Shuru
Apke Nagar Ki App…
१ मे रोजी घुमणार झांज-ढोल ताशांचा कडकडाट; अभिनेत्री मानसी नाईक यांची खास उपस्थिती! १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या कडकडाटात भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांची लाभलेली खास उपस्थिती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि सांस्कृतिक उत्साहात हा सोहळा पार पडणार असून, प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरेल.
Sachin Dilip Wakhare
१ मे रोजी घुमणार झांज-ढोल ताशांचा कडकडाट; अभिनेत्री मानसी नाईक यांची खास उपस्थिती! १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या कडकडाटात भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांची लाभलेली खास उपस्थिती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि सांस्कृतिक उत्साहात हा सोहळा पार पडणार असून, प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरेल.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या कडकडाटात भव्य सोहळा रंगणार आहे. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांची लाभलेली खास उपस्थिती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि सांस्कृतिक उत्साहात हा सोहळा पार पडणार असून, प्रेक्षकांसाठी ही एक मोठी पर्वणी ठरेल.1
- Post by Anand Gangurde3
- नाशिकच्या इंदिरानगर परिसरात, फ्रेशअफ बेकरी समोर एक धक्कादायक प्रकार घडला आहे 😡 किरकोळ कारणावरून दोन नशेखोर युवकांनी एका सामान्य नागरिकाला बेदम मारहाण केली! 📍 ही घटना अशा ठिकाणी घडली जिथे नेहमी प्रचंड वर्दळ असते… तरीही त्या ठिकाणी कोणताही पोलीस बंदोबस्त नसल्यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ❗ 👉 नागरिकांची सुरक्षा नेमकी कोणाच्या भरोशावर? 👉 अशा घटना थांबवण्यासाठी प्रशासन जागं होणार का? 📢 आपलं मत नक्की कळवा आणि हा पोस्ट शेअर करा!1
- मनमाड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ असलेल्या महावितरणाच्या डीपीला अचानक आग लागल्याची घटना घडली. वाढत्या तापमानामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि महावितरणाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ कारवाई करत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग.... भाजप आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस चर्चेत ANC : भाजपचे विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचे व्हॉट्सअॅप स्टेटस सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. विधान परिषद उमेदवारांच्या नव्या यादीत त्यांचे नाव नसल्याने या स्टेटसकडे विशेष लक्ष वेधले जात आहे. भाजपाने काल विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली. मात्र, विद्यमान आमदार संजय केनेकर यांचे नाव या यादीत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यानंतर केनेकर यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर स्वतःचा फोटो ठेवत मराठी कवितेच्या ओळी शेअर केल्या आहेत. “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही… पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही… छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी… अडवू शकेल मला, अजून अशी भिंत नाही… माझी झोपडी जाळण्याचे, केलेत कैक कावे… जळेल झोपडी अशी, आग ती ज्वलंत नाही…” या ओळींतून केनेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, भाजपकडून त्यांना विधान परिषदेवर केवळ १३ महिन्यांची संधी मिळाली होती. बाईट : आमदार संजय केणेकर3
- सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.28. कृषी विभागाने प्रमाणित बियाणे व खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा तसेच खतांची कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. तसेच चढ्या दराने खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर आणि बोगस साहित्य विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी टास्क फोर्स तयार करावे, पात्र शेतकऱ्यांना निर्धारित वेळेत पीक कर्ज देवून शेतकऱ्यांची कोठेही अडवणूक - पिळवणूक होणार नाही याची गांभीर्याने दक्षता घ्या अशा स्पष्ट सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. येथील नगर परिषदेच्या सभागृहात आमदार अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पूर्व तालुकास्तरीय नियोजन व आढावा बैठक पार पडली. या बैठकीत उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना संबोधित करतांना आमदार अब्दुल सत्तार यांनी वरील निर्देश दिले. या बैठकीस नगराध्यक्ष अब्दुल समीर , उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, तहसीलदार अंकिता ताकभाते ,उपविभागीय कृषी अधिकारी सुभाष आघाव ,गटविकास अधिकारी रत्नाकर पगार ,न.