logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

तुपकार यांनी एका महिला कर्मचाऱ्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला सज्जड इशारा दिला आहे. हा इशारा देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते अशा व्यक्तीला "कपडे काढून नंगा करत मारतील".

1 hr ago
user_SURYA MARATHI NEWS
SURYA MARATHI NEWS
Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 hr ago

तुपकार यांनी एका महिला कर्मचाऱ्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीला सज्जड इशारा दिला आहे. हा इशारा देताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते अशा व्यक्तीला "कपडे काढून नंगा करत मारतील".

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिंदखेड राजा तालुक्यातील किनगावं राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोयनदेव गावामध्ये अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
    1
    सिंदखेड राजा तालुक्यातील किनगावं राजा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सोयनदेव गावामध्ये अवैध देशी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामगार मेळावा आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला.
    1
    अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कामगार मेळावा आणि सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवून चार महिलांचा जीव घेणारी टी-२ वाघीण अखेर वनविभागाच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या जेरबंद केली आहे. शनिवारी रात्री (२३ मे) सुमारे ७.१५ वाजता सिंदेवाही तालुक्यातील पवनपार तलाव परिसरातील (वनक्षेत्र क्र. २८२) ट्रॅन्क्युलायझर डार्टच्या सहाय्याने तिला बेशुद्ध करण्यात आले. रात्री ८ वाजेपर्यंत ही संपूर्ण कारवाई यशस्वीपणे पूर्ण झाली. वनविभागाने अवघ्या दोन दिवसांत ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्ही, पायी गस्त आणि डार्ट गनचा वापर करून ही मोठी मोहीम फत्ते केली. सुमारे १४ वर्षांची ही प्रौढ वाघीण असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, जेरबंद करताना तिच्यासोबत कोणतेही बछडे आढळून आले नाहीत, मात्र संभाव्य बछड्यांच्या शोधासाठी वनविभागाकडून स्वतंत्र मोहीम सुरू करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या वाघिणीला पुढील उपचार व देखरेखीसाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात हलवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानवी व वाघ यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या भीतीवर या कारवाईने मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवून चार महिलांचा जीव घेणारी टी-२ वाघीण अखेर वनविभागाच्या विशेष पथकाने यशस्वीरित्या जेरबंद केली आहे. शनिवारी रात्री (२३ मे) सुमारे ७.१५ वाजता सिंदेवाही तालुक्यातील पवनपार तलाव परिसरातील (वनक्षेत्र क्र. २८२) ट्रॅन्क्युलायझर डार्टच्या सहाय्याने तिला बेशुद्ध करण्यात आले. रात्री ८ वाजेपर्यंत ही संपूर्ण कारवाई यशस्वीपणे पूर्ण झाली.

