logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्रभरातील शेतकरी आणि श्रमिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, २१ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर किसान सभेच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील २१ हून अधिक जिल्ह्यांतून हजारो शेतकरी आणि श्रमिक या मोर्चात सहभागी होणार असल्याने आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मोर्चामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत दिलासा देणे, देवस्थान, गायरान आणि घराच्या तळजमिनी शेतकरी व श्रमिकांच्या नावे करणे या प्रमुख मागण्या लावून धरल्या जाणार आहेत. याशिवाय, पीक विमा योजनेतील ट्रिगर प्रणाली पूर्ववत करून योजना शेतकरी हिताची करणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे आणि पेसा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी थांबवणे या मागण्यांचाही यात समावेश आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले आणि उमेश देशमुख करणार असून या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील शेतकरी आणि श्रमिकांचे लक्ष लागले आहे.

8 hrs ago
user_SHEGAONlive
SHEGAONlive
Local News Reporter Buldana, Buldhana•
8 hrs ago

महाराष्ट्रभरातील शेतकरी आणि श्रमिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, २१ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर किसान सभेच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील २१ हून अधिक जिल्ह्यांतून हजारो शेतकरी आणि श्रमिक या मोर्चात सहभागी होणार असल्याने आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मोर्चामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत दिलासा देणे, देवस्थान, गायरान आणि घराच्या तळजमिनी शेतकरी व श्रमिकांच्या नावे करणे या प्रमुख मागण्या लावून धरल्या जाणार आहेत. याशिवाय, पीक विमा योजनेतील ट्रिगर प्रणाली पूर्ववत करून योजना शेतकरी हिताची करणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे आणि पेसा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी थांबवणे या मागण्यांचाही यात समावेश आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले आणि उमेश देशमुख करणार असून या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील शेतकरी आणि श्रमिकांचे लक्ष लागले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • बुलढाणा जिल्ह्यात सलग दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले असून खामगाव तालुक्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर आणि कापसाच्या पिकांना मोठे जीवदान मिळणार आहे. ऐनवेळी झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांचा प्रश्न सुटला असून जिल्ह्यातील बळीराजाची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे.
    1
    बुलढाणा जिल्ह्यात सलग दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन केले असून खामगाव तालुक्यात सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतातील सोयाबीन, तूर आणि कापसाच्या पिकांना मोठे जीवदान मिळणार आहे. ऐनवेळी झालेल्या या दमदार पावसामुळे पिकांचा प्रश्न सुटला असून जिल्ह्यातील बळीराजाची चिंता आता पूर्णपणे मिटली आहे.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • महाराष्ट्रभरातील शेतकरी आणि श्रमिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, २१ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर किसान सभेच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील २१ हून अधिक जिल्ह्यांतून हजारो शेतकरी आणि श्रमिक या मोर्चात सहभागी होणार असल्याने आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मोर्चामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत दिलासा देणे, देवस्थान, गायरान आणि घराच्या तळजमिनी शेतकरी व श्रमिकांच्या नावे करणे या प्रमुख मागण्या लावून धरल्या जाणार आहेत. याशिवाय, पीक विमा योजनेतील ट्रिगर प्रणाली पूर्ववत करून योजना शेतकरी हिताची करणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे आणि पेसा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी थांबवणे या मागण्यांचाही यात समावेश आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले आणि उमेश देशमुख करणार असून या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील शेतकरी आणि श्रमिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    महाराष्ट्रभरातील शेतकरी आणि श्रमिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उद्या, २१ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर किसान सभेच्या वतीने भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील २१ हून अधिक जिल्ह्यांतून हजारो शेतकरी आणि श्रमिक या मोर्चात सहभागी होणार असल्याने आझाद मैदान परिसरात मोठी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या मोर्चामध्ये नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत दिलासा देणे, देवस्थान, गायरान आणि घराच्या तळजमिनी शेतकरी व श्रमिकांच्या नावे करणे या प्रमुख मागण्या लावून धरल्या जाणार आहेत. याशिवाय, पीक विमा योजनेतील ट्रिगर प्रणाली पूर्ववत करून योजना शेतकरी हिताची करणे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देणे आणि पेसा कर्मचाऱ्यांची हकालपट्टी थांबवणे या मागण्यांचाही यात समावेश आहे. या मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, डॉ. अजित नवले, आमदार विनोद निकोले आणि उमेश देशमुख करणार असून या मागण्यांवर सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील शेतकरी आणि श्रमिकांचे लक्ष लागले आहे.
    user_SHEGAONlive
    SHEGAONlive
    Local News Reporter Buldana, Buldhana•
    8 hrs ago
  • जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील ओम नारायण बावणे या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये 544 गुण मिळवत एमबीबीएस प्रवेशासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. जाफराबाद बस स्थानक परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील पालकांच्या मुलाने हे प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ओमचे इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे झाले असून तो सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने CBSE दहावीच्या परीक्षेत 85 टक्के, तर बारावीत 89.4 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दोन वर्षे नीट परीक्षेची कठोर तयारी केली आणि एकूण तीन वेळा ही परीक्षा दिली. 2025 मधील पहिल्या प्रयत्नात त्याला 421 गुण मिळाले होते, जे एमबीबीएससाठी अपुरे ठरले. त्यानंतर 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्याने मोठा मानसिक धक्का बसूनही खचून न जाता त्याने पुन्हा एक महिना अभ्यास केला आणि अखेर 21 जून 2026 च्या परीक्षेत 544 गुण मिळवून आपले स्वप्न साकार केले. मोबाईल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहून केलेले नियोजनबद्ध अध्ययन, जिद्द, नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कष्टकरी पालकांचा त्याग यांच्या बळावर ओमने हे यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या यशामुळे माहोरा गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्र, शिक्षक आणि मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
    2
    जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथील ओम नारायण बावणे या विद्यार्थ्याने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG) 2026 मध्ये 544 गुण मिळवत एमबीबीएस प्रवेशासाठी आपली दावेदारी भक्कम केली आहे. जाफराबाद बस स्थानक परिसरात फळविक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील पालकांच्या मुलाने हे प्रेरणादायी यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र लोखंडे यांच्या हस्ते ओमचा सत्कार करण्यात आला असून उपस्थित मान्यवरांनी त्याचे अभिनंदन करत पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

