logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सडक अर्जुनी येथील शशीकरण मंदिराजवळील देवपायली परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहिल्याच पावसात या पुलाच्या अॅप्रोच भागात तडे गेले असून मुख्य रस्ता खचल्याचे आणि रिटेनिंग वॉल (आरीवाल) फुगल्याचे दिसून येत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही पहिल्याच पावसात या उड्डाणपुलाच्या अॅप्रोच भागातील सुमारे १०० मीटर रस्ता तुटला होता. या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना युवासेना गोंदियाचे माजी जिल्हाप्रमुख महेश डुंभरे यांनी अग्रवाल ग्लोबल कंपनीने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त करत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संबंधित कामाचे सीओडी (COD) तात्काळ थांबवून या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास शिवसेना युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजीत जिजकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणावर महामार्ग प्राधिकरणाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. दरम्यान, भविष्यातील कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलून पुलाची तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

12 hrs ago
user_Ashlesh Made
Ashlesh Made
साडक-अर्जुनी, गोंदिया, महाराष्ट्र•
12 hrs ago

मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सडक अर्जुनी येथील शशीकरण मंदिराजवळील देवपायली परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहिल्याच पावसात या पुलाच्या अॅप्रोच भागात तडे गेले असून मुख्य रस्ता खचल्याचे आणि रिटेनिंग वॉल (आरीवाल) फुगल्याचे दिसून येत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही पहिल्याच पावसात या उड्डाणपुलाच्या

d8592d25-c04b-4e96-a97c-47b3f3387a1e

अॅप्रोच भागातील सुमारे १०० मीटर रस्ता तुटला होता. या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना युवासेना गोंदियाचे माजी जिल्हाप्रमुख महेश डुंभरे यांनी अग्रवाल ग्लोबल कंपनीने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त करत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संबंधित कामाचे सीओडी (COD) तात्काळ थांबवून या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई

938c1d7e-18e1-42f4-90fb-a4e156082544

न झाल्यास शिवसेना युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजीत जिजकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणावर महामार्ग प्राधिकरणाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. दरम्यान, भविष्यातील कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलून पुलाची तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सडक अर्जुनी येथील शशीकरण मंदिराजवळील देवपायली परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहिल्याच पावसात या पुलाच्या अॅप्रोच भागात तडे गेले असून मुख्य रस्ता खचल्याचे आणि रिटेनिंग वॉल (आरीवाल) फुगल्याचे दिसून येत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही पहिल्याच पावसात या उड्डाणपुलाच्या अॅप्रोच भागातील सुमारे १०० मीटर रस्ता तुटला होता. या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना युवासेना गोंदियाचे माजी जिल्हाप्रमुख महेश डुंभरे यांनी अग्रवाल ग्लोबल कंपनीने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त करत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संबंधित कामाचे सीओडी (COD) तात्काळ थांबवून या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास शिवसेना युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. या संदर्भात NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजीत जिजकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणावर महामार्ग प्राधिकरणाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. दरम्यान, भविष्यातील कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलून पुलाची तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
    3
    मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सडक अर्जुनी येथील शशीकरण मंदिराजवळील देवपायली परिसरात उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पहिल्याच पावसात या पुलाच्या अॅप्रोच भागात तडे गेले असून मुख्य रस्ता खचल्याचे आणि रिटेनिंग वॉल (आरीवाल) फुगल्याचे दिसून येत आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षीही पहिल्याच पावसात या उड्डाणपुलाच्या अॅप्रोच भागातील सुमारे १०० मीटर रस्ता तुटला होता.

या प्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत शिवसेना युवासेना गोंदियाचे माजी जिल्हाप्रमुख महेश डुंभरे यांनी अग्रवाल ग्लोबल कंपनीने केलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप केला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संताप व्यक्त करत, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) संबंधित कामाचे सीओडी (COD) तात्काळ थांबवून या संपूर्ण कामाची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास शिवसेना युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

