logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

निफाड येथून गुजरात राज्यातील बिलमाळ येथे भक्तगण पालखी घेऊन निघाले आहेत.

3 hrs ago
user_Laxman Kisan bagul
Laxman Kisan bagul
Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

निफाड येथून गुजरात राज्यातील बिलमाळ येथे भक्तगण पालखी घेऊन निघाले आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • निफाड येथून गुजरात राज्यातील बिलमाळ येथे भक्तगण पालखी घेऊन निघाले आहेत.
    1
    निफाड येथून गुजरात राज्यातील बिलमाळ येथे भक्तगण पालखी घेऊन निघाले आहेत.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्टच्या वतीने आयोजित गंगा-गोदावरी पूजन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडला. संत-महंतांच्या साक्षीने कपिलधारा अर्थात गंगा-गोदावरीच्या उगमस्थानी हे विधिवत पूजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, निसर्गपूजा आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा जपणारा हा सोहळा समाजाला सकारात्मक दिशा देणारा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पर्यावरण संरक्षणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून, वृक्षसंवर्धनात नाशिक जिल्ह्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. या प्रसंगी नदी संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा संकल्प करण्यात आला. या कार्यक्रमाला महंत भक्तिचरणदास महाराज, महंत कल्कीराम महाराज, महंत परशुराम महाराज, आमदार हिरामण खोसकर, आमदार शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विलास पांगारकर, धनंजय बेळे आणि श्री कपिलधारा ट्रस्टचे विश्वस्त कुलदीप चौधरी यांच्यासह साधू-संत, महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील कावनई येथील श्री कपिल महामुनी आश्रम ट्रस्टच्या वतीने आयोजित गंगा-गोदावरी पूजन सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडला. संत-महंतांच्या साक्षीने कपिलधारा अर्थात गंगा-गोदावरीच्या उगमस्थानी हे विधिवत पूजन करण्यात आले. भारतीय संस्कृतीतील अध्यात्म, निसर्गपूजा आणि पर्यावरण संवर्धनाची परंपरा जपणारा हा सोहळा समाजाला सकारात्मक दिशा देणारा असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

पर्यावरण संरक्षणासाठी राज्य शासन विविध उपक्रम राबवत असून, वृक्षसंवर्धनात नाशिक जिल्ह्याचे कार्य उल्लेखनीय असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले. या प्रसंगी नदी संवर्धन, वृक्षारोपण आणि पर्यावरण रक्षणाची सामूहिक जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडण्याचा संकल्प करण्यात आला.

या कार्यक्रमाला महंत भक्तिचरणदास महाराज, महंत कल्कीराम महाराज, महंत परशुराम महाराज, आमदार हिरामण खोसकर, आमदार शांताराम मोरे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार शिवराम झोले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्चाव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष गोरख बोडके, विलास पांगारकर, धनंजय बेळे आणि श्री कपिलधारा ट्रस्टचे विश्वस्त कुलदीप चौधरी यांच्यासह साधू-संत, महंत व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    46 min ago
  • पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली असून हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे पाण्याखाली गेल्याने आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पूरवठा विभागाने तातडीने मदतकार्य सुरू करत पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. सहाय्यक जिल्हा पूरवठा अधिकारी (ADSO) सीमा महल्ले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांमध्ये धान्य वाटपाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात पूरवठा अधिकारी श्री. गावित आणि पूरवठा निरीक्षक श्रीमती प्रणाली बेडसे यांनी रास्तभाव दुकानदारांची बैठक घेऊन ग्रामपंचायत, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या समन्वयाने पात्र पूरग्रस्तांची माहिती संकलित केली आहे. तसेच तलाठी व ग्रामसेवक युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करत असून त्याआधारे शासनाकडून आर्थिक मदत आणि भरपाई दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी करून कोणताही बाधित नागरिक अन्नाविना राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात अन्नधान्यासह पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि निवारा उपलब्ध करून दिला जात आहे. पूरवठा निरीक्षक प्रणाली बेडसे यांनी स्पष्ट केले की, कोणतेही पात्र कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त धान्य पुरवले जाईल. हे अभियान पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.
    1
    पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावे पूरग्रस्त झाली असून हजारो कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. घरे पाण्याखाली गेल्याने आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याने दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पूरवठा विभागाने तातडीने मदतकार्य सुरू करत पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

सहाय्यक जिल्हा पूरवठा अधिकारी (ADSO) सीमा महल्ले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, पालघर, वाडा, मोखाडा, विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यांमध्ये धान्य वाटपाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात पूरवठा अधिकारी श्री. गावित आणि पूरवठा निरीक्षक श्रीमती प्रणाली बेडसे यांनी रास्तभाव दुकानदारांची बैठक घेऊन ग्रामपंचायत, तलाठी आणि ग्रामसेवक यांच्या समन्वयाने पात्र पूरग्रस्तांची माहिती संकलित केली आहे. तसेच तलाठी व ग्रामसेवक युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करत असून त्याआधारे शासनाकडून आर्थिक मदत आणि भरपाई दिली जाणार आहे.

