Shuru
Apke Nagar Ki App…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ भारत नांदुरे यांच्या संकल्पनेतून फक्त 10 रुपये लोकसहभागातुन मोफत ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न
Sayad Jamil
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ भारत नांदुरे यांच्या संकल्पनेतून फक्त 10 रुपये लोकसहभागातुन मोफत ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न
More news from महाराष्ट्र and nearby areas
- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ भारत नांदुरे यांच्या संकल्पनेतून फक्त 10 रुपये लोकसहभागातुन मोफत ॲम्बुलन्स सेवेचा लोकार्पण सोहळा संपन्न1
- परभणी (प्रतिनिधी) :- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, अभिमान आणि प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून समाजाप्रती असलेली बांधिलकी अधोरेखित केली. त्यांच्या या प्रेरणादायी कृतीमुळे युवकांमध्ये विशेष उत्साह निर्माण झाला असून अनेकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेत सहभाग नोंदवला. “शिवरायांच्या जयंतीनिमित्त समाजोपयोगी कार्य करणे हीच खरी सेवा आहे,” असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त परभणी शहरात उत्साह, सामाजिक बांधिलकी आणि प्रेरणेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.1
- LIVE || पवित्र रमज़ान के मद्देनज़र तुरंत विभिन्न उपाययोजनाएँ करने का निर्देश. #ramadan #20261
- Post by Today One Live1
- मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयीन वेळेचे सरळ उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, याप्रकरणी संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) रोजी मंठा तालुका कृषी अधिकारी कार्यालय सायंकाळी ५:३० वाजताच बंद आढळून आले. कार्यालयास कुलूप लावलेले होते आणि कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हता. शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग व कृषी विभागाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांची वेळ सकाळी ९:४५ ते सायंकाळी ६:१५ अशी निश्चित असताना, वेळेपूर्वी कार्यालय बंद