logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील क्रीडा संकुलास पहिल्याच पावसात अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. या घटनेमुळे क्रीडा संकुलाच्या स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

16 hrs ago
user_Mohsin ahmed khan
Mohsin ahmed khan
Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
16 hrs ago

मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील क्रीडा संकुलास पहिल्याच पावसात अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. या घटनेमुळे क्रीडा संकुलाच्या स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील क्रीडा संकुलास पहिल्याच पावसात अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. या घटनेमुळे क्रीडा संकुलाच्या स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    1
    मिळालेल्या माहितीनुसार, परभणी येथील क्रीडा संकुलास पहिल्याच पावसात अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. या घटनेमुळे क्रीडा संकुलाच्या स्थितीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
    user_Mohsin ahmed khan
    Mohsin ahmed khan
    Advertising agency परभणी, परभणी, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • बीड जिल्ह्याच्या परळी येथे तोहीद खान यांच्या हत्येचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पाथरी येथील कुल जमाते तन्जीम या संघटनेतर्फे या प्रकरणी निवेदन सादर करण्यात आले.
    1
    बीड जिल्ह्याच्या परळी येथे तोहीद खान यांच्या हत्येचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पाथरी येथील कुल जमाते तन्जीम या संघटनेतर्फे या प्रकरणी निवेदन सादर करण्यात आले.
    user_अय्युब शहेबाज़ खान /
    अय्युब शहेबाज़ खान /
    Aquatic centre पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    35 min ago
  • श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने सॅनरो नॉलेज सिटी, रवळगाव रोड, सेलू येथे बहुकोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी "PRINCE Infotainment Park" हा प्रकल्प साकारला जात आहे. "Ultimate Destination for Learning & Fun" या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प मराठवाड्यातील विद्यार्थी, पालक आणि पर्यटकांसाठी शिक्षण व मनोरंजनाचे नवे पर्व ठरणार असून, सन २०२६ च्या उत्तरार्धात तो नागरिकांच्या सेवेत दाखल होईल. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे इन्फोटेंटमेंट पार्क विज्ञान, क्रीडा, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडविणारे मराठवाड्यातील पहिले विज्ञान-पर्यटन केंद्र ठरणार आहे. या पार्कमध्ये Curiosity SIAC (Science Innovation & Activity Centre), ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, किड्स स्विमिंग पूल, बहुउद्देशीय क्रीडा संकुल, अटल टिंकरिंग लॅब, IgniteX स्किल लॅब, खुल्या वातावरणातील विज्ञान उद्यान, बोटॅनिकल गार्डन आणि बहुउद्देशीय सभागृह अशा विविध आकर्षणांचा समावेश असणार आहे. Curiosity SIAC हे महाराष्ट्रातील सातवे विज्ञान केंद्र ठरणार असून, त्यास राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग (RGSTC), नेहरू सायन्स सेंटर, मुंबई तसेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे. या केंद्रात व्हर्च्युअल अॅनाटॉमी लॅब, स्पेस व्हॉयेज सिम्युलेटर, व्हीआर केमिस्ट्री लॅब, ऑगमेंटेड रिअॅलिटी लॅब, होलोग्राम थिएटर, रोबोटिक्स व कोडिंग लॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात परभणी जिल्ह्यातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा हे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल. या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, क्रीडा आणि नवोपक्रम यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे. याबाबत बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी नमूद केले की, "भौगोलिक मर्यादा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आड येऊ नयेत, ही आमची भूमिका आहे. PRINCE Infotainment Park च्या माध्यमातून सेलू हे महाराष्ट्रातील विज्ञान-पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येईल. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आता विज्ञान केंद्रांचा अनुभव घेण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही." सुमारे १०,००० हून अधिक वार्षिक पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा लाभ परभणीसह नांदेड, लातूर आणि आसपासच्या पाच जिल्ह्यांतील ५०० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे. PRINCE Infotainment Park हा केवळ एक प्रकल्प नसून, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, नवोपक्रम आणि मनोरंजनाच्या नव्या संधी निर्माण करणारा एक ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.
    2
    श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने सॅनरो नॉलेज सिटी, रवळगाव रोड, सेलू येथे बहुकोटी रुपयांचा महत्त्वाकांक्षी "PRINCE Infotainment Park" हा प्रकल्प साकारला जात आहे. "Ultimate Destination for Learning & Fun" या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प मराठवाड्यातील विद्यार्थी, पालक आणि पर्यटकांसाठी शिक्षण व मनोरंजनाचे नवे पर्व ठरणार असून, सन २०२६ च्या उत्तरार्धात तो नागरिकांच्या सेवेत दाखल होईल.

श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारत असलेले हे इन्फोटेंटमेंट पार्क विज्ञान, क्रीडा, निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम घडविणारे मराठवाड्यातील पहिले विज्ञान-पर्यटन केंद्र ठरणार आहे. या पार्कमध्ये Curiosity SIAC (Science Innovation & Activity Centre), ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव, किड्स स्विमिंग पूल, बहुउद्देशीय क्रीडा संकुल, अटल टिंकरिंग लॅब, IgniteX स्किल लॅब, खुल्या वातावरणातील विज्ञान उद्यान, बोटॅनिकल गार्डन आणि बहुउद्देशीय सभागृह अशा विविध आकर्षणांचा समावेश असणार आहे.

