logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

यावल मंडळ अधिकारी तलाठी कार्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरपरिषद फिल्टर हाऊसजवळ पिवळ्या मातीचा आणि वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच, नगरपरिषदेच्या मालकीची जागा तोंडी कराराने दुसऱ्या व्यक्तीला विकल्याची जोरदार चर्चा संपूर्ण यावल शहरात सुरू आहे, ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. सविस्तर माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत यावल शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मे. रा. यस. सी. आय. पी. यल अँड संदीप कंस्ट्रक्शन (जे.व्ही.) या ठेकेदाराद्वारे सुरू आहे. या कामाची मुदत २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असून, योजनेला १२ जुलै २०२४ रोजी तांत्रिक मान्यता, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता आणि २३ मे २०२५ रोजी निविदा कार्यादेश मिळाला आहे. तांत्रिक मंजूर किंमत ५६३५.६५ लक्ष, प्रशासकीय मंजूर किंमत ५६०३.०३ लक्ष आणि मूळ निविदा किंमत ४३८८.७७ लक्ष आहे. हे काम करत असताना, ठेकेदाराने यावल महसूल किंवा इतर मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या कार्यक्षेत्रातून पिवळी माती कोणत्या ठिकाणाहून उत्खनन करून फिल्टर हाऊसमध्ये आणली आणि ती किती ब्रास होती, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही माती वाहतूक करताना ठेकेदाराने यावल महसूलकडून रीतसर परवाना घेतला होता का आणि शासकीय रॉयल्टी भरली आहे का, याबाबतही विचारणा होत आहे. जर रॉयल्टी भरली नसेल, तर याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे, साठा केलेली वाळू कोणत्या परवानाधारक वाळू वाहतूकदाराकडून खरेदी करण्यात आली आणि हा वाळू साठा कोणाच्या परवानगीने करण्यात आला, यावरही अनेक प्रश्नचिन्हे आहेत. यावल नगरपालिकेच्या मालकीची फिल्टर हाऊस परिसरातील जागा तोंडी कराराने दुसऱ्या व्यक्तीला कोणी विकली, याबाबतही शहरात चर्चा सुरू आहे. या गंभीर प्रकरणांची संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास एक मोठा आर्थिक घोटाळा आणि महसुलाची रॉयल्टी बुडवल्याचे सत्य जनतेसमोर येईल, अशी जोरदार चर्चा यावलमध्ये आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी गट दोघेही या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

7 hrs ago
user_सुरेश जगन्नाथ पाटील.
सुरेश जगन्नाथ पाटील.
यावल, जळगाव, महाराष्ट्र•
7 hrs ago

यावल मंडळ अधिकारी तलाठी कार्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरपरिषद फिल्टर हाऊसजवळ पिवळ्या मातीचा आणि वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच, नगरपरिषदेच्या मालकीची जागा तोंडी कराराने दुसऱ्या व्यक्तीला विकल्याची जोरदार चर्चा संपूर्ण यावल शहरात सुरू आहे, ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. सविस्तर माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत यावल शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मे. रा. यस. सी. आय. पी. यल अँड संदीप कंस्ट्रक्शन (जे.व्ही.) या ठेकेदाराद्वारे सुरू आहे. या कामाची मुदत २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असून, योजनेला १२ जुलै २०२४ रोजी तांत्रिक मान्यता, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता आणि २३ मे २०२५ रोजी निविदा कार्यादेश मिळाला आहे. तांत्रिक मंजूर किंमत ५६३५.६५ लक्ष, प्रशासकीय मंजूर किंमत ५६०३.०३ लक्ष आणि मूळ निविदा किंमत ४३८८.७७ लक्ष आहे. हे काम करत असताना, ठेकेदाराने यावल महसूल किंवा इतर मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या कार्यक्षेत्रातून पिवळी माती कोणत्या ठिकाणाहून उत्खनन करून फिल्टर हाऊसमध्ये आणली आणि ती किती ब्रास होती, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही माती वाहतूक करताना ठेकेदाराने यावल महसूलकडून रीतसर परवाना घेतला होता का आणि शासकीय रॉयल्टी भरली आहे का, याबाबतही विचारणा होत आहे. जर रॉयल्टी भरली नसेल, तर याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे, साठा केलेली वाळू कोणत्या परवानाधारक वाळू वाहतूकदाराकडून खरेदी करण्यात आली आणि हा वाळू साठा कोणाच्या परवानगीने करण्यात आला, यावरही अनेक प्रश्नचिन्हे आहेत. यावल नगरपालिकेच्या मालकीची फिल्टर हाऊस परिसरातील जागा तोंडी कराराने दुसऱ्या व्यक्तीला कोणी विकली, याबाबतही शहरात चर्चा सुरू आहे. या गंभीर प्रकरणांची संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास एक मोठा आर्थिक घोटाळा आणि महसुलाची रॉयल्टी बुडवल्याचे सत्य जनतेसमोर येईल, अशी जोरदार चर्चा यावलमध्ये आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी गट दोघेही या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

