" चला कागदोपत्री झाडे लाऊ या ! विश्वविक्रम करू या " ----------- बीड जिल्हा प्रशासनाने तब्बल ४२ कोटी रुपयांची उधळपट्टी करून एका दिवसात ३० लाख ऐवजी ६३ लाख वृक्ष लागवड करण्यात आल्याची वनमंत्री गणेश नाईक आणि सभागृहाची दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ लक्ष्यवेधी आंदोलन. ------- (प्रतिनिधी) :- बीड शहरातील खंडेश्वरी दीपमाळ परीसरातील तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हरित अभियानाच्या अंतर्गत एकाच दिवसात ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांची अवस्था बिकट झाली असून नुसत्या काड्या राहिल्या आहेत काही झाडे जळुन गेली आहेत. मा.अजित दादांच्या हस्ते लावण्यात आलेले झाड सुद्धा जगवता आले नाही आणि जिल्हा प्रशासन म्हणतंय आम्ही एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड केली असुन त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत आहेत. जिल्हा प्रशासनाने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केले आहे. आज दिनांक २६ फेब्रुवारी गुरुवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ "चला कागदोपत्री झाडे लावु या आणि विश्वविक्रम करूया" जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कागदावर झाडांची चित्रे काढून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सकाळी ११:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
" चला कागदोपत्री झाडे लाऊ या ! विश्वविक्रम करू या " ----------- बीड जिल्हा प्रशासनाने तब्बल ४२ कोटी रुपयांची उधळपट्टी करून एका दिवसात ३० लाख ऐवजी ६३ लाख वृक्ष लागवड करण्यात आल्याची वनमंत्री गणेश नाईक आणि सभागृहाची दिशाभूल केल्याच्या निषेधार्थ लक्ष्यवेधी आंदोलन. ------- (प्रतिनिधी) :- बीड शहरातील खंडेश्वरी दीपमाळ परीसरातील तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हरित अभियानाच्या अंतर्गत एकाच दिवसात ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांची अवस्था बिकट झाली असून नुसत्या काड्या राहिल्या आहेत काही झाडे जळुन गेली आहेत. मा.अजित दादांच्या हस्ते लावण्यात आलेले झाड सुद्धा जगवता आले नाही आणि जिल्हा प्रशासन म्हणतंय आम्ही एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड केली असुन त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत आहेत. जिल्हा प्रशासनाने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केले आहे. आज दिनांक २६ फेब्रुवारी गुरुवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ "चला कागदोपत्री झाडे लावु या आणि विश्वविक्रम करूया" जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कागदावर झाडांची चित्रे काढून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सकाळी ११:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
- जुना बाजार की कचरा बाजार? अस्वच्छतेचा आरसा...1
- ----------- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील हरित बीड अभियान अंतर्गत वृक्षलागवड प्रकरणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात दिलेल्या माहितीतून दिशाभूल केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी कागदावर झाडांची चित्रे काढत “चला कागदोपत्री झाडे लावून या आणि विश्वविक्रम करूया” असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या दाव्यांचा निषेध केला. या वेळी जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत वनमंत्री गणेश नाईक, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनात रामनाथ जमाले, शेख युनुस, शेख मुबीन, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (बीड जिल्हाध्यक्ष इंटक, बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्वकल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड), वृक्षप्रेमी अभिमान खरसाडे सह आदी उपस्थित होते. तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. या विषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एका दिवसात ३० लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा करण्यात आला होता. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ४२ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात १० टक्के ही झाडे जिवंत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात सखोल चौकशीची मागणी करत विविध आंदोलने करण्यात आली; परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे. या बाबत दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेत आमदार चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला असता, त्या वर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड झाल्याचे आणि त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत असल्याचे सांगितले. या विधानामुळे जिल्हा प्रशासनाकडून शासन व सभागृहाची दिशाभूल झाल्याचा आरोप करत आंदोलन छेडण्यात आले. डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- आज शिक्षण महर्षी सत्यशोधक मोहनरावजी सोळुंके काका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमपूर्वक फीचर फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. 🎉🌸 या प्रसंगी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्रजी शिरसाट सर, निवासी संपादक अरविंदजी ओव्हाळ, न्यूज 24 बीड न्यूज चैनल चे संपादक अशोकजी फपाळ सर, तसेच नंदू आनभुले, श्रीमती वर्षा भोसले मॅडम, श्रीमती सारिका शिंदे मॅडम, ज्ञानेश्वर कटारे व इतर मान्यवर उपस्थित होते. मोहनरावजी सोळुंके काका यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, समाजासाठी दिलेले योगदान आणि सत्यशोधक विचारांची जपणूक ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शुभेच्छा दिल्या. 🌹 हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.1
- Post by Abhishek Andhale1
- माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील1
- Post by दैनिक महाराष्ट्र भुषण न्यूज दैनिक महाराष्ट्र भुषण न्युज1
- शेतकऱ्यांना कर्जमाफी होणारच ! आम्ही कर्जमाफी देणारच आहोत - अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती1
- ------- (प्रतिनिधी) :- बीड शहरातील खंडेश्वरी दीपमाळ परीसरातील तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हरित अभियानाच्या अंतर्गत एकाच दिवसात ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांची अवस्था बिकट झाली असून नुसत्या काड्या राहिल्या आहेत काही झाडे जळुन गेली आहेत. मा.अजित दादांच्या हस्ते लावण्यात आलेले झाड सुद्धा जगवता आले नाही आणि जिल्हा प्रशासन म्हणतंय आम्ही एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड केली असुन त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत आहेत. जिल्हा प्रशासनाने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केले आहे. आज दिनांक २६ फेब्रुवारी गुरुवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ "चला कागदोपत्री झाडे लावु या आणि विश्वविक्रम करूया" जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कागदावर झाडांची चित्रे काढून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सकाळी ११:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.1