महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त म.फुलेनगर झोपडपट्टी च्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न; महापुरुषांना अभिवादन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त म.फुलेनगर झोपडपट्टी च्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न; महापुरुषांना अभिवादन अंबाजोगाई:-दिनांक - १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा ज्योतिराव फूले नगर येथे शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त फुलेनगर च्या वतीने मुक व कर्नबधिर यांना खिचडी वाटप करण्यात आली.सायंकाळी खिचडी, अन्नदान व पाणी पाऊचही देण्यात आले.फुलेनगर मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात 13 एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी भिम गितांचा कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरूवात करण्यात आली. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूण ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी, मा.आमदार पृथ्वीराज साठे, अंबाजोगाई न.प. उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया,माजी नगरसेवक कमलाकर आण्णा कोपले,नगरसेवक संजय गंभिरे, दिग्गविजय लोमटे, पत्रकार अभिजित लोमटे ,शेख फेरोज, रिपब्लिकन बहुजन सेनेचे जि.अध्यक्ष दयानंद लांडगे , सुरेश मिसाळ सर, मराठी पत्रकार परिषद चे ता.अध्यक्ष बालाजी खैरमोडे, संपादक एसएस उदारे, नगर सेवक सचिन जाधव, किरण भालेकर,डाॅ.इंगोले व ईतर मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले. याप्रसंगी 'बाबासाहेबांचे सामाजिक विचार आणि वर्तमान काळ' या विषयावर मा.आमदार पृथ्वीराज साठे,सुरेश मिसाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यात अनेक विचारवंतांनी बाबासाहेबांच्या समतावादी विचारांवर प्रकाश टाकला.मा.फुलेगर झोपडपट्टी च्या वतीने पाणी पाऊच, खिचडी अन्नदान वाटप करण्यात आले. तसेच जयंती समिती अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साहेबराव लोंढे, राजू बलाडे, कैलास वाघमारे, रोहित ढवारे , आदित्य गायकवाड , प्रविण जोगदंड, निलेश जोगदंड, रोहित वाघमारे, रूपेश वाघमारे, निखिल जोगदंड , गोविंद शिंदे ,आमर जोगदंड, प्रदिप थोरात,रवि मस्के,सुरज पोटभरे, बबन वावळकर, धनराज जोगदंड, महेंद्र मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले होते.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक,महिला आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी डॉ.आंबेडकरांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या त्रिसुत्रीचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पञकार मारुती जोगदंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन साहेबराव लोंढे यांनी केले.यावेळी नागरिक,महिला आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त म.फुलेनगर झोपडपट्टी च्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न; महापुरुषांना अभिवादन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त म.फुलेनगर झोपडपट्टी च्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न; महापुरुषांना अभिवादन अंबाजोगाई:-दिनांक - १४ एप्रिल रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या महात्मा ज्योतिराव फूले नगर येथे शिस्तबद्ध वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त फुलेनगर च्या वतीने मुक व कर्नबधिर यांना खिचडी वाटप करण्यात आली.सायंकाळी खिचडी, अन्नदान व पाणी पाऊचही देण्यात आले.फुलेनगर मित्र मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात 13 एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी भिम गितांचा कार्यक्रमाच्या माध्यमातून सुरूवात करण्यात आली. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करूण ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी, मा.आमदार पृथ्वीराज साठे, अंबाजोगाई न.प. उपनगराध्यक्ष दिनेश भराडिया,माजी नगरसेवक कमलाकर आण्णा कोपले,नगरसेवक संजय गंभिरे, दिग्गविजय लोमटे, पत्रकार अभिजित लोमटे ,शेख फेरोज, रिपब्लिकन बहुजन सेनेचे जि.अध्यक्ष दयानंद लांडगे , सुरेश मिसाळ सर, मराठी पत्रकार परिषद चे ता.अध्यक्ष बालाजी खैरमोडे, संपादक एसएस उदारे, नगर सेवक सचिन जाधव, किरण भालेकर,डाॅ.इंगोले व ईतर मान्यवरांनी बाबासाहेबांच्या विचारांचे स्मरण केले. याप्रसंगी 'बाबासाहेबांचे सामाजिक विचार आणि वर्तमान काळ' या विषयावर मा.आमदार पृथ्वीराज साठे,सुरेश मिसाळ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.यात अनेक विचारवंतांनी बाबासाहेबांच्या समतावादी विचारांवर प्रकाश टाकला.मा.फुलेगर झोपडपट्टी च्या वतीने पाणी पाऊच, खिचडी अन्नदान वाटप करण्यात आले. तसेच जयंती समिती अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी साहेबराव लोंढे, राजू बलाडे, कैलास वाघमारे, रोहित ढवारे , आदित्य गायकवाड , प्रविण जोगदंड, निलेश जोगदंड, रोहित वाघमारे, रूपेश वाघमारे, निखिल जोगदंड , गोविंद शिंदे ,आमर जोगदंड, प्रदिप थोरात,रवि मस्के,सुरज पोटभरे, बबन वावळकर, धनराज जोगदंड, महेंद्र मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले होते.यावेळी मोठ्या संख्येने नागरिक,महिला आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी डॉ.आंबेडकरांच्या 'शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा' या त्रिसुत्रीचा अंगीकार करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पञकार मारुती जोगदंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन साहेबराव लोंढे यांनी केले.यावेळी नागरिक,महिला आणि तरुण कार्यकर्ते उपस्थित होते.