  • user_सुरेश जगन्नाथ पाटील.
    सुरेश जगन्नाथ पाटील.
    यावल, जळगाव, महाराष्ट्र
    ठेकेदाराकडून गौण खनिजाचा वापर
    7 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • यावल मंडळ अधिकारी तलाठी कार्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरपरिषद फिल्टर हाऊसजवळ पिवळ्या मातीचा आणि वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच, नगरपरिषदेच्या मालकीची जागा तोंडी कराराने दुसऱ्या व्यक्तीला विकल्याची जोरदार चर्चा संपूर्ण यावल शहरात सुरू आहे, ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. सविस्तर माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत यावल शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मे. रा. यस. सी. आय. पी. यल अँड संदीप कंस्ट्रक्शन (जे.व्ही.) या ठेकेदाराद्वारे सुरू आहे. या कामाची मुदत २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असून, योजनेला १२ जुलै २०२४ रोजी तांत्रिक मान्यता, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता आणि २३ मे २०२५ रोजी निविदा कार्यादेश मिळाला आहे. तांत्रिक मंजूर किंमत ५६३५.६५ लक्ष, प्रशासकीय मंजूर किंमत ५६०३.०३ लक्ष आणि मूळ निविदा किंमत ४३८८.७७ लक्ष आहे. हे काम करत असताना, ठेकेदाराने यावल महसूल किंवा इतर मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या कार्यक्षेत्रातून पिवळी माती कोणत्या ठिकाणाहून उत्खनन करून फिल्टर हाऊसमध्ये आणली आणि ती किती ब्रास होती, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही माती वाहतूक करताना ठेकेदाराने यावल महसूलकडून रीतसर परवाना घेतला होता का आणि शासकीय रॉयल्टी भरली आहे का, याबाबतही विचारणा होत आहे. जर रॉयल्टी भरली नसेल, तर याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे, साठा केलेली वाळू कोणत्या परवानाधारक वाळू वाहतूकदाराकडून खरेदी करण्यात आली आणि हा वाळू साठा कोणाच्या परवानगीने करण्यात आला, यावरही अनेक प्रश्नचिन्हे आहेत. यावल नगरपालिकेच्या मालकीची फिल्टर हाऊस परिसरातील जागा तोंडी कराराने दुसऱ्या व्यक्तीला कोणी विकली, याबाबतही शहरात चर्चा सुरू आहे. या गंभीर प्रकरणांची संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास एक मोठा आर्थिक घोटाळा आणि महसुलाची रॉयल्टी बुडवल्याचे सत्य जनतेसमोर येईल, अशी जोरदार चर्चा यावलमध्ये आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी गट दोघेही या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
    1
    यावल मंडळ अधिकारी तलाठी कार्यालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरपरिषद फिल्टर हाऊसजवळ पिवळ्या मातीचा आणि वाळूचा मोठ्या प्रमाणात साठा आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यासोबतच, नगरपरिषदेच्या मालकीची जागा तोंडी कराराने दुसऱ्या व्यक्तीला विकल्याची जोरदार चर्चा संपूर्ण यावल शहरात सुरू आहे, ज्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

