logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही, काँग्रेस पक्ष संपूर्णपणे तुमच्या सोबत आहे, असे स्पष्ट आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धीर देत काँग्रेस पक्षाचा खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे.

1 day ago
user_विष्णु आखरे पाटील
विष्णु आखरे पाटील
पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
1 day ago

आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरण्याचे कारण नाही, काँग्रेस पक्ष संपूर्णपणे तुमच्या सोबत आहे, असे स्पष्ट आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे. त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धीर देत काँग्रेस पक्षाचा खंबीर पाठिंबा जाहीर केला आहे.

  • user_Ubed khan
    Ubed khan
    नगर, अहमदनगर, महाराष्ट्र
    😡
    1 day ago
More news from Buldhana and nearby areas
  • खरीप हंगामातील पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन अटींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात या नव्या नियमांच्या परिणामांमुळे अपेक्षेपेक्षा कमी, म्हणजेच केवळ ६४ हजार शेतकऱ्यांनीच यंदा पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. या वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे पीक विम्याचा अर्ज करताना शेतकऱ्यांकडून "मी कोणत्याही प्रकारचे कृषी पीक कर्ज घेतलेले नाही" या आशयाचे हमीपत्र भरून घेतले जात असल्याचा दावा केला जात आहे. दरवर्षी बँकांकडून शेतीसाठी पीक कर्ज घेणारे अनेक शेतकरी यामुळे प्रचंड संभ्रमात आहेत. भविष्यात या हमीपत्राचा आधार घेऊन विमा नाकारला जाईल का, असा भीतीचा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. या हमीपत्राबाबत शासनाने तातडीने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधीच पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असताना, अशा जाचक अटी लादून शेतकऱ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तुपकर यांनी सरकारकडे जुनी पीक विमा योजना पूर्ववत लागू करण्याची आणि अशा अटी तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
    1
    खरीप हंगामातील पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन अटींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात या नव्या नियमांच्या परिणामांमुळे अपेक्षेपेक्षा कमी, म्हणजेच केवळ ६४ हजार शेतकऱ्यांनीच यंदा पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे.

या वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे पीक विम्याचा अर्ज करताना शेतकऱ्यांकडून "मी कोणत्याही प्रकारचे कृषी पीक कर्ज घेतलेले नाही" या आशयाचे हमीपत्र भरून घेतले जात असल्याचा दावा केला जात आहे. दरवर्षी बँकांकडून शेतीसाठी पीक कर्ज घेणारे अनेक शेतकरी यामुळे प्रचंड संभ्रमात आहेत. भविष्यात या हमीपत्राचा आधार घेऊन विमा नाकारला जाईल का, असा भीतीचा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. या हमीपत्राबाबत शासनाने तातडीने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधीच पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असताना, अशा जाचक अटी लादून शेतकऱ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तुपकर यांनी सरकारकडे जुनी पीक विमा योजना पूर्ववत लागू करण्याची आणि अशा अटी तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    13 hrs ago
  • शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याची बातमी समजताच सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह तेथील विद्यार्थिनींमध्ये उत्साहाची आणि आनंदाची लाट पसरली आहे.
    1
    शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके आणि तेथे उपस्थित असलेल्या विद्यार्थिनींमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी दिलेल्या राजीनाम्याची बातमी समजताच सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह तेथील विद्यार्थिनींमध्ये उत्साहाची आणि आनंदाची लाट पसरली आहे.
    user_✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    ✍️.MANSUR. SHAHA. ✍️
    Salesperson चिखली, बुलढाणा, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरच थांबणे पसंत केले. वाघ परिसरातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत हे कर्मचारी सुमारे एक तास विद्युत खांबावरच अडकून राहिले. वन विभाग आणि स्थानिकांकडून परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
    1
    चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरच थांबणे पसंत केले. वाघ परिसरातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत हे कर्मचारी सुमारे एक तास विद्युत खांबावरच अडकून राहिले.

वन विभाग आणि स्थानिकांकडून परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती. देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, नगरसेविका वैशाली तायडे, ॲड. संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आजम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
    1
    नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती. देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा असल्याचे सांगितले.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, नगरसेविका वैशाली तायडे, ॲड. संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आजम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • आषाढी एकादशीनिमित्त विदर्भाचे प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानामध्ये भाविकांचा भक्तिसागर उसळला आहे. पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य न झालेल्या हजारो भाविकांनी शेगावात हजेरी लावली असून, मराठवाडा, खान्देश, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावतीसह विदर्भातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संस्थानाने शुक्रवारी (२४ जुलै) रात्री मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. पहाटेपासूनच श्रींच्या समाधी दर्शनासाठी लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. या सोहळ्यानिमित्त संस्थानतर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा आरतीने उत्सवाला सुरुवात झाली असून त्यानंतर भजन, दुपारचे प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा आणि रात्री ८ ते १० या वेळेत श्रीहरी कीर्तन होणार आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानने श्री समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद तसेच भक्त निवासामध्ये निवासाची विशेष सोय केली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, वाहतूक नियंत्रण आणि सेवेकऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली असून अधिकारी व सेवेकरी दिवसरात्र कार्यरत आहेत. पंढरपूरप्रमाणेच शेगावातही भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा साकारला असून गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
    1
    आषाढी एकादशीनिमित्त विदर्भाचे प्रति पंढरपूर मानल्या जाणाऱ्या शेगाव येथील श्री संत गजानन महाराज संस्थानामध्ये भाविकांचा भक्तिसागर उसळला आहे. पंढरपूरला प्रत्यक्ष जाणे शक्य न झालेल्या हजारो भाविकांनी शेगावात हजेरी लावली असून, मराठवाडा, खान्देश, जळगाव, बुलढाणा, अकोला आणि अमरावतीसह विदर्भातील विविध भागांतून नागरिक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संस्थानाने शुक्रवारी (२४ जुलै) रात्री मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला. पहाटेपासूनच श्रींच्या समाधी दर्शनासाठी लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर विठ्ठलनामाच्या गजराने आणि "गण गण गणात बोते" च्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे.

या सोहळ्यानिमित्त संस्थानतर्फे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडा आरतीने उत्सवाला सुरुवात झाली असून त्यानंतर भजन, दुपारचे प्रवचन, सायंकाळी हरिपाठ, श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा आणि रात्री ८ ते १० या वेळेत श्रीहरी कीर्तन होणार आहे.

भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी संस्थानने श्री समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद तसेच भक्त निवासामध्ये निवासाची विशेष सोय केली आहे. मंदिर परिसरात स्वच्छता, सुरक्षा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, वाहतूक नियंत्रण आणि सेवेकऱ्यांची मोठी फौज तैनात करण्यात आली असून अधिकारी व सेवेकरी दिवसरात्र कार्यरत आहेत. पंढरपूरप्रमाणेच शेगावातही भक्ती, सेवा आणि श्रद्धेचा अविस्मरणीय सोहळा साकारला असून गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    15 hrs ago
  • Khadka MIDC road taluka Bhusawal jila Jalgaon
    1
    Khadka MIDC road taluka Bhusawal jila Jalgaon
    user_Sheikh Rauf Sheikh Yusuf
    Sheikh Rauf Sheikh Yusuf
    भुसावळ, जळगाव, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने आपल्या सासू आणि सासऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने आपल्या सासू आणि सासऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे.

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    10 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.