छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य ऐतिहासिक आरक्षण मेळाव्यात गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या अभ्यास समितीकडून तात्काळ अहवाल घेऊन तो केंद्र सरकारकडे शिफारसीसाठी पाठवावा आणि गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारला जाईल आणि हे फडणवीस सरकारला परवडणार नाही, असा स्पष्ट इशारा चव्हाण यांनी दिला. गोर बंजारा समाज हा आदिम सभ्यता जपणारा असून अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करतो, त्यामुळे त्यांना या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात या मागणीवर समाज ठाम आहे. या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गोर बंजारा समाजाच्या वतीने ५७ महामोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान अनेक तरुणांनी आमरण उपोषण केले आणि किमान ५ तरुणांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, तसेच समृद्धी महामार्गही रोखण्यात आला होता. त्यानंतर सरकारने अनुसूचित जमाती आयोगासाठी अभ्यास समिती नेमली, मात्र सात महिने उलटूनही या समितीने आपला अभ्यास सुरू केलेला नाही. याच शासकीय दिरंगाईमुळे गोर बंजारा आरक्षण कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत संभाजीनगरमध्ये हा महामेळावा आयोजित केला. या कार्यक्रमाची सुरुवात पारंपारीक निसर्गपूजा म्हणजेच 'जळभोग' लावून आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून झाली. प्रा. डॉ. दामोदर राठोड हिमायदनगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १० हजार समाज बांधव व भगिनी उपस्थित होते आणि त्यांनी भविष्यात एकजुटीने एसटी आरक्षणासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी आमदार राजेश भाऊ राठोड, माजी आमदार निलय नाईक, कर्नाटक बिदरचे उद्योजक जयसिंग राठोड, नांदेडच्या शशिकला काशिनाथ राठोड, आरक्षण अभ्यासक प्रा. मोहन भाऊ चव्हाण, निवृत्त माहिती संचालक मोहन भाऊ राठोड, परभणीचे प्रा. डॉ. बबन पवार, कर्नाटकचे माजी न्यायाधीश ॲड. सुभाषचंद्र राठोड, राष्ट्रीय समन्वयक दिगंबर राठोड, सिम्पलताई राठोड, राष्ट्रीय महासचिव प्रा. डॉ. अनिल भाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आकाशी जाधव, डॉ. अभय जाधव, कबीरदास महाराज पोरिया गड, कर्नाटकचे आयएएस अनिल राठोड, मध्य प्रदेशचे देवराज नायक, निवृत्त अधिकारी उत्तम चव्हाण, उद्योजक गणेश चव्हाण, देविदास राठोड, विनोद जाधव आणि अरुण राठोड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य ऐतिहासिक आरक्षण मेळाव्यात गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या अभ्यास समितीकडून तात्काळ अहवाल घेऊन तो केंद्र सरकारकडे शिफारसीसाठी पाठवावा आणि गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारला जाईल आणि हे फडणवीस सरकारला परवडणार नाही, असा स्पष्ट इशारा चव्हाण यांनी दिला. गोर बंजारा समाज हा आदिम सभ्यता जपणारा असून अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करतो, त्यामुळे त्यांना या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात या मागणीवर समाज ठाम आहे. या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी संपूर्ण
महाराष्ट्रात गोर बंजारा समाजाच्या वतीने ५७ महामोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान अनेक तरुणांनी आमरण उपोषण केले आणि किमान ५ तरुणांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, तसेच समृद्धी महामार्गही रोखण्यात आला होता. त्यानंतर सरकारने अनुसूचित जमाती आयोगासाठी अभ्यास समिती नेमली, मात्र सात महिने उलटूनही या समितीने आपला अभ्यास सुरू केलेला नाही. याच शासकीय दिरंगाईमुळे गोर बंजारा आरक्षण कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत संभाजीनगरमध्ये हा महामेळावा आयोजित केला. या कार्यक्रमाची सुरुवात पारंपारीक निसर्गपूजा म्हणजेच 'जळभोग' लावून आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून झाली. प्रा. डॉ. दामोदर राठोड हिमायदनगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १० हजार समाज बांधव व भगिनी उपस्थित होते आणि त्यांनी भविष्यात