या संदर्भात NHAI चे प्रोजेक्ट डायरेक्टर अभिजीत जिजकार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे या प्रकरणावर महामार्ग प्राधिकरणाची अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. दरम्यान, भविष्यातील कोणतीही मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलून पुलाची तांत्रिक तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
    user_Ashlesh Made
    Ashlesh Made
    साडक-अर्जुनी, गोंदिया, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मानेगाव येथे अंडर ब्रिजचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या ब्रिजचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून आज तब्बल ५ ते ६ किलोमीटरपर्यंत प्रचंड ट्रॅफिक जाम झाली होती. ब्रिजच्या या अत्यंत खराब नियोजनाला कंटाळून अखेर गावातील लोकांनी एकत्र येत आंदोलन केले आणि वाहतूक पूर्णपणे बंद पाडली. या आंदोलनामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील वाहतूक अद्यापही पूर्ववत झालेली नाही.
    2
    भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील मानेगाव येथे अंडर ब्रिजचे बांधकाम सुरू आहे. मात्र, या ब्रिजचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून आज तब्बल ५ ते ६ किलोमीटरपर्यंत प्रचंड ट्रॅफिक जाम झाली होती. 

ब्रिजच्या या अत्यंत खराब नियोजनाला कंटाळून अखेर गावातील लोकांनी एकत्र येत आंदोलन केले आणि वाहतूक पूर्णपणे बंद पाडली. या आंदोलनामुळे आणि वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांसह स्थानिक नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. येथील वाहतूक अद्यापही पूर्ववत झालेली नाही.
    user_Satyajit Gajbhiye
    Satyajit Gajbhiye
    Toll road services साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे पडसाद आता विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील गोंदिया शहरात विविध शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक भव्य रॅली काढली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक हातात फलक व बॅनर घेऊन सहभागी झाले होते. ही रॅली आंबेडकर चौकात पोहोचताच तिचे रूपांतर आंदोलनात झाले, जिथे आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. तसेच सोनम वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने त्वरित आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे. गोंदियातील या आंदोलनाने हे स्पष्ट केले आहे की, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता विदर्भ भागातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. आता या मागण्यांवर केंद्र सरकार काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या आंदोलनाची माहिती जिल्हा प्रतिनिधी शुभम धुर्वे यांनी दिली आहे.
    1
    दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचे पडसाद आता विदर्भापर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रातील गोंदिया शहरात विविध शैक्षणिक, सामाजिक आणि विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक भव्य रॅली काढली. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक हातात फलक व बॅनर घेऊन सहभागी झाले होते. ही रॅली आंबेडकर चौकात पोहोचताच तिचे रूपांतर आंदोलनात झाले, जिथे आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या आंदोलनानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नावे एक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली आहे. तसेच सोनम वांगचुक यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर केंद्र सरकारने त्वरित आणि सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.

गोंदियातील या आंदोलनाने हे स्पष्ट केले आहे की, सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आता विदर्भ भागातूनही मोठा पाठिंबा मिळत आहे. आता या मागण्यांवर केंद्र सरकार काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या आंदोलनाची माहिती जिल्हा प्रतिनिधी शुभम धुर्वे यांनी दिली आहे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • गोंदिया जिल्ह्यातील एकोडी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांवरून स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नळ योजनेच्या नावाखाली येथील चांगले रस्ते तोडून ते अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासोबतच, गावातील गटारांची पातळी योग्य नसल्यामुळे पाण्याचा निचरा नीट होत नसल्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या विकासकामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असल्याचे सांगत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि गावात पुन्हा दर्जेदार कामे करून दिली जावीत, अशी आग्रही मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.
    1
    गोंदिया जिल्ह्यातील एकोडी ग्रामपंचायतीमध्ये सुरू असलेल्या विविध विकासकामांवरून स्थानिक ग्रामस्थांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. नळ योजनेच्या नावाखाली येथील चांगले रस्ते तोडून ते अर्धवट अवस्थेतच सोडून देण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यासोबतच, गावातील गटारांची पातळी योग्य नसल्यामुळे पाण्याचा निचरा नीट होत नसल्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

