logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वासी येथे सानंद शिक्षण संस्था संचलित जे. डी. चौधरी ज्यू. सायन्स कॉलेज आणि ज्ञान ज्योती इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने "शिक्षणाची वारी पंढरीच्या दारी" या संकल्पनेवर आधारित वृक्षदिंडी अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आली. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण, साक्षरता, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेवराव चौधरी होते, तर सौ. दुर्गाताई वा. चौधरी, पोलीस पाटील सौ. शहनाज शेख, सरपंच प्रवीण पंचवटे, प्राचार्य प्रणाली चौधरी, मुख्याध्यापक प्रवीण भोयर आणि पर्यवेक्षक सौ. सारिका पर्बत यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिंडीदरम्यान "एक पेड मा के नाम" या संकल्पनेला उजाळा देत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणाचा संदेश देत, फलक, घोषणा आणि संवादाद्वारे मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या या वारीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःही वृक्षलागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल कीटे, नितीन डहाके, प्रणाली वरघणे, पूनम देवगडे, सौरभ वैरागडे, पूनम कोसुरकर, पूजा नगेले, रीना धोटे, सीमा बांबोडे, मयुरी धवणे, मीनल गुलघाने, प्रियंका निमजे, सुवर्णा सातपुते, मयुरी चचाने, रोशनी पाटोळे, योगिनी वैरागडे, प्रवीण साबळे, निखिल चौधरी, मंदा भोयर, कुणाल कावळे व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

18 hrs ago
user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
18 hrs ago

वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वासी येथे सानंद शिक्षण संस्था संचलित जे. डी. चौधरी ज्यू. सायन्स कॉलेज आणि ज्ञान ज्योती इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने "शिक्षणाची वारी पंढरीच्या दारी" या संकल्पनेवर आधारित वृक्षदिंडी अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आली. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण, साक्षरता, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेवराव चौधरी होते, तर सौ. दुर्गाताई वा. चौधरी, पोलीस पाटील सौ. शहनाज शेख, सरपंच प्रवीण पंचवटे, प्राचार्य प्रणाली चौधरी, मुख्याध्यापक प्रवीण भोयर आणि पर्यवेक्षक सौ. सारिका पर्बत यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिंडीदरम्यान "एक पेड मा के नाम" या संकल्पनेला उजाळा देत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणाचा संदेश देत, फलक, घोषणा आणि संवादाद्वारे मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या या वारीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःही वृक्षलागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल कीटे, नितीन डहाके, प्रणाली वरघणे, पूनम देवगडे, सौरभ वैरागडे, पूनम कोसुरकर, पूजा नगेले, रीना धोटे, सीमा बांबोडे, मयुरी धवणे, मीनल गुलघाने, प्रियंका निमजे, सुवर्णा सातपुते, मयुरी चचाने, रोशनी पाटोळे, योगिनी वैरागडे, प्रवीण साबळे, निखिल चौधरी, मंदा भोयर, कुणाल कावळे व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • दिल्लीतील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर वर्ध्याच्या हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विजय जल्लोष साजरा केला. सरकारचा निर्णय हा जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याचे सांगत युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, संघटित आणि शांततापूर्ण आंदोलनामुळे अखेर सरकारला युवकांच्या आवाजासमोर झुकावे लागले आणि आपला निर्णय बदलावा लागला. हा विजय लोकशाहीचा असून तो केवळ एका संघटनेचा नसून सर्वसामान्य जनता आणि युवकांच्या एकजुटीच्या संघर्षाचे फळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आनंदात युवकांनी एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी जनतेच्या समस्या आणि युवकांच्या हितासाठी भविष्यातही लोकशाही मार्गाने अशाच प्रकारे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पार पडलेल्या या विजय उत्सवाने शहरवासीयांचेही विशेष लक्ष वेधून घेतले.
    1
    दिल्लीतील आंदोलनाला यश मिळाल्यानंतर वर्ध्याच्या हिंगणघाट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रविवारी 'कॉकरोच जनता पार्टी'च्या बॅनरखाली युवकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत विजय जल्लोष साजरा केला. सरकारचा निर्णय हा जनतेच्या संघर्षाचा विजय असल्याचे सांगत युवकांनी जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, संघटित आणि शांततापूर्ण आंदोलनामुळे अखेर सरकारला युवकांच्या आवाजासमोर झुकावे लागले आणि आपला निर्णय बदलावा लागला. हा विजय लोकशाहीचा असून तो केवळ एका संघटनेचा नसून सर्वसामान्य जनता आणि युवकांच्या एकजुटीच्या संघर्षाचे फळ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या आनंदात युवकांनी एकमेकांना मिठाई भरवून अभिनंदन केले.

कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी जनतेच्या समस्या आणि युवकांच्या हितासाठी भविष्यातही लोकशाही मार्गाने अशाच प्रकारे आवाज उठवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पार पडलेल्या या विजय उत्सवाने शहरवासीयांचेही विशेष लक्ष वेधून घेतले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • आज आपल्या सेहताकडे लक्ष पुरवा. प्रत्येक आरोग्य समस्यांचा योग्य आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहे. हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृत आजार, आणि फुफ्फुसाचे आजार (अस्थमा आणि क्षयरोग) यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य सल्ला महत्त्वाचा आहे. मधुमेहाच्या उपचारात एक नवीन आणि सोपी पद्धत साप्ताहिक इंसुलिन आहे, ज्याचा उल्लेख डॉ. मेहेर अब्बास यांनी केला आहे. या प्रकारचा इंसुलिन प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. स्वास्थ्यविषयक कोणत्याही सल्ल्यासाठी किंवा नियुक्ती बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकात संपर्क साधा. #DrMeherAbbas #Diabetes #Insulin #Awiqliinsulininjection #Type1diabetes #Type2diabetes
    1
    आज आपल्या सेहताकडे लक्ष पुरवा. प्रत्येक आरोग्य समस्यांचा योग्य आणि सुरक्षित उपाय उपलब्ध आहे. हृदयरोग, मधुमेह, मूत्रपिंडाचे आजार, यकृत आजार, आणि फुफ्फुसाचे आजार (अस्थमा आणि क्षयरोग) यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य सल्ला महत्त्वाचा आहे.

मधुमेहाच्या उपचारात एक नवीन आणि सोपी पद्धत साप्ताहिक इंसुलिन आहे, ज्याचा उल्लेख डॉ. मेहेर अब्बास यांनी केला आहे. या प्रकारचा इंसुलिन प्रकार 1 आणि प्रकार 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.

स्वास्थ्यविषयक कोणत्याही सल्ल्यासाठी किंवा नियुक्ती बुक करण्यासाठी +91 9125734374 या क्रमांकात संपर्क साधा.

#DrMeherAbbas #Diabetes #Insulin #Awiqliinsulininjection #Type1diabetes #Type2diabetes
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    2 hrs ago
  • कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले. या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले. राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    1
    कळंब येथील रॉयल पॅलेस येथे २५ जुलै रोजी दुपारी एक वाजता 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान' पार पडले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते पार पडले.

या शिबिरामध्ये कळंब, बाभुळगाव, केळापूर व पांढरकवडा तालुक्यातील नागरिक, शेतकरी आणि लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात आला. यामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्र, स्वामित्व सनद, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे मंजुरी आदेश तसेच मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेसह विविध महसुली सेवांचा लाभ प्रदान करण्यात आला. त्यासोबतच लोकसेवा हक्क कायदा, जीवंत सातबारा मोहीम, अभिलेख दुरुस्ती, घरकुल योजना आणि राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना आदी विविध शासकीय योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले.

राळेगाव विधानसभा मतदारसंघातील २७ विभागांच्या सहभागातून आयोजित या अभियानाद्वारे ३,८१५ हून अधिक लाभार्थ्यांना ५,७०७ विविध योजनांचा लाभ देण्यात आला असून, नागरिकांनी शासनाच्या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार धीरज स्थूल, तहसीलदार अमित भोईटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    user_Amol sangani
    Amol sangani
    पत्रकार राळेगाव, यवतमाळ, महाराष्ट्र•
    15 hrs ago
  • पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा येथे आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात तब्बल ६,६०८ नागरिकांनी विविध आजारांची मोफत तपासणी करून घेतली. आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील हे पहिले शिबिर पार पडले असून, यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक राहिला. तपासणी करून घेतलेल्यांमध्ये ३,०८७ पुरुष आणि ३,५२१ महिलांचा समावेश आहे. या शिबिरात सर्वाधिक ४,१८६ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्याशिवाय ६३८ रुग्णांची हाडरोग, ५९६ रुग्णांची कान-नाक-घसा, ३५४ रुग्णांची दंत, ३२५ रुग्णांची त्वचारोग आणि १३२ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. ४,२२५ नागरिकांची औषधवैद्यक, १,०४७ जणांची असंसर्गजन्य आजार, ३०१ रुग्णांची HLH, १९७ रुग्णांची मानसोपचार, ३९४ रुग्णांची ईसीजी आणि ७ महिलांची स्तन कॅन्सर तपासणी झाली. या तपासणीदरम्यान ५८ रुग्णांमध्ये हृदयरोग, १०६ जणांमध्ये मधुमेह व रक्तदाब तर २२ संशयित कर्करोग रुग्ण आढळले. शिबिरात ३,८१७ रुग्णांना औषधांचे तर ३,२६१ नागरिकांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले. शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ३४५ नागरिकांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे ६६ रुग्णांचे आर्थिक मदतीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच १९९ अपंग बांधवांकडून आवश्यक साहित्यासाठी मोजमाप घेण्यात आले. या पहिल्याच शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागरिकांना पुढील तीन शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील महाआरोग्य शिबिरे ८ व ९ ऑगस्ट रोजी तळेगाव (शामजीपंत), १० व ११ ऑगस्ट रोजी हिंगणघाट आणि १३ व १४ ऑगस्ट रोजी देवळी येथे आयोजित केली जाणार आहेत.
    1
    पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या संकल्पनेतून वर्धा येथे आयोजित तीन दिवसीय महाआरोग्य शिबिरात तब्बल ६,६०८ नागरिकांनी विविध आजारांची मोफत तपासणी करून घेतली. आरोग्य अमृत महोत्सवांतर्गत जिल्ह्यातील हे पहिले शिबिर पार पडले असून, यामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक राहिला. तपासणी करून घेतलेल्यांमध्ये ३,०८७ पुरुष आणि ३,५२१ महिलांचा समावेश आहे.

