अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा विद्यालयात आषाढी एकादशीच्या औचित्याने अत्यंत दिमाखदार आणि भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा पार पडला. यंदाच्या दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात ‘वारकरी दिंडी’, ‘वृक्ष दिंडी’ आणि ‘ग्रंथ दिंडी’ अशा त्रिवेणी संगमाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी पालखी पूजन आणि श्री विठ्ठलाची भावपूर्ण आरती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. उढाणे साहेब, उपमुख्याध्यापक तथा समृद्ध कर्जतचे पत्रकार जावेद काझी, पर्यवेक्षक श्री. राक्षे साहेब, श्री. कर्पे सर आणि श्री. बाबर सर यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली. या दिंडी सोहळ्यात बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या मनमोहक वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकून घेतली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम" च्या जयघोषाने संपूर्ण राशीन नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. यासोबतच विद्यार्थ्यांनी पर्यावरण, स्वच्छता आणि वाचन संस्कृती जपण्याचा संदेश देणारे रंगीबेरंगी फलक तयार केले होते. "झाडे लावा, जीवन फुलवा", "वारीची शान, स्वच्छतेचा मान", "ग्रंथ आमचे खरे मित्र, ज्ञानाचा हा पवित्र मंत्र" आणि "विठ्ठल नामाचा गजर करू, स्वच्छतेचा संकल्प धरू" अशा घोषणांनी संपूर्ण गावचे लक्ष वेधून घेतले. गावातून मिरवणूक फिरताना विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्धता पाळली, तर ग्रामस्थ आणि पालक वर्गाने ठिकठिकाणी या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून विशेष परिश्रम घेतले. भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि ज्ञानोपासनेचा सुंदर संदेश देणारा हा दिंडी सोहळा संपूर्ण राशीन परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा विद्यालयात आषाढी एकादशीच्या औचित्याने अत्यंत दिमाखदार आणि भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा पार पडला. यंदाच्या दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात ‘वारकरी दिंडी’, ‘वृक्ष दिंडी’ आणि ‘ग्रंथ दिंडी’ अशा त्रिवेणी संगमाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी पालखी पूजन आणि श्री विठ्ठलाची भावपूर्ण आरती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. उढाणे साहेब, उपमुख्याध्यापक तथा समृद्ध कर्जतचे पत्रकार जावेद काझी, पर्यवेक्षक श्री. राक्षे साहेब, श्री. कर्पे सर आणि श्री. बाबर सर यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली. या दिंडी सोहळ्यात बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या मनमोहक वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकून घेतली. टाळ-मृदुंगाचा
गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम" च्या जयघोषाने संपूर्ण राशीन नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. यासोबतच विद्यार्थ्यांनी पर्यावरण, स्वच्छता आणि वाचन संस्कृती जपण्याचा संदेश देणारे रंगीबेरंगी फलक तयार केले होते. "झाडे लावा, जीवन फुलवा", "वारीची शान, स्वच्छतेचा मान", "ग्रंथ आमचे खरे मित्र, ज्ञानाचा हा पवित्र मंत्र" आणि "विठ्ठल नामाचा गजर करू, स्वच्छतेचा संकल्प धरू" अशा घोषणांनी संपूर्ण गावचे लक्ष वेधून घेतले. गावातून मिरवणूक फिरताना विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्धता पाळली, तर ग्रामस्थ आणि पालक वर्गाने ठिकठिकाणी या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून विशेष परिश्रम घेतले. भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि ज्ञानोपासनेचा सुंदर संदेश देणारा हा दिंडी सोहळा संपूर्ण राशीन परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा विद्यालयात आषाढी एकादशीच्या औचित्याने अत्यंत दिमाखदार आणि भक्तिमय वातावरणात दिंडी सोहळा पार पडला. यंदाच्या दिंडीचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या सोहळ्यात ‘वारकरी दिंडी’, ‘वृक्ष दिंडी’ आणि ‘ग्रंथ दिंडी’ अशा त्रिवेणी संगमाचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता. कार्यक्रमाप्रसंगी पालखी पूजन आणि श्री विठ्ठलाची भावपूर्ण आरती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. उढाणे साहेब, उपमुख्याध्यापक तथा समृद्ध कर्जतचे पत्रकार जावेद काझी, पर्यवेक्षक श्री. राक्षे साहेब, श्री. कर्पे सर आणि श्री. बाबर सर यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात पार पडली. या दिंडी सोहळ्यात बालचमूंचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि वारकरी संप्रदायातील विविध संतांच्या मनमोहक वेशभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकून घेतली. टाळ-मृदुंगाचा गजर आणि "ज्ञानबा-तुकाराम" च्या जयघोषाने संपूर्ण राशीन नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली होती. यासोबतच विद्यार्थ्यांनी पर्यावरण, स्वच्छता आणि वाचन संस्कृती जपण्याचा संदेश देणारे रंगीबेरंगी फलक तयार केले होते. "झाडे लावा, जीवन फुलवा", "वारीची शान, स्वच्छतेचा मान", "ग्रंथ आमचे खरे मित्र, ज्ञानाचा हा पवित्र मंत्र" आणि "विठ्ठल नामाचा गजर करू, स्वच्छतेचा संकल्प धरू" अशा घोषणांनी संपूर्ण गावचे लक्ष वेधून घेतले. गावातून मिरवणूक फिरताना विद्यार्थ्यांनी अत्यंत शिस्तबद्धता पाळली, तर ग्रामस्थ आणि पालक वर्गाने ठिकठिकाणी या दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून विशेष परिश्रम घेतले. भक्ती, पर्यावरण संवर्धन आणि ज्ञानोपासनेचा सुंदर संदेश देणारा हा दिंडी सोहळा संपूर्ण राशीन परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.2
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे पंढरीत पोहोचले असून, लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर पूर्णपणे तल्लीन झाले आहेत. हातात भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदवान घेऊन आलेले हे वारकरी भक्तीत रंगून पंढरपुरात दाखल झाले आहेत.1
- स्व. दादांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून 'अजितवृक्ष' असे नामकरण करण्यात आलेल्या त्यांच्या अतिप्रिय सोनचाफ्याच्या वृक्षाला विनम्र अभिवादन करण्यात आले आहे. दादांच्या अत्यंत आवडीच्या असलेल्या या सोनचाफ्याच्या झाडाला आदराने वंदन करण्यात आले.1
- केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बारामतीतील भिगवण चौकात विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेट वाटत अत्यंत अनोख्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला आणि मोठा जल्लोष केला.1
- सोलापूरच्या माढा तालुक्यातील बारलोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिंडी मोठ्या उत्साहाने संपन्न झाली आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेला हा बालदिंडी सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तीचा अथांग महासागर चंद्रभागेच्या वाळवंटात अवतरला आहे. 'माऊली-माऊली', 'विठ्ठल विठ्ठल' आणि 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजरात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन आणि टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. देवाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर अत्यंत भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. मुख्य मंदिरासमोरील श्री संत नामदेव पायरीचा परिसर फुलांच्या विलोभनीय सजावटीने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. जात-पात आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारी ही वारी परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची साक्ष देत आहे.1
- अहमदनगर जिल्ह्यातील कोरेगाव येथे मेंढपाळांवर जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे.1