एकजुटीने एसटी आरक्षणासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी आमदार राजेश भाऊ राठोड, माजी आमदार निलय नाईक, कर्नाटक बिदरचे उद्योजक जयसिंग राठोड, नांदेडच्या शशिकला काशिनाथ राठोड, आरक्षण अभ्यासक प्रा. मोहन भाऊ चव्हाण, निवृत्त माहिती संचालक मोहन भाऊ राठोड, परभणीचे प्रा. डॉ. बबन पवार, कर्नाटकचे माजी न्यायाधीश ॲड. सुभाषचंद्र राठोड, राष्ट्रीय समन्वयक दिगंबर राठोड, सिम्पलताई राठोड, राष्ट्रीय महासचिव प्रा. डॉ. अनिल भाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आकाशी जाधव, डॉ. अभय जाधव, कबीरदास महाराज पोरिया गड, कर्नाटकचे आयएएस अनिल राठोड, मध्य प्रदेशचे देवराज नायक, निवृत्त अधिकारी उत्तम चव्हाण, उद्योजक गणेश चव्हाण, देविदास राठोड, विनोद जाधव आणि अरुण राठोड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
- छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड येथील शिवसेना भवन येथे सिल्लोड–सोयगाव विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे बीएलए (बूथ लेव्हल एजंट), पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी विशेष मतदार पुनर्निरीक्षण (SIR) कार्यक्रमाच्या अनुषंगाने मार्गदर्शन शिबिर आणि आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या शिबिरात शिवसेनेचे मार्गदर्शक प्रशांत घोरपडे आणि दिग्विजय पाटील यांनी मतदार पुनर्निरीक्षणाची प्रक्रिया, बीएलएंची जबाबदारी आणि प्रत्यक्ष काम करताना घ्यावयाची दक्षता याविषयी सखोल मार्गदर्शन केले. या बैठकीला खासदार आणि छत्रपती संभाजीनगर–जालना SIR संपर्क प्रमुख संदीपान भुमरे, माजी मंत्री व आमदार अब्दुल सत्तार आणि शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख विलास पारकर प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद करणे, अपात्र व बोगस मतदारांची नावे शोधून काढणे आणि कोणताही पात्र मतदार वंचित राहू नये यासाठी बीएलएंनी गांभीर्याने काम करण्याचे आवाहन करण्यात आले. बीएलएंना ई-फॉर्म अचूक भरणे, आवश्यक कागदपत्रे, पांढऱ्या पार्श्वभूमीचा फोटो वापरणे, ओळखपत्र जवळ बाळगणे आणि स्थलांतरित, मृत किंवा दुबार मतदारांची नोंद याबाबत उदाहरणांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. बैठकीत बीएलए व कार्यकर्त्यांनी आपल्या शंका व अडचणी मांडल्या, ज्यांचे मार्गदर्शकांनी उदाहरणांसह निरसन केले. तसेच या मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलएंचा मुंबई येथे विशेष सन्मान केला जाईल, अशी घोषणाही यावेळी करण्यात आली. आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्कल प्रमुखांना बूथनिहाय सूक्ष्म नियोजन करून बीएलएशी सातत्याने समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले, तर खासदार संदीपान भुमरे यांनी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन केले. या प्रसंगी नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव पा. तायडे यांच्यासह स्थानिक विविध संस्थांचे पदाधिकारी आणि महिला आघाडीच्या नेत्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.4
- छत्रपती संभाजीनगरच्या प्रतापनगर परिसरात व्यावसायिक संजय लाहोटी यांच्या बंगल्यावर झालेल्या सशस्त्र दरोड्यानंतर अवघ्या सहा दिवसांत पुन्हा त्याच भागात दुसरी मोठी चोरी झाली आहे. घाटी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती देशमुख यांच्या बंद घरावर चोरट्यांनी डल्ला मारत लाखोंचा ऐवज लंपास केल्याने शहरात कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. देशमुख या कामानिमित्त बाहेरगावी गेल्या असताना पहाटे ३:४५ वाजताच्या सुमारास दोन शस्त्रधारी चोरट्यांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये प्रवेश केला. त्यांनी लोखंडी लॅच लॉक, लाकडी दरवाजाची चौकट आणि कपाट फोडून अवघ्या २० मिनिटांत ९ तोळे सोने, दीड किलो चांदीचे दागिने आणि ८० हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा चोरीचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. चोरीची तक्रार देण्यासाठी गेलेल्या डॉ. देशमुख यांना पोलीस ठाण्यात वीज पुरवठा नसणे आणि अधिकारी उपलब्ध नसल्याचे कारण सांगत तब्बल १० तास हेलपाटे मारावे लागल्याचा गंभीर आरोप आहे. तसेच, फॉरेन्सिक पथकही चोरीच्या घटनेनंतर तब्बल १२ तासांनी घटनास्थळी पोहोचल्याने पोलिसांच्या ढिसाळ कार्यपद्धतीवर रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, लाहोटी यांच्या बंगल्यातील दरोड्यात ज्या पद्धतीने दरवाजे फोडून घरात प्रवेश करण्यात आला होता, हुबेहूब त्याच पद्धतीचा वापर या चोरीतही झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या दोन्ही गुन्ह्यांमागे एकाच टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रतापनगर परिसरात लागोपाठ घडणाऱ्या या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी या भागात रात्रगस्त वाढवावी अशी जोरदार मागणी रहिवाशांनी केली आहे.4
- छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदिपान भुमरे साहेब यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे.1
- Post by Anis qureshi sillod1
- छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा टाकला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी पत्ता जुगार खेळणाऱ्या आरोपींना अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त केला आहे. रेलगाव येथील या जुगार अड्ड्यावर छापा मारून आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्याची ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली आहे.1
- जालना येथे शासकीय डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेवर एका डॉक्टरने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शासकीय डॉक्टरवर झालेल्या या हल्ल्यानंतर डॉक्टरांनी एकत्र येत आपली एकजूट दाखवून दिली आहे.1
- छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भव्य ऐतिहासिक आरक्षण मेळाव्यात गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेल्या अभ्यास समितीकडून तात्काळ अहवाल घेऊन तो केंद्र सरकारकडे शिफारसीसाठी पाठवावा आणि गोर बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळवून देण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा भविष्यात रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारला जाईल आणि हे फडणवीस सरकारला परवडणार नाही, असा स्पष्ट इशारा चव्हाण यांनी दिला. गोर बंजारा समाज हा आदिम सभ्यता जपणारा असून अनुसूचित जमातीच्या (एसटी) आरक्षणाचे सर्व निकष पूर्ण करतो, त्यामुळे त्यांना या सवलती लवकरात लवकर लागू कराव्यात या मागणीवर समाज ठाम आहे. या आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात गोर बंजारा समाजाच्या वतीने ५७ महामोर्चे काढण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान अनेक तरुणांनी आमरण उपोषण केले आणि किमान ५ तरुणांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, तसेच समृद्धी महामार्गही रोखण्यात आला होता. त्यानंतर सरकारने अनुसूचित जमाती आयोगासाठी अभ्यास समिती नेमली, मात्र सात महिने उलटूनही या समितीने आपला अभ्यास सुरू केलेला नाही. याच शासकीय दिरंगाईमुळे गोर बंजारा आरक्षण कृती समितीने आक्रमक पवित्रा घेत संभाजीनगरमध्ये हा महामेळावा आयोजित केला. या कार्यक्रमाची सुरुवात पारंपारीक निसर्गपूजा म्हणजेच 'जळभोग' लावून आणि भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून झाली. प्रा. डॉ. दामोदर राठोड हिमायदनगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या मेळाव्यात संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे १० हजार समाज बांधव व भगिनी उपस्थित होते आणि त्यांनी भविष्यात एकजुटीने एसटी आरक्षणासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाला विधान परिषदेचे माजी आमदार राजेश भाऊ राठोड, माजी आमदार निलय नाईक, कर्नाटक बिदरचे उद्योजक जयसिंग राठोड, नांदेडच्या शशिकला काशिनाथ राठोड, आरक्षण अभ्यासक प्रा. मोहन भाऊ चव्हाण, निवृत्त माहिती संचालक मोहन भाऊ राठोड, परभणीचे प्रा. डॉ. बबन पवार, कर्नाटकचे माजी न्यायाधीश ॲड. सुभाषचंद्र राठोड, राष्ट्रीय समन्वयक दिगंबर राठोड, सिम्पलताई राठोड, राष्ट्रीय महासचिव प्रा. डॉ. अनिल भाऊ राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या आकाशी जाधव, डॉ. अभय जाधव, कबीरदास महाराज पोरिया गड, कर्नाटकचे आयएएस अनिल राठोड, मध्य प्रदेशचे देवराज नायक, निवृत्त अधिकारी उत्तम चव्हाण, उद्योजक गणेश चव्हाण, देविदास राठोड, विनोद जाधव आणि अरुण राठोड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.3
- पैठण तालुक्यातील कडेठाण येथे शेतातून डाळिंब चोरी केल्याच्या संशयावरून एका पुरुषाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही नेमकी घटना कशामुळे घडली याचा तपास सध्या सुरू असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे.1