- विशेष अधिवेशन घेऊन नारिशक्ती वंदन या अभियाना अंतर्गत घटना दुरुस्ती करणार असल्यामुळे देशाचे पंत प्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार -भारतीय जनता पार्टी प्रदेश उप अध्यक्षा अर्चना पाटील चाकूरकर1
- नारी शक्ती बिल होणार पारित, महाराष्ट्र उपाध्यक्षा डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांची पत्रकार परिषदेत माहिती1
- लातूर शहरात भीमजयंतीचा जल्लोष; मिरवणूक मार्गावर स्वागतासाठी भीम आर्मीच्या स्टेजवर मिरवणूक व मिरवणूक अध्यक्षाचे सन्मान चिन्ह देऊन केले स्वागत. सुरू ॲप इन मराठी न्यूज. बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी (दि. १४) शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी संपूर्ण शहर निळ्या ध्वजांनी, शुभेच्छांच्या फलकांनी आणि आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. एका बाजूला आंबेडकर अनुयायांनी, भीम सैनिकांनी समतेचा संदेश देत लातूर शहरातून अनेक भागातून मिरवणुका काढण्यात आल्या या मिरवणुकांना शांततेचा संदेश देत भीम आर्मीचे रणधीर सुरवसे यांनी मिरवणुकीतील अध्यक्षांना स्टेजवर बोलावून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष रणधीर सुरवसे यांनी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले शिका संघर्ष करा परंतु आपला समाज संघटित झाला नाही तो झाला पाहिजे, संघटन करा असे समाजाला संदेश देत सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती भीम आर्मीने उत्साहात साजरी केली. याप्रसंगी भीम आर्मीचे सर्व पदाधिकारी व सदस्य भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- 🙏 मी तुम्हाला एका खास उपक्रमासाठी आमंत्रित करत आहे… 🌍 आज जगात ताण, भीती आणि अस्थिरता वाढत आहे… पण एक सुंदर सत्य आहे - 👉 समाजातील फक्त 1% लोक जर नियमित ध्यान करू लागले, तर त्यांचा शांत आणि सकारात्मक प्रभाव हळूहळू संपूर्ण समाजात पसरतो 💫 🧘♂️14 दिवसांची विनामूल्य मेडिटेशन सिरीज 🗓 20 एप्रिलपासून ⏰ Batch Timings: 👉 7:00 AM | 11:00 AM | 7:00 PM ✨ प्राणायाम • ध्यान • सकारात्मक ऊर्जा आताच विनामूल्य नोंदणी करा आणि त्या 1% चा भाग बनन्यासाठी व्हॉटसअप करा 9422366147 🌿 शांत मनातूनच शांत जग निर्माण होतं 🌍1
- Post by बाळकृष्ण प्रकाश कदम4
- Post by Ramesh Mulgir1
- परभणी, दि. 15 (प्रतिनिधी) : खरीप 2025 हंगामात झालेल्या अतिवृष्टी, सततचा पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, अपेक्षित पिकविमा मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांना तातडीने विमा भरपाई देऊन न्याय द्यावा, अशी मागणी राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.निवेदनानुसार, जिल्ह्यात सुमारे 2 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाचा विमा काढण्यात आला होता. तरीही नुकसानीच्या तुलनेत केवळ सहा तालुक्यांसाठी सुमारे 45 कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. परभणी, गंगाखेड व सोनपेठ तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, तर इतर तालुक्यांनाही अत्यल्प भरपाई मिळत असल्याचे सांगण्यात आले.पीक कापणी प्रयोगानुसार सरासरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट होत असून, सुमारे 60 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यानुसार विमा भरपाई मिळणे अपेक्षित असल्याचे नमूद करण्यात आले. उपग्रह छायाचित्रांवर आधारित निकष ‘ओला दुष्काळ’ परिस्थितीत लागू होत नसल्याचेही विटेकर यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील सुमारे 3.64 लाख शेतकऱ्यांनी विमा भरला असून, अपेक्षित रक्कम शेकडो कोटींमध्ये असताना केवळ 45 कोटी मंजूर झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासन व राज्य शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.1
- Post by Sanjhsuyog News Channel1