Shuru
Apke Nagar Ki App…
सुरगाणा तहसील कार्यालयावर भर पावसात श्रमजीवी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी ठिया आंदोलन करण्यात आले आहे. जोरदार पाऊस सुरू असतानाही आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू ठेवले.
Surekha Mohan Gangurde
सुरगाणा तहसील कार्यालयावर भर पावसात श्रमजीवी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी ठिया आंदोलन करण्यात आले आहे. जोरदार पाऊस सुरू असतानाही आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू ठेवले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सुरगाणा तहसील कार्यालयावर भर पावसात श्रमजीवी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी ठिया आंदोलन करण्यात आले आहे. जोरदार पाऊस सुरू असतानाही आंदोलकांनी तहसील कार्यालयासमोर एकत्र येत आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू ठेवले.1
- नाशिक जिल्ह्यातील येवला येथील श्रीराम अंजनी स्वामी मंदिर परिसरात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, नाशिक (ग्रामीण, उ.) तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यकर्त्यांनी श्रमदान आणि वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करत पर्यावरण संवर्धन व समाजसेवेचा संदेश दिला. या कार्यक्रमात भाजप युवा मोर्चाच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांप्रती निष्ठा व आदर व्यक्त करण्यासाठी हातावर मुख्यमंत्र्यांचा टॅटू काढला. कार्यकर्त्यांच्या या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र जोरदार चर्चा पाहायला मिळाली. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडीया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब गाडेकर, जिल्हा चिटणीस नानासाहेब, माजी तालुकाध्यक्ष राजू परदेशी, भाजप व्यापारी महासंघाचे गणेश दोडे, युवा नेते दिनेश परदेशी, युवराज पाटोळे, मिलन पाटील, अरुण आव्हाड, विक्रम बोराडे, संतोष नागपुरे, दीपक टकले, बाळासाहेब सातारकर, प्रथमेश गाडेकर, दत्ता सानप, गणेश गायकवाड, सुभाष वाघ, अरुण आहेर, संजय कुक्कर, बंडू क्षिरसागर आणि सचिन साबळे यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.4
- सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागात धावणाऱ्या नाशिक–करंजुल एसटी बसची अत्यंत दुरवस्था समोर आली आहे. पावसाळ्यात बसच्या छतामधून मोठ्या प्रमाणात पाणी गळत असल्याने प्रवाशांना चक्क बसमध्येच छत्री धरून प्रवास करावा लागत आहे. छताला अनेक ठिकाणी गळती लागल्याने आसनांवर पाणी साचत असून दररोज प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, शेतकरी, महिला, कामगार व ज्येष्ठ नागरिकांचे कपडे, पुस्तके आणि सामान भिजत आहे. बसमध्ये उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याने प्रवाशांना अत्यंत असुरक्षित वातावरणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आदिवासी भागात सातत्याने जुन्या, जीर्ण आणि भंगार बसेस पाठवल्या जात असल्याची तक्रार नागरिक अनेक वर्षांपासून करत आहेत. विकासाच्या मोठमोठ्या घोषणा होत असताना दुर्गम भागातील लोकांना मूलभूत सुविधांपासून वंचित ठेवून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याची तीव्र भावना व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी झोपलेत का असा सवाल करत श्री. गणेश एकनाथ महाले हट्टी यांनी राज्य सरकार आणि एसटी महामंडळाने नाशिक–करंजुलसह सुरगाणा तालुक्यातील इतर मार्गांवर तातडीने नवीन व सुस्थितीतील बसेस उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी केली आहे. गळक्या आणि निकृष्ट बसेसमुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असून प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.1