प.चे मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, पोलीस निरीक्षक शेषराव उदार ,शिवसेना तालुकाप्रमुख केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे ,उपसभापती संदीप राऊत ,जि.प.सदस्य देविदास पालोदकर ,सय्यद नासिर हुसेन, राजू बाबा काळे, कृउबा समितीचे संचालक सतीश ताठे ,जयराम चिंचपुरे ,नानासाहेब रहाटे, भावराव पा. लोखंडे, पं.स.सदस्य शेख सलीम, समी चाउस, नॅशनल सहकारी सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र ( बापू ) पाटील, संचालक राजेंद्र ठोंबरे, शंकरराव खांडवे ,सयाजीराव वाघ, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, माजी सभापती रामदास पालोदकर, संजय डमाळे , दुर्गाबाई पवार, सुदर्शन अग्रवाल, मनोज झंवर, जलसंधारण अधिकारी राजधर दांडगे ,जि प सिंचन विभागाच्या उपविभागीय अभियंता रुचिका घोगरे, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अभय शेळके यांच्यासह न.प.तील शिवसेना गटनेता सुधाकर पाटील, नगरसेवक सिद्धेश्वर आहेर ,आसिफ बागवान , शेख इम्रान, अशोक बनसोड, सत्तार हुसेन, सिद्धेश्वर आहेर, डॉ. फेरोज खान, बबलू पठाण, शेख सलीम हुसेन आदिंसह शासनाच्या विविध विभागाचे विभागप्रमुख,कर्मचारी - शेतकरी उपस्थित होते. पुढे बोलतांना आमदार अब्दुल सत्तार यांनी खतांचा अवाजवी साठा व विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याचे निर्देश देत नॅनो युरियाच्या वापरावर भर देण्यासह शेतकऱ्यांमध्ये त्याबाबत जनजागृती करण्याचे सांगितले. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देत कमी खर्चिक शेती पद्धतींचा विस्तार करण्यावरही त्यांनी भर दिला. पीक कर्जाच्या बाबतीत बँकांनी शेतकऱ्यांची अडवणूक किंवा पिळवणूक करू नये, त्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले. अतिवृष्टी, दुष्काळ यांसारख्या आपत्कालीन परिस्थितीसाठी पर्यायी पिकांचा आराखडा तयार ठेवण्यास सांगितले. तसेच आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देण्यासाठी पथके सज्ज ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन सुरू ठेवावी, कृषी सहाय्यकांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात व शासनाच्या विविध योजनांची माहिती द्यावी, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या तक्रारींना प्राधान्याने व तात्काळ प्रतिसाद देण्यावर त्यांनी विशेष भर दिला. पिकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग सुनिश्चित करावा, असे निर्देश देण्यात आले. सर्व विभागांनी आपापला कृती आराखडा पुढील सात दिवसांत सादर करावा व ठराविक जबाबदाऱ्या निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे त्यांनी बजावले. “नियोजनातील कसूर शेतकऱ्यांचे संपूर्ण वर्ष वाया घालवू शकते. त्यामुळे सर्वांनी सूचनांचे गांभीर्याने पालन करून प्रभावी नियोजन करावे,” असे स्पष्ट मत आमदार सत्तार यांनी व्यक्त केले. याशिवाय “गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार” योजनेअंतर्गत कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पशुधन विकासासाठी सुयोग्य नियोजन करून शेतीपूरक व्यवसायांना प्राधान्य देण्यावर भर देण्यात आला. पोखरा टप्पा १ व २ अंतर्गत मंजूर गावांमध्ये योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचवण्याचे तसेच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेअंतर्गत शेत रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी दिले. ------------- “शेतकऱ्यांनी बी-बियाणे व खतांची खरेदी करताना नेहमीच अधिकृत व ओरिजिनल पावती घ्यावी, जेणेकरून फसवणुकीपासून संरक्षण मिळेल,” असे आवाहन आमदार अब्दुल सत्तार यांनी केले. बोगस बियाणे, चढ्या दराने विक्री आणि खतांच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनीही जागरूक राहणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ------------1
- इगतपुरी येथे भरदिवसा ४ लाख ५० हजार रुपयांची धक्कादायक हिसकावून लूट झाली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गर्दीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अज्ञात आरोपींनी क्षणार्धात रक्कम हिसकावून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.1