या शिबिरात सर्वाधिक ४,१८६ नागरिकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला. त्याशिवाय ६३८ रुग्णांची हाडरोग, ५९६ रुग्णांची कान-नाक-घसा, ३५४ रुग्णांची दंत, ३२५ रुग्णांची त्वचारोग आणि १३२ महिलांची स्त्रीरोग तपासणी करण्यात आली. ४,२२५ नागरिकांची औषधवैद्यक, १,०४७ जणांची असंसर्गजन्य आजार, ३०१ रुग्णांची HLH, १९७ रुग्णांची मानसोपचार, ३९४ रुग्णांची ईसीजी आणि ७ महिलांची स्तन कॅन्सर तपासणी झाली. या तपासणीदरम्यान ५८ रुग्णांमध्ये हृदयरोग, १०६ जणांमध्ये मधुमेह व रक्तदाब तर २२ संशयित कर्करोग रुग्ण आढळले. शिबिरात ३,८१७ रुग्णांना औषधांचे तर ३,२६१ नागरिकांना चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

शिबिरामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत ३४५ नागरिकांचे आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यात आले, तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाद्वारे ६६ रुग्णांचे आर्थिक मदतीचे अर्ज भरून घेण्यात आले. तसेच १९९ अपंग बांधवांकडून आवश्यक साहित्यासाठी मोजमाप घेण्यात आले. या पहिल्याच शिबिराला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी नागरिकांना पुढील तीन शिबिरांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. पुढील महाआरोग्य शिबिरे ८ व ९ ऑगस्ट रोजी तळेगाव (शामजीपंत), १० व ११ ऑगस्ट रोजी हिंगणघाट आणि १३ व १४ ऑगस्ट रोजी देवळी येथे आयोजित केली जाणार आहेत.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी (गुपचूप) ग्रामपंचायतीमध्ये दलित निधीतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. कामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलक लावलेला नसून निधीचा तपशील, प्रशासकीय मंजुरी आणि कंत्राटदाराची माहिती लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते दिनेश कोडापे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी किशोर डाखोळे यांनी रविवार असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केले असावे असे सांगत, पाहणी करून आवश्यक माहिती फलक तातडीने लावण्याचे स्पष्ट केले. तर हिंगणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता, नियमभंग किंवा शासकीय निधीच्या वापरात त्रुटी आढळल्यास जबाबदार ग्रामविकास अधिकारी, कंत्राटदार व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
    1
    नागपूर जिल्ह्यातील हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सुकळी (गुपचूप) ग्रामपंचायतीमध्ये दलित निधीतून सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात गंभीर अनियमिततेचे आरोप समोर आले आहेत. कामाच्या ठिकाणी अनिवार्य असलेला माहिती फलक लावलेला नसून निधीचा तपशील, प्रशासकीय मंजुरी आणि कंत्राटदाराची माहिती लपविल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजप कार्यकर्ते दिनेश कोडापे यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून रस्ता अत्यंत निकृष्ट दर्जाचा होत असल्याचा आरोप केला आणि संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली.

