भूमिगत गटार योजनेच्या कामाचा दर्जा व अनियमिततेची चौकशी करावी..! येवल्यात शिवसेना,राष्ट्रवादीच्या (श. प.) नगरसेवकांचे तहसीलदाराना निवेदन प्रतिनिधी सचिन वखारे येवला कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटात योजनेच्या कामाने गती घेतलेली नाही. सुरू असलेल्या गटार योजनेतील कामाचा निकृष्ट दर्जा,अनियमितता आणि निधीचा संभाव्य गैरवापर याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विरोधी नगरसेवकानी केली आहे. चौकशीसह योजनेच्या सविस्तर कामाची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आज मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन देऊन केली आहे. शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे डॉ. संकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी,अमोल शिंदे, नगरसेवक एजाज शेख,वकील अहमद, अब्दुलगनी शेख,अरबाज अन्सारी,अक्षय राजपूत,एजाज शेख,प्रशांत शिंदे,सुनील शिंदे, समर्थ अलगट,एकबाल अन्सारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून भूमीगत गटारीचे कामे शहरात कॉलनी भागात अनेक ठिकाणी सुरू आहेत.या योजनेमुळे रस्त्यांचे काँक्रीटीकरणाची कामे सुद्धा बाकी आहेत. अनेक ठिकाणी भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदून ठेवलेले असून भूमिगत गटार योजनेचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून, यामुळे भविष्यात शहरवासीयांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.भूमिगत गटार योजनेचे पाणी शहराबाहेर काढण्यात आले नसून घरांचे सांडपाणी या गटारींना जोडण्यात आलेले नाही. ज्याठिकाणी सांडपाणी भूमीगत गटारीला जोडले आहे ते पाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांना या सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत आहे. अनेक ठिकाणी नव्याने काँक्रिटीकरण झालेले रस्ते फोडून ठेवले आहे तर काही ठिकाणी भूमिगत गटारीचे काम होत नसल्याने मंजूर असलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करता आलेले नाही.त्यामुळे या कामाची सर्व तांत्रिक माहिती उपलब्ध व्हावी,काम पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे,आतापर्यंत योजनेच्या ठेकेदाराला नोटीस वगैरे दिली आहे का?,विचारणा झाली आहे का याबाबत सविस्तर माहिती मिळावी आणि यापुढील काळात दर्जेदार पद्धतीने काम करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी करत प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चौकशी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. नगर विकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.
भूमिगत गटार योजनेच्या कामाचा दर्जा व अनियमिततेची चौकशी करावी..! येवल्यात शिवसेना,राष्ट्रवादीच्या (श. प.) नगरसेवकांचे तहसीलदाराना निवेदन प्रतिनिधी सचिन वखारे येवला कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटात योजनेच्या कामाने गती घेतलेली नाही. सुरू असलेल्या गटार योजनेतील कामाचा निकृष्ट दर्जा,अनियमितता आणि निधीचा संभाव्य गैरवापर याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विरोधी नगरसेवकानी केली आहे. चौकशीसह योजनेच्या सविस्तर कामाची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आज मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन देऊन केली आहे. शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे डॉ. संकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी,अमोल शिंदे, नगरसेवक एजाज शेख,वकील अहमद, अब्दुलगनी शेख,अरबाज अन्सारी,अक्षय राजपूत,एजाज शेख,प्रशांत शिंदे,सुनील शिंदे, समर्थ अलगट,एकबाल अन्सारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून भूमीगत गटारीचे कामे शहरात कॉलनी भागात अनेक ठिकाणी सुरू आहेत.या योजनेमुळे रस्त्यांचे काँक्रीटीकरणाची कामे सुद्धा बाकी आहेत. अनेक ठिकाणी भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदून ठेवलेले असून भूमिगत गटार योजनेचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून, यामुळे भविष्यात शहरवासीयांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.भूमिगत गटार योजनेचे पाणी शहराबाहेर काढण्यात आले नसून घरांचे सांडपाणी या गटारींना जोडण्यात आलेले नाही. ज्याठिकाणी सांडपाणी भूमीगत गटारीला जोडले आहे ते पाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांना या सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत आहे. अनेक ठिकाणी नव्याने काँक्रिटीकरण झालेले रस्ते फोडून ठेवले आहे तर काही ठिकाणी भूमिगत गटारीचे काम होत नसल्याने मंजूर असलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करता आलेले नाही.त्यामुळे या कामाची सर्व तांत्रिक माहिती उपलब्ध व्हावी,काम पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे,आतापर्यंत योजनेच्या ठेकेदाराला नोटीस वगैरे दिली आहे का?,विचारणा झाली आहे का याबाबत सविस्तर माहिती मिळावी आणि यापुढील काळात दर्जेदार पद्धतीने काम करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी करत प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चौकशी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. नगर विकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.