वनविभागाने अवघ्या दोन दिवसांत ट्रॅप कॅमेरे, सीसीटीव्ही, पायी गस्त आणि डार्ट गनचा वापर करून ही मोठी मोहीम फत्ते केली. सुमारे १४ वर्षांची ही प्रौढ वाघीण असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, जेरबंद करताना तिच्यासोबत कोणतेही बछडे आढळून आले नाहीत, मात्र संभाव्य बछड्यांच्या शोधासाठी वनविभागाकडून स्वतंत्र मोहीम सुरू करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या वाघिणीला पुढील उपचार व देखरेखीसाठी नागपूर येथील गोरेवाडा वन्यजीव बचाव केंद्रात हलवण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानवी व वाघ यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे निर्माण झालेल्या भीतीवर या कारवाईने मोठा दिलासा मिळाला असून, परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे डिझेलसाठी नागरिकांची तुफान झुंबड उडाल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    1
    औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे डिझेलसाठी नागरिकांची तुफान झुंबड उडाल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून, लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    23 hrs ago
  • महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि मंदिरांच्या अन्य जमिनी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित येत आहे. या धोरणाला महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कृती हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवून भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करत, शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. यावेळी सविस्तर भूमिका मांडताना श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले की, भारतीय कायद्यानुसार हिंदू देवता (मूर्ती) ही एक ‘कायदेशीर व्यक्ती’ असल्याने देवस्थानच्या मालमत्तेचा मूळ मालक ‘देव’ असतो. महाराष्ट्र राज्य सरकार, ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ अन्वये केवळ नियामक, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांच्या माध्यमातून सार्वजनिक मंदिरांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे विश्वस्तांना व शासनाला देवस्थानांच्या मूळ मालकाची जमीन परस्पर त्रयस्थांना किंवा वहिवाटदारांना वाटण्याचा कोणताही अधिकार नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या प्रस्थापित निकालांनुसार देवस्थान जमिनींवर कुळांना मालकी हक्क सांगता येत नाही. असे असतानाही हा कायदा आणणे हे संविधानाच्या कलम २५, २६ आणि ३००-अ मधील मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मंदिर महासंघाचे श्री. निळकंठ चौधरी यांनी मंदिर आणि वक्फ प्रॉपर्टीबाबत शासनाच्या दुजाभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासनाने १३ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक काढून वक्फ मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यावर "वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार" अशी नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना, हिंदू देवस्थानांच्या जमिनी वहिवाटदारांच्या घशात का घातल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. हा राज्यघटनेच्या समानतेच्या (कलम १४) तत्त्वाचा उघड भंग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’मधील कलम ८८ ब/ १२९ ब नुसार देवस्थान जमिनींना कुळ कायद्यातून आधीच संरक्षण मिळाले आहे. या मूळ कायद्याचे संरक्षण डावलून, विकासाच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी बिल्डर आणि भूमाफियांच्या घशात घालण्याचा हा छुपा प्रयत्न असून, ज्यामुळे मंदिरांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली. महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासनाकडे ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत: १. देवस्थान इनाम व देवस्थानच्या जमिनी कुळे/वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रस्तावित कायद्याचा मसुदा तात्काळ आणि कायमस्वरूपी मागे घ्यावा. २. वक्फ प्रमाणे संरक्षण देऊन हिंदू देवस्थानांच्या सर्व जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर "देवस्थान प्रतिबंधित सत्ता प्रकार - अहस्तांतरणीय" अशी स्पष्ट नोंद घेण्याचे परिपत्रक शासनाने तात्काळ काढावे. ३. गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कठोर 'अँटी लँड ग्रॅबिंग कायदा' लागू करावा आणि देवस्थान जमीन हडपणाऱ्यांना १४ वर्षे सश्रम कारावास आणि अजामीनपात्र शिक्षेची तरतूद करावी. ४. मागील २५ वर्षांतील सर्व देवस्थान जमिनींचे हस्तांतरण, बोगस नोंदी आणि अतिक्रमणांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावी. ५. देवस्थान जमिनींबाबत महसूली आणि दिवाणी न्यायालयांत प्रलंबित असलेले वाद त्वरित निकाली काढण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करून ६ महिन्यात खटले निकाली काढावेत. यावेळी स्वामी नारायण मंदिराचे श्री. नयन स्वामी महाराज यांनी मंदिरांच्या मालकीच्या अनेक एकर जमिनी हडपण्याचा उद्देश असलेल्या वहिवाटदारांवर कर्नाटक, गुजरात प्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी सांगितले की, देवस्थान जमिनी केवळ महसुली दप्तरातील आकडेवारी नसून, त्या महाराष्ट्राच्या संस्कृती, श्रद्धा आणि समाजजीवनाचा मूळ आधार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शासनाने धर्मदाय मालमत्तांचे ‘विश्वस्त’ म्हणून रक्षण करावे आणि मंदिराच्या कारभारात प्रशासकीय हस्तक्षेप करू नये. या वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून हा कायदा लादण्याचा प्रयत्न झाल्यास, राज्यभरातील सकल हिंदू समाज, सर्व मंदिरे, भाविक, पुरोहित, पुजारी आणि विविध हिंदू, सामाजिक व आध्यात्मिक संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा त्यांनी इशारा दिला. त्यांनी हिंदुत्ववादी शासनाने मंदिरांच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्याची मागणी केली.
    1
    महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाकडून देवस्थान इनाम जमिनी आणि मंदिरांच्या अन्य जमिनी कुळांना किंवा वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासाठी नवीन कायदा प्रस्तावित येत आहे. या धोरणाला महाराष्ट्र मंदिर महासंघाने कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कृती हिंदू देवस्थानांचे अस्तित्व संपवून भूमाफियांचे खिसे भरण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करत, शासनाने हा बेकायदेशीर आणि अन्यायकारक मसुदा तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यभर मंदिरांच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी जळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी सविस्तर भूमिका मांडताना श्री. सुनील घनवट यांनी स्पष्ट केले की, भारतीय कायद्यानुसार हिंदू देवता (मूर्ती) ही एक ‘कायदेशीर व्यक्ती’ असल्याने देवस्थानच्या मालमत्तेचा मूळ मालक ‘देव’ असतो. महाराष्ट्र राज्य सरकार, ‘महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५०’ अन्वये केवळ नियामक, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांच्या माध्यमातून सार्वजनिक मंदिरांवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे विश्वस्तांना व शासनाला देवस्थानांच्या मूळ मालकाची जमीन परस्पर त्रयस्थांना किंवा वहिवाटदारांना वाटण्याचा कोणताही अधिकार नाही. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांच्या प्रस्थापित निकालांनुसार देवस्थान जमिनींवर कुळांना मालकी हक्क सांगता येत नाही. असे असतानाही हा कायदा आणणे हे संविधानाच्या कलम २५, २६ आणि ३००-अ मधील मूलभूत अधिकारांचे थेट उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मंदिर महासंघाचे श्री. निळकंठ चौधरी यांनी मंदिर आणि वक्फ प्रॉपर्टीबाबत शासनाच्या दुजाभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासनाने १३ एप्रिल २०१६ रोजी परिपत्रक काढून वक्फ मालमत्तांच्या ७/१२ उताऱ्यावर "वक्फ प्रतिबंधित सत्ता प्रकार" अशी नोंद घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले असताना, हिंदू देवस्थानांच्या जमिनी वहिवाटदारांच्या घशात का घातल्या जात आहेत, असा सवाल त्यांनी केला. हा राज्यघटनेच्या समानतेच्या (कलम १४) तत्त्वाचा उघड भंग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तसेच, ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’मधील कलम ८८ ब/ १२९ ब नुसार देवस्थान जमिनींना कुळ कायद्यातून आधीच संरक्षण मिळाले आहे. या मूळ कायद्याचे संरक्षण डावलून, विकासाच्या नावाखाली मोक्याच्या जमिनी बिल्डर आणि भूमाफियांच्या घशात घालण्याचा हा छुपा प्रयत्न असून, ज्यामुळे मंदिरांची आर्थिक स्वायत्तता धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली.

महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासनाकडे ५ प्रमुख मागण्या केल्या आहेत: १. देवस्थान इनाम व देवस्थानच्या जमिनी कुळे/वहिवाटदारांना हस्तांतरित करण्यासंदर्भातील प्रस्तावित कायद्याचा मसुदा तात्काळ आणि कायमस्वरूपी मागे घ्यावा. २. वक्फ प्रमाणे संरक्षण देऊन हिंदू देवस्थानांच्या सर्व जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर "देवस्थान प्रतिबंधित सत्ता प्रकार - अहस्तांतरणीय" अशी स्पष्ट नोंद घेण्याचे परिपत्रक शासनाने तात्काळ काढावे. ३. गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात कठोर 'अँटी लँड ग्रॅबिंग कायदा' लागू करावा आणि देवस्थान जमीन हडपणाऱ्यांना १४ वर्षे सश्रम कारावास आणि अजामीनपात्र शिक्षेची तरतूद करावी. ४. मागील २५ वर्षांतील सर्व देवस्थान जमिनींचे हस्तांतरण, बोगस नोंदी आणि अतिक्रमणांची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करावी. ५. देवस्थान जमिनींबाबत महसूली आणि दिवाणी न्यायालयांत प्रलंबित असलेले वाद त्वरित निकाली काढण्यासाठी विशेष जलदगती न्यायालये स्थापन करून ६ महिन्यात खटले निकाली काढावेत.