या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी किशोर डाखोळे यांनी रविवार असल्यामुळे कंत्राटदाराने काम सुरू केले असावे असे सांगत, पाहणी करून आवश्यक माहिती फलक तातडीने लावण्याचे स्पष्ट केले. तर हिंगणा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप गोडशलवार यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आश्वासन दिले आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता, नियमभंग किंवा शासकीय निधीच्या वापरात त्रुटी आढळल्यास जबाबदार ग्रामविकास अधिकारी, कंत्राटदार व संबंधित व्यक्तींवर नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले. या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.
    1
    पवनी येथील बाम्हणी येथे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी बाम्हणी ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती आणि गावकऱ्यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात ग्रामस्थांनी एकत्र येत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष स्वागत केले.

या कार्यक्रमाला कोंढा केंद्राचे केंद्रप्रमुख मा. मानप्रकाशजी येळेकर हे पूर्णवेळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षकांचेही मनापासून अभिनंदन केले.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तांचा मोठा जनसागर उसळला आहे. या धार्मिक उत्सवातील मुख्य सोहळा ३० जुलै रोजी पार पडणार आहे.
    1
    विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नागपूर येथील धापेवाडा येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तांचा मोठा जनसागर उसळला आहे. या धार्मिक उत्सवातील मुख्य सोहळा ३० जुलै रोजी पार पडणार आहे.
    user_Pallavi Patil, निवासी संपादक
    Pallavi Patil, निवासी संपादक
    Lawyer नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वासी येथे सानंद शिक्षण संस्था संचलित जे. डी. चौधरी ज्यू. सायन्स कॉलेज आणि ज्ञान ज्योती इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने "शिक्षणाची वारी पंढरीच्या दारी" या संकल्पनेवर आधारित वृक्षदिंडी अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आली. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण, साक्षरता, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेवराव चौधरी होते, तर सौ. दुर्गाताई वा. चौधरी, पोलीस पाटील सौ. शहनाज शेख, सरपंच प्रवीण पंचवटे, प्राचार्य प्रणाली चौधरी, मुख्याध्यापक प्रवीण भोयर आणि पर्यवेक्षक सौ. सारिका पर्बत यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिंडीदरम्यान "एक पेड मा के नाम" या संकल्पनेला उजाळा देत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणाचा संदेश देत, फलक, घोषणा आणि संवादाद्वारे मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या या वारीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःही वृक्षलागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल कीटे, नितीन डहाके, प्रणाली वरघणे, पूनम देवगडे, सौरभ वैरागडे, पूनम कोसुरकर, पूजा नगेले, रीना धोटे, सीमा बांबोडे, मयुरी धवणे, मीनल गुलघाने, प्रियंका निमजे, सुवर्णा सातपुते, मयुरी चचाने, रोशनी पाटोळे, योगिनी वैरागडे, प्रवीण साबळे, निखिल चौधरी, मंदा भोयर, कुणाल कावळे व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
    1
    वर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वासी येथे सानंद शिक्षण संस्था संचलित जे. डी. चौधरी ज्यू. सायन्स कॉलेज आणि ज्ञान ज्योती इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने "शिक्षणाची वारी पंढरीच्या दारी" या संकल्पनेवर आधारित वृक्षदिंडी अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आली. या अनोख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी शिक्षण, साक्षरता, पर्यावरण संरक्षण आणि वृक्षसंवर्धनाबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. वासुदेवराव चौधरी होते, तर सौ. दुर्गाताई वा. चौधरी, पोलीस पाटील सौ. शहनाज शेख, सरपंच प्रवीण पंचवटे, प्राचार्य प्रणाली चौधरी, मुख्याध्यापक प्रवीण भोयर आणि पर्यवेक्षक सौ. सारिका पर्बत यांची प्रमुख उपस्थिती होती.

या दिंडीदरम्यान "एक पेड मा के नाम" या संकल्पनेला उजाळा देत प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला. तसेच महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुलींच्या शिक्षणाचा संदेश देत, फलक, घोषणा आणि संवादाद्वारे मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे आवाहन करण्यात आले. संपूर्ण गावातून काढण्यात आलेल्या या वारीला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वतःही वृक्षलागवड करण्याचा निर्धार व्यक्त केला.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी अतुल कीटे, नितीन डहाके, प्रणाली वरघणे, पूनम देवगडे, सौरभ वैरागडे, पूनम कोसुरकर, पूजा नगेले, रीना धोटे, सीमा बांबोडे, मयुरी धवणे, मीनल गुलघाने, प्रियंका निमजे, सुवर्णा सातपुते, मयुरी चचाने, रोशनी पाटोळे, योगिनी वैरागडे, प्रवीण साबळे, निखिल चौधरी, मंदा भोयर, कुणाल कावळे व सर्व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.