logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न. सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

1 day ago
user_दत्तात्रय पवार
दत्तात्रय पवार
सांगोले, सोलापूर, महाराष्ट्र•
1 day ago

अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न. सांगोल तालुका अजनाळे येथे पत्रकार सचिन धांडोरे मित्रपरिवार व डॉक्टर खंडागळे हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोग आरोग्य शिबिर संपन्न या शिबिरामध्ये 200 रुग्णांची तपासणी करण्यात आली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
    1
    सोलापूर : ज्योती वाघमारे यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहित नव्हते, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुंबई येथे एका कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या नावावरून त्यांच्याकडून कागदपत्रे घेतली. मात्र, त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल काहीच माहीत नव्हते. उमेदवारी अर्ज भरण्याचे दिवशी त्यांना राज्यसभा उमेदवारीबद्दल माहीत झाले असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
    user_Rahul S
    Rahul S
    पंढरपूर, सोलापूर, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    1
    Post by सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    user_सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    सारथी महाराष्ट्राचा न्यूज
    Voice of people जत, सांगली, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही. यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    1
    सध्या संपूर्ण देशात रमजानच्या पवित्र महिना चालू आहे या महिन्यात मुस्लिम समुदायाने रोजे व नमाज पाटण करत आहेत याच म्हणजे  सोलापुरात सोशल मीडियावर काही असामाजिक तत्वांकडून इस्लाम धर्म आणि मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली आहे. अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजात द्वेष, आपसी वैमनस्य आणि तणाव निर्माण होतो, जे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारार्ह नाही.
या गंभीर प्रकरणाची दखल घेत आम्ही सोलापूरचे पोलीस आयुक्त यांना लेखी तक्रार दिली असून संबंधित इंस्टाग्राम अकाउंटची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
भारत हा लोकशाही देश असून येथे सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. त्यामुळे कोणत्याही धर्म, मजहब किंवा समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई होणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही अशी कृती करण्याचे धाडस करणार नाही.
यावेळी पार्टीचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते
    user_ईलियास नजीर शेख
    ईलियास नजीर शेख
    Salesperson सोलापूर उत्तर, सोलापूर, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    user_युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    युवा शक्ती न्यूज महाराष्ट्र
    सोलापूर दक्षिण, सोलापूर, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    1
    Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न कोल्हापूर / प्रतिनिधी  मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले. मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.
    1
    मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर विकासाबाबत संभ्रम; सतेज पाटील यांचा अधिवेशनात प्रश्न
कोल्हापूर / प्रतिनिधी 
मुंबई शहराचे “फुप्फुस” मानल्या जाणाऱ्या मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जागेच्या विकासाबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने विधानसभेत हा मुद्दा उपस्थित झाला.आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करत या मोठ्या प्रकल्पाबाबत नागरिकांमध्ये संभ्रम असल्याचे सांगितले.
मुंबई सेंट्रल पार्कच्या 295 एकर जमिनीवर विकासकामे सुरू असून या ठिकाणी नेमक्या कोणत्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप सार्वजनिक झालेली नाही. त्यामुळे शहरातील पर्यावरणप्रेमी तसेच स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चा सुरू असल्याचे पाटील यांनी अधिवेशनात नमूद केले.या संदर्भात त्यांनी राज्य सरकारने नागरिकांसाठी खुली सुनावणी आयोजित करावी किंवा प्रकल्पाचा संपूर्ण आराखडा प्रेझेंटेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केली. इतक्या मोठ्या प्रमाणावर विकसित होणाऱ्या या हरित क्षेत्राचा आराखडा पारदर्शकपणे लोकांसमोर यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.या प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. मुंबई सेंट्रल पार्क विकसित करताना नागरिकांच्या सूचना विचारात घेतल्या जातील आणि या संदर्भात उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच या प्रकल्पामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यापारीकरण होणार नसल्याचा स्पष्ट खुलासा सामंत यांनी केला. पार्कचा विकास हा पर्यावरणपूरक आणि नागरिकांना खुला असा करण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.मुंबईसारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मोठे हरित क्षेत्र उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे या 295 एकर जागेचा विकास कशा स्वरूपात होणार याकडे आता नागरिकांसह पर्यावरणप्रेमींचेही लक्ष लागले आहे.
