्हे रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना यांनी 10 लाख रुपये काढून आपल्या कारमध्ये घेऊन जात असताना त्यावर चोरट्यांनी पाळत ठेवून फिर्यादीच्या कारचा पाठलाग करून धोपटेश्वर शिवरातील धोपटेश्वर ते देवगाव रोडवर आपली कार उभी करून शेतात जाऊन परत आले असता कारच्या मागील दरवाजाचे काच तुटलेले दिसले असता गाडीतील रक्कम दिसेनाशी झाली. त्यानंतर फिर्यादी विष्णु कुंडलीकराव कोल्हे वय 49 वर्ष रा. धोपटेश्वर ता. बदनापूर जि. जालना हे पोलिस स्टेशन बदनापूर येथे येऊन रिपोर्ट दिल्यावरून अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एम. टी. सुरवसे, पोलिस निरीक्षक बदनापूर यांनी तत्काळ सूत्र हाती घेऊन २ टीम तयार करून गुन्ह्याच्या तपासामध्ये CCTV फुटेज चेक केले तसेच तांत्रिक तपास केला असता एक मोटार सायकल वर दोन चोरट्यांनी कारचा पाठलाग करून कारची काच फोडून पैसे चोरून नेल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हे 1) गुंजी चालराजु जबराज 2) गुड्डेटी विनोत प्रभुदास दोन्ही रा. कपरला टिपा. ता. बिटरगुंटा जि. नेल्लोर राज्य आंध्रप्रदेश येथील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, या आरोपीस अटक करणे कामी तपास पथक यांना आंध्र प्रदेश येथे रवाना करून आरोपी चा शोध घेतला असता मिळून आला नाही, परंतु त्याच्या राहत्या घरातून चोरीस गेलेले 6 लाख रुपये जप्त करण्यास तपास पथक यांना यश प्राप्त झाले आहे. बाकी आरोपी व उर्वरीत रक्कम यांचा शोध घेणे कामी पथक रवाना करण्यात आले आहेत. सदरची कारवाई मा. श्री. तेघबिर सिंह संधु साहेब, पोलीस अधीक्षक जालना, मा. विक्रम साळी साहेब, अपर पोलीस अधीक्षक साहेब जालना, मा. अनंत कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, जालना यांचे मार्गदर्शनाखाली १) एम. टी. सुरवसे, पोलिस स्टेशन पोलीस ठाणे बदनापूर, २) पोउपनि एस. आर.कुकलारे, ३) पोहेकॉ/671 ए.एस.दासर, ४) पोको/227 भडंगे, ५) पोको/342 पी. के. गोलवाल, ६) पोको/1699 एस. जे. तडवी यांनी केली आहे.1
- येवल्यात श्री गजानन महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन भाद्रपद शुद्ध पंचमी (ऋषीपंचमी) निमित्त श्री गजानन महाराज मंदिर, दत्तनगर (विंचुर रोड, येवला) येथे श्री गजानन महाराज यांच्या संजीवन समाधी दिनाचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले. दिवसाची सुरुवात सकाळी ६.३० वाजता श्रीं ना महावस्त्र अर्पण आणि महाअभिषेक पूजेने झाली. सकाळी ७.३० वाजेपर्यंत पार पडलेल्या या अभिषेकानंतर दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. सायंकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत श्रीं ची बावन्नी, महाआरती आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन आणि स्वागत हिरालाल नारायणसा बाकळे, दिगंबर नारायणसा बाकळे व समस्त बाकळे परिवार (येवला) यांच्या वतीने करण्यात आले होते. तसेच या कार्यक्रमास वक्रतुंड बिल्डर्स & डेव्हलपर्स (येवला व कोपरगाव) आणि इंजि. ऋषिकेश हिरालाल बाकळे यांचे सहकार्य लाभले. श्री गजानन महाराजांच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात सर्व कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- बोरगाव सारवणीत राज्यमंत्री दर्जा प्राप्त मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांचा भव्य नागरी सत्कार | AQS NEWS इनामूल उलूम उर्दू हायस्कूलच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन; मा. श्री. इद्रिसजी मुलतानी यांची उपस्थिती | AQS NEWS1
- माजी मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड शहरात तरुणांच्या रोजगारासाठी पैठणी उद्योग सुरू करणार कापसे पैठणी कंपनीला भेट सिल्लोड सोयगाव मतदार संघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी येवला येथील कापसे पैठणी उद्योग येथे भेट देत पैठणी उद्योगाची माहिती घेतली1
- 🌊 जायकवाडी व मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर विविध प्रमुख मागण्यांसाठी नागरिक आणि आंदोलक एकवटले1
- तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन. गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष. तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन... गुलालविरहित, सनई चौघड्याच्या निनादात भावपूर्ण निरोप दिला.. मराठी पत्रकार संघाच्या अनेक वर्षाची परंपरा कायम, विसर्जन मिरवणूने वेधले लक्ष.... तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. दीड दिवसाचा गणरायाची ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या निवासस्थानी स्थापना करण्यात आली. मंगळवारी तळोदा स्मारक चौकापासून सनईच्या सुरात, चौघड्याच्या निनादात, बाप्पाची पालखीतून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत गुलाल विरहित फूल पाकळ्यांची उधळण करण्यात येत होती. मिरवणुकीत नगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, माजी मंत्री ॲड पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे योगेश चौधरी, शिवसेना विपुल कुलकर्णी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, बापू कलाल, भाजपाचे गौरव वाणी, नगरसेवक शिरीष माळी, सुरज माळी,नगरसेवक कपिल कर्णकार, योगेश पाडवी, अनिल पवार, शैलेश अहिरे भूषण सोनार, श्याम सोनागडवाला, सामाजिक राजकीय मान्यवरांसह पोलिस उपनिरीक्षक गुलाबसिंग पावरा, वाहतूक शाखेचे संदीप महाले, महेश महाले, होमगार्ड यशवंत कुकावलकर मिरवणुकीत सहभाग घेतला. विसर्जन मिरवणुकीत पत्रकार दत्तात्रय सूर्यवंशी, भरत भामरे, सुनील सूर्यवंशी, वसंत मराठे, किरण पाटील, महेंद्र लोहार, कैलास पाडवी, नरेश चौधरी, सम्राट महाजन, हेमंत मराठे, वैभव कर्णकार, सुशील सूर्यवंशी, बापू गुरव, मानसिंग राजपूत आदींनी परिश्रम घेतले.1
- सिल्लोड वडोद चाथा येथे विजेचा शॉक लागून एकाचा मृत्यू सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद सिल्लोड तालुक्यातील वडोद साठा येथे विजेचा धक्का लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरील घटने प्रकरणे सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाणे येथे नोंद घेण्यात आली आहे1