Shuru
Apke Nagar Ki App…
आज 44, पार हुआ तापमान,, खड़ी गाड़ी जली,दो तीन दिन, और बढ़ेगा तापमान,, रहे सावधानी
Samachar king digital
आज 44, पार हुआ तापमान,, खड़ी गाड़ी जली,दो तीन दिन, और बढ़ेगा तापमान,, रहे सावधानी
More news from Maharashtra and nearby areas
- Post by Samachar king digital1
- Post by कु सुषमा डबराल1
- Post by Ammar haider (ezaan)1
- कर्तृत्वाला मानाचा मुजरा : चंद्रपूरकरांकडून जी.सी. विनय गौडा यांचा 19 एप्रिल ला भव्य नागरी सत्कार नव्या जिल्हाधिकारी वसूमना पंत देखील होणार सन्मानित चंद्रपूर: जिल्ह्याच्या विकासाला नवे आयाम देत प्रशासनाला लोकाभिमुखतेची धार देणारे माजी जिल्हाधिकारी जी.सी. विनय गौडा यांचे योगदान चंद्रपूरकरांच्या मनात अढळ स्थान निर्माण करून गेले आहे. त्यांच्या कार्यकाळात जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेल्या निर्णयांची आणि राबवलेल्या उपक्रमांची आठवण आजही नागरिक अभिमानाने करतात. आ सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या विकास प्रकल्पाना प्रशासकीय पातळीवर त्यांनी केलेल्या सकारात्मक सहकार्यामुळे विकास प्रक्रियेला गती मिळाली आहे. या कर्तृत्वाला मानाचा मुजरा देण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांच्या वतीने त्यांच्या सन्मानार्थ भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे उत्साहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार राहणार असून, कार्यक्रमाला आ कीर्तिकुमार भांगडिया, आ. देवराव भोंगळे, आ करण देवतळे या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. विविध सामाजिक संस्था संघटनांच्या माध्यमातून त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचवेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाची धुरा नुकतीच स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी श्रीमती वसूमना पंत यांचाही शुभेच्छापर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. नव्या जबाबदारीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या आगामी कार्यासाठी नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होणार आहे. दोन्ही कार्यक्षम आणि लोकाभिमुख सनदी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ आयोजित हा नागरी सत्कार सोहळा चंद्रपूरच्या सामाजिक ऐक्याचे आणि कृतज्ञतेच्या भावनेचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी चंद्रपूरकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.1
- कामठीत थरार! पैशांच्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला – आरोपी अटकेत! “कामठी पुन्हा हादरलंय…! मैत्रीतून सुरू झालेला वाद… थेट जीवघेण्या हल्ल्यापर्यंत पोहोचला…!”कामठी शहरातील जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून थेट जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचा मित्र हे पिली हवेली चौक परिसरात उभे असताना, त्यांचा परिचित आरोपी शफीक असारी हा तिथे आला. सकाळी दिलेल्या पैशांच्या मागणीवरून वाद सुरु झाला… काही क्षणातच हा वाद विकोपाला गेला… आणि अचानक आरोपीने गाडीच्या डिक्कीतून चाकू काढत तरुणावर थेट छातीवर वार केला! या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालय, कामठी येथे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जुनी कामठी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. IPC कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. “कामठीत वाढता गुन्हेगारीचा ग्राफ… सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर!”2
- इसासनी-वागधरा येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमणाचा स्फोटक आरोप! माजी सरपंचांची पालकमंत्र्यांकडे धाव नागपूर : नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील इसासनी-वागधरा ग्रामपंचायत हद्दीत शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. माजी सरपंच संतोष गोपीचंद कटरे यांनी थेट महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करून उच्चस्तरीय चौकशी व तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. तक्रारीनुसार, शांती नगर, बुद्ध नगरी व बहुजन नगर परिसरातील खसरा क्रमांक एक, सहा व सात या शासकीय जमिनीवर संघटित पद्धतीने कब्जा करण्यात आला आहे. काही स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व प्रभावशाली व्यक्तींच्या संगनमताने नागरिकांकडून लाखो रुपये घेऊन जागा ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात काही स्थानिक सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची नावेही चर्चेत आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले त्या भागात सिमेंट रस्ते, पाणी पाईपलाईन व इतर विकासकामे करण्यात आल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. म्हणजेच बेकायदेशीर अतिक्रमणालाच शासकीय सुविधांचा आधार दिला जात असल्याचा आरोप होत आहे. तसेच अतिक्रमणासाठी त्या भागातील तलावही बुजविण्यात आला असून पर्यावरणीय हानी झाल्याची बाब समोर आली आहे. माजी सरपंच संतोष कटरे यांनी या प्रकरणाला विरोध केल्यानंतर एकोणतीस मार्च दोन हजार सव्वीस रोजी त्यांच्यावर मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. उलट पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कटरे यांनी आपल्या जीवितास धोका असल्याचे सांगत स्वतःस व कुटुंबास पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अतिक्रमणधारक, अधिकारी व निष्क्रिय पोलिसांवर फौजदारी गुन्हे दाखल करून शासकीय जमीन मोकळी करावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. या स्फोटक तक्रारीमुळे इसासनी-वागधरा परिसरात खळबळ उडाली असून आता पालकमंत्री बावनकुळे या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड मध्ये वाढली मिरचीची आवक वाढली ०मिरची बाजार यामुळे नक्षी रोडवर भरणार भिवापूर ( राजेश जांभुळे ) यावर्षी हिरव्या मिरचीचा तोडा शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात बांधावरच केला होता. त्यामुळे आठवडी मिरची मार्केट मध्ये फरवरी व मार्च, महिन्यात मिरचीची आवक कमी होती मात्र दर चांगलेच वाढलेले होते. मात्र एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या मिरचीच्या आठवडी बाजारात या मिरचीची 1000 क्विंटल इतकी आवक झाली. या मिरचीला 150 ते 250 रुपये किलोमागे भाव मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मागील दोन आठवडी बाजार पासून भिवापूर मिरचीचा बाजार नक्षी रोडवरील बाजार समितीची जागा असलेल्या परिसरात नेण्यात आला. कारण की कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट यार्ड परिसरात मोठया प्रमाणात कापसाची आवक झाल्यामुळे हा कापसाचा साठा परिसरात ठेवलेला असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सचिव रामकृष्ण गोंगल यांनी दिली. हा परिसर भव्य तीन एकराचा असून या परिसराचा विकास करण्यात येणार असल्याचे सांगितले. दि. 17 एप्रिलला भरलेल्या मिरचीच्या आठवडी बाजारात 1000 क्विंटल मिरचीची आवक झाली. तालुक्यातील शेतकऱ्यांनी काही ओल्या डोडाचे वाळवण करून ही मिरची मोठया प्रमाणात शुक्रवारी मिरची बाजारात आणली होती चिल्लर मध्ये घरगुती वापरासाठी असलेली रोशनी व सी -5 मिरचीची किलोमागे दर 240 ते 260 इतका होता. या मिरचीला चांगली मागणी दिसून येत होती. एकंदरीत या मिरचीची दर्जा चांगला होता. सचिव रामकृष्ण गोंगल कृषी उत्पन्न बाजार समिती भिवापूर मागील दोन आठवड्या पासून मिरचीचा बाजार नक्षी रोड परिसरात नेण्यात आला आहे. या परिसरात संरक्षण भिंत तयार करण्यात येणार आहे. शेतकऱ्या करीता पाण्याची व बसण्याची व्यवस्था करण्यात येणार असून बैला करीता पाण्याचे हौद तयार करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.1
- Post by कु सुषमा डबराल1