सविस्तर माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत यावल शहर पाणीपुरवठा योजनेचे काम मे. रा. यस. सी. आय. पी. यल अँड संदीप कंस्ट्रक्शन (जे.व्ही.) या ठेकेदाराद्वारे सुरू आहे. या कामाची मुदत २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असून, योजनेला १२ जुलै २०२४ रोजी तांत्रिक मान्यता, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यता आणि २३ मे २०२५ रोजी निविदा कार्यादेश मिळाला आहे. तांत्रिक मंजूर किंमत ५६३५.६५ लक्ष, प्रशासकीय मंजूर किंमत ५६०३.०३ लक्ष आणि मूळ निविदा किंमत ४३८८.७७ लक्ष आहे.

हे काम करत असताना, ठेकेदाराने यावल महसूल किंवा इतर मंडळ अधिकारी, तलाठी यांच्या कार्यक्षेत्रातून पिवळी माती कोणत्या ठिकाणाहून उत्खनन करून फिल्टर हाऊसमध्ये आणली आणि ती किती ब्रास होती, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही माती वाहतूक करताना ठेकेदाराने यावल महसूलकडून रीतसर परवाना घेतला होता का आणि शासकीय रॉयल्टी भरली आहे का, याबाबतही विचारणा होत आहे. जर रॉयल्टी भरली नसेल, तर याला कोण जबाबदार आहे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे, साठा केलेली वाळू कोणत्या परवानाधारक वाळू वाहतूकदाराकडून खरेदी करण्यात आली आणि हा वाळू साठा कोणाच्या परवानगीने करण्यात आला, यावरही अनेक प्रश्नचिन्हे आहेत. यावल नगरपालिकेच्या मालकीची फिल्टर हाऊस परिसरातील जागा तोंडी कराराने दुसऱ्या व्यक्तीला कोणी विकली, याबाबतही शहरात चर्चा सुरू आहे.