    user_आमची मराठी.com
    आमची मराठी.com
    शिरोळ, कोल्हापूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • माजी सैनिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (AICC) माजी सैनिक विभागाच्या वतीने नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातील मोठ्या संख्येने माजी सैनिकांसह सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. या आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी सैनिकांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः डिसएबिलिटी पेन्शन कायम ठेवणे, ECHS (एक्स-सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम) अधिक प्रभावीपणे राबविणे, अग्निवीर योजना रद्द करणे तसेच सैनिकांवरील अन्यायकारक वागणूक थांबविणे या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत माजी सैनिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. या धरणे आंदोलनात काँग्रेसचे विविध नेते, माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत माजी सैनिकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    1
    माजी सैनिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या (AICC) माजी सैनिक विभागाच्या वतीने नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात देशभरातील मोठ्या संख्येने माजी सैनिकांसह सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले.
या आंदोलनादरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांनी माजी सैनिकांच्या विविध मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले. विशेषतः डिसएबिलिटी पेन्शन कायम ठेवणे, ECHS (एक्स-सर्व्हिसमेन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम) अधिक प्रभावीपणे राबविणे, अग्निवीर योजना रद्द करणे तसेच सैनिकांवरील अन्यायकारक वागणूक थांबविणे या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत माजी सैनिकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी केली. देशाच्या सुरक्षेसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या सैनिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे योग्य नसून त्यांना न्याय मिळवून देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
या धरणे आंदोलनात काँग्रेसचे विविध नेते, माजी सैनिक संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत माजी सैनिकांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध विषयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक आज समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी संपन्न झाला. या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल मध्ये आलेला आहे. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढत नसून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात 2 मार्चला मुंबईला मुद्रा मोदी ते मुजरा मोदी या नावाने आंदोलन करून पंतप्रधान पदाचा राजीनामा मागितला होता. त्याच अनुषंगाने सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने दिनांक 16 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय पुनम गेट समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याचप्रमाणे गॅस दरवाढीचा निषेध, अमेरिकेचा मंत्री भारतात येऊन गेलेल्या बडबडाचा निषेध, एफस्टिन फाईल मध्ये भाजपाचे तीन मंत्र्यांचे नाव आलेले असून त्यांच्या राजीनामा मागणीच्या संदर्भात, आणि ग्राहकाच्या पूर परवानगी न घेता जोर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ 16 तारखेला वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आंदोलन घेण्यात येणार असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा व शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. या.
    1
    वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने विविध विषयाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची बैठक आज समाज कल्याण केंद्र रंगभवन या ठिकाणी संपन्न झाला. या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल मध्ये आलेला आहे. त्याबद्दल कोणीही चकार शब्द काढत नसून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात 2 मार्चला मुंबईला मुद्रा मोदी ते मुजरा मोदी या नावाने आंदोलन करून पंतप्रधान पदाचा राजीनामा मागितला होता. त्याच अनुषंगाने सोलापूर वंचित बहुजन आघाडी शहर व जिल्ह्याच्या वतीने दिनांक 16 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद कार्यालय पुनम गेट समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने व धरणे आंदोलन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 
त्याचप्रमाणे गॅस दरवाढीचा निषेध, अमेरिकेचा मंत्री भारतात येऊन गेलेल्या बडबडाचा निषेध, एफस्टिन फाईल मध्ये भाजपाचे तीन मंत्र्यांचे नाव आलेले असून त्यांच्या राजीनामा मागणीच्या संदर्भात, आणि ग्राहकाच्या पूर परवानगी न घेता जोर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहे त्याच्या निषेधार्थ 16 तारखेला वंचित बहुजन आघाडी सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आंदोलन घेण्यात येणार असून या आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा व शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला. 
या.
    user_Akkalkot news
    Akkalkot news
    Press reporter अक्कलकोट, सोलापूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.