यावेळी स्वामी नारायण मंदिराचे श्री. नयन स्वामी महाराज यांनी मंदिरांच्या मालकीच्या अनेक एकर जमिनी हडपण्याचा उद्देश असलेल्या वहिवाटदारांवर कर्नाटक, गुजरात प्रमाणे कठोर कारवाई करण्याची मागणी केली. सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी सांगितले की, देवस्थान जमिनी केवळ महसुली दप्तरातील आकडेवारी नसून, त्या महाराष्ट्राच्या संस्कृती, श्रद्धा आणि समाजजीवनाचा मूळ आधार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवून शासनाने धर्मदाय मालमत्तांचे ‘विश्वस्त’ म्हणून रक्षण करावे आणि मंदिराच्या कारभारात प्रशासकीय हस्तक्षेप करू नये. या वस्तुनिष्ठ आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष करून हा कायदा लादण्याचा प्रयत्न झाल्यास, राज्यभरातील सकल हिंदू समाज, सर्व मंदिरे, भाविक, पुरोहित, पुजारी आणि विविध हिंदू, सामाजिक व आध्यात्मिक संघटना एकत्र येऊन तीव्र आंदोलन करतील, असा त्यांनी इशारा दिला. त्यांनी हिंदुत्ववादी शासनाने मंदिरांच्या मागण्यांचा तातडीने विचार करण्याची मागणी केली.
    user_Kiran Mali
    Kiran Mali
    Local News Reporter धरणगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • मंठा शहरातील जवाहर कॉलनी परिसरात एका धक्कादायक घटनेत देशी दारूच्या दुकानातून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंठा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनीतील देशी दारूच्या दुकानात काही कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी “अजून किती निरपराध जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. नागरिकांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशी दारूचे दुकान बंद करणे, आरोपींवर कठोर कारवाई करणे, परिसरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे या प्रमुख मागण्या केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंठा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या मृत्यूबद्दल शोककळा पसरली आहे.
    1
    मंठा शहरातील जवाहर कॉलनी परिसरात एका धक्कादायक घटनेत देशी दारूच्या दुकानातून झालेल्या वादातून एका २२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण मंठा शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जवाहर कॉलनीतील देशी दारूच्या दुकानात काही कारणावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर संबंधित युवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या या युवकाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.

संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनी “अजून किती निरपराध जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला. नागरिकांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर, देशी दारूचे दुकान बंद करणे, आरोपींवर कठोर कारवाई करणे, परिसरात कायदा व सुव्यवस्था मजबूत करणे आणि अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे या प्रमुख मागण्या केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मंठा शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, युवकाच्या मृत्यूबद्दल शोककळा पसरली आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील ५१ वर्षीय शेतकरी गोपीनाथ जनार्धन सरकटे यांचा डिझेल आणण्यासाठी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असताना, ग्रामीण भागात डिझेलची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना इंधनासाठी दूरवर प्रवास करावा लागत आहे. वझर सरकटे गाव परिसरात पेट्रोल पंपाची सुविधा नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे. माहितीनुसार, गोपीनाथ सरकटे हे प्रथम ढोकसाळ येथील अहिरे पंपावर डिझेलसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माऊली (नायरा) पंपावरही प्रयत्न केला, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना डिझेल उपलब्ध झाले नाही. यानंतर ते मंठा शहराकडे येत असताना जालना-जितूर महामार्गावरील एस. आय. बँकेजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी वर्गातून "डिझेल मिळाले नाही, पण शेतकऱ्याचा जीव गेला," अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत आहेत.
    1
    मंठा तालुक्यातील वझर सरकटे येथील ५१ वर्षीय शेतकरी गोपीनाथ जनार्धन सरकटे यांचा डिझेल आणण्यासाठी दुचाकीवरून जात असताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या पेरणीपूर्व शेती मशागतीची कामे वेगाने सुरू असताना, ग्रामीण भागात डिझेलची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना इंधनासाठी दूरवर प्रवास करावा लागत आहे. वझर सरकटे गाव परिसरात पेट्रोल पंपाची सुविधा नसल्याने ही समस्या अधिकच गंभीर बनली आहे.

माहितीनुसार, गोपीनाथ सरकटे हे प्रथम ढोकसाळ येथील अहिरे पंपावर डिझेलसाठी गेले होते. त्यानंतर त्यांनी माऊली (नायरा) पंपावरही प्रयत्न केला, मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना डिझेल उपलब्ध झाले नाही. यानंतर ते मंठा शहराकडे येत असताना जालना-जितूर महामार्गावरील एस. आय. बँकेजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला.

या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी वर्गातून "डिझेल मिळाले नाही, पण शेतकऱ्याचा जीव गेला," अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मंठा पोलीस करत आहेत.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • वंचित बहुजन आघाडीने गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही मागणी वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांना निवेदन देऊन केली.
    1
    वंचित बहुजन आघाडीने गाढे गव्हाण येथील गावगुंडांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही मागणी वंचित बहुजन आघाडीने पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांना निवेदन देऊन केली.
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील सुगत पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये नंबरवरून वाद झाला. यामुळे डिझेल वाटप करण्यास पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण झाला.
    1
    जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथील सुगत पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांमध्ये नंबरवरून वाद झाला. यामुळे डिझेल वाटप करण्यास पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण झाला.
    user_AJINKYA S DAWANE
    AJINKYA S DAWANE
    मंठा, जालना, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.