या गंभीर प्रकरणांची संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यास एक मोठा आर्थिक घोटाळा आणि महसुलाची रॉयल्टी बुडवल्याचे सत्य जनतेसमोर येईल, अशी जोरदार चर्चा यावलमध्ये आहे. विशेष म्हणजे, नगरपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी गट दोघेही या गंभीर प्रकरणांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.
    user_सुरेश जगन्नाथ पाटील.
    सुरेश जगन्नाथ पाटील.
    यावल, जळगाव, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जळगाव विधान परिषद निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार, नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्याचा हा निर्णय मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. रक्षा खडसे यांनी पुन्हा एकदा या उमेदवारीचा निर्णय गिरीश महाजन यांचा असल्याचे नमूद केले.
    1
    केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जळगाव विधान परिषद निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या माहितीनुसार, नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्याचा हा निर्णय मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला होता. रक्षा खडसे यांनी पुन्हा एकदा या उमेदवारीचा निर्णय गिरीश महाजन यांचा असल्याचे नमूद केले.
    user_R Media
    R Media
    रावेर, जळगाव, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'फसव्या' कर्जमाफी योजनेविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज, १५ जूनच्या सकाळपासून बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील आपल्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या योजनेत असलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करत तुपकर यांनी हे पाऊल उचलले आहे. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आई-वडिलांचे दर्शन घेतले, तर पत्नी शर्वरी तुपकर यांनी त्यांचे औक्षण केले. माध्यमांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारची ही योजना कर्जमाफी नसून 'वन टाइम सेटलमेंट' असल्याचा दावा केला. त्यांनी सरकारवर 'वसुलीचा धंदा' करत असल्याचा आरोप करत स्पष्ट केले की, जर एखाद्या शेतकऱ्यावर पाच लाखांचे कर्ज असेल, तर त्याला आधी तीन लाख भरावे लागतील आणि नंतर सरकार दोन लाख भरेल. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी तीन लाख कुठून आणायचे, असा प्रश्न विचारत त्यांना पुन्हा सावकाराच्या दारात जावे लागेल, असे तुपकर म्हणाले. त्यांनी सरकारला जनाची नाही तर मनाचीही लाज नसल्याचे म्हटले आणि ही योजना केवळ 'नौटंकीपणा' असल्याचे आरोप केले. तुपकर यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. त्यांच्या मते, सरकारच्या बिनडोक आयात-निर्यात धोरणांमुळे, शेतमालाचे पडलेले भाव आणि खते, औषधे, बियाण्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. उद्योगपतींना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारला शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. जर सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताची एवढी भूक असेल, तर मी स्वतः बलिदान द्यायला तयार आहे, असे ठामपणे सांगत, आता काहीही झाले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हा वणवा राज्यभर पसरेल आणि हे आंदोलन सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी टप्प्याटप्प्याने पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात पोहोचणार आहेत. तुपकर यांनी महाराष्ट्रातील गावागावातील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून फसव्या कर्जमाफीच्या जीआरची होळी करण्याचे आवाहन केले. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे नसून, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू केलेले आंदोलन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
    1
    राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'फसव्या' कर्जमाफी योजनेविरोधात शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आज, १५ जूनच्या सकाळपासून बुलढाणा शहरातील चिखली रोडवरील आपल्या निवासस्थानासमोर अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे. या योजनेत असलेल्या जाचक अटी आणि शर्तींमुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार असल्याचा आरोप करत तुपकर यांनी हे पाऊल उचलले आहे. आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी आई-वडिलांचे दर्शन घेतले, तर पत्नी शर्वरी तुपकर यांनी त्यांचे औक्षण केले.

माध्यमांशी संवाद साधताना रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारची ही योजना कर्जमाफी नसून 'वन टाइम सेटलमेंट' असल्याचा दावा केला. त्यांनी सरकारवर 'वसुलीचा धंदा' करत असल्याचा आरोप करत स्पष्ट केले की, जर एखाद्या शेतकऱ्यावर पाच लाखांचे कर्ज असेल, तर त्याला आधी तीन लाख भरावे लागतील आणि नंतर सरकार दोन लाख भरेल. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी तीन लाख कुठून आणायचे, असा प्रश्न विचारत त्यांना पुन्हा सावकाराच्या दारात जावे लागेल, असे तुपकर म्हणाले. त्यांनी सरकारला जनाची नाही तर मनाचीही लाज नसल्याचे म्हटले आणि ही योजना केवळ 'नौटंकीपणा' असल्याचे आरोप केले.