- बाढ उपविभागातील सम्यागड पंचायतीमध्ये असलेल्या आयुष्मान भारत आरोग्य केंद्राच्या जर्जर अवस्थेबाबत रोगी कल्याण समितीचे सदस्य रण विजय कुमार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आमदार अनंत कुमार सिंह यांची भेट घेतली. या शिष्टमंडळाने रुग्णालयातील डॉक्टरांची कमतरता, औषधांचा अभाव, इमारतीची दुरवस्था, तुटलेली स्टाफ क्वार्टर्स तसेच तातडीची (इमर्जन्सी) आणि रात्रीची सेवा सुरू करण्याची मागणी लावून धरली. याशिवाय, नियमित ड्युटी न करता पगार घेणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही आमदारांकडे करण्यात आली. या आरोग्य केंद्रावर सम्यागडसह आसपासच्या पाच पंचायतींमधील सुमारे २५ हजार लोकसंख्या उपचारासाठी अवलंबून आहे. आता या गंभीर समस्येवर आरोग्य विभाग आणि प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- नाशिकच्या जुन्या बिटको हॉस्पिटल परिसरात एकाच रात्री पाच दुकाने फोडून ₹१,१२,००० ची रोकड लांबवणाऱ्या सराईत चोरट्याला नाशिक गुन्हे शाखेच्या नाशिकरोड युनिटने अटक केली आहे. धन्ना रामलाल राठोड (वय ४०, रा. लक्ष्मी टॉकीजजवळ, मोंढा मार्केट, वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने आपल्या तीन साथीदारांसह ही चोरी केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ३०५, ३३१(३) आणि ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. १४ जुलै रोजी रात्री चोरट्यांनी जुन्या बिटको हॉस्पिटल परिसरातील एक भांडी दुकान, दोन मेडिकल, एक एजन्सी आणि एक मिठाईचे दुकान अशी पाच दुकाने फोडून १ लाख १२ हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. गुन्ह्याचा तपास करताना नाशिकरोड गुन्हे शाखेच्या पथकाने मानवी माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी रेल्वे स्थानक परिसरात फिरत असल्याची माहिती मिळवली. त्या आधारे सापळा रचून धन्ना राठोड याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली असून, त्याच्या फरार तीन साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत. ही धडाकेबाज कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोउनि संदीप पवार, ग्रेड पोउनि दिलीप भोई, पोह अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, राहुल जगझाप तसेच पोशि केतन सोनवणे, कुणाल घोरपडे, सुशांत दिघे आणि समाधान जाधव यांच्या पथकाने सहभाग घेतला.1
- दिल्लीत युथ काँग्रेस कार्यकर्त्यांवर झालेला लाठीहल्ला आणि खासदार राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ नाशिकमध्ये काँग्रेस व मनसेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार आंदोलन करण्यात आले. या कारवाईमुळे नाशिकमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आंदोलनादरम्यान शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. आंदोलकांनी सरकारच्या भूमिकेवर कडक शब्दांत टीका करत या कारवाईबाबत तीव्र निषेध व्यक्त केला असून परिसरात निषेधाची मोठी लाट पाहायला मिळाली.1
- नाशिकच्या भद्रकाली क्षेत्रात चालणाऱ्या कथित अवैध जुगार, मटका आणि सट्टा व्यवसायाविरोधात कारवाईच्या मागणीसाठी आवामी विकास पार्टीचे नाशिक शहर अध्यक्ष सरफराज पठाण यांनी पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. हे निवेदन पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि भद्रकाली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सुपूर्द करण्यात आले. या निवेदनात शहरातील कथित बेकायदेशीर उपक्रमांची सखोल चौकशी करून दोषी, संबंधित चालक आणि गरज भासल्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची तसेच गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- 'सेवा सप्ताह' निमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल येवला प्रखंड यांच्या वतीने अंगणगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाटावर विशेष स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरवासीयांना पर्यावरणपूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती स्थापन करण्याचे आणि प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळण्याचे आग्रही आवाहन या प्रसंगी करण्यात आले. या उपक्रमाला येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप मांडलिक, माजी नगरसेवक महेश काबरा, तसेच विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत विधी आयाम कृषी प्रमुख ॲड. शैलेश भावसार यांची प्रमुख उपस्थिती व सहकार्य लाभले. यावेळी प्रखंड सेवा विभाग प्रमुख साहिल बाबर, प्रखंड संयोजक गणेश काबरा यांच्यासह विहिंप व बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण रक्षणाचा संकल्प करावा, असा संदेश या कार्यक्रमाद्वारे देण्यात आला.1