Curiosity SIAC हे महाराष्ट्रातील सातवे विज्ञान केंद्र ठरणार असून, त्यास राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग (RGSTC), नेहरू सायन्स सेंटर, मुंबई तसेच होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र यांचे सहकार्य लाभले आहे. या केंद्रात व्हर्च्युअल अॅनाटॉमी लॅब, स्पेस व्हॉयेज सिम्युलेटर, व्हीआर केमिस्ट्री लॅब, ऑगमेंटेड रिअॅलिटी लॅब, होलोग्राम थिएटर, रोबोटिक्स व कोडिंग लॅब यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पात परभणी जिल्ह्यातील पहिला ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव आणि अत्याधुनिक क्रीडा सुविधा हे आणखी एक वैशिष्ट्य ठरेल. या प्रकल्पाचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, क्रीडा आणि नवोपक्रम यांचा प्रत्यक्ष अनुभव देणे हा आहे.

याबाबत बोलताना श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी नमूद केले की, "भौगोलिक मर्यादा गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या आड येऊ नयेत, ही आमची भूमिका आहे. PRINCE Infotainment Park च्या माध्यमातून सेलू हे महाराष्ट्रातील विज्ञान-पर्यटनाचे नवे केंद्र म्हणून उदयास येईल. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना आता विज्ञान केंद्रांचा अनुभव घेण्यासाठी पुणे किंवा मुंबईला जाण्याची गरज भासणार नाही." सुमारे १०,००० हून अधिक वार्षिक पर्यटकांना आकर्षित करण्याची क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा लाभ परभणीसह नांदेड, लातूर आणि आसपासच्या पाच जिल्ह्यांतील ५०० हून अधिक शाळांमधील विद्यार्थ्यांना होणार आहे.

PRINCE Infotainment Park हा केवळ एक प्रकल्प नसून, ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी विज्ञान, नवोपक्रम आणि मनोरंजनाच्या नव्या संधी निर्माण करणारा एक ऐतिहासिक उपक्रम ठरणार आहे.
    user_Nishikant rodge
    Nishikant rodge
    Farmer Selu, Parbhani•
    4 hrs ago
  • परळी शहरासह परिसरातील अनेक गावांची जीवनवाहिनी असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात सध्या केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, ज्यामुळे पाणी बचतीचे तातडीचे आवाहन करण्यात आले आहे. प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पाणीपुरवठा सभापती जयश्री गित्ते, गटनेते वैजनाथराव सोळंके, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवक नेते रविंद्र उर्फ पापा गित्ते तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प प्रमुख नागनाथ सोळंके यांच्या उपस्थितीत ही माहिती समोर आली. पाहणीनुसार, प्रकल्पात सध्या अंदाजे 5.5 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे, तर परळी नगर परिषदेचे अधिकृत पाणी आरक्षण 5 दशलक्ष घनमीटर इतके आहे. यावर्षी कमी झालेला पाऊस, भूजल पातळीत झालेली घट आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे आगामी काळात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पाणी वापरण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. उपलब्ध पाणीसाठा प्रामुख्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच प्रशासन, जलसंपदा विभाग, महावितरण व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून, पाणी हा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी बचतीची सवय अंगीकारणे आवश्यक आहे. घरगुती वापरात पाण्याची काटकसर करणे, गळती तातडीने दुरुस्त करणे, नळ उघडे ठेवून पाणी वाया जाऊ न देणे आणि पावसाच्या पाण्याचे संकलन यावर भर देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. नगर परिषद पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असली तरी, या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळाल्यास ही परिस्थिती अधिक प्रभावीपणे हाताळता येईल असे सांगण्यात आले.
    1
    परळी शहरासह परिसरातील अनेक गावांची जीवनवाहिनी असलेल्या नागापूर येथील वाण प्रकल्पात सध्या केवळ 30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, ज्यामुळे पाणी बचतीचे तातडीचे आवाहन करण्यात आले आहे. प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पाणीपुरवठा सभापती जयश्री गित्ते, गटनेते वैजनाथराव सोळंके, माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, युवक नेते रविंद्र उर्फ पापा गित्ते तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प प्रमुख नागनाथ सोळंके यांच्या उपस्थितीत ही माहिती समोर आली.