तुपकर यांनी सरकारच्या धोरणांवरही टीका केली. त्यांच्या मते, सरकारच्या बिनडोक आयात-निर्यात धोरणांमुळे, शेतमालाचे पडलेले भाव आणि खते, औषधे, बियाण्यांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकरी आधीच अडचणीत आहेत. उद्योगपतींना फायदा मिळवून देण्यासाठी सरकारला शेतकऱ्यांचे बळी हवे आहेत, असा गंभीर आरोप त्यांनी केला. जर सरकारला शेतकऱ्यांच्या रक्ताची एवढी भूक असेल, तर मी स्वतः बलिदान द्यायला तयार आहे, असे ठामपणे सांगत, आता काहीही झाले तरी मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हा वणवा राज्यभर पसरेल आणि हे आंदोलन सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी टप्प्याटप्प्याने पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात पोहोचणार आहेत. तुपकर यांनी महाराष्ट्रातील गावागावातील शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून फसव्या कर्जमाफीच्या जीआरची होळी करण्याचे आवाहन केले. हे आंदोलन कोणत्याही पक्षाचे किंवा संघटनेचे नसून, शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी सुरू केलेले आंदोलन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    5 hrs ago
  • शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत, रविकांत तुपकर यांनी बुलडाणा येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
    1
    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेत, रविकांत तुपकर यांनी बुलडाणा येथे बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • सिल्लोड तालुक्यातील भवन गाव भीषण पाणीटंचाई आणि उन्हाच्या कडाक्यामुळे दुहेरी संकटात सापडले आहे. गेल्या २५ दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने संतप्त महिलांनी संयम सोडून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. या वेळी प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे भवन परिसर दणाणून गेला होता. पूर्णा नदीच्या काठावर वसलेले असूनही, गावात १५ ते २० दिवस नळ कोरडे असल्याने ग्रामस्थांचे जीवन विस्कळीत झाले आहे. लहान मुलांच्या शाळांपासून वृद्धांच्या आरोग्यापर्यंत सर्व स्तरांवर पाण्याअभावी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांनी “आम्ही जगायचे कसे?” असा सवाल करत प्रशासनाच्या अपयशावर प्रकाश टाकला आहे. या भीषण टंचाईमुळे घरातील प्रसाधनगृहांचा वापर करणेही कठीण झाले असून, महिलांना उघड्यावर जाण्याची नामुष्की ओढवली आहे, ज्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेच्या या गंभीर मुद्द्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग सुस्त असल्याने 'टँकर माफिया' मात्र मालामाल होत असल्याचे चित्र आहे. गोरगरीब जनतेला ₹१००० ते ₹१२०० मोजून टँकर विकत घेण्यास भाग पाडले जात असून, महागाईने त्रस्त नागरिकांना दररोज ₹२०० चा भुर्दंड पाणी विकत घेण्यासाठी सोसावा लागत आहे. या 'टँकर माफिया' रॅकेटला कोणाचे अभय आहे, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. अशा कठीण परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील साळवे हे देवदूत बनून धावले असून, त्यांनी स्वतःच्या बोअरवेलचे पाणी ग्रामस्थांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या मदतीमुळे अनेकांची पाण्यासाठीची पायपीट थांबली असून, महिला मंडळाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेपर्यंत माघार न घेण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रामपंचायतीला ठोकलेले कुलूप हे केवळ एक प्रतीक नसून, प्रशासनाच्या विरोधातील संतापाचा स्फोट आहे. जर तातडीने पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता तरी जिल्हा प्रशासन या 'तहानलेल्या' गावाच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की आणखी तीव्र आंदोलनाची वाट पाहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
    2
    सिल्लोड तालुक्यातील भवन गाव भीषण पाणीटंचाई आणि उन्हाच्या कडाक्यामुळे दुहेरी संकटात सापडले आहे. गेल्या २५ दिवसांपासून नळांना पाणी न आल्याने संतप्त महिलांनी संयम सोडून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. या वेळी प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, ज्यामुळे भवन परिसर दणाणून गेला होता.