ओमचे इयत्ता 5 वी ते 12 वीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे झाले असून तो सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होता. त्याने CBSE दहावीच्या परीक्षेत 85 टक्के, तर बारावीत 89.4 टक्के गुण मिळवले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने दोन वर्षे नीट परीक्षेची कठोर तयारी केली आणि एकूण तीन वेळा ही परीक्षा दिली. 2025 मधील पहिल्या प्रयत्नात त्याला 421 गुण मिळाले होते, जे एमबीबीएससाठी अपुरे ठरले. त्यानंतर 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्याने मोठा मानसिक धक्का बसूनही खचून न जाता त्याने पुन्हा एक महिना अभ्यास केला आणि अखेर 21 जून 2026 च्या परीक्षेत 544 गुण मिळवून आपले स्वप्न साकार केले.

मोबाईल आणि इतर आकर्षणांपासून दूर राहून केलेले नियोजनबद्ध अध्ययन, जिद्द, नवोदय विद्यालयाच्या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि कष्टकरी पालकांचा त्याग यांच्या बळावर ओमने हे यशाचे शिखर गाठले आहे. त्याच्या या यशामुळे माहोरा गावासह संपूर्ण जाफराबाद तालुक्यात आनंदाचे वातावरण असून नातेवाईक, मित्र, शिक्षक आणि मान्यवरांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मोताळा तालुक्यातील सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कोथळी गावात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यामुळे नाल्यांमधील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवरून थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे. ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवक नसून प्रभारी ग्रामसेवक कार्यरत आहेत. मात्र ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नसल्याने प्रशासनाचा बोजवारा उडाला असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील नाल्यांवरील धापे तुटल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावात २० ते २५ दिवस नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेजवळील कचराकुंडी मागील तीन महिन्यांपासून ओसंडून भरली आहे. या कचराकुंडीला लागूनच शाळेचे स्वयंपाकगृह (किचन शेड) असल्याने मध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नाल्यांची साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट, धाप्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर गावात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    1
    मोताळा तालुक्यातील सुमारे १५ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या कोथळी गावात स्वच्छतेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या तुंबलेल्या अवस्थेत आहेत. पावसाळ्यामुळे नाल्यांमधील सांडपाणी ओव्हरफ्लो होऊन रस्त्यांवरून थेट नागरिकांच्या घरात शिरत असल्याने दुर्गंधी, अस्वच्छता आणि साथीच्या रोगांचा धोका वाढला आहे.

ग्रामपंचायतीत कायमस्वरूपी ग्रामसेवक नसून प्रभारी ग्रामसेवक कार्यरत आहेत. मात्र ते नियमितपणे गावात उपस्थित राहत नसल्याने प्रशासनाचा बोजवारा उडाला असून नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील नाल्यांवरील धापे तुटल्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावात २० ते २५ दिवस नळाला पाणी येत नसल्याने पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.

गावातील जिल्हा परिषद उर्दू उच्च प्राथमिक शाळेजवळील कचराकुंडी मागील तीन महिन्यांपासून ओसंडून भरली आहे. या कचराकुंडीला लागूनच शाळेचे स्वयंपाकगृह (किचन शेड) असल्याने मध्यान्ह भोजन तयार करताना स्वयंपाकी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना असह्य दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. जर प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नाल्यांची साफसफाई, कचऱ्याची विल्हेवाट, धाप्यांची दुरुस्ती आणि पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर गावात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यांसारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील म्हसला खुर्द येथे एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे।
    1
    छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील म्हसला खुर्द येथे एका ३२ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे।
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • महाराष्ट्रातील कुऱ्हा-वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत संपादित झालेल्या पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे आणि जे या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत, त्यांना प्रति हेक्टरी ५ लाख रुपये या दराने हे अनुदान मिळणार आहे.
    1
    महाराष्ट्रातील कुऱ्हा-वडोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेअंतर्गत संपादित झालेल्या पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे आणि जे या अनुदानासाठी पात्र ठरले आहेत, त्यांना प्रति हेक्टरी ५ लाख रुपये या दराने हे अनुदान मिळणार आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • उबाठा शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. मोदी सरकारचा सध्याचा कारभार हा थेट इंग्रजांच्या दडपशाहीच्या पद्धतीची आठवण करून देणारा असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
    1
    उबाठा शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. मोदी सरकारचा सध्याचा कारभार हा थेट इंग्रजांच्या दडपशाहीच्या पद्धतीची आठवण करून देणारा असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे.
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.