पाहणीनुसार, प्रकल्पात सध्या अंदाजे 5.5 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे, तर परळी नगर परिषदेचे अधिकृत पाणी आरक्षण 5 दशलक्ष घनमीटर इतके आहे. यावर्षी कमी झालेला पाऊस, भूजल पातळीत झालेली घट आणि वाढती पाण्याची मागणी यामुळे आगामी काळात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पाणी वापरण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. उपलब्ध पाणीसाठा प्रामुख्याने नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवणे आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. तसेच प्रशासन, जलसंपदा विभाग, महावितरण व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी विशेष उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे असून, पाणी हा प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी बचतीची सवय अंगीकारणे आवश्यक आहे. घरगुती वापरात पाण्याची काटकसर करणे, गळती तातडीने दुरुस्त करणे, नळ उघडे ठेवून पाणी वाया जाऊ न देणे आणि पावसाच्या पाण्याचे संकलन यावर भर देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. नगर परिषद पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असली तरी, या प्रयत्नांना नागरिकांच्या सहकार्याची जोड मिळाल्यास ही परिस्थिती अधिक प्रभावीपणे हाताळता येईल असे सांगण्यात आले.
    user_M. p. gitte
    M. p. gitte
    परळी, बीड, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील रमाई आवास योजना २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही निधी मिळवण्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घरकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही तब्बल सहा महिने उलटून गेले आहेत, तरी निधी मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १५ जून रोजी संतप्त लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समिती येथे धाव घेत गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. यावेळी काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या हप्त्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केला, तसेच पैसे देऊनही त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. 'घरकुल मिळवण्यासाठी शासनाकडे हात जोडायचे की संबंधितांच्या मागण्या पूर्ण करायच्या?' असा संतप्त सवाल उपस्थित करत लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतही लाभार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लाभार्थ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, पंधरा दिवसांच्या आत घरकुलाचा निधी खात्यात जमा झाला नाही, तर मंठा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असताना, कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभार्थ्यांना निधीसाठी चकरा माराव्या लागत असतील, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. आता या लाभार्थ्यांच्या आरोपांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, की हे प्रकरण केवळ कागदोपत्रीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    1
    मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील रमाई आवास योजना २०२३-२४ मधील लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होऊनही निधी मिळवण्यासाठी पंचायत समितीचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. घरकुलासाठी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनही तब्बल सहा महिने उलटून गेले आहेत, तरी निधी मिळाला नसल्याने लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. १५ जून रोजी संतप्त लाभार्थ्यांनी मंठा पंचायत समिती येथे धाव घेत गटविकास अधिकारी यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला.

यावेळी काही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या हप्त्यासाठी पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केला, तसेच पैसे देऊनही त्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याची खंत व्यक्त केली. 'घरकुल मिळवण्यासाठी शासनाकडे हात जोडायचे की संबंधितांच्या मागण्या पूर्ण करायच्या?' असा संतप्त सवाल उपस्थित करत लाभार्थ्यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाच्या गोरगरीबांसाठी असलेल्या योजनेतही लाभार्थ्यांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लाभार्थ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, पंधरा दिवसांच्या आत घरकुलाचा निधी खात्यात जमा झाला नाही, तर मंठा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. गोरगरीबांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासन कोट्यवधी रुपयांच्या योजना राबवत असताना, कागदपत्रांची पूर्तता करूनही लाभार्थ्यांना निधीसाठी चकरा माराव्या लागत असतील, तर ही बाब प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे. आता या लाभार्थ्यांच्या आरोपांची चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई होणार का, की हे प्रकरण केवळ कागदोपत्रीच राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आगामी विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मराठवाड्यात आपली संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने, रविवारी नांदेड येथे पक्षाची एक संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती, जिथे मराठवाडा विभागातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यावर भर देण्यात आला.
    1
    आगामी विधान परिषद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने मराठवाड्यात आपली संघटना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. याच अनुषंगाने, रविवारी नांदेड येथे पक्षाची एक संघटनात्मक आढावा बैठक पार पडली. या बैठकीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपस्थिती होती, जिथे मराठवाडा विभागातील पक्ष संघटनेला बळकटी देण्यावर भर देण्यात आला.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • गोव्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका पर्यटक बोटीचा समुद्रात अपघात होऊन ती बुडाल्याने एक भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला असून, ६४ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात ४० प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. तटरक्षक दल, नौदल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
    1
    गोव्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणाऱ्या एका पर्यटक बोटीचा समुद्रात अपघात होऊन ती बुडाल्याने एक भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला असून, ६४ जण अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.

या अपघातात ४० प्रवाशांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. तटरक्षक दल, नौदल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे आणि सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हा अपघात झाल्याचे प्रमुख कारण म्हणून समोर येत आहे.

प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • नांदेडमधून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली पूर्ण एकनिष्ठा असल्याचे स्पष्ट केले आहे. आष्टीकर यांनी यावेळी 'ऑपरेशन टायगर'सारख्या गोष्टी अस्तित्वात नसतात, लोक केवळ विविध प्रकारच्या चर्चा करत असतात, असे मत व्यक्त केले.
    1
    नांदेडमधून मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी आपली पूर्ण एकनिष्ठा असल्याचे स्पष्ट केले आहे. आष्टीकर यांनी यावेळी 'ऑपरेशन टायगर'सारख्या गोष्टी अस्तित्वात नसतात, लोक केवळ विविध प्रकारच्या चर्चा करत असतात, असे मत व्यक्त केले.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.