पूर्णा नदीच्या काठावर वसलेले असूनही, गावात १५ ते २० दिवस नळ कोरडे असल्याने ग्रामस्थांचे जीवन विस्कळीत झाले आहे. लहान मुलांच्या शाळांपासून वृद्धांच्या आरोग्यापर्यंत सर्व स्तरांवर पाण्याअभावी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. महिलांनी “आम्ही जगायचे कसे?” असा सवाल करत प्रशासनाच्या अपयशावर प्रकाश टाकला आहे. या भीषण टंचाईमुळे घरातील प्रसाधनगृहांचा वापर करणेही कठीण झाले असून, महिलांना उघड्यावर जाण्याची नामुष्की ओढवली आहे, ज्यामुळे आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छतेच्या या गंभीर मुद्द्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा विभाग सुस्त असल्याने 'टँकर माफिया' मात्र मालामाल होत असल्याचे चित्र आहे. गोरगरीब जनतेला ₹१००० ते ₹१२०० मोजून टँकर विकत घेण्यास भाग पाडले जात असून, महागाईने त्रस्त नागरिकांना दररोज ₹२०० चा भुर्दंड पाणी विकत घेण्यासाठी सोसावा लागत आहे. या 'टँकर माफिया' रॅकेटला कोणाचे अभय आहे, हा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे. अशा कठीण परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील साळवे हे देवदूत बनून धावले असून, त्यांनी स्वतःच्या बोअरवेलचे पाणी ग्रामस्थांसाठी विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. त्यांच्या या मदतीमुळे अनेकांची पाण्यासाठीची पायपीट थांबली असून, महिला मंडळाने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांनी, विशेषतः महिलांनी, पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेपर्यंत माघार न घेण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. ग्रामपंचायतीला ठोकलेले कुलूप हे केवळ एक प्रतीक नसून, प्रशासनाच्या विरोधातील संतापाचा स्फोट आहे. जर तातडीने पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता तरी जिल्हा प्रशासन या 'तहानलेल्या' गावाच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणार का, की आणखी तीव्र आंदोलनाची वाट पाहणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    8 min ago
  • आज वाळूज ग्रामपंचायतीची सोडत काढण्यात आली आहे, मात्र ग्रामपंचायत सदस्यांनी ही सोडत आपल्याला मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. सदस्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या ग्रामपंचायत सोडतीवर तीव्र आक्षेप घेतला असून ती नाकारली असल्याचे सांगितले.
    1
    आज वाळूज ग्रामपंचायतीची सोडत काढण्यात आली आहे, मात्र ग्रामपंचायत सदस्यांनी ही सोडत आपल्याला मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. सदस्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी या ग्रामपंचायत सोडतीवर तीव्र आक्षेप घेतला असून ती नाकारली असल्याचे सांगितले.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सावळदबारा येथील जिल्हा परिषद शाळेत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन देखील करण्यात आले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पुस्तके, वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जफर तडवी, सरपंच मोहम्मद अरिफ, माजी सरपंच ईश्वर कोळपे, पोलीस अमलदार शिवदास गोपाळ, रवी कोळपे, संजय गावडे, सोनू आप्पा गोडंबे, शेख मन्ना, आलियार तडवी आणि कादर तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन स्वतःचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले, तसेच आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
    2
    सावळदबारा येथील जिल्हा परिषद शाळेत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, जिथे विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन देखील करण्यात आले.

यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, पुस्तके, वह्या तसेच इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष जफर तडवी, सरपंच मोहम्मद अरिफ, माजी सरपंच ईश्वर कोळपे, पोलीस अमलदार शिवदास गोपाळ, रवी कोळपे, संजय गावडे, सोनू आप्पा गोडंबे, शेख मन्ना, आलियार तडवी आणि कादर तडवी यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शिक्षण घेऊन स्वतःचे उज्ज्वल भवितव्य घडवण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले, तसेच आयोजकांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर राजस्थानच्या जयपूर येथील शहीद स्मारक परिसरात एका आंदोलनादरम्यान जमावातील एका व्यक्तीने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना काही सेकंदांत अनेक थपडा मारण्यात आल्या. ही घटना शिक्षणविषयक मुद्द्यांवर आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान घडली. हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, जे पोलिसांनी त्वरित नियंत्रणात आणले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    1
    कॉक्रोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्यावर राजस्थानच्या जयपूर येथील शहीद स्मारक परिसरात एका आंदोलनादरम्यान जमावातील एका व्यक्तीने हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना काही सेकंदांत अनेक थपडा मारण्यात आल्या.

ही घटना शिक्षणविषयक मुद्द्यांवर आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयोजित केलेल्या आंदोलनादरम्यान घडली. हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, जे पोलिसांनी त्वरित नियंत्रणात आणले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    33 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.