logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

10 hrs ago
user_Nandkumar Motiram Totewad
Nandkumar Motiram Totewad
हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
10 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अखंड हरिनाम सप्ताह मौजे उंद्री प दे ता मुखेड दिनांक 06/04/2026/ सोमवार सम्राट कीर्तनकार ह.भ.प. हनमंत महाराज किणीकर
    3
    अखंड हरिनाम सप्ताह मौजे उंद्री प दे ता मुखेड दिनांक 06/04/2026/ सोमवार सम्राट कीर्तनकार ह.भ.प. हनमंत महाराज किणीकर
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • *गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन* वाशीम:-राज्यभर सुरु असलेल्या गॅस टंचाई ,गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या गंभीर परिणामा बाबतीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांनी चौकात जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरील रस्त्यावर प्रत्यक्ष चूल पेटवून भाकरी तयार केली. ती भाकरी आपल्या मागण्यांच्या निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली.या कृतीतून गॅस टंचाईचे सामान्य कुटुंबात आलेल्या संकटाचे जीवंत चित्र उभे करण्यात आले. आपल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या. गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी.गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा. 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळेल, ही अट शिथिल करावी. काळाबाजार करणार्‍यांवर सक्त कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्य़ात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? यांचे ऑडिट करावे.इत्यादीं मागण्या करण्यात आल्या. सदरील आंदोलनात प्रा.रंगनाथ धांडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, ज्योतीताई इंगळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, सूर्यकांत गायकवाड युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष राव सरकटे माझी जिल्हा सचिव दिलीप भगत तालुका अध्यक्ष सोनाजी इंगळे, सुरेश सोनवणे सुनिता ताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, मिलनताई बनसोड,स्वप्नील खडसे संतोष सरकटे नारायण मिटकरी विशाल इंगोले किशोर पंडित अनिल खडसे अखिल भगत, कैलास राऊत, निलेश भोजने, अरविंद पडघान कांताबाई खिल्लारे कांताबाई साबळे कल्पना रवी कुमार देवळे गोदावरी प्रधान अनंत कुमार जुमडे, विलास खिल्लारे, सुमनबाई ताजने ,मिनल बनसोड,मायाताई इंगोले,नारायण खोडके, रवींद्र इंगोले, भगवत चव्हाण, दिनेश खडसे,महेश तायडे दीपक आगलावे, आकाश इंगोले, प्रा.मुकुंद खडसे, महेश खडसे, उपस्थित होते.
    3
    *गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन*
वाशीम:-राज्यभर सुरु असलेल्या गॅस टंचाई ,गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या गंभीर परिणामा बाबतीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
या आंदोलनात महिला  पदाधिकाऱ्यांनी चौकात जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरील रस्त्यावर प्रत्यक्ष चूल पेटवून भाकरी तयार केली. ती भाकरी आपल्या मागण्यांच्या निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली.या कृतीतून गॅस टंचाईचे सामान्य कुटुंबात आलेल्या संकटाचे जीवंत चित्र उभे करण्यात आले.
आपल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी.गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा. 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळेल, ही अट शिथिल करावी. काळाबाजार करणार्‍यांवर सक्त कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्य़ात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? यांचे ऑडिट करावे.इत्यादीं मागण्या करण्यात आल्या.
