logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

लातूर स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर वायर आणि डीसी केबल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून २,५०,००० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. रविवार, १२ जुलै २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक हरंगुळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयित आरोपी विकास विलास जाधव (वय ४० वर्षे, रा. आवंतीनगर, पीव्हीआर चौक, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या पिशवीची झडती घेतली असता ही रोकड आढळून आली. चोरीच्या कॉपर वायर आणि डीसी केबलची विक्री करून ही रक्कम मिळाल्याची कबुली आरोपीने दिली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास जाधव याने त्याचे साथीदार सागर मच्छिंद्र माने (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि नरसिंग दत्तात्रय माने (रा. तगरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्या मदतीने या चोऱ्या केल्या आहेत. ही टोळी ओमनी कार आणि ऑटोरिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहर परिसरातील इलेक्ट्रिकल दुकाने व गोदामांमधून कॉपर वायर आणि डीसी केबलची चोरी करत असे. या टोळीने लातूर जिल्ह्यातील ६ आणि धाराशिव जिल्ह्यातील ३ अशा एकूण ९ गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यांतील एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यांतर्गत तीन गुन्हे (गु.र.नं. ५०६/२०२५, ५१८/२०२५, ५२२/२०२५), चाकूर पोलीस ठाण्यांतर्गत दोन गुन्हे (गु.र.नं. ५९३/२०२४, २१५/२०२६) आणि गांधी चौक पोलीस ठाण्यांतर्गत एका गुन्ह्याचा (गु.र.नं. ४५६/२०२६) समावेश आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाणे (गु.र.नं. ३००/२०२६), नळदुर्ग पोलीस ठाणे (गु.र.नं. २७६/२०२६) आणि शिराढोण पोलीस ठाण्यांतर्गत (गु.र.नं. १३/२०२६) दाखल असलेले गुन्हे उघड झाले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांच्यासह पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे आणि अंजली गायकवाड यांचा समावेश होता. सध्या आरोपीला औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले असून औसा पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच फरार साथीदारांचा शोध व इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

1 hr ago
user_Nitin Chalak
Nitin Chalak
Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
1 hr ago

लातूर स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर वायर आणि डीसी केबल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून २,५०,००० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. रविवार, १२ जुलै २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक हरंगुळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयित आरोपी विकास विलास जाधव (वय ४० वर्षे, रा. आवंतीनगर, पीव्हीआर चौक, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या पिशवीची झडती घेतली असता ही रोकड आढळून आली. चोरीच्या कॉपर वायर आणि डीसी केबलची विक्री करून ही रक्कम मिळाल्याची कबुली आरोपीने दिली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास जाधव याने त्याचे साथीदार सागर मच्छिंद्र माने (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि नरसिंग दत्तात्रय माने (रा. तगरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्या मदतीने या चोऱ्या केल्या आहेत. ही टोळी ओमनी कार आणि ऑटोरिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहर परिसरातील इलेक्ट्रिकल दुकाने व गोदामांमधून कॉपर वायर आणि डीसी केबलची चोरी करत असे. या टोळीने लातूर जिल्ह्यातील ६ आणि धाराशिव जिल्ह्यातील ३ अशा एकूण ९ गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यांतील एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यांतर्गत तीन गुन्हे (गु.र.नं. ५०६/२०२५, ५१८/२०२५, ५२२/२०२५), चाकूर पोलीस ठाण्यांतर्गत दोन गुन्हे (गु.र.नं. ५९३/२०२४, २१५/२०२६) आणि गांधी चौक पोलीस ठाण्यांतर्गत एका गुन्ह्याचा (गु.र.नं. ४५६/२०२६) समावेश आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाणे (गु.र.नं. ३००/२०२६), नळदुर्ग पोलीस ठाणे (गु.र.नं. २७६/२०२६) आणि शिराढोण पोलीस ठाण्यांतर्गत (गु.र.नं. १३/२०२६) दाखल असलेले गुन्हे उघड झाले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांच्यासह पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे आणि अंजली गायकवाड यांचा समावेश होता. सध्या आरोपीला औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले असून औसा पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच फरार साथीदारांचा शोध व इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

