व्ही.जे.एन.टी. प्रमाणपत्राच्या अडचणींबाबत राजपूत समाजाने मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. जळगाव : व्ही.जे.एन.टी. (VJNT) प्रमाणपत्र काढताना राजपूत समाजातील नागरिकांना होत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील राजपूत समाज पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी समाजाच्या वतीने व्ही.जे.एन.टी. प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नाची दखल घेत लवकरच संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. या भेटीवेळी धरणगाव राजपूत समाजाचे अध्यक्ष श्री. जीवन आप्पा बयस, व्ही.जे.एन.टी. जिल्हाध्यक्ष श्री. रमेश बापू पाटील, राजू भाऊ पाटील (मन्यारखेडा), शिरीष आप्पा बयस, धिरेद्र पुरभे, अमोल पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
व्ही.जे.एन.टी. प्रमाणपत्राच्या अडचणींबाबत राजपूत समाजाने मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेतली. जळगाव : व्ही.जे.एन.टी. (VJNT) प्रमाणपत्र काढताना राजपूत समाजातील नागरिकांना होत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील राजपूत समाज पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी समाजाच्या वतीने व्ही.जे.एन.टी. प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रश्नाची दखल घेत लवकरच संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. या भेटीवेळी धरणगाव राजपूत समाजाचे अध्यक्ष श्री. जीवन आप्पा बयस, व्ही.जे.एन.टी. जिल्हाध्यक्ष श्री. रमेश बापू पाटील, राजू भाऊ पाटील (मन्यारखेडा), शिरीष आप्पा बयस, धिरेद्र पुरभे, अमोल पाटील तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.
- धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. इराण, इराक आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस पुरवठ्यावर होत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे कालपासून अनेक हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे बंद झाले आहे.1
- प्रतिनिधि.... दिलीप मोरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्याच्या सीमेवर आणि बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या गिरडा घाटात दि १० रोजी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा अपघात झाला. घाट उतरत असताना टिप्परचे अचानक ब्रेक निकामी झाले. परिस्थितीची गंभीरता लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत टिप्पर टेकडीकडे वळवून धडक दिली. त्यामुळे टिप्पर जागीच पलटी झाला. या अपघातात चालकाला किरकोळ दुखापत झाली असून तो सुदैवाने बचावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चालकाने वेळीच निर्णय घेतला नसता तर टिप्पर अंदाजे २०० ते २५० फूट खोल दरीत कोसळण्याची शक्यता होती. त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, या दहा टायरी टिप्परमध्ये साधारण पाच ते सहा ब्रास रेती असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर टिप्पर रस्त्यावर पलटी झाल्याने काही काळासाठी गिरडा घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. त्यामुळे वाहनधारकांना बराच वेळ अडचणीचा सामना करावा लागनार आहे गिरडा घाट हा अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परचा प्रमुख मार्ग बनल्याची चर्चा परिसरात आहे. अरुंद घाटमार्गावरून मोठ्या वेगाने धावणाऱ्या टिप्परमुळे परिसरातील दुचाकीस्वार आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.2
- गिरडा घाटात 10 टायर हायवा अपघातग्रस्त; नागरिकांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात बातमी : सोयगाव तालुक्यातील गिरडा घाट येथे 10 टायर हायवा वाहनाचा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातामुळे काही काळ घाटातील वाहतूक थांबवण्यात आली होती. मात्र सध्या घाटातील रस्ता पुन्हा सुरू करण्यात आला असून वाहतूक सुरळीत सुरू आहे. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.2
- सिल्लोड पंचायत समिती सभापती पदी भाजप च्या अनिता सुरेश बनकर तर उपसभापती भगवान आहेर यांची निवड... या निवडीने भाजपात आनंदाचे वातावरण.निवडी बद्दल भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला..1
- आज दिनांक 10 मार्च दुपारी चार वाजून 30 मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड पंचायत समिती येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेमध्ये सिल्लोड पंचायत समिती सभापती व उपसभापतींची निवड करण्यात आली यामध्ये अनिता सुरेश बनकर यांना बहुमत मिळाल्याने त्यांना पंचायत समिती सिल्लोड सभापती पद देण्यात आले तर उपसभापती भगवान आहे यांची निवड करण्यात आली सदरील काम निवडणूक अधिकारी निलेश अपार यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली1
- #marathi#newsjalna#1
- छत्रपती शिवाजी महाराज यांचे जेष्ठ चिरंजीव असलेल्या संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी आणि धर्मासाठी प्राणाची आहुती दिली. मुघल बादशहा औरंगजेब याने धर्मांतराचा दबाव टाकला, पण संभाजी महाराजांनी तो ठामपणे नाकारला आणि स्वाभिमानासाठी बलिदान दिले. म्हणूनच त्यांना “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज” म्हणून ओळखले जाते. या महान योद्ध्याला आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.1
- धुळे शहरातील देवपूर येथील अमरधाम स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरधाम परिसरातून राख चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली असून, राखेतून सोने मिळवण्यासाठी काही अज्ञात व्यक्तींनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.1