logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मोताळा तालुक्यातील सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कोथळी गावात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यामुळे नाल्यांमधील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवरून थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवक नसून प्रभारी ग्रामसेवक कार्यरत आहेत. मात्र ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नसल्याने प्रशासनाचा बोजवारा उडाला असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील नाल्यांवरील धापे तुटल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावात २० ते २५ दिवस नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेजवळील कचराकुंडी मागील तीन महिन्यांपासून ओसंडून भरली आहे. या कचराकुंडीला लागूनच शाळेचे स्वयंपाकगृह (किचन शेड) असल्याने मध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नाल्यांची साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट, धाप्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर गावात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

4 hrs ago
user_अनिल भगत पत्रकार
अनिल भगत पत्रकार
जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
4 hrs ago

मोताळा तालुक्यातील सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कोथळी गावात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यामुळे नाल्यांमधील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवरून थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवक नसून प्रभारी ग्रामसेवक कार्यरत आहेत. मात्र ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नसल्याने प्रशासनाचा बोजवारा उडाला असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील नाल्यांवरील धापे तुटल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावात २० ते २५ दिवस नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेजवळील कचराकुंडी मागील तीन महिन्यांपासून ओसंडून भरली आहे. या कचराकुंडीला लागूनच शाळेचे स्वयंपाकगृह (किचन शेड) असल्याने मध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नाल्यांची साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट, धाप्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर गावात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मोताळा तालुक्यातील सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कोथळी गावात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यामुळे नाल्यांमधील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवरून थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवक नसून प्रभारी ग्रामसेवक कार्यरत आहेत. मात्र ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नसल्याने प्रशासनाचा बोजवारा उडाला असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील नाल्यांवरील धापे तुटल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावात २० ते २५ दिवस नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेजवळील कचराकुंडी मागील तीन महिन्यांपासून ओसंडून भरली आहे. या कचराकुंडीला लागूनच शाळेचे स्वयंपाकगृह (किचन शेड) असल्याने मध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नाल्यांची साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट, धाप्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर गावात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    1
    मोताळा तालुक्यातील सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कोथळी गावात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यामुळे नाल्यांमधील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवरून थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.

ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवक नसून प्रभारी ग्रामसेवक कार्यरत आहेत. मात्र ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नसल्याने प्रशासनाचा बोजवारा उडाला असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील नाल्यांवरील धापे तुटल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावात २० ते २५ दिवस नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

गावातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेजवळील कचराकुंडी मागील तीन महिन्यांपासून ओसंडून भरली आहे. या कचराकुंडीला लागूनच शाळेचे स्वयंपाकगृह (किचन शेड) असल्याने मध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नाल्यांची साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट, धाप्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर गावात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • शैक्षणिक क्षेत्रातील कथित गोंधळ, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात २१ जुलै २०२६ रोजी शेगावमध्ये विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन करत भव्य मोर्चा काढला. हजारो विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले असून न्याय मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही, असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. या मोर्चाच्या माध्यमातून लडाखच्या पर्यावरणवाद्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार आणि पेपरफुटी प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांनी केली. शैक्षणिक व्यवस्थेतील गैरप्रकारांवर तीव्र संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. शेगावच्या रस्त्यांवर उतरलेल्या तरुणाईने आपल्या एकजुटीचे आणि संघर्षाच्या निर्धाराचे प्रभावी प्रदर्शन घडवून आणले. हा मोर्चा शांततेत पार पडला असला, तरी विद्यार्थ्यांच्या बुलंद घोषणांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी विद्यार्थी, युवक आणि नागरिकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.
    1
    शैक्षणिक क्षेत्रातील कथित गोंधळ, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात २१ जुलै २०२६ रोजी शेगावमध्ये विद्यार्थ्यांनी अभूतपूर्व शक्तिप्रदर्शन करत भव्य मोर्चा काढला. हजारो विद्यार्थ्यांच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले असून न्याय मिळाल्याशिवाय हा संघर्ष थांबणार नाही, असा थेट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

या मोर्चाच्या माध्यमातून लडाखच्या पर्यावरणवाद्यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा दर्शवण्यात आला. तसेच शैक्षणिक क्षेत्रातील कथित भ्रष्टाचार आणि पेपरफुटी प्रकरणांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांनी केली. शैक्षणिक व्यवस्थेतील गैरप्रकारांवर तीव्र संताप व्यक्त करत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास हे आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.

शेगावच्या रस्त्यांवर उतरलेल्या तरुणाईने आपल्या एकजुटीचे आणि संघर्षाच्या निर्धाराचे प्रभावी प्रदर्शन घडवून आणले. हा मोर्चा शांततेत पार पडला असला, तरी विद्यार्थ्यांच्या बुलंद घोषणांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी विद्यार्थी, युवक आणि नागरिकांचे आयोजकांनी मनःपूर्वक आभार मानले.
    user_Sachin kadukar
    Sachin kadukar
    Photographer Shegaon, Buldhana•
    1 hr ago
  • बुलढाणा जिल्ह्यात सलग दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले असून खामगाव तालुक्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर आणि कापसाच्या पिकांना मोठे जीवदान मिळणार आहे. ऐनवेळी झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांचा प्रश्न सुटला असून जिल्ह्यातील बळीराजाची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यात सलग दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले असून खामगाव तालुक्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर आणि कापसाच्या पिकांना मोठे जीवदान मिळणार आहे. ऐनवेळी झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांचा प्रश्न सुटला असून जिल्ह्यातील बळीराजाची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • महाराष्ट्रभरातील शेतकरी आणि श्रमिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, २१ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर किसान सभेच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील २१ हून अधिक जिल्ह्यांतून हजारो शेतकरी आणि श्रमिक या मोर्चात सहभागी होणार असल्याने आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मोर्चामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत दिलासा देणे, देवस्थान, गायरान आणि घराच्या तळजमिनी शेतकरी व श्रमिकांच्या नावे करणे या प्रमुख मागण्या लावून धरल्या जाणार आहेत. याशिवाय, पीक विमा योजनेतील ट्रिगर प्रणाली पूर्ववत करून योजना शेतकरी हिताची करणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे आणि पेसा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी थांबवणे या मागण्यांचाही यात समावेश आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले आणि उमेश देशमुख करणार असून या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील शेतकरी आणि श्रमिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    महाराष्ट्रभरातील शेतकरी आणि श्रमिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, २१ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर किसान सभेच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील २१ हून अधिक जिल्ह्यांतून हजारो शेतकरी आणि श्रमिक या मोर्चात सहभागी होणार असल्याने आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या मोर्चामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत दिलासा देणे, देवस्थान, गायरान आणि घराच्या तळजमिनी शेतकरी व श्रमिकांच्या नावे करणे या प्रमुख मागण्या लावून धरल्या जाणार आहेत. याशिवाय, पीक विमा योजनेतील ट्रिगर प्रणाली पूर्ववत करून योजना शेतकरी हिताची करणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे आणि पेसा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी थांबवणे या मागण्यांचाही यात समावेश आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले आणि उमेश देशमुख करणार असून या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील शेतकरी आणि श्रमिकांचे लक्ष लागले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    10 hrs ago
  • दिल्लीतील जंतर मंतर येथे न्यूज नॅशनल 81 च्या टीमकडून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येत आहे.
    1
    दिल्लीतील जंतर मंतर येथे न्यूज नॅशनल 81 च्या टीमकडून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात येत आहे.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • अकोला येथील अलंकार मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
    1
    अकोला येथील अलंकार मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.