More news from Maharashtra and nearby areas
  • लातूर स्थानिक गुन्हे शाखेने मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कॉपर वायर व डीसी केबल चोरीच्या प्रकरणांमधील एका सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा माल विकून मिळालेली २,५०,००० रुपयांची रोकड जप्त केली आहे. प्राथमिक चौकशीत या आरोपीने लातूर जिल्ह्यातील ६ आणि धाराशिव जिल्ह्यातील ३ अशा एकूण ९ गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १२ जुलै २०२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास हरंगुळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयास्पदरीत्या थांबलेल्या विकास विलास जाधव (वय ४० वर्षे, रा. आवंतीनगर, पीव्हीआर चौक, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पिशवीत २,५०,००० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम चोरीच्या कॉपर वायर आणि डीसी केबलच्या विक्रीतून मिळाल्याची कबुली त्याने दिली. तसेच, आपले साथीदार सागर मच्छिंद्र माने (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि नरसिंग दत्तात्रय माने (रा. तगरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्यासोबत मिळून ओम्नी कार व ऑटो रिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहर परिसरातील इलेक्ट्रिकल दुकाने व गोदामांमधून चोरी केल्याचे त्याने कबूल केले. आरोपीच्या कबुलीमुळे लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यातील तीन, चाकूर पोलीस ठाण्यातील दोन आणि गांधी चौक पोलीस ठाण्यातील एक, तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, नळदुर्ग व शिराढोण पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे व अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली. सध्या आरोपीला पुढील तपासासाठी औसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून फरार आरोपींचा आणि चोरीतील इतर मुद्देमालाचा शोध सुरू आहे.
    1
    लातूर स्थानिक गुन्हे शाखेने मालमत्तेविरुद्धचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या विशेष मोहिमेअंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील कॉपर वायर व डीसी केबल चोरीच्या प्रकरणांमधील एका सराईत आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीचा माल विकून मिळालेली २,५०,००० रुपयांची रोकड जप्त केली आहे. प्राथमिक चौकशीत या आरोपीने लातूर जिल्ह्यातील ६ आणि धाराशिव जिल्ह्यातील ३ अशा एकूण ९ गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक १२ जुलै २०२६ रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास हरंगुळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयास्पदरीत्या थांबलेल्या विकास विलास जाधव (वय ४० वर्षे, रा. आवंतीनगर, पीव्हीआर चौक, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता त्याच्या पिशवीत २,५०,००० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. ही रक्कम चोरीच्या कॉपर वायर आणि डीसी केबलच्या विक्रीतून मिळाल्याची कबुली त्याने दिली. तसेच, आपले साथीदार सागर मच्छिंद्र माने (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि नरसिंग दत्तात्रय माने (रा. तगरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्यासोबत मिळून ओम्नी कार व ऑटो रिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहर परिसरातील इलेक्ट्रिकल दुकाने व गोदामांमधून चोरी केल्याचे त्याने कबूल केले.

आरोपीच्या कबुलीमुळे लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यातील तीन, चाकूर पोलीस ठाण्यातील दोन आणि गांधी चौक पोलीस ठाण्यातील एक, तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, नळदुर्ग व शिराढोण पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे व अंजली गायकवाड यांच्या पथकाने केली. सध्या आरोपीला पुढील तपासासाठी औसा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून फरार आरोपींचा आणि चोरीतील इतर मुद्देमालाचा शोध सुरू आहे.
    user_Dede Khanderao Nivrutti
    Dede Khanderao Nivrutti
    Advertising agency Latur, Maharashtra•
    41 min ago
  • लातूर स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर वायर आणि डीसी केबल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून २,५०,००० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. रविवार, १२ जुलै २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक हरंगुळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयित आरोपी विकास विलास जाधव (वय ४० वर्षे, रा. आवंतीनगर, पीव्हीआर चौक, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या पिशवीची झडती घेतली असता ही रोकड आढळून आली. चोरीच्या कॉपर वायर आणि डीसी केबलची विक्री करून ही रक्कम मिळाल्याची कबुली आरोपीने दिली आहे. प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास जाधव याने त्याचे साथीदार सागर मच्छिंद्र माने (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि नरसिंग दत्तात्रय माने (रा. तगरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्या मदतीने या चोऱ्या केल्या आहेत. ही टोळी ओमनी कार आणि ऑटोरिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहर परिसरातील इलेक्ट्रिकल दुकाने व गोदामांमधून कॉपर वायर आणि डीसी केबलची चोरी करत असे. या टोळीने लातूर जिल्ह्यातील ६ आणि धाराशिव जिल्ह्यातील ३ अशा एकूण ९ गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे. या कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यांतील एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यांतर्गत तीन गुन्हे (गु.र.नं. ५०६/२०२५, ५१८/२०२५, ५२२/२०२५), चाकूर पोलीस ठाण्यांतर्गत दोन गुन्हे (गु.र.नं. ५९३/२०२४, २१५/२०२६) आणि गांधी चौक पोलीस ठाण्यांतर्गत एका गुन्ह्याचा (गु.र.नं. ४५६/२०२६) समावेश आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाणे (गु.र.नं. ३००/२०२६), नळदुर्ग पोलीस ठाणे (गु.र.नं. २७६/२०२६) आणि शिराढोण पोलीस ठाण्यांतर्गत (गु.र.नं. १३/२०२६) दाखल असलेले गुन्हे उघड झाले आहेत. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांच्यासह पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे आणि अंजली गायकवाड यांचा समावेश होता. सध्या आरोपीला औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले असून औसा पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच फरार साथीदारांचा शोध व इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
    1
    लातूर स्थानिक गुन्हे शाखेने कॉपर वायर आणि डीसी केबल चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली असून त्याच्याकडून २,५०,००० रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. रविवार, १२ जुलै २०२६ रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक हरंगुळ रेल्वे पुलाजवळ गस्त घालत असताना संशयित आरोपी विकास विलास जाधव (वय ४० वर्षे, रा. आवंतीनगर, पीव्हीआर चौक, लातूर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या पिशवीची झडती घेतली असता ही रोकड आढळून आली. चोरीच्या कॉपर वायर आणि डीसी केबलची विक्री करून ही रक्कम मिळाल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी विकास जाधव याने त्याचे साथीदार सागर मच्छिंद्र माने (रा. उमरगा, जि. धाराशिव) आणि नरसिंग दत्तात्रय माने (रा. तगरखेडा, ता. निलंगा, जि. लातूर) यांच्या मदतीने या चोऱ्या केल्या आहेत. ही टोळी ओमनी कार आणि ऑटोरिक्षाचा वापर करून औसा, चाकूर आणि लातूर शहर परिसरातील इलेक्ट्रिकल दुकाने व गोदामांमधून कॉपर वायर आणि डीसी केबलची चोरी करत असे. या टोळीने लातूर जिल्ह्यातील ६ आणि धाराशिव जिल्ह्यातील ३ अशा एकूण ९ गुन्ह्यांमध्ये आपला सहभाग असल्याची कबुली दिली आहे.

या कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यांतील एकूण नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये लातूर जिल्ह्यातील औसा पोलीस ठाण्यांतर्गत तीन गुन्हे (गु.र.नं. ५०६/२०२५, ५१८/२०२५, ५२२/२०२५), चाकूर पोलीस ठाण्यांतर्गत दोन गुन्हे (गु.र.नं. ५९३/२०२४, २१५/२०२६) आणि गांधी चौक पोलीस ठाण्यांतर्गत एका गुन्ह्याचा (गु.र.नं. ४५६/२०२६) समावेश आहे. तसेच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस ठाणे (गु.र.नं. ३००/२०२६), नळदुर्ग पोलीस ठाणे (गु.र.नं. २७६/२०२६) आणि शिराढोण पोलीस ठाण्यांतर्गत (गु.र.नं. १३/२०२६) दाखल असलेले गुन्हे उघड झाले आहेत.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे यांच्यासह पोलीस अंमलदार युवराज गिरी, प्रदीप स्वामी, राजेश कंचे, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, काकासाहेब बोचरे, रामदास बाचीफळे आणि अंजली गायकवाड यांचा समावेश होता. सध्या आरोपीला औसा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मुद्देमालासह हजर करण्यात आले असून औसा पोलीस पुढील तपास करत आहेत. तसेच फरार साथीदारांचा शोध व इतर मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे 'राम कृष्ण हरी' आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत पालखीचे प्रस्थान झाले आहे. या सोहळ्यात विठ्ठल नामाच्या गजराने अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून पालखी मार्गस्थ झाली आहे.
    1
    लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे 'राम कृष्ण हरी' आणि विठ्ठलाच्या नावाचा जयघोष करत पालखीचे प्रस्थान झाले आहे. या सोहळ्यात विठ्ठल नामाच्या गजराने अत्यंत उत्साही आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून पालखी मार्गस्थ झाली आहे.
    user_लहुकुमार शिंदे
    लहुकुमार शिंदे
    Media company Latur, Maharashtra•
    5 hrs ago
  • बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील संत सेवालाल महाराज चौकात रविवारी बंजारा समाज एकता संकल्प यात्रेचे अत्यंत उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. देशभर बंजारा समाजात एकता, संघटन आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचे समाजबांधवांनी पुष्पवृष्टी, जयघोष आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. ही यात्रा बंजारा समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारी असून समाजाने संघटित राहून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. आंध्र प्रदेशातील सेवागड येथून ५ जुलै रोजी सुरू झालेली ही यात्रा देशातील १८ राज्यांतून प्रवास करत २६ जुलै रोजी दिल्ली येथे पोहोचणार आहे. धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोहराड गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, सेवागड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. परळीतील या स्वागत सोहळ्याला बंजारा समाजातील सरपंच विजय राठोड, प्रेमदास पवार, अमर पवार, प्रविण पवार, वैजनाथ पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    2
    बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील संत सेवालाल महाराज चौकात रविवारी बंजारा समाज एकता संकल्प यात्रेचे अत्यंत उत्स्फूर्त आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. देशभर बंजारा समाजात एकता, संघटन आणि सामाजिक सलोखा निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या यात्रेचे समाजबांधवांनी पुष्पवृष्टी, जयघोष आणि पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. ही यात्रा बंजारा समाजात एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक जागृतीचा संदेश देणारी असून समाजाने संघटित राहून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