जिल्हाधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड यांनी स्वतः पूरग्रस्त भागांची पाहणी करून कोणताही बाधित नागरिक अन्नाविना राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाकडून पूरग्रस्त भागात अन्नधान्यासह पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि निवारा उपलब्ध करून दिला जात आहे. पूरवठा निरीक्षक प्रणाली बेडसे यांनी स्पष्ट केले की, कोणतेही पात्र कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही आणि आवश्यकतेनुसार अतिरिक्त धान्य पुरवले जाईल. हे अभियान पुढील काही दिवस सुरू राहणार आहे.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते, आवामी विकास पार्टीचे शहराध्यक्ष आणि 'एव्हीपी नाशिक टीव्ही न्यूज' चॅनेलचे मुख्य संपादक सरफराज पठाण यांना भद्रकाली पोलिस स्टेशन व सरकारवाडा विभागाकडून तडीपारीची नोटीस जारी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. सरफराज पठाण यांनी २१ जुलै २०२६ रोजी कथित बेकायदेशीर जुगार, मटका आणि सट्टा व्यवसायाविरोधात पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर लगेचच, २४ जुलै २०२६ रोजी त्यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली. या कारवाईनंतर सोशल मीडियावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष समीक्षा करून कारवाईवर पुनर्विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. सामाजिक प्रश्न आणि अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत निष्पक्ष व्यवहार झाला पाहिजे, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
    1
    नाशिकमधील सामाजिक कार्यकर्ते, आवामी विकास पार्टीचे शहराध्यक्ष आणि 'एव्हीपी नाशिक टीव्ही न्यूज' चॅनेलचे मुख्य संपादक सरफराज पठाण यांना भद्रकाली पोलिस स्टेशन व सरकारवाडा विभागाकडून तडीपारीची नोटीस जारी करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे.

सरफराज पठाण यांनी २१ जुलै २०२६ रोजी कथित बेकायदेशीर जुगार, मटका आणि सट्टा व्यवसायाविरोधात पोलिस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर लगेचच, २४ जुलै २०२६ रोजी त्यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावण्यात आली.

या कारवाईनंतर सोशल मीडियावर लोकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पोलिस आयुक्त आणि पोलिस उपायुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष समीक्षा करून कारवाईवर पुनर्विचार करावा, अशी मागणी केली जात आहे. सामाजिक प्रश्न आणि अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत निष्पक्ष व्यवहार झाला पाहिजे, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.
    user_AVP Nashik Tv
    AVP Nashik Tv
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • बिहारमधील बाढ येथील प्रसिद्ध उमानाथ धाम परिसरात एका महिलेने आपल्या पहिल्या पतीच्या समोरच प्रेमीसोबत सात फेरे घेऊन लग्न केल्याने प्रचंड गोंधळ उडाला. या घटनेदरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पहिल्या पतीच्या उपस्थितीतच हा विवाह सोहळा पार पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून हा संपूर्ण प्रकार सध्या सर्वत्र जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.
    1
    बिहारमधील बाढ येथील प्रसिद्ध उमानाथ धाम परिसरात एका महिलेने आपल्या पहिल्या पतीच्या समोरच प्रेमीसोबत सात फेरे घेऊन लग्न केल्याने प्रचंड गोंधळ उडाला. या घटनेदरम्यान घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. पहिल्या पतीच्या उपस्थितीतच हा विवाह सोहळा पार पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली असून हा संपूर्ण प्रकार सध्या सर्वत्र जोरदार चर्चेचा विषय बनला आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवर एकरा टूल्स या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असून तेथे गळती सुरू झाली आहे. सध्या या लिकेजचे प्रमाण कमी असले तरी ते कधीही वाढण्याची शक्यता आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २९ जुलै, गुरुवार ३० जुलै व शुक्रवार ३१ जुलै अशा तीन दिवसांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. शटडाऊनचे सुधारित वेळापत्रक नियोजन करून जाहीर केले जाईल. जलवाहिनी दुरुस्तीचे हे ठिकाण अत्यंत रहदारीचे आणि वर्दळीचे असल्याने कामात येणाऱ्या अडचणींमुळे दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवार २९ जुलै ते शुक्रवार ३१ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
    1
    मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवर एकरा टूल्स या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असून तेथे गळती सुरू झाली आहे. सध्या या लिकेजचे प्रमाण कमी असले तरी ते कधीही वाढण्याची शक्यता आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २९ जुलै, गुरुवार ३० जुलै व शुक्रवार ३१ जुलै अशा तीन दिवसांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. शटडाऊनचे सुधारित वेळापत्रक नियोजन करून जाहीर केले जाईल.

