logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गणेशोत्सवात जाधव संकुलातील नागरिकांच्या नशिबी गढूळ पाणी! “दोन दिवसांत प्रश्न सोडवा, अन्यथा अधिकाऱ्यांना हेच पाणी पाजन्याचा इशारा एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण सुरू असताना, प्रभाग क्रमांक १० मधील जाधव संकुलातील नागरिकांना मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. नळातून गढूळ तसेच उग्र वासाचे पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग सभापतींच्याच प्रभागात नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जाधव संकुल परिसरातील नळांना गढूळ आणि उग्र वासाचे पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवाच्या काळातच नागरिकांच्या घरात शुद्ध पाण्याऐवजी गढूळ पाणी पोहोचत असल्याने महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला. “दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर हेच गढूळ मिश्रित पाणी अधिकाऱ्यांना पाजू आणि याच पाण्याने त्यांना अंघोळ घालू,” असा संतप्त इशारा महिलांनी दिल्याने प्रशासनासमोर आता पाणीप्रश्न सोडविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, परिसरातील काही नागरिक तसेच चिमुकल्यांना उलटी-जुलाबाचा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मथुराई सोसायटीतील माधुरी जाधव (२६), रिद्धी कुश्वाह (५), स्वप्नील निकम (१५), साई गांगुर्डे (६), प्रतीक्षा पाटील (५) यांना उलटी-जुलाबाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच सविता आमजिरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, या आरोग्याच्या तक्रारींचे कारण दूषित पाणीच आहे, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाने पाण्याचे नमुने तातडीने तपासून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. सोसायटीतील ड्रेनेजचे चेंबर कोरडे असल्याचे दिसून येत असले तरी, ड्रेनेजचे दूषित पाणी पिण्याच्या जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन खोदून पाहणे पुरेसे नसून, परिसरातील ड्रेनेज चेंबर, जलवाहिनी आणि त्यांचे परस्पर कनेक्शन यांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. “गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नसणे ही मोठी शोकांतिका आहे,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी शोभा जाधव, मंगला चव्हाण, सुनीला कुश्वाह, योगिता निकम, उमरवती पंडित, उर्मिला सोळंकी, कल्याणी गांगुर्डे, सुवर्णा पगार, सुमन हांडे, पद्मावती आव्हाड, सुलोचना पोटे, सुनीता पाटील, योगिता गिरासे यांच्यासह महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या उत्सवात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासन न देता तातडीने जलवाहिनी व ड्रेनेजची तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

1 hr ago
user_Anil GUNJAL
Anil GUNJAL
नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
1 hr ago

गणेशोत्सवात जाधव संकुलातील नागरिकांच्या नशिबी गढूळ पाणी! “दोन दिवसांत प्रश्न सोडवा, अन्यथा अधिकाऱ्यांना हेच पाणी पाजन्याचा इशारा एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह आणि भक्तिमय वातावरण सुरू असताना, प्रभाग क्रमांक १० मधील जाधव संकुलातील नागरिकांना मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः संघर्ष करावा लागत आहे. नळातून गढूळ तसेच उग्र वासाचे पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, प्रभाग सभापतींच्याच प्रभागात नागरिकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून जाधव संकुल परिसरातील नळांना गढूळ आणि उग्र वासाचे पाणी येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या समस्येबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासनाकडे

वारंवार तक्रारी करूनही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गणेशोत्सवाच्या काळातच नागरिकांच्या घरात शुद्ध पाण्याऐवजी गढूळ पाणी पोहोचत असल्याने महिलांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवला नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा संतप्त महिलांनी दिला. “दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न सुटला नाही, तर हेच गढूळ मिश्रित पाणी अधिकाऱ्यांना पाजू आणि याच पाण्याने त्यांना अंघोळ घालू,” असा संतप्त इशारा महिलांनी दिल्याने प्रशासनासमोर आता पाणीप्रश्न सोडविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. दरम्यान, परिसरातील काही नागरिक तसेच चिमुकल्यांना उलटी-जुलाबाचा त्रास होत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मथुराई सोसायटीतील माधुरी जाधव (२६), रिद्धी कुश्वाह (५), स्वप्नील निकम (१५), साई गांगुर्डे (६),

