कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळाला सन्मान,शेख नसीर यांची सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती... ----- पाटोदा (प्रतिनिधी) - पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी शेख नसीर बशीर यांची सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती झाली असून, त्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक विनोद घोळवे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड यांच्या हस्ते स्टार लावुन सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल पाटोदा तालुक्यासह बीड शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सन-२००० मध्ये पोलीस दलात निवड झाल्यानंतर शेख नसीर यांनी विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांनी ठाणे शहर येथे ०२ वर्षे, केज येथे ०२ वर्षे, शिरूर कासार येथे ०२ वर्षे, बॉम्ब शोधक पथकात तब्बल ०५ वर्षे, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) मध्ये ०६ वर्षे तसेच पेठ बीड येथे ०४ वर्षे सेवा देत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वीच ते आपल्या जन्मभूमी असलेल्या पाटोदा शहरात रुजू झाले असून, खाकी वर्दीतील सेवाभावी आणि जनसामान्यांशी आपुलकीने वागणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या अथक परिश्रम, प्रामाणिक सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेमुळे मिळालेली ही पदोन्नती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केली. या वेळी बोलताना शेख नसीर म्हणाले, “जन्मभूमीत मिळणारा सन्मान हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि नागरिकांच्या प्रेमामुळेच मला ही वाटचाल शक्य झाली.”
कर्तव्यनिष्ठ सेवेला मिळाला सन्मान,शेख नसीर यांची सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती... ----- पाटोदा (प्रतिनिधी) - पाटोदा पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी शेख नसीर बशीर यांची सहाय्यक फौजदारपदी पदोन्नती झाली असून, त्यांच्या खांद्यावर पोलीस निरीक्षक विनोद घोळवे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड यांच्या हस्ते स्टार लावुन सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल पाटोदा तालुक्यासह बीड शहरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सन-२००० मध्ये पोलीस दलात निवड झाल्यानंतर शेख नसीर यांनी विविध ठिकाणी उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांनी ठाणे शहर येथे ०२ वर्षे, केज येथे ०२ वर्षे, शिरूर कासार येथे ०२ वर्षे, बॉम्ब शोधक पथकात तब्बल ०५ वर्षे, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) मध्ये ०६ वर्षे तसेच पेठ बीड येथे ०४ वर्षे सेवा देत आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. काही दिवसांपूर्वीच ते आपल्या जन्मभूमी असलेल्या पाटोदा शहरात रुजू झाले असून, खाकी वर्दीतील सेवाभावी आणि जनसामान्यांशी आपुलकीने वागणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या अथक परिश्रम, प्रामाणिक सेवाभाव आणि कर्तव्यनिष्ठेमुळे मिळालेली ही पदोन्नती अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याची भावना नागरिकांनी सत्कार प्रसंगी व्यक्त केली. या वेळी बोलताना शेख नसीर म्हणाले, “जन्मभूमीत मिळणारा सन्मान हा आयुष्यातील सर्वात मोठा आनंद असतो. वरिष्ठ अधिकारी, सहकारी आणि नागरिकांच्या प्रेमामुळेच मला ही वाटचाल शक्य झाली.”
- न्यू मुंबई चायनीज बिडकीन बस स्टॅन्ड समोर आहे. मुंबई चायनीज दुसरी शाखा फारोळा. मुंबई चायनीज मालक इमरान शहा यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .1
- डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड डिझेलसाठी जीव धोक्यात; टँकर पलटल्यानंतर नागरिकांची कॅन-बाटल्या घेऊन एकच झुंबड बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात कल्याण ते विशाखापट्टणम महामार्गावरील तालखेड फाटा परिसरात डिझेल वाहतूक करणारा टँकर पलटल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र टँकरमधून डिझेल गळती सुरू होताच परिसरातील नागरिकांनी जीवाची पर्वा न करता डिझेल मिळवण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.1
- श्री जगदंबा देवी ट्रस्टची नवीन कार्यकारिणी सर्वधर्मसमभाव ठेवत लोकशाही मार्गाने व्हावी: रवींद्र दामोदरे.1
- कीर्तनकार आणि संतांविरोधातील आरोपांनंतर पंढरपूर, आळंदीसह अनेक ठिकाणी निषेध; जाहीर माफी व अटकेची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात कथित “प्रतिगामी विचारांची घुसखोरी” झाल्याचा आरोप करत काही कीर्तनकार आणि संत-महंतांची नावे सार्वजनिक केल्याने राज्यभर मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे वारकरी संप्रदाय, हिंदू संघटना आणि विविध राजकीय पक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळखीचा महत्त्वाचा भाग असून, लवांडे यांच्या विधानाने संत परंपरेचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे. पंढरपूर, आळंदी यांसह अनेक ठिकाणी निषेध आंदोलने करण्यात आली. आंदोलकांनी लवांडे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत तात्काळ अटकेची मागणी केली. दरम्यान, संबंधित संत आणि वारकरी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही विविध संघटनांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काही दिवसांत हा वाद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.1
- जालना जिल्ह्यातील मामादेवी मस्तागडावर जागेच्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तक्रारदाराची जागा इतरांना विकल्याच्या कारणावरून हा वाद पेटला होता. या प्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.1
- अहिल्यानगरमधील कर्जत-जामखेड भागातील बेनवडीचे भावी सरपंच परशुराम गदादे अठरा समाजांसाठी झटणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जात आहेत. त्यांचे कार्य समाजात सलोखा आणि एकोपा निर्माण करणारे आहे.1
- १२६२ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याच्या हातात कवडी नाही; उलट अडत्यालाच द्यावा लागला १ रुपया छत्रपती संभाजीनगर पैठण: लाखो रुपये खर्च करून, उसनेवारी आणि कर्ज काढून पिकवलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी पूर्णपणे हतबल झाला आहे. पैठण तालुक्यातील वरुडी गावातील कांदा उत्पादक शेतकरी प्रकाश गलधर यांनी तब्बल तीन महिने मेहनत घेऊन तयार केलेला १२६२ किलो कांदा बाजारात विक्रीसाठी नेला. मात्र बाजारात कांद्याला मिळालेल्या अत्यल्प दरामुळे हमाली, तोलाई आणि गोणी खर्च वजा जाता त्यांच्या हातात एकही रुपया उरला नाही. उलट अडत्याला १ रुपया द्यावा लागल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी सातबारावर कर्ज काढले, तर काहींनी उसनेवारी करून पैसे उभे केले होते. मात्र बाजारातील पडलेल्या दरामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सरकारी अधिकारी पंचनामे करून फोटो काढून गेले, पण प्रत्यक्ष मदत कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. कांद्याला हमीभाव द्यावा आणि शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.1
- बिडकीन बस स्टॅन्ड ता. पैठण.जि. औरंगाबाद एस टी महामंडळ पैठण बिडकीन एमआयडीसी बिडकीन बस स्टॅन्ड काम सहा महिन्यापासून बंद आहे. बिडकीन बस स्टँड काम बंद आहे. एसटी बाहेरून जाऊ लागले. बस स्टॅन्ड प्रवाशांना उन्हाळ्यामुळे लय हाल होत आहे. बस स्टॅन्ड मध्ये छत नाही.1