या विकासकामांमध्ये वापरल्या जाणाऱ्या बांधकाम साहित्याचा दर्जाही अत्यंत निकृष्ट असल्याचे सांगत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची तातडीने निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, दोषींवर कडक कारवाई व्हावी आणि गावात पुन्हा दर्जेदार कामे करून दिली जावीत, अशी आग्रही मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.
    user_Town news
    Town news
    Media company गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • भंडारा येथील नवीन टाकळी, भगतसिंग वॉर्डमधील शिवाजी पुतळ्याजवळ नालीचे काम अजूनही सुरू झालेले नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या असून त्याचे फोटोही पाठवण्यात आले आहेत, परंतु तरीही प्रशासनाकडून कोणतेही कार्य करण्यात आलेले नाही. सतत पाठपुरावा करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
    1
    भंडारा येथील नवीन टाकळी, भगतसिंग वॉर्डमधील शिवाजी पुतळ्याजवळ नालीचे काम अजूनही सुरू झालेले नाही. यासंदर्भात वारंवार तक्रारी करण्यात आल्या असून त्याचे फोटोही पाठवण्यात आले आहेत, परंतु तरीही प्रशासनाकडून कोणतेही कार्य करण्यात आलेले नाही. सतत पाठपुरावा करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
    user_दादाराम गभणे
    दादाराम गभणे
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • ओडिशातील पुरीच्या धर्तीवर नागपुरातील जुनी मंगळवारी येथील प्राचीन मंदिरापासून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची रथावरून शोभायात्रा काढण्यात येत आहे. आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते पूजा अर्चा करून या रथयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा जुनी मंगळवारी घास बाजार येथून निघून हरिहर मंदिराकडे जात आहे. या रथयात्रेत विविध आकर्षक झाक्या सहभागी झाल्या असून टाळ-मृदुंगाच्या गजरात भजने गात ही यात्रा पुढे जात आहे. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून 'जय जगन्नाथ'च्या जयघोषात मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
    1
    ओडिशातील पुरीच्या धर्तीवर नागपुरातील जुनी मंगळवारी येथील प्राचीन मंदिरापासून भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांची रथावरून शोभायात्रा काढण्यात येत आहे. आमदार प्रवीण दटके यांच्या हस्ते पूजा अर्चा करून या रथयात्रेचा प्रारंभ करण्यात आला. ही शोभायात्रा जुनी मंगळवारी घास बाजार येथून निघून हरिहर मंदिराकडे जात आहे.

या रथयात्रेत विविध आकर्षक झाक्या सहभागी झाल्या असून टाळ-मृदुंगाच्या गजरात भजने गात ही यात्रा पुढे जात आहे. संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून 'जय जगन्नाथ'च्या जयघोषात मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक या सोहळ्यात सहभागी झाले आहेत.
    user_Rokhthok media
    Rokhthok media
    Journalist Mauda, Nagpur•
    8 hrs ago
  • गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद हद्दीतील कोरेबार ते गणेशपूर दरम्यानच्या सिमेंट काँक्रीट रस्ता आणि नाली बांधकामाच्या गुणवत्तेवरून नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत. सालेकसा रोडवरील या रस्त्याच्या कामात तांत्रिक निकषांचे सर्रास उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार, या मार्गावर आवश्यक ठिकाणी पूल किंवा पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था न करताच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच मंजूर आराखड्यानुसार १८ एमएम गिट्टीचा वापर करणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात केवळ १४ एमएम गिट्टी वापरून कामात हातसफाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी व अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तिरथ येटरे, अभय ढेगे, नितेश दोनोंडे, बालू वंजारी, विनोद तावाडे, पिंकेश शेंडे, जगदीश चुटे, प्रशांत गायधने, धीरज ठाकरे, समीर पठाण आणि राजू लाडसे यांनी उच्चस्तरीय तांत्रिक समितीमार्फत या कामाची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामात तडजोड न करता दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून हे काम पुन्हा करून घेण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे, आमगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद कांबळे यांनी नागरिकांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी स्वतः संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असून तेथे १८ एमएम गिट्टीचाच वापर करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. हे काम तांत्रिक निकषांनुसारच योग्य पद्धतीने झाले असून करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रमोद कांबळे यांनी केले आहे.
    1
    गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगरपरिषद हद्दीतील कोरेबार ते गणेशपूर दरम्यानच्या सिमेंट काँक्रीट रस्ता आणि नाली बांधकामाच्या गुणवत्तेवरून नागरिक अत्यंत संतप्त झाले आहेत. सालेकसा रोडवरील या रस्त्याच्या कामात तांत्रिक निकषांचे सर्रास उल्लंघन करून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या संपूर्ण विकासकामांची स्वतंत्र तांत्रिक चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