प्रतीक्षा पाटील (५) यांना उलटी-जुलाबाचा त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. तसेच सविता आमजिरे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र, या आरोग्याच्या तक्रारींचे कारण दूषित पाणीच आहे, हे अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे प्रशासनाने पाण्याचे नमुने तातडीने तपासून त्याचा अहवाल जाहीर करावा, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे. सोसायटीतील ड्रेनेजचे चेंबर कोरडे असल्याचे दिसून येत असले तरी, ड्रेनेजचे दूषित पाणी पिण्याच्या जलवाहिनीमध्ये मिसळत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन खोदून पाहणे पुरेसे नसून, परिसरातील ड्रेनेज चेंबर, जलवाहिनी आणि त्यांचे परस्पर कनेक्शन यांची सखोल तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. “गेल्या पंधरा दिवसांपासून

पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना याचे सोयरसुतक नसणे ही मोठी शोकांतिका आहे,” असा संताप नागरिकांनी व्यक्त केला. यावेळी शोभा जाधव, मंगला चव्हाण, सुनीला कुश्वाह, योगिता निकम, उमरवती पंडित, उर्मिला सोळंकी, कल्याणी गांगुर्डे, सुवर्णा पगार, सुमन हांडे, पद्मावती आव्हाड, सुलोचना पोटे, सुनीता पाटील, योगिता गिरासे यांच्यासह महिला व पुरुष नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेशोत्सवाच्या उत्सवात नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये, यासाठी प्रशासनाने केवळ आश्वासन न देता तातडीने जलवाहिनी व ड्रेनेजची तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला. भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले. पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले. चौकट : आदेशांची वेळमर्यादा व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी
पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी
महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला.
भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला.
पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले.
पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले.
चौकट : आदेशांची वेळमर्यादा
व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन
'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित
बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण
सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक
पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर
महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    45 min ago
  • सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
    1
    सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
सोशल मीडिया के माध्यम से खबर उजागर करने का प्रयास किया जा रहा है ताकि लोगों की समस्या का निराकरण जल्दी से जल्द हो सके
    user_Raj Kumar
    Raj Kumar
    Photographer India•
    2 hrs ago
  • NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : ​नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. ​तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..​ NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : ​नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. ​तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..​
    1
    NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : 
​नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
​तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..​
NASHIK : नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार : 
​नाशिक शहरात ठेकेदारांच्या चुकीमुळे काही अपघात झाले आहेत. वारंवार सूचना देऊनही नियमबाह्य काम करणाऱ्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे.
​तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा विमा काढण्याचा विचार सुरू असल्याचे महापौर हिमगौरी आडके यांनी सांगितले. चुकीचे काम करणाऱ्या ठेकेदार व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला..​
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
    1
    निफाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन
नाशिक:निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून, अनेक लहान मुले व नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आरोप आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करूनही नगरपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम रंधवे व नगरसेविका रूपाली रंधवे यांनी केला. नागरिकांसह आंदोलन करत त्यांनी मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या दालनातील टेबलवर मोकाट कुत्रे आणून निषेध व्यक्त केला. मुख्याधिकारी निविदा प्रक्रियेत व्यस्त असल्याचा आरोप करत टेबलला नोटांचा हार घालून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. यावेळी रंधवे दाम्पत्याने प्रशासनाला जाब विचारत मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. गणेशोत्सव, नवरात्र व सणासुदीच्या काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्वरित उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली. या पथसंचलनावेळी अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले. दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    4
    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली.
या पथसंचलनावेळी  अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवारात पोलिसांचे पथसंचलन
कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त; घरकुलवासीयांची गर्दी
नाशिक : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चुंचाळे शिवार घरकुल योजना परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी पोलिसांकडून पथसंचलन करण्यात आले. गणेशोत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी परिसरात विशेष खबरदारी घेतली.
या पथसंचलनावेळी  अंबड डिव्हिजन एसिपी बारीसर, अंबड पीआय शिरसाट, सातपूर पीआय अहिरे, इंद्रा नगर पीआय करंडे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पोलिसांच्या उपस्थितीमुळे परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आल्याचे दिसून आले.
दरम्यान, मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी व कर्मचारी परिसरात दाखल झाल्याने घरकुलवासीयांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. प्रतिनिधी निलेश शेकोकार नाशिक
    user_NPS न्यूज निलेश  शेकोकार
    NPS न्यूज निलेश शेकोकार
    Advertising agency नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • Post by सोनू पटेल
    4
    Post by सोनू पटेल
    user_सोनू पटेल
    सोनू पटेल
    अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
    1
    पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान

अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न
पेठ जि.प. शाळा क्रमांक १ मध्ये तोडफोड; वायरिंगसह मुख्याध्यापक कार्यालयाचे नुकसान
अज्ञात व्यक्तींविरोधात पोलिसांकडे तक्रार; शाळेतील विद्यार्थी व साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न
पेठ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या आवारात अज्ञात व्यक्तींनी शाळेच्या वीज वायरिंगची तोडफोड करून नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच मुख्याध्यापक कार्यालयाच्या कुलूपाची व भिंतीचीही तोडफोड करण्यात आल्याने शाळेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी पेठ पोलिस ठाण्यात दि. १५ सप्टेंबर रोजी लेखी तक्रार दिली आहे. शाळेच्या मालमत्तेचे नुकसान करण्यासोबतच शासकीय दस्तऐवज व साहित्याच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अज्ञात व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच शालेय परिसरात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. शाळेच्या आवारात वारंवार अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनानेही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    28 min ago
  • पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश नाशिक | प्रतिनिधी शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला. भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला. पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले. पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले. चौकट : आदेशांची वेळमर्यादा व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    1
    पाणीप्रश्नावर महासभेत रणकंदन; धारणकरांवर कारवाईची मागणी
महापौरांचे पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश; स्काडा महिनाअखेर, बारा बंगला केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे आयुक्तांचे निर्देश
नाशिक | प्रतिनिधी
शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून महापालिकेच्या महासभेत बुधवारी (दि. १६) जोरदार वादंग झाला. सिडकोतील अनियमित पाणीपुरवठ्यावर नगरसेवकांनी मांडलेल्या लक्षवेधीवर चर्चा करताना नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. कृत्रिम पाणीटंचाईचा ठपका पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रवींद्र धारणकर यांच्यावर ठेवत त्यांच्या बदलीसह कारवाईची मागणी करण्यात आली. नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपलाही सभागृहात घरचा आहेर मिळाला.
भूषण राणे यांनी पवननगरचा पाणीपुरवठा कोणाच्या तरी दबावाखाली वळविला जात असल्याचा आरोप करत सुधाकर बडगुजर यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यावर बडगुजर यांनी पाणी वितरण व्यवस्था आणि पंपिंग यंत्रणेतील दोषांमुळेच पाणीप्रश्न निर्माण होत असल्याचा दावा केला. यावेळी मुकेश शहाणे आणि बडगुजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अमोल पाटील यांनी शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील क्लोरिन टँकला भगदाड पडल्याचा मुद्दा उपस्थित केला.
पाणीपुरवठा व्यवस्थेतील 'स्काडा' मीटर प्रणालीसह आनुषंगिक कामे स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू आहेत. त्यामुळे आयुक्त मनीषा खत्री यांनी स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांना महासभेत पाचारण केले. 'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित करण्याचे, तर बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. निर्धारित वेळेत काम पूर्ण न केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा शब्दांत आयुक्तांनी मोरे यांना सुनावले.
पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रुटी मान्य करत आयुक्तांनी व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन करण्याचे आदेश दिले. नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ अभियंत्यांची असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. येत्या सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान, चर्चेनंतर महापौरांनीही प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने सुरळीत करावी, तसेच व्हॉल्व्हमनच्या विभागनिहाय तातडीने बदल्या कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले. नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा मिळण्यासाठी ठोस नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असेही महापौरांनी प्रशासनाला बजावले.
चौकट : आदेशांची वेळमर्यादा
व्हॉल्व्हमनचे विभागनिहाय फेरनियोजन
'स्काडा' प्रणाली महिनाअखेरपर्यंत कार्यान्वित
बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्राचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण
सोमवारी पाणीप्रश्नावर सविस्तर बैठक
पाणीपुरवठा सुरळीत करण्याची जबाबदारी कार्यकारी व कनिष्ठ अभियंत्यांवर
महासभेत नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर आयुक्त आणि महापौरांनी अधिकाऱ्यांना वेळमर्यादा देत कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन नाशिककरांना नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    47 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.