Shuru
Apke Nagar Ki App…
गंगापूर शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना; परिसरात खळबळ गंगापूर शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना; परिसरात खळबळ गंगापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गंगापूर शिवारात आज सकाळच्या सुमारास एक बिबट्या विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
RahimKhan Pathan
गंगापूर शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना; परिसरात खळबळ गंगापूर शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना; परिसरात खळबळ गंगापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गंगापूर शिवारात आज सकाळच्या सुमारास एक बिबट्या विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धुळे शहरात आंदोलन करण्यात आले. शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने हे आंदोलन छेडण्यात आले असून शासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.1
- खामगाव : आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सरकारी-निमसरकारी,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज, २१ एप्रिल २०२६ पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या आंदोलनामुळे खामगाव येथील उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालय आणि तहसील कार्यालयातील कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रशासकीय इमारत परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उपविभागीय महसूल व तहसील कार्यालयातील वर्ग ३ आणि ४ चे सुमारे ३० कर्मचाऱ्यांसह इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी प्रशासकीय इमारतीसमोर एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी केली. "आमच्या मागण्या मान्य करा", "शासनाचा निषेध असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कर्मचारी संपावर गेल्याने तहसील आणि एसडीओ कार्यालयात कामानिमित्त आलेल्या शेकडो नागरिकांना रिकाम्या हाती परतावे लागले. दाखले, शासकीय योजनांची कामे आणि इतर प्रशासकीय प्रक्रियांसाठी आलेल्या सामान्य जनतेचे यामुळे मोठे हाल होताना दिसत आहेत. यावेळी बोलताना तहसील कर्मचारी प्रवीण पवार यांनी सांगितले की, "गेल्या १५ महिन्यांत आम्ही ७ वेळा लक्षवेधी आंदोलने केली. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शासनाला चर्चेसाठी वेळ मिळाला नाही. विशेष म्हणजे, विधानसभेच्या पटलावर ज्या मागण्या मान्य झाल्या होत्या, त्याही अंमलात आणण्यास शासनाला विसर पडला आहे.मागण्यांचे घोंगडे भिजत ठेवल्याने आता बेमुदत संपाशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय उरलेला नाही." शासनाने कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याने कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा समन्वय समितीने घेतला आहे.1
- Post by Subhash Suryavanshi1
- अकोला बाळापूर ते अकोला राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या रिधोरा शेतशिवारात आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. येथील राजेश लोहिया यांच्या मालकीच्या गोडाऊनच्या परिसरात वाढलेल्या वाळलेल्या गवताने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या गोडाऊनमध्ये 'नाफेड'चा मोठा हरभरा साठा साठवणूक केलेला असल्याने प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. सध्या विदर्भात सूर्य कोपला असून तापमानाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. प्रचंड उष्णता आणि वाळलेले गवत यामुळे आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले होते. गोडाऊनमध्ये नाफेडचा लाखो रुपयांचा हरभरा साठा असल्याने ही आग गोडाऊनपर्यंत पोहोचली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आणि आग गोडाऊनच्या मुख्य भागापर्यंत पोहोचण्याआधीच विझवली. यामुळे गोडाऊनमधील हरभरा साठा पूर्णपणे सुरक्षित राहिला असून मोठा अनर्थ टळला आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि वाढते तापमान पाहता, गोडाऊन परिसरातील कचरा व गवत वेळीच साफ करण्याच्या सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालाचे नुकसान झाले नाही.1
- काश्मीरमध्ये भीषण अपघात; बस दरीत कोसळून १५ ठार, अनेक जखमी; बघा भयानक व्हिडिओ ! उधमपूर जिल्ह्यात सोमवारी (दि. २० एप्रिल २०२६) सकाळी प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत किमान १५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.1
- मालेगाव /अकोला इंदिरानगरमध्ये सांडपाण्याचा कहर; १५ दिवसांत तोडगा न निघाल्यास आमरण उपोषणाचा इशारा!1
- प्रवाशांना त्रास देणाऱ्या महिला कंडक्टरची चौकशी; बुलढाणा आगाराचा निर्णय1
- खामगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील एन.डी.ए. सरकारने महिलांना राजकारणात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी 'नारी शक्ती वंदन विधेयक' मांडले.मात्र, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरणाऱ्या या विधेयकास काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीने विरोध दर्शवल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या विरोधी मानसिकतेचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. भारतामध्ये महिलांना आदराचे आणि मानाचे स्थान दिले जाते. त्यांना निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे महत्त्वपूर्ण विधेयक आणले. या विधेयकामुळे महिलांना संसदेत आणि विधानसभांमध्ये आरक्षणाची दारे उघडणार आहेत. असे असतानाही, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी याला विरोध करून आपली महिलाविरोधी भूमिका स्पष्ट केली असल्याची टीका यावेळी करण्यात आली. सद्बुद्धी मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना निषेध व्यक्त करताना पदाधिकारी म्हणाले की,"महिलांचे सक्षमीकरण हे देशाला प्रगतीकडे नेणारे आहे. मात्र,राजकीय स्वार्थापोटी काँग्रेस आणि इंडिया यूआघाडीने या प्रक्रियेत अडथळा आणला आहे. त्यांची ही मानसिकता महिला शक्तीचा अपमान करणारी आहे. या नेत्यांना भविष्यात योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी ईश्वर देवो, अशी प्रार्थना आम्ही करतो, यावेळी काँग्रेस व मित्रपक्षांच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून जाहीर निषेध करण्यात आला.1
- पिंपळनेर शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न गंभीर बनला असून, बैलांच्या झुंजीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत राजधर गंभीर भोई हे गंभीर जखमी झाले आहेत.1