जलवाहिनी दुरुस्तीचे हे ठिकाण अत्यंत रहदारीचे आणि वर्दळीचे असल्याने कामात येणाऱ्या अडचणींमुळे दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवार २९ जुलै ते शुक्रवार ३१ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या बातमीचे वृत्त धडकताच येवला शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवाची सुरुवात विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. चौफुलीवर भव्य फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला. या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, तालुकाप्रमुख छगनराव आहेर, युवा सेना तालुकाप्रमुख संतोष गोरे आणि शहरप्रमुख गणेश वडनेरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    1
    नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटल्याच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. या बातमीचे वृत्त धडकताच येवला शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या आनंदोत्सवाची सुरुवात विंचूर चौफुली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. यानंतर शिवसैनिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात आणि आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. चौफुलीवर भव्य फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.

या प्रसंगी उपजिल्हाप्रमुख भास्कर कोंढरे, शहरप्रमुख लक्ष्मण गवळी, तालुकाप्रमुख छगनराव आहेर, युवा सेना तालुकाप्रमुख संतोष गोरे आणि शहरप्रमुख गणेश वडनेरे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • सुरगाणा तालुक्यातील केम डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंगारबारी गावात अपूर्ण स्मशानभूमीमुळे अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. गावातील १६ वर्षीय खुशी कांतीलाल पिठे हिचे अल्पशा आजाराने निधन झाले, मात्र गेल्या वर्षभरापासून स्मशानभूमीचे बांधकाम अर्धवट पडून असल्याने ग्रामस्थांना मुसळधार पावसात भुईडाग करून तिच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदताना सतत पावसाचे आणि जमिनीतून झिरपणारे पाणी साचत असल्याने ग्रामस्थांना बादल्या, मोटारपंप आणि इतर साधनांच्या मदतीने अथक प्रयत्न करून पाणी उपसावे लागले. या घटनेमुळे पंगारबारी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला असून त्यांनी ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदाराच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक निधीतून सुरू असलेले काम वर्षभरापासून अपूर्ण का राहिले, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नागरिक आगामी ग्रामसभेत हा मुद्दा ठामपणे मांडून जबाबदारी निश्चित करण्याच्या निर्धारात आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अपूर्ण स्मशानभूमीमुळे नागरिकांना असा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेदनादायी वेळ येऊ नये यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार काम पूर्ण करावे आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
    4
    सुरगाणा तालुक्यातील केम डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पंगारबारी गावात अपूर्ण स्मशानभूमीमुळे अत्यंत वेदनादायी घटना समोर आली आहे. गावातील १६ वर्षीय खुशी कांतीलाल पिठे हिचे अल्पशा आजाराने निधन झाले, मात्र गेल्या वर्षभरापासून स्मशानभूमीचे बांधकाम अर्धवट पडून असल्याने ग्रामस्थांना मुसळधार पावसात भुईडाग करून तिच्यावर अंत्यसंस्कार करावे लागले. अंत्यसंस्कारासाठी खड्डा खोदताना सतत पावसाचे आणि जमिनीतून झिरपणारे पाणी साचत असल्याने ग्रामस्थांना बादल्या, मोटारपंप आणि इतर साधनांच्या मदतीने अथक प्रयत्न करून पाणी उपसावे लागले.

या घटनेमुळे पंगारबारी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरला असून त्यांनी ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदाराच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सार्वजनिक निधीतून सुरू असलेले काम वर्षभरापासून अपूर्ण का राहिले, याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. नागरिक आगामी ग्रामसभेत हा मुद्दा ठामपणे मांडून जबाबदारी निश्चित करण्याच्या निर्धारात आहेत.

दरवर्षी पावसाळ्यात अपूर्ण स्मशानभूमीमुळे नागरिकांना असा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याने जिल्हा प्रशासन, पंचायत समिती आणि संबंधित विभागांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन काम युद्धपातळीवर पूर्ण करावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. भविष्यात कोणत्याही कुटुंबावर अशी वेदनादायी वेळ येऊ नये यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दर्जेदार काम पूर्ण करावे आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
    user_दिव्य भारत बीएसएम न्यूज
    दिव्य भारत बीएसएम न्यूज
    Tour Guide नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.