नागरिकांच्या तक्रारीनुसार, या मार्गावर आवश्यक ठिकाणी पूल किंवा पाणी निचऱ्याची योग्य व्यवस्था न करताच रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच मंजूर आराखड्यानुसार १८ एमएम गिट्टीचा वापर करणे बंधनकारक असताना, प्रत्यक्षात केवळ १४ एमएम गिट्टी वापरून कामात हातसफाई करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी व अभियंत्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत तिरथ येटरे, अभय ढेगे, नितेश दोनोंडे, बालू वंजारी, विनोद तावाडे, पिंकेश शेंडे, जगदीश चुटे, प्रशांत गायधने, धीरज ठाकरे, समीर पठाण आणि राजू लाडसे यांनी उच्चस्तरीय तांत्रिक समितीमार्फत या कामाची सखोल तपासणी करण्याची मागणी केली आहे. सार्वजनिक निधीतून होणाऱ्या कामात तडजोड न करता दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून हे काम पुन्हा करून घेण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे.

दुसरीकडे, आमगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद कांबळे यांनी नागरिकांचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांनी स्वतः संबंधित कामाची प्रत्यक्ष पाहणी केली असून तेथे १८ एमएम गिट्टीचाच वापर करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. हे काम तांत्रिक निकषांनुसारच योग्य पद्धतीने झाले असून करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन मुख्याधिकारी प्रमोद कांबळे यांनी केले आहे.
    user_नरेश बोपचे
    नरेश बोपचे
    Journalist आमगाव, गोंदिया, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • गोंदियामध्ये विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तीव्र धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनादरम्यान NEET २०२६ परीक्षेतील कथित पेपर लीक आणि अनियमिततेचा तीव्र निषेध करत केंद्र सरकारविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. आंदोलनादरम्यान सांगण्यात आले की, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि परीक्षा प्रणालीत सुधारणा करणे या मागण्यांसाठी सोनम वांगचुक हे नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुमारे २० दिवस बेमुदत उपोषणावर बसले होते. आंदोलक विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळी 'चित्र श्रद्धांजली' कार्यक्रम आयोजित करून, परीक्षेचा ताण आणि कथित अनियमिततेमुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर प्रशासनामार्फत सरकारला निवेदन सादर करण्यापूर्वी एक प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून जोरदार विरोध दर्शवण्यात आला. जोपर्यंत परीक्षा प्रणाली पारदर्शक होत नाही, दोषींवर कडक कारवाई केली जात नाही आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लोकशाही मार्गाने चालणारा संघर्ष थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे.
    1
    गोंदियामध्ये विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तीव्र धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनादरम्यान NEET २०२६ परीक्षेतील कथित पेपर लीक आणि अनियमिततेचा तीव्र निषेध करत केंद्र सरकारविरुद्ध संताप व्यक्त करण्यात आला आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.

आंदोलनादरम्यान सांगण्यात आले की, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणणे, विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण करणे आणि परीक्षा प्रणालीत सुधारणा करणे या मागण्यांसाठी सोनम वांगचुक हे नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुमारे २० दिवस बेमुदत उपोषणावर बसले होते. आंदोलक विद्यार्थ्यांनी आंदोलनस्थळी 'चित्र श्रद्धांजली' कार्यक्रम आयोजित करून, परीक्षेचा ताण आणि कथित अनियमिततेमुळे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर प्रशासनामार्फत सरकारला निवेदन सादर करण्यापूर्वी एक प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून जोरदार विरोध दर्शवण्यात आला.

जोपर्यंत परीक्षा प्रणाली पारदर्शक होत नाही, दोषींवर कडक कारवाई केली जात नाही आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लोकशाही मार्गाने चालणारा संघर्ष थांबणार नाही, असा स्पष्ट इशारा आंदोलकांनी दिला आहे.
    user_Bhushan Raje.
    Bhushan Raje.
    Lawyer गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.