Shuru
Apke Nagar Ki App…
सुलेमान खान मॉब लिंचिंग मामले को एक साल पूरा, इंसाफ की मांग को लेकर प्रशासन से फिर गुहार
Irfan Shaikh
सुलेमान खान मॉब लिंचिंग मामले को एक साल पूरा, इंसाफ की मांग को लेकर प्रशासन से फिर गुहार
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सुलेमान खान मॉब लिंचिंग मामले को एक साल पूरा, इंसाफ की मांग को लेकर प्रशासन से फिर गुहार1
- अकोला : नगरसेवक सागर भारुकाच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मनपाची कारवाई अकोला : नगरसेवक सागर भारूकाच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मनपाची कारवाई Anchor : अकोला महानगरपालिकेतील भ्रष्टाचारावर अंकुश लावण्यासाठी आणि विविध नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपोषणास बसलेले नगरसेवक सागर भारुका यांच्यावर पहिल्याच दिवशी महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाने दादागिरी करत उपोषणाचा मंडप गुंडाळला तसेच आंदोलनाचे सर्व साहित्य जप्त केले. मिळालेल्या माहितीनुसार, सागर भारुका यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. परंतु, मनपा कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बळजबरी करत आंदोलकांना तेथून हटवले. या कारवाईदरम्यान उपोषणस्थळी ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना व अनादर झाल्याचा आरोप सागर भारुका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे. प्रशासकीय दडपशाहीविरोधात तीव्र संताप भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीवर व कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे कारवाई केल्यामुळे अकोला मनपाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले जात आहेत. "प्रशासन स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी लोकशाही मार्गाने चाललेला आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे," असा आरोप स्थानिक नेत्यांकडून केला जात आहे. महापुरुषांच्या प्रतिमांचा अनादर करणाऱ्या आणि आंदोलकांवर बेकायदेशीरपणे दबाव आणणाऱ्या मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण अत्यंत तापले आहे.2
- गवंढाळा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराचा चौकशी अहवाल अपूर्ण; संतप्त ग्रामस्थांचा पंचायत समितीत ठिय्या! खामगाव : तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायती मधील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि विकासकामांच्या अनियमिततेची चौकशी करून पूर्ण अहवाल सादर करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन मांडले. काही दिवसांपूर्वी गवंढाळा येथील रहिवासी गोपाल सतीश पांढरे आणि महेंद्र रमेश पाटील यांनी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराविरोधात बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यावेळी गट विकास अधिकारी यांनी १० दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते.त्यानुसार आज सोमवारी सादर करण्यात आलेला चौकशी अहवाल अत्यंत अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. प्रशासनाने सादर केलेला अहवाल अपूर्ण असून तो आम्हाला अजिबात मान्य नाही.जोपर्यंत सर्व मुद्द्यांची निष्पक्ष चौकशी होऊन पूर्ण अहवाल दिला जात नाही, तोपर्यंत पंचायत समितीतून उठणार नाही. गरज पडल्यास येत्या काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.4
- पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात पोलीस स्टेशन अकोट शहर पोलीसांची कारवाई २३५ किलो गोवंश जातीचे मास किंमंत ४७०००/-रु माल जप्त व चार ईसम ताब्यात अकोट तालुका प्रतिनिधी.... दिनांक ११/०८/२०२६ रोजी डी.बी. पथकाचे प्रमुख पोउपनि निलेश बारहाते पो.स्टे. अकोट शहर जि. अकोला यांना गुप्त माहीती मिळाली की, कुरेशीपुरा अकोट येथे एका इसमाचे घरात गोवंश जनावराची कृरतेने कत्तल करुन विक्री करीत आहेत अशी माहीती मिळालेवरुन सदरची माहीती मा.पो.नि.जुनघरे यांना देवुन त्यांनी कारवाई करणे करीता आदेशित केल्याने पोलीस स्टाप व दोन पंचासह सदर ठिकाणी जावुन रेड केली असता इसम नामे १) शे. इमरान शे.इस्माईल वय ३४ वर्ष २) जमिल अहमद अब्दल हमीद वय ५५ वर्ष ३) शारुख खान हिरेखान वय ३४ वर्ष ४) शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी वय ६१ वर्ष सर्व रा. कुरेशीपुरा अकोट हे शे. इमरान शे.इस्माईल यांचे राहते घरात गोवंश जातीचे जनावरे कृरतेने ठार करुन मासाचे टुकडे करुन विक्री करीत असतांना मिळुन आले सदरचे गोवंश जातीचे मास अंदाजे २३५ किलो किंमंत ४७०००/-रु असा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पत्रका प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतला. नमुद इसमावर कार्यवाही करण्यात येत आहे. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधिक्षक बी.चंद्रकांत रेड्डी, मा.उप.विभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. किशोर जुनघरे, डी.बी.पथक प्रमुख पो.उपनि निलेश बाराहाते, तसेच पथकातील पोहेकॉ गणेश सोळंके, पोकॉ मोहन दुर्गे पोकॉ अश्विन चौव्हाण यांनी केली4
- भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष! ‘भारत माता की जय’च्या जयघोषाने दुमदुमले जळगाव जामोद; भव्य तिरंगा रॅलीत राष्ट्रभक्तीचा जल्लोष! ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार डॉ. संजय कुटे यांच्यासह हजारो नागरिक, विद्यार्थी रॅलीत सहभागी... जळगाव जामोद(प्रतिनिधी): भारताच्या राष्ट्रध्वजाचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ९ ते १७ ऑगस्ट २०२६ दरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून ११ ऑगस्ट रोजी जळगाव जामोद शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमुळे संपूर्ण शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेले. राष्ट्रभक्तीपर गीतांचे मंत्रमुग्ध करणारे स्वर, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि आसमंत दुमदुमून टाकणारा ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’चा जयघोष यामुळे शहरातील वातावरण भारावून गेले होते. रॅलीत सहभागी झालेल्या नागरिकांच्या चेहऱ्यावर राष्ट्रप्रेमाचा उत्साह दिसून येत होता.‘देश प्रथम, राष्ट्र सर्वोच्च’ या भावनेने प्रेरित झालेल्या या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. विशेषतः युवा वर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदवत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशभक्तीचा संदेश जनमानसात पोहोचविला.यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, नगराध्यक्ष गणेश दांडगे, डॉ. अपर्णा कुटे, उपाध्यक्ष कैलास पाटील, अनिल जयस्वाल, किशोर केला, शहर अध्यक्ष अजय वंडाळे, ग्रामीण अध्यक्ष संजय पांडव, बंडू पाटील, परिक्षित ठाकरे, निलेश शर्मा, पांडुरंग मिसाळ, शाकीर खान, अक्षय देशमुख, ऋषिकेश देशमुख, गणेश गिरे, वैभव अढाव यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. तसेच दि. न्यू. ईरा हायस्कूल आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, युवा वर्ग आणि मोठ्या संख्येने राष्ट्रभक्त नागरिकांनी रॅलीत सहभाग घेतला.तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून तो भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अभिमान, समृद्ध वर्तमानाचा विश्वास आणि उज्ज्वल भविष्याचा संकल्प आहे. या भावनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासोबतच प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रभक्तीचा तिरंगा सदैव उंच राहावा, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.1
- चिकणी डोमगा रोड ची दुरवस्था बस ल ये जा करण्यास खूप हलाखीचे झाले व विद्यार्थ्यास खूप त्रास chkni ते domga या रस्त्यावरून महामंडळ ची बस चालते त्या बसणी चार गावचे विद्यार्थी नेर ल शिक्षणा साठी जाते पण आज त्या रस्त्याची अवस्था खूप वाईट आहे4
- Panchayat Samiti Akola | दुपारी 12 वाजले, कृषी विभागात कोणीच नाही? अकोला पंचायत समितीच्या कृषी विभागात ‘सन्नाटा’! दुपारी १२ वाजले, तरी अधिकारी-कर्मचारी गायब? अकोला : पंचायत समिती अकोला येथील कृषी विभागाच्या कार्यालयीन कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुपारी १२ वाजण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शेतकरी व नागरिकांच्या विविध कामांसाठी पंचायत समितीच्या कृषी विभागात ये-जा सुरू असते. मात्र, कार्यालयीन वेळेतच संबंधित विभागात कोणीही उपस्थित नसल्यास नागरिकांनी आपली कामे कोणाकडे करायची, असा सवाल उपस्थित होत आहे. कार्यालयीन वेळेत कर्मचारी-अधिकारी नेमके कुठे होते? त्यांची उपस्थिती नोंदवहीत नोंद झाली आहे का? कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचे पालन केले जात आहे का? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, संबंधित विभागात अचानक पाहणी करून बायोमेट्रिक/उपस्थिती नोंद तपासावी आणि कर्तव्यावर गैरहजर आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या कामासाठी असलेले कार्यालयच दुपारी ‘ओस’ पडत असेल, तर प्रशासनाचा कारभार नेमका चालतोय तरी कसा? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.1
- कुरेशीपुरात घरात गोवंश मांसाची विक्री? अकोट पोलिसांचा छापा; २३५ किलो मांस जप्त, चौघे ताब्यात ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; डी.बी. पथकाची कारवाई... अकोला प्रतिनिधी : पूर्णाजी खोडके अकोट, दि. ११ : कुरेशीपुरा परिसरातील एका घरात गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अकोट शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत अंदाजे २३५ किलो गोवंश जातीचे मांस, किंमत ४७ हजार रुपये, जप्त करण्यात आले असून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. अकोट शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते यांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी माहिती पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे यांना दिल्यानंतर त्यांच्या आदेशाने पोलीस पथकाने दोन पंचांसह कुरेशीपुरा परिसरातील संबंधित घरावर छापा टाकला. पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान शे. इमरान शे. इस्माईल (३४), जमिल अहमद अब्दल हमीद (५५), शारुख खान हिरेखान (३४) आणि शे. मुकद्दर अब्दुल सत्तार कुरेशी (६१), सर्व रा. कुरेशीपुरा, अकोट, हे शे. इमरान शे. इस्माईल यांच्या घरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करून मांसाचे तुकडे करीत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी पंचांसमक्ष कारवाई करून २३५ किलो मांस व इतर मुद्देमाल असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी निखील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, डी.बी. पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक निलेश बाराहाते, पोहेकॉ गणेश सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल मोहन दुर्गे व अश्विन चौव्हाण यांच्या पथकाने केली.2