- येवला: येथील श्री गुरुदेव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, स्वामी मुक्तानंद विद्यालयात (प्राथमिक विभाग) विद्यार्थ्यांसाठी नुकताच एक विलक्षण मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला. 'नारायण मामा शिंदे जनकल्याण सेवा समिती'च्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध जादूगार नारायण मामा शिंदे यांनी आपल्या कलेने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी नारायण मामांनी पेल्यातून अंगठी गायब करणे, हवेत कोल्ड्रिंकची बाटली तरंगवणे, पत्त्यांचा बंगला उभारणे आणि रिकाम्या खोक्यातून कबूतर व चॉकलेट्स बाहेर काढणे असे एकापेक्षा एक सरस प्रयोग सादर केले. विशेषतः डोळ्यांवर पट्टी बांधून स्कुटी चालवण्याच्या त्यांच्या चित्तथरारक कौशल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. जादूच्या या किमयेने उपस्थित शेकडो विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात मनमोकळा आनंद लुटला. मान्यवरांचा गौरव यावेळी जनकल्याण सेवा समितीचे उपाध्यक्ष किशोर कुमावत, सुदाम दाणे, विजय पोंदे, सुरजमल करवा, राजेंद्र आहेर, शशिकांत मालपुरे आणि कैलास बकरे, गोविंदा शिंदे, दिव्यानी शिंदे, भाग्यश्री शिंदे या मान्यवरांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. आयोजन आणि सहभाग कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बोडके सर यांनी केले, तर मुख्याध्यापक संजय जाधव यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा दिला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संग्राम जाधव, कल्पना पराते, सरला बोरसे, प्रकाश भोरकडे, अक्षता फासे, जयश्री थोरात यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला4
- नाशिक च्या अंबड MIDC मधील घटना आहे अग्निशामक दलाच्या स्टेशनवरनं 500 मिटर त्या आत मध्ये असणारी एक सायकल रिपेरिंग दुकानाला आग लागली संबंधित लोकांनी मदतीसाठी 112 ला फोन केला 112 वाले प्रतिनिधीने 15 मिनिट बायोडाटा घेण्यामध्ये घालवला मग कुठेतरी उपकार करून विनंती स्वीकारली त्यानंतर सुरू होतो अग्निशामक वाल्यांचा फोनवरच पंचनामा त्यामध्ये 15 मिनट मग त्यांनीही विनंती स्वीकारून उपकार करायचे ठरवले आणि 45 मिनिटा नंतर घटनास्थळी दाखल झाले.....1
- नाशिक महानगरपालिकेतील महापौर-उपमहापौर निवडणुकीपूर्वी भाजपचे सर्व नगरसेवक व नगरसेविका अज्ञात स्थळी रवाना झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. पक्षांतर्गत रणनीती आखणी व आमदार-नगरसेवकांमधील समन्वय वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या हालचालींमुळे मनपातील सत्तासमीकरणांवर सर्वांचे लक्ष लागले असून आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.1
- महाजनपूर शाळेची अवस्था1
- पगडी गणेश मित्र मंडळ (मातीचा गणपती ) सोमवारपेठ ,चांदवड येथे श्रीगणेश चतुर्थी व वर्धापण दिन सोहळ्या निमित महाप्रसाद व भंडाऱ्याचा कार्यक्रम संपन्न. भाविकांमध्ये मोठा उत्साह2
- ठाणे: शहापूर तालुक्यातील आटगाव येथील रेल्वे स्थानकालगत असलेल्या श्री.प्रदीप भानुषाली यांच्या घराला मोठ्या प्रमाणात आग लागण्याची घटना घडली असून स्थानिक टँकर तसेच शहापूर नगरपंचायत अग्निशामक दलाच्या गाडीमुळे आग आटोक्यात आलेली आहे. कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. घटनास्थळी पोलीस यंत्रणासुद्धा हजर झालेली आहे.1
- jategaon te lodhara rod khup kharab rod aahe4
- प्रतिनिधी सचिन वखारे येवला कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही शहरात सुरू असलेल्या भूमिगत गटात योजनेच्या कामाने गती घेतलेली नाही. सुरू असलेल्या गटार योजनेतील कामाचा निकृष्ट दर्जा,अनियमितता आणि निधीचा संभाव्य गैरवापर याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विरोधी नगरसेवकानी केली आहे. चौकशीसह योजनेच्या सविस्तर कामाची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आज मुख्याधिकारी तुषार आहेर यांना निवेदन देऊन केली आहे. शिवसेना पक्षाचे गटनेते गणेश शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे डॉ. संकेत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.शिवसेना गटनेते गणेश शिंदे, शहर प्रमुख विशाल परदेशी,अमोल शिंदे, नगरसेवक एजाज शेख,वकील अहमद, अब्दुलगनी शेख,अरबाज अन्सारी,अक्षय राजपूत,एजाज शेख,प्रशांत शिंदे,सुनील शिंदे, समर्थ अलगट,एकबाल अन्सारी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून भूमीगत गटारीचे कामे शहरात कॉलनी भागात अनेक ठिकाणी सुरू आहेत.या योजनेमुळे रस्त्यांचे काँक्रीटीकरणाची कामे सुद्धा बाकी आहेत. अनेक ठिकाणी भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदून ठेवलेले असून भूमिगत गटार योजनेचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून, यामुळे भविष्यात शहरवासीयांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार आहे.या कामात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.भूमिगत गटार योजनेचे पाणी शहराबाहेर काढण्यात आले नसून घरांचे सांडपाणी या गटारींना जोडण्यात आलेले नाही. ज्याठिकाणी सांडपाणी भूमीगत गटारीला जोडले आहे ते पाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांना या सांडपाण्यामुळे दुर्गंधीचा त्रास होत आहे. अनेक ठिकाणी नव्याने काँक्रिटीकरण झालेले रस्ते फोडून ठेवले आहे तर काही ठिकाणी भूमिगत गटारीचे काम होत नसल्याने मंजूर असलेल्या रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू करता आलेले नाही.त्यामुळे या कामाची सर्व तांत्रिक माहिती उपलब्ध व्हावी,काम पूर्ण करण्याचा कालावधी किती आहे,आतापर्यंत योजनेच्या ठेकेदाराला नोटीस वगैरे दिली आहे का?,विचारणा झाली आहे का याबाबत सविस्तर माहिती मिळावी आणि यापुढील काळात दर्जेदार पद्धतीने काम करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी करत प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन चौकशी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळेस देण्यात आला आहे. नगर विकास मंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन देण्यात येणार आहे.1