Shuru
Apke Nagar Ki App…
Khadka MIDC road taluka Bhusawal jila Jalgaon
Sheikh Rauf Sheikh Yusuf
Khadka MIDC road taluka Bhusawal jila Jalgaon
- Juber Khan Karim KhanBhusawal, Jalgaon👍11 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Khadka MIDC road taluka Bhusawal jila Jalgaon1
- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वीज दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांना परिसरात वाघ दिसल्याची माहिती मिळताच त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून खांबावरच थांबणे पसंत केले. वाघ परिसरातून निघून गेल्याची खात्री होईपर्यंत हे कर्मचारी सुमारे एक तास विद्युत खांबावरच अडकून राहिले. वन विभाग आणि स्थानिकांकडून परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतरच कर्मचाऱ्यांनी खाली उतरून सुटकेचा निश्वास सोडला. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, महावितरण कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.1
- पाचोरा येथील कृष्णापुरी परिसरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने फराळ वाटप करण्यात आले आहे. माऊली ग्रुप आणि बहुळेश्वर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या फराळ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.1
- खरीप हंगामातील पीक विमा योजनेत समाविष्ट करण्यात आलेल्या नवीन अटींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात या नव्या नियमांच्या परिणामांमुळे अपेक्षेपेक्षा कमी, म्हणजेच केवळ ६४ हजार शेतकऱ्यांनीच यंदा पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. या वादाचा मुख्य मुद्दा म्हणजे पीक विम्याचा अर्ज करताना शेतकऱ्यांकडून "मी कोणत्याही प्रकारचे कृषी पीक कर्ज घेतलेले नाही" या आशयाचे हमीपत्र भरून घेतले जात असल्याचा दावा केला जात आहे. दरवर्षी बँकांकडून शेतीसाठी पीक कर्ज घेणारे अनेक शेतकरी यामुळे प्रचंड संभ्रमात आहेत. भविष्यात या हमीपत्राचा आधार घेऊन विमा नाकारला जाईल का, असा भीतीचा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत. या हमीपत्राबाबत शासनाने तातडीने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. आधीच पीक विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळण्यास विलंब होत असताना, अशा जाचक अटी लादून शेतकऱ्यांना योजनेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तुपकर यांनी सरकारकडे जुनी पीक विमा योजना पूर्ववत लागू करण्याची आणि अशा अटी तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे.1
- नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी दुपारी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जामोद शहरातील दुर्गा चौकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि मित्र पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडून जल्लोष साजरा केला. दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट पेपरफुटी प्रकरणी न्यायाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या कथित लाठीचार्ज आणि मारहाणीचा देशभरातून निषेध व्यक्त करण्यात आला होता. या घटनेनंतर विद्यार्थी संघटना, विरोधी पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांनी केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र केली होती. देशभरातून मिळालेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांच्या या संघर्षाला अखेर यश मिळाल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. उपस्थितांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या संघर्षाला सलाम केला आणि हा विजय विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा व लोकशाही मार्गाने लढलेल्या आंदोलनाचा असल्याचे सांगितले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस पक्षनेत्या डॉ. स्वाती वाकेकर, राजीव गांधी पंचायत राज समितीचे समन्वयक अविनाश उमरकर, तालुकाध्यक्ष ॲड. भाऊराव भालेराव, शहराध्यक्ष ॲड. अमर पाचपोर, संग्रामपूर तालुकाध्यक्ष राजेंद्र वानखडे, नगरसेविका वैशाली तायडे, ॲड. संदीप मानकर यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष देवानंद दामोदर, शहराध्यक्ष आजम कुरेशी, सुनील बोदडे, श्रीराम भिडे, रोशन तायडे, विजय सातव यांच्यासह मित्र पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.1
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत अल्पसंख्यांक मागासवर्गीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जळगाव जामोद येथील सातपुडा कॉन्व्हेंट ऑफ कलर्सच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) शहरातून पारंपरिक वारकरी दिंडीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा निनाद, भगवे झेंडे आणि संतांच्या वेशभूषेत सजलेल्या चिमुकल्यांच्या सहभागामुळे संपूर्ण शहर भक्तिरसात न्हाऊन निघाले. ही दिंडी पोलीस स्टेशन परिसरातून सुरू होऊन दुर्गा चौक, चौभरा चौक, जुने भाजी मार्केट आणि लहान बस स्टँड या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. यावेळी "ज्ञानोबा-तुकाराम", "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल", "जय जय राम कृष्ण हरी" आणि "गण गण गणात बोते" या जयघोषांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. दिंडीत सहभागी झालेल्या मुलांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव आणि संत सावता माळी अशा विविध संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या होत्या. टाळ, मृदुंग, भगवे झेंडे आणि तुळशी वृंदावनासह शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या दिंडीने वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. या उपक्रमातून बालकांमध्ये भारतीय संस्कृती, भक्ती, एकता, शिस्त, सामाजिक मूल्ये आणि वारकरी परंपरेचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला. दिंडी मार्गावर मोठ्या संख्येने पालक, नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहून चिमुकल्यांचे कौतुक केले. या प्रसंगी जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन अस्थाना, माजी आमदार कृष्णराव इंगळे, उर्मिलाताई इंगळे, भाऊसाहेब इंगळे, डॉ. शेषराव भोपळे, स्वातीताई वाकेकर, गौरीताई सातव, डॉ. संदीप वाकेकर, हुसेन डायमंड, तुकाराम काळपांडे, राजाभाऊ कोकाटे, एपीआय शेडगे मॅडम, अमर पाचपोर, रमेश ताडे, रामविजय बुरुंगले, जिवनलालजी झंवर, चंपालालजी झंवर, केशव हिंगणे, मनोज राठी, अजय वानखडे, विकास जाधव, अर्जुन घोलप, श्रीकृष्ण केदार, संदीप मानकर, राजू घुटे, अनिल इंगळे, दिवेश कोठडिया आणि अनंता वानखडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा सोहळा जळगाव जामोद शहरासाठी भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अविस्मरणीय संगम ठरला.1
- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड शहरात पती-पत्नीमध्ये झालेल्या वादातून पतीने आपल्या सासू आणि सासऱ्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. याप्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1