Shuru
Apke Nagar Ki App…
Abhishek Andhale
- Abhishek Andhaleकेज, बीड, महाराष्ट्रयय1 hr ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Abhishek Andhale1
- आज शिक्षण महर्षी सत्यशोधक मोहनरावजी सोळुंके काका यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रेमपूर्वक फीचर फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. 🎉🌸 या प्रसंगी दैनिक वास्तव चे संपादक जितेंद्रजी शिरसाट सर, निवासी संपादक अरविंदजी ओव्हाळ, न्यूज 24 बीड न्यूज चैनल चे संपादक अशोकजी फपाळ सर, तसेच नंदू आनभुले, श्रीमती वर्षा भोसले मॅडम, श्रीमती सारिका शिंदे मॅडम, ज्ञानेश्वर कटारे व इतर मान्यवर उपस्थित होते. मोहनरावजी सोळुंके काका यांनी शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य, समाजासाठी दिलेले योगदान आणि सत्यशोधक विचारांची जपणूक ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मान्यवरांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि निरंतर समाजसेवेची शुभेच्छा दिल्या. 🌹 हा सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि आपुलकीच्या वातावरणात पार पडला.1
- जुना बाजार की कचरा बाजार? अस्वच्छतेचा आरसा...1
- ----------- (प्रतिनिधी):- बीड जिल्ह्यातील हरित बीड अभियान अंतर्गत वृक्षलागवड प्रकरणात वनमंत्री गणेश नाईक यांनी सभागृहात दिलेल्या माहितीतून दिशाभूल केल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य, डॉ. गणेश ढवळे (लिंबागणेशकर) यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी कागदावर झाडांची चित्रे काढत “चला कागदोपत्री झाडे लावून या आणि विश्वविक्रम करूया” असा उपरोधिक संदेश देत प्रशासनाच्या दाव्यांचा निषेध केला. या वेळी जिल्हाधिकारी, बीड यांच्या मार्फत वनमंत्री गणेश नाईक, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड सुनेत्रा पवार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना निवेदन पाठविण्यात आले. आंदोलनात रामनाथ जमाले, शेख युनुस, शेख मुबीन, माजी सैनिक अशोक येडे (जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी, बीड), सय्यद सादेक (शहराध्यक्ष आम आदमी पार्टी बीड), रामधन जमाले (बीड जिल्हाध्यक्ष इंटक, बीड), किष्किंधा पांचाळ (अध्यक्ष विश्वकल्याण महिला सेवा भावी संस्था, बीड), वृक्षप्रेमी अभिमान खरसाडे सह आदी उपस्थित होते. तसेच विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. या विषयी सविस्तर माहिती अशी की दिनांक ०७ ऑगस्ट २०२५ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली एका दिवसात ३० लाख वृक्ष लागवड केल्याचा दावा करण्यात आला होता. या मोहिमेसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल ४२ कोटी रुपयांचा खर्च केल्याचे सांगितले गेले. मात्र प्रत्यक्षात १० टक्के ही झाडे जिवंत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. या संदर्भात सखोल चौकशीची मागणी करत विविध आंदोलने करण्यात आली; परंतु प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांनी म्हटले आहे. या बाबत दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ रोजी विधानसभेत आमदार चेतन तुपे यांनी प्रश्न उपस्थित केला असता, त्या वर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड झाल्याचे आणि त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत असल्याचे सांगितले. या विधानामुळे जिल्हा प्रशासनाकडून शासन व सभागृहाची दिशाभूल झाल्याचा आरोप करत आंदोलन छेडण्यात आले. डॉ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनातून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.1
- नवी मुंबई महानगरपालिका एच प्रभाग समिती, दिघा येथे सुरू असलेल्या तथाकथित “बंधु शिरोसे–ऐश्वर्या टनल” या कामाबाबत गंभीर भ्रष्टाचार, आर्थिक अनियमितता व अधिकाऱ्यांच्या संगनमताची तीव्र शंका व्यक्त होत आहे. ज्या प्रकारे देशात “अटल टनल” राष्ट्रीय हितासाठी उभारण्यात आली, त्याच नावाची आड घेऊन दिघा मुकुंद गेट, ईश्वर नगर परिसरात केवळ अंदाजे १० फूट लांबीचा टनल उभारण्याचा दिखावा करून एका विशिष्ट कंत्राटदार कंपनीला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच, संबंधित अभियंता श्री. बंधु शिरोसे यांच्यावर इतर एका प्रकरणात गंभीर आरोप माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे. अशा परिस्थितीत, आरोपांच्या छायेत असलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हा प्रकल्प पुढे नेण्यात येत असल्याने संपूर्ण कामकाजावर संशयाची छाया निर्माण झाली आहे. जनतेच्या कराच्या पैशातून राबविल्या जाणाऱ्या या प्रकल्पामध्ये पारदर्शकता व जबाबदारी अपेक्षित असताना, संशयास्पद पद्धतीने काम सुरू ठेवणे हे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. महानगरपालिका ही जनतेची संस्था आहे; ती काही मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कंत्राटदारांच्या फायद्यासाठी वापरली जाऊ नये. मी, त्रिभुवन सिंह ठाकूर, विरोधी पक्षनेता, एच प्रभाग समिती दिघा, या संशयास्पद टनल प्रकल्पाचा आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध करतो. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करण्यात यावी, प्रकल्पाची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई केली नाही, तर जनहितासाठी व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. जनतेच्या हक्कांसाठी रस्त्यावरून ते न्यायालयापर्यंत लढा दिला जाईल. भ्रष्टाचाराविरुद्धची ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली असून, सत्य बाहेर येईपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील.1
- माजलगाव येथील मंगलनाथ मंदिर येथे शिवमहापुराणकथे प्रसंगी प्रवचनकार बालासाहेब फपाळ पाटील1
- ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?, आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं। X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं: व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है। कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है। 50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है। जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा। आज ही शुरू करें ! अपनी मेहनत को 'Forward' नहीं, 'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं। याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे। अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है। पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें। लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें। फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी। $ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:1
- ------- (प्रतिनिधी) :- बीड शहरातील खंडेश्वरी दीपमाळ परीसरातील तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बीड अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हरित अभियानाच्या अंतर्गत एकाच दिवसात ३० लाख वृक्ष लागवड करण्यात आलेल्या झाडांची अवस्था बिकट झाली असून नुसत्या काड्या राहिल्या आहेत काही झाडे जळुन गेली आहेत. मा.अजित दादांच्या हस्ते लावण्यात आलेले झाड सुद्धा जगवता आले नाही आणि जिल्हा प्रशासन म्हणतंय आम्ही एका दिवसात ३० लाख नव्हे तर ६३ लाख वृक्ष लागवड केली असुन त्या पैकी ९६ टक्के झाडे जिवंत आहेत. जिल्हा प्रशासनाने जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी व्यक्त केले आहे. आज दिनांक २६ फेब्रुवारी गुरुवार रोजी जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ "चला कागदोपत्री झाडे लावु या आणि विश्वविक्रम करूया" जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कागदावर झाडांची चित्रे काढून लक्ष्यवेधी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सकाळी ११:३० वा. जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.1