सदरील आंदोलनात प्रा.रंगनाथ धांडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी,   ज्योतीताई इंगळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, सूर्यकांत गायकवाड युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष राव सरकटे  माझी जिल्हा सचिव दिलीप भगत तालुका अध्यक्ष सोनाजी इंगळे, सुरेश सोनवणे सुनिता ताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, मिलनताई बनसोड,स्वप्नील खडसे संतोष सरकटे  नारायण मिटकरी विशाल इंगोले  किशोर पंडित अनिल खडसे अखिल भगत, कैलास राऊत, निलेश भोजने, अरविंद पडघान कांताबाई खिल्लारे कांताबाई साबळे कल्पना रवी कुमार देवळे गोदावरी प्रधान अनंत कुमार जुमडे, विलास खिल्लारे, सुमनबाई ताजने ,मिनल बनसोड,मायाताई इंगोले,नारायण खोडके, रवींद्र इंगोले, भगवत चव्हाण, दिनेश खडसे,महेश तायडे दीपक आगलावे, आकाश इंगोले, प्रा.मुकुंद खडसे, महेश खडसे, उपस्थित होते.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • सोयाबीन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; 6 आरोपी जेरबंद, ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त. लातूर (एल पी उगीले) येथील     एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या सोयाबीन चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून एमआयडीसी पोलिसांनी अल्पावधीतच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला असून, 6 आरोपींना अटक करून तब्बल ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सदर प्रकरणी फिर्यादी समीर अहमद पठाण (वय 31 वर्षे, रा. हाडको कॉलनी, लातूर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 127/2026, कलम 331, 331(4), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये दिनांक 16/03/2026 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक 14/03/2026 रोजी पहाटे 1.30 ते सकाळी 08.30 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला व साठवून ठेवलेले 100 कट्टे सोयाबीन (अंदाजे किंमत ₹2,50,000/-) चोरून नेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्याचे बारकाईने विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले अभिषेक सुहास यादव (वय 21, रा. स्वराज्य नगर, लातूर),सुशील सुनिल नाथभजण (वय 21, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),अजय महादेव जमदाडे (वय 20, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),रमजान वजीर शेख (वय 29, रा. शिऊर, ता. जि. लातूर),आर्यन माणिक कांबळे (वय 19, रा. वरवटी, ता. जि. लातूर),विनोद गोविंद सुरवसे (वय 26, रा. वरवटी, ता. जि. लातूर) सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन पिकअप वाहने (अंदाजे किंमत ₹12,00,000/-) तसेच चोरीस गेलेले 100 कट्टे सोयाबीन (₹2,50,000/-) असा एकूण ₹14,50,000/- (चौदा लाख पन्नास हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच स्थानिक गोपनीय माहितीचा प्रभावी वापर केला. अल्पावधीत आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केले आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे (लातूर शहर) यांच्या नियंत्रणाखाली  एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिमराव बेल्लाळे, पोलीस अमलदार बळवंत भोसले,राजाभाऊ म्हस्के, अक्षय डिगोळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
    2
    सोयाबीन चोरी प्रकरणाचा पर्दाफाश; 6 आरोपी जेरबंद, ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त.
लातूर (एल पी उगीले) येथील     एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या सोयाबीन चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून एमआयडीसी पोलिसांनी अल्पावधीतच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला असून, 6 आरोपींना अटक करून तब्बल ₹14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.सदर प्रकरणी फिर्यादी समीर अहमद पठाण (वय 31 वर्षे, रा. हाडको कॉलनी, लातूर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 127/2026, कलम 331, 331(4), 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये दिनांक 16/03/2026 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादी यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक 14/03/2026 रोजी पहाटे 1.30 ते सकाळी 08.30 वा. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य शटरचे लॉक तोडून आत प्रवेश केला व साठवून ठेवलेले 100 कट्टे सोयाबीन (अंदाजे किंमत ₹2,50,000/-) चोरून नेले होते. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने तात्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली. घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. त्याचे बारकाईने विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली.तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतले अभिषेक सुहास यादव (वय 21, रा. स्वराज्य नगर, लातूर),सुशील सुनिल नाथभजण (वय 21, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),अजय महादेव जमदाडे (वय 20, रा. राजेशिवाजी नगर, लातूर),रमजान वजीर शेख (वय 29, रा. शिऊर, ता. जि. लातूर),आर्यन माणिक कांबळे (वय 19, रा. वरवटी, ता. जि. लातूर),विनोद गोविंद सुरवसे (वय 26, रा. वरवटी, ता. जि. लातूर)
सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली तीन पिकअप वाहने (अंदाजे किंमत ₹12,00,000/-) तसेच चोरीस गेलेले 100 कट्टे सोयाबीन (₹2,50,000/-) असा एकूण ₹14,50,000/- (चौदा लाख पन्नास हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच स्थानिक गोपनीय माहितीचा प्रभावी वापर केला. अल्पावधीत आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे (लातूर शहर) यांच्या नियंत्रणाखाली 
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समाधान चवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भिमराव बेल्लाळे, पोलीस अमलदार बळवंत भोसले,राजाभाऊ म्हस्के, अक्षय डिगोळे यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मुन्ना देशमुख हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
लातूर पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या मालमत्तेची सुरक्षा करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवावी व संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मंठा :- प्रत्येक दिवसाप्रमाणे आजचीही सकाळ सर्व नियोजितपने वातावरण असताना मंठा जालना रोडवरील उस्ताद लहुजी साळवे चौक मंठा येथे सकाळी ९.४० च्या दरम्यान कंटेनर आणि मोटारसायकल यांचा भीषण अपघात होत असताना मोटारसायकल कंटेनर च्या खाली आली. कंटेनर च्या समोरील चाकात आली असता मोटारसायकल चालक मोरे यांच्या अंगावरून जाणार असता सोनपेठ येथील युवक याने मोरे यांना ओढून बाहेर काढले क्षणात मोठी घडणारी घटना या युवकाच्या देवदूतपणा मुळे होणारा अनर्थ टळला दैव तारी त्याला कोण मारी ही मन तंतोतंत खरी ठरली.मोरे यांच्या मातापित्याने व मित्रपरिवाराने सोनपेठ येथील युवकाचे आभार मानले. अपघात स्थळी फोटो रिल काढण्यापेक्षा ही मदतीची साखळी निर्माण झाली तर अनेकांचे प्राण निश्चित वाचू शकतात.
    1
    मंठा :- प्रत्येक दिवसाप्रमाणे आजचीही सकाळ सर्व नियोजितपने वातावरण असताना मंठा जालना रोडवरील उस्ताद लहुजी साळवे चौक मंठा येथे सकाळी ९.४० च्या दरम्यान कंटेनर आणि मोटारसायकल यांचा भीषण अपघात होत असताना मोटारसायकल कंटेनर च्या खाली आली. कंटेनर च्या समोरील चाकात आली असता मोटारसायकल चालक मोरे यांच्या अंगावरून जाणार असता सोनपेठ येथील युवक याने मोरे यांना ओढून बाहेर काढले क्षणात मोठी घडणारी घटना या युवकाच्या देवदूतपणा मुळे होणारा अनर्थ टळला दैव तारी त्याला कोण मारी ही मन  तंतोतंत खरी ठरली.मोरे यांच्या मातापित्याने व मित्रपरिवाराने सोनपेठ येथील युवकाचे आभार मानले. अपघात स्थळी फोटो रिल काढण्यापेक्षा ही मदतीची साखळी निर्माण झाली तर अनेकांचे प्राण निश्चित वाचू शकतात.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • मूर्तिजापूर शहरातील दर्यापूर उड्डाणपुलावर २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तरुणीचा पाठलाग करत लग्नासाठी दबाव टाकला आणि जबरदस्तीने तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    10
    मूर्तिजापूर शहरातील दर्यापूर उड्डाणपुलावर २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तरुणीचा पाठलाग करत लग्नासाठी दबाव टाकला आणि जबरदस्तीने तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले.