आंध्र प्रदेशातील सेवागड येथून ५ जुलै रोजी सुरू झालेली ही यात्रा देशातील १८ राज्यांतून प्रवास करत २६ जुलै रोजी दिल्ली येथे पोहोचणार आहे. धर्मगुरू बाबुसिंग महाराज पोहराड गड तसेच धर्माधिकारी आंध्र प्रदेशचे संत सेवालाल महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, सेवागड यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा काढण्यात आली आहे. परळीतील या स्वागत सोहळ्याला बंजारा समाजातील सरपंच विजय राठोड, प्रेमदास पवार, अमर पवार, प्रविण पवार, वैजनाथ पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    25 min ago
  • बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात सुरू असलेल्या मतदान नोंदणी अभियानाला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी भेट दिली. या दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे आणि नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
    1
    बीड जिल्ह्यातील वडवणी शहरात सुरू असलेल्या मतदान नोंदणी अभियानाला जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी भेट दिली. या दौऱ्यादरम्यान ज्येष्ठ नेते राजाभाऊ मुंडे आणि नगराध्यक्ष शेषेराव जगताप यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी भेट घेऊन विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली.
    user_शंकर झाडे  दैनिक समर्थ राजयोग  पत्रकार
    शंकर झाडे दैनिक समर्थ राजयोग पत्रकार
    Wadwani, Beed•
    5 min ago
  • परभणी येथील महानगरपालिकेच्या महापौरांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. महापौरांवर थेट चाकूने हल्ला करण्याचा हा प्रयत्न नेमका कोणी केला आणि यामागचे कारण काय होते, याबाबतची अधिक माहिती समोर आलेली नाही.
    1
    परभणी येथील महानगरपालिकेच्या महापौरांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. महापौरांवर थेट चाकूने हल्ला करण्याचा हा प्रयत्न नेमका कोणी केला आणि यामागचे कारण काय होते, याबाबतची अधिक माहिती समोर आलेली नाही.
    user_Ramesh Mulgir
    Ramesh Mulgir
    मानवत, परभणी, महाराष्ट्र•
    56 min ago
  • महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    1
    महाराष्ट्रात सुरेश भुमरे यांनी धनगर समाजाच्या ताकदीबाबत थेट इशारा दिला आहे. धनगर समाजाला अजिबात कमी समजू नका, कारण या समाजात आमदार घडवण्याची आणि त्यांना पाडण्याचीही पूर्ण ताकद आहे, असे रोखठोक प्रतिपादन भुमरे यांनी केले आहे.
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    22 hrs ago
  • लातूर शहराच्या दक्षिण भागातील संजय नगर भागात अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ सुरू असून दारूच्या नशेत एक महिला रस्त्यावर बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार, १२ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे संजय नगरमधील रहिवाशांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथील वॉर्ड क्रमांक चार आणि पाच अंतर्गत येणाऱ्या संजय नगर भागात घरोघरी अवैध दारूची विक्री केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या लहू वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरच ही महिला दारूच्या नशेत अत्यंत वाईट आणि बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडली होती. हे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून या महिलेला पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. हा संपूर्ण परिसर विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने संतप्त स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून विवेकानंद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    1
    लातूर शहराच्या दक्षिण भागातील संजय नगर भागात अवैध दारू विक्रीचा धुमाकूळ सुरू असून दारूच्या नशेत एक महिला रस्त्यावर बेशुद्ध पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवार, १२ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे संजय नगरमधील रहिवाशांमध्ये तीव्र भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. येथील वॉर्ड क्रमांक चार आणि पाच अंतर्गत येणाऱ्या संजय नगर भागात घरोघरी अवैध दारूची विक्री केली जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

या भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या लहू वाघमारे नावाच्या व्यक्तीच्या घरासमोरच ही महिला दारूच्या नशेत अत्यंत वाईट आणि बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पडली होती. हे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून या महिलेला पुढील उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. हा संपूर्ण परिसर विवेकानंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने संतप्त स्थानिक नागरिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून विवेकानंद पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
    user_Nitin Chalak
    Nitin Chalak
    Media company शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.