लोणार धोटे गावात सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचा विळखा; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी व कचऱ्यामुळे अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी साचले असून संपूर्ण गावाला चिखल आणि कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची योग्य स्वच्छता न झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असून, 'स्वच्छ भारत' मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने नालेसफाई व सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने पुढील दोन दिवसांत यावर ठोस उपाययोजना न केल्यास सुमठाणा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि विभागप्रमुख सचिन दडमल यांनी दिला असून याबाबत पंचायत समितीकडे आज तक्रारही नोंदवली आहे.
लोणार धोटे गावात सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचा विळखा; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी व कचऱ्यामुळे अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी साचले असून संपूर्ण गावाला चिखल आणि कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची योग्य स्वच्छता न झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असून, 'स्वच्छ भारत' मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने नालेसफाई व सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने पुढील दोन दिवसांत यावर ठोस उपाययोजना न केल्यास सुमठाणा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि विभागप्रमुख सचिन दडमल यांनी दिला असून याबाबत पंचायत समितीकडे आज तक्रारही नोंदवली आहे.
- लोणार धोटे गावात सांडपाण्यामुळे अस्वच्छतेचा विळखा; दोन दिवसांत समस्या न सुटल्यास युवासेनेचा आंदोलनाचा इशारा सुमठाणा गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या लोणार धोटे गावात सांडपाणी व कचऱ्यामुळे अंतर्गत व मुख्य रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त दूषित पाणी साचले असून संपूर्ण गावाला चिखल आणि कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पावसाळ्याच्या दिवसांत नाल्यांची योग्य स्वच्छता न झाल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत असून, 'स्वच्छ भारत' मोहिमेचा पुरता बोजवारा उडाला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तातडीने नालेसफाई व सांडपाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने पुढील दोन दिवसांत यावर ठोस उपाययोजना न केल्यास सुमठाणा ग्रामपंचायतीसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा युवासेना जिल्हाप्रमुख निखिल मांडवकर, उपतालुका प्रमुख रोशन नारे आणि विभागप्रमुख सचिन दडमल यांनी दिला असून याबाबत पंचायत समितीकडे आज तक्रारही नोंदवली आहे.1
- चंद्रपूर शहरात आंबेडकरी जनतेचा भव्य आक्रोश मोर्चा, दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन चंद्रपुरात आज दिक्षाभूमी मुक्ती आंदोलन अंतर्गत भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला, आयोजित मोर्च्यात आंबेडकरी जनतेतर्फे 9 मागण्या करण्यात आल्या असून त्यामध्ये प्रमुख मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी चंद्रपूर या संस्थेमध्ये एकाच परिवारातील तसेच नातेसंबंधातील रक्त नात्याचे सदस्य नसावे व त्यात जिल्ह्यातील सर्व बौद्ध बांधवांनी सर्वानुमते निवडलेले अथवा पाठविलेल्या समाजाच्या प्रतिनिधींचा समावेश असावा.1
- शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’ शाळेत पिण्याचे पाणीच नाही! विद्यार्थ्यांचे हाल; 15 दिवसांत पाणी न मिळाल्यास ‘भीक मांगो आंदोलन’1
- अबब!! निष्टी येथील शेतकऱ्याच्या शेतात आढळला अकरा फुट लांबीचा अजगर ११ फुट अजगर सर्पमित्रांनी शिताफीने पकडले भिवापूर (प्रतिनिधी ) निष्टी ता. पवनी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात ११ फुट अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. याबाबत शेतकऱ्याने सर्पमित्रांला बोलविले. यावेळी सर्पमित्र दुर्गेश बडघरे यांच्या टिमने अतिशय काळजीपुर्वक ११ फुट अजगर यास पकडले आणि वनविभाच्या सुचनेनुसार पुल्लरच्या जंगलात सोडण्यात आले. भिवापूर पासून १० किमी अंतरावर असलेला निष्टी ता. पवनी येथील शेतकरी भगवान चट्टे यांच्या शेतात काल सकाळी ९ वाजता भव्य मोठा अजगर आढळून आला. त्यामुळे शेतकरी चांगलाच भयभीत झाला. त्याने भिवापूर येथील सर्पमित्रांना पाचरण केले. ११ फुट अजगर सर्पमित्र दुर्गेश बडघरे , जाकीर सय्यद, कृणाल रोहनकर, प्रदीप मडावी यांनी मोठया शिताफीने पकडून त्यास उमरेड कऱ्हाडला अभयारण्य कार्यालयात याबाबतची नोंद केली. या अजगराचे वजन २१ किलो होते. त्याचे वय ५ ते ७ वर्षे इतके सांगण्यात आले. हा बिनविषारी होता अशी माहिती आहे. हा भव्य अजगर पुल्लरच्या जंगलात वनविभाग माध्यमातून अधिवासात सोडण्यात आले.1
- ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews ================================================================================ 🚨 PTN न्यूज | विशेष धडक बातमी | महाघोटाळा उघडकीस! 🚨 ================================================================================ 💥 कुही नगरपंचायतीचा काळा कारनामा चव्हाट्यावर! 💥 कागदावर शौचालय... प्रत्यक्षात गुरांच्या शेणाचा गोठा! ================================================================================ 🔴 नगराध्यक्षांच्याच वॉर्ड क्रमांक १३ मध्ये जनतेच्या पैशांवर उघड दरोडा! 🔴 बांधकामाचे बिल हडप; शौचालयात दारे, वीज, पाणी गायब! 🔴 दलित वस्ती सुधार योजनेचा लाखो रुपयांचा निधी थेट फाईलीतच फस्त! 🔴 रोजच्या साफसफाईचा पैसा स्वच्छता निरीक्षक अन् अधिकाऱ्यांच्या खिशात? ================================================================================ ⚡ नागरिकांचा प्रशासनाला थेट इशारा ⚡ "दोषी कंत्राटदार आणि लाचखोर अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अन्यथा कुही नगरपंचायत कार्यालयाला कायमचे टाळे ठोकू!" ================================================================================ 📢 विशेष वृत्त: पी टी एन न्यूज करिता पत्रकार संजय अतकरी, कुही ================================================================================ #PTNNews1
- वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर मध्ये गोवंशतकरीचा पडदाफाश ठाणेदार संगीता हिलोंडे यांच्या धडक कारवाई ने तस्करांचे धाबे दणाणले *ब्रेकिंग न्यूज - वर्धा* *वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूरमध्ये गोवंश तस्करीचा पर्दाफाश; ठाणेदार संगीता हेलोंडे यांच्या धडक कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले* गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध जनावर वाहतुकीला आळा; पहाटेच्या सुमारास सापळा रचून वाहन जप्त वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर गाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या जनावरांच्या अवैध तस्करीला अखेर आळा बसला आहे. याबाबत बजरंग दलाच्यावतीने अनेकदा तक्रारी केल्या होत्या तसेच वृत्तपत्रांमध्ये देखील या बाबत बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. या गंभीर बाबीची दखल घेत अखेर आज पहाटे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मध्यरात्रीला 2 वाजेच्या सुमारास अल्लीपूर मार्गावरून जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती ठाणेदार संगीता हेलोंडे यांना मिळाली होती. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ आपली टीम तयार केली आणि अल्लीपूर जवळ सोनेगाव स्टेश सापळा रचला. बुलेरो मालवाहतूक गाडी MH 30 आरडी 63 व पाहणी करण्याकरता एक कार MH 5925 अंधाराचा फायदा घेत येणाऱ्या संशयित वाहनाला पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्या वाहनाला चारही बाजूंनी घेरून पकडण्यात यश आले. माल वाहतूक बुलेरो गाडीमध्ये एकूण नऊ जनावरे कत्तलीसाठी नेत होते त्या जनावरांमध्ये दोन गाय कालवड गोरे तीन कालवड चार एकूण नऊ जनावर वाहनात निर्दयतेने कोंबून जनावरे वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ वाहन जप्त करून त्यातील जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत दोन्ही गाडीमध्ये असलेले एकूण चार आरोपी फरार आल्याची प्राथमिक माहिती आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे पोलीस उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संगीत हेलोंडे पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक वर्षात तांदूळकर जमादार अजय रिठे पोलीस शिपाई अजय वानखेडे पंकज कापसे पोलीस शिपाई दिनेश खराबे यांनी केली आहे . जप्त केलेले वाहन पोलीस स्टेशनला लावले आहे व नऊ जनावरे वर्धा येथील करुणा आश्रम मध्ये सोडण्यात आली आहे या धडक कारवाईमुळे अल्लीपूर परिसरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून गावकऱ्यांनी ठाणेदार संगीता हेलोंडे व त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे गेल्या अनेक दिवसांपासून अल्लीपूर परिसरातून अवैध जनावर वाहतूक होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. आज पहाटे आम्ही केलेल्या कारवाईत वाहन पकडले असून पुढील तपास सुरू आहे. अशा अवैध धंद्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असे ठाणेदार संगीता हेलोंडे यांनी यावेळी सांगितले. सदर कारवाई या प्रकरणी संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास पोलीस करीत आहेत.1
- विषय: नवनिर्मित जिल्हा रुग्णालय, नागपूर मधील विद्यमान १०० खाटांची ९०० पर्यंत वाढ करणे बाबत.1