या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    Construction Contractor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • वरोरा-वणी रेल्वे गेटवर निकृष्ट कोळसा प्रकरण उघड
    1
    वरोरा-वणी रेल्वे गेटवर निकृष्ट कोळसा प्रकरण उघड
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Wani, Yavatmal•
    4 hrs ago
  • मंगरूळपीर येथे गॅस टंचाईचे तहसीलदारांना निवेदन वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मंगरूळपीर ता ६ मंगरूळपीर येथे दि ६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे वतीने "नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर" या आशायाचे जण आंदोलन करण्यात आले. असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाचा आशय असा की राज्यभरात सुरू असलेली गैस टंचाई, गैस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामा बद्दल बंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, नागरिक "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन, शासनाचे आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारकचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ५ तास उन्हात रांगेत उभे होते. त्यातच रांगेत उभे असतांना त्यांचा मृत्यू आला होता. वसेच अमरावती येथे तरुणाचा गैस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्देवी मृत्यू झाला होता. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आले असून मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलन करण्यात येईल.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र राऊत,समाधान भगत, विनोद भगत, सुधीर गहुले,सुनील वानखडे,छाया वानखडे,दुर्गा वानखडे, देवराव भगत,भगवान भगत, विलास दंदे ,संगीता वानखडे, अरुण भगत ,सिद्धार्थ वानखडे, रवींद्र शृंगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    2
    मंगरूळपीर येथे गॅस टंचाईचे तहसीलदारांना निवेदन
वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन 
मंगरूळपीर ता ६ मंगरूळपीर  येथे दि ६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे  वतीने "नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर" या आशायाचे जण आंदोलन करण्यात  आले. असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. 
या निवेदनाचा आशय असा की राज्यभरात सुरू असलेली गैस टंचाई, गैस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामा बद्दल बंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, नागरिक "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर"  ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन, शासनाचे आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारकचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे.
काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ५ तास उन्हात रांगेत उभे होते. त्यातच रांगेत उभे असतांना त्यांचा मृत्यू आला होता. वसेच अमरावती येथे तरुणाचा गैस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्देवी मृत्यू झाला होता. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आले असून मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलन करण्यात येईल.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र राऊत,समाधान भगत, विनोद भगत, सुधीर गहुले,सुनील वानखडे,छाया वानखडे,दुर्गा वानखडे, देवराव भगत,भगवान भगत, विलास दंदे ,संगीता वानखडे, अरुण भगत ,सिद्धार्थ वानखडे, रवींद्र शृंगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
    user_सारनाथ अवचार
    सारनाथ अवचार
    पत्रकार मालेगाव, वाशिम, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा ₹3.75 लाखांचा साठा जप्त, एक आरोपी जेरबंद. लातूर (एल पी उगीले)  जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर व नियोजनबद्ध कारवाया सुरू असून, त्याच अनुषंगाने दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी चाकूर येथे मोठी धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख,पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांचा समावेश होता. तसेच कारवाईदरम्यान पोलीस स्टेशन चाकूर येथील बीट अंमलदार बोळंगे यांनी सहकार्य केले. सदर पथकाने स्वामी विवेकानंद चौक परिसरातील “राज कन्फेक्शनरी” दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू साठवून विक्रीसाठी ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून मारुती राजेंद्र सोमवंशी (वय 33 वर्षे,रा. चाकूर)  यास ताब्यात घेतले. गोडाऊनची झडती घेतली असता झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामध्ये— NO.4101 Premium Chewing Tobacco नावाची 16 पोती, सुगंधी तंबाखूची 6 पोती,  Extra Freshness नावाची 3 पोती, असा एकूण ₹3,75,000/- (तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर प्रतिबंधित तंबाखू हा सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा असून, महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे. तरीदेखील आरोपीने स्वतःच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये हा साठा बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. सदर मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला असून,या प्रकरणी आरोपी मारुती राजेंद्र सोमवंशी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
    2
    स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा ₹3.75 लाखांचा साठा जप्त, एक आरोपी जेरबंद.
लातूर (एल पी उगीले)  जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाकडून सातत्याने कठोर व नियोजनबद्ध कारवाया सुरू असून, त्याच अनुषंगाने दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी चाकूर येथे मोठी धाड टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या सुगंधी तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नियंत्रणाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली.
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामधील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद नानासाहेब देशमुख,पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, पाराजी पुठ्ठेवाड, तुळशीराम बरुरे, प्रदीप चोपणे यांचा समावेश होता. तसेच कारवाईदरम्यान पोलीस स्टेशन चाकूर येथील बीट अंमलदार बोळंगे यांनी सहकार्य केले.
सदर पथकाने स्वामी विवेकानंद चौक परिसरातील “राज कन्फेक्शनरी” दुकानाच्या पाठीमागील गोडाऊनमध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखू साठवून विक्रीसाठी ठेवलेल्या ठिकाणी धाड टाकून मारुती राजेंद्र सोमवंशी (वय 33 वर्षे,रा. चाकूर)  यास ताब्यात घेतले. गोडाऊनची झडती घेतली असता झडतीदरम्यान मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधी तंबाखूचा साठा आढळून आला. त्यामध्ये—
NO.4101 Premium Chewing Tobacco नावाची 16 पोती, सुगंधी तंबाखूची 6 पोती,  Extra Freshness नावाची 3 पोती, असा एकूण ₹3,75,000/- (तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये) किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर प्रतिबंधित तंबाखू हा सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारा असून, महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घातलेली आहे. तरीदेखील आरोपीने स्वतःच्या दुकानाच्या गोडाऊनमध्ये हा साठा बेकायदेशीर रित्या विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. सदर मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला असून,या प्रकरणी आरोपी मारुती राजेंद्र सोमवंशी याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 123, 274, 275, 223 तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम कलम 59 अन्वये पोलीस ठाणे चाकूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री करणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारच्या अवैध कृत्यांविरुद्ध भविष्यातही कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
    user_Laxman Ugile
    Laxman Ugile
    उदगीर, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंचांचे आमरण उपोषण धामणगाव रेल्वे ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंच श्रीमती श्रुती अंकुश उईके यांनी आमरण उपोषणाचा सुरू केले आहे . याबाबत त्यांनी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथील गटविकास अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिली आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या दिनांक १२ मार्च २०२६ च्या अहवालामध्ये दलित वस्ती सुधार योजनेत गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र अहवालानंतरही संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप श्रीमती उईके यांनी केला आहे. या प्रकरणात दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खोट्या सह्यांच्या आधारे करण्यात आलेल्या RTGS व्यवहारातील संबंधित व्यक्ती व बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, बनावट कागदपत्रे तयार करून सादर करणाऱ्यांसह त्यांना मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेची विभागीय चौकशी करून आजपर्यंत झालेल्या सर्व कामे व पेमेंटची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या आहेत. दरम्यान, आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीमती श्रुती उईके या मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ पासून पंचायत समिती प्रांगण, धामणगाव रेल्वे येथे शांततापूर्ण आमरण उपोषणास बसल्या आहे . या आंदोलनामुळे तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    1
    दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंचांचे आमरण उपोषण
धामणगाव रेल्वे ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंच श्रीमती श्रुती अंकुश उईके यांनी आमरण उपोषणाचा सुरू केले आहे . याबाबत त्यांनी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथील गटविकास अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिली आहे.
पंचायत समिती कार्यालयाच्या दिनांक १२ मार्च २०२६ च्या अहवालामध्ये दलित वस्ती सुधार योजनेत गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र अहवालानंतरही संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप श्रीमती उईके यांनी केला आहे.
या प्रकरणात दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खोट्या सह्यांच्या आधारे करण्यात आलेल्या RTGS व्यवहारातील संबंधित व्यक्ती व बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, बनावट कागदपत्रे तयार करून सादर करणाऱ्यांसह त्यांना मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेची विभागीय चौकशी करून आजपर्यंत झालेल्या सर्व कामे व पेमेंटची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या आहेत.
दरम्यान, आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीमती श्रुती उईके या मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ पासून पंचायत समिती प्रांगण, धामणगाव रेल्वे येथे शांततापूर्ण आमरण उपोषणास बसल्या आहे .
या आंदोलनामुळे तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.