Shuru
Apke Nagar Ki App…
जाफराबाद पंचायत समिती हदरली! 600 पानाच्या पुराव्यासह प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत महा घोटाळा
Sudam gadekar
जाफराबाद पंचायत समिती हदरली! 600 पानाच्या पुराव्यासह प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेत महा घोटाळा
More news from महाराष्ट्र and nearby areas
- डोळ्यांसमोर वाहून गेली घरं, पूल अन् गाड्या; नेपाळमध्ये महापुराचा कहर! नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांत महापुराने थैमान घातले असून, पूराच्या पाण्याचा वेग इतका प्रचंड आहे की घरं, पूल आणि वाहने डोळ्यांसमोर वाहून गेल्याचे थरकाप उडवणारे दृश्य समोर आले आहे. महापुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. #NepalFlood #FlashFlood #Nepal #Flood #BreakingNews1
- छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. छ संभाजीनगर सहा लाख प्रवासी, तरीही गोवा, नागपूर, अहमदाबादची विमानसेवा बंद ANC - छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून गेल्या आर्थिक वर्षात सुमारे सहा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला. विमानतळावरून मोठ्या प्रमाणात कार्गो वाहतूकही होत असताना गोवा, नागपूर आणि अहमदाबाद या महत्त्वाच्या शहरांसाठीची विमानसेवा बंद झाली आहे. त्यामुळे पर्यटन आणि औद्योगिक राजधानीच्या विकासाला मोठा फटका बसत आहे. विमानसेवा वाढण्याऐवजी कमी होत असल्याने प्रवासी आणि उद्योजकांमध्ये नाराजी आहे. छत्रपती संभाजीनगर हे पर्यटन आणि औद्योगिक केंद्र असल्याने देशातील प्रमुख शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी वाढवण्याची मागणी होत आहे. विमानतळावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध असतानाही अपेक्षित विमानसेवा मिळत नसल्याने केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.1
- पाण्यावरून वाद पेटला, विरोधी पक्षनेते व सत्ता धारी यांच्यात मनपाच्या सभागृहात गदारोळ1
- बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले. सातकुंड-तेलवाडी येथे बंजारा समाजाचा तिज महोत्सव उत्साहात सातकुंड-तेलवाडी : बंजारा समाजाच्या वतीने पारंपरिक तिज महोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील महिला, युवक व ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत बंजारा समाजाची पारंपरिक संस्कृती, लोकपरंपरा आणि सामाजिक एकोप्याचे दर्शन घडविले. तिज महोत्सव हा बंजारा समाजाच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला महत्त्वाचा उत्सव मानला जातो. या उत्सवानिमित्त पारंपरिक पद्धतीने तिजची पूजा, पारंपरिक गीते व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. महिला व युवतींनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. सातकुंड-तेलवाडी परिसरातील बंजारा समाजबांधवांनी एकत्र येत आपल्या संस्कृतीचे जतन आणि पुढील पिढीपर्यंत परंपरांचा वारसा पोहोचविण्याचा संदेश दिला. तिज महोत्सवाच्या माध्यमातून समाजातील महिला व युवकांचा सहभाग वाढविण्यासोबतच सामाजिक एकता आणि बंधुभाव मजबूत करण्यावर भर देण्यात आला. यावेळी पारंपरिक गीते, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणामुळे उत्सवाचे वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले. लहान मुले, महिला, युवक तसेच ज्येष्ठ समाजबांधवांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. बंजारा समाजाची समृद्ध लोकसंस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी अशा सांस्कृतिक उत्सवांचे महत्त्व मोठे आहे. सातकुंड-तेलवाडी येथे झालेल्या तिज महोत्सवातूनही याच सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.1
- संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती.. संजय शर्मा खून प्रकरणात दोन आरोपी ताब्यात!.. दोन तासांत पोलिसांची धडाकेबाज कारवाई; हाफिज हत्या प्रकरणातील वैमनस्यातून खून झाल्याची प्राथमिक माहिती..1
- चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा; अत्याधुनिक इमारतीचा शुभारंभ!.. साडेपाच कोटींच्या निधीतून भव्य इमारत उभारणार; MIDC परिसरात २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध.. वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा.. चंदनझिरा पोलीस ठाण्याला मिळणार हक्काची जागा; अत्याधुनिक इमारतीचा शुभारंभ!.. साडेपाच कोटींच्या निधीतून भव्य इमारत उभारणार; MIDC परिसरात २ हजार चौ.मी. जागा उपलब्ध.. वर्षभरात काम पूर्ण करण्याचे नियोजन; अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांना मिळणार अत्याधुनिक सुविधा.. आज दिनांक 27 गुरुवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्काच्या इमारतीच्या प्रतीक्षेत असलेल्या चंदनझिरा पोलीस ठाण्याला अखेर हक्काची जागा मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या माध्यमातून तब्बल साडेपाच कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या नवीन अत्याधुनिक पोलीस ठाण्याच्या इमारतीचे भूमिपूजन गुरुवारी MIDC परिसरात उत्साहात पार पडले. त्यामुळे चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या आधुनिक इमारतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. MIDC परिसरातील नियोजित जागेवर आयोजित भूमिपूजन कार्यक्रम आमदार अर्जुनराव खोतकर, आमदार नारायण कुचे, उद्योजक घनश्याम शेठ गोयल, माजी नगराध्यक्ष भास्करराव आंबेकर, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, डीवायएसपी अनंत कुलकर्णी आणि उद्योजक अरुण अग्रवाल यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी यांनी केले. यावेळी बोलताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी सांगितले की, जालना शहरातील पोलीस ठाण्यांना स्वतःच्या आणि सुसज्ज इमारती मिळाव्यात, यासाठी गृह खात्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्याचाच परिणाम म्हणून चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.1
- पैशांसाठी मुक्या जीवांचा जीवघेणा खेळ; बैल-घोड्यांच्या धोकादायक शर्यती सिल्लोड-जळगाव मार्गावर पैशांसाठी बैल व घोड्यांच्या धोकादायक शर्यती सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या शर्यतींमुळे मुक्या प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होत असून, अपघाताचीही शक्यता आहे. प्राण्यांना वेगाने पळवण्यासाठी त्यांच्यावर ताण आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे प्राणीप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी होत आहे.1
- फुलंब्री येथे ईद ए मिलादुन्नबी निमित्त जलसा-ए-सिरातुन्नबी कार्यक्रम घेण्यात आला,1
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... पैशांच्या हव्यासापोटी प्राण्यांचा अमानुष छळ; सिल्लोड-जळगाव मार्गावर बैल-घोड्याच्या धोकादायक शर्यती ANC : सिल्लोड-जळगाव मुख्य महामार्गावरील मंगरूळ फाट्यावर दररोज दुपारी चारच्या सुमारास बैल आणि घोड्याला एकाच टांग्याला जुंपून धोकादायक शर्यती लावल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शर्यतींवर हजारो रुपयांचा जुगार खेळला जात असल्याचा आरोप असून, पैशांच्या हव्यासापोटी मुक्या प्राण्यांचा अमानुष छळ केला जात आहे. घोडा आणि बैलाची शारीरिक क्षमता आणि धावण्याची नैसर्गिक क्षमता वेगवेगळी असतानाही दोन्ही प्राण्यांना एकाच टांग्याला जुंपून भरधाव पळवले जाते. वेग वाढवण्यासाठी त्यांना मारहाण केली जात असल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, या शर्यतींच्या मागे तरुणांच्या दुचाकींचा मोठा ताफा धावत असतो. हार-जीत पाहण्याच्या नादात दुचाकीस्वारांकडून हुल्लडबाजी केली जात असल्याने महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा धोका निर्माण झाला आहे. अचानक एखादे वाहन समोर आल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुक्या प्राण्यांवरील क्रूरतेसोबतच सर्वसामान्य वाहनचालकांच्या जीवाशीही हा खेळ सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी पोलिस आणि प्रशासनाने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन शर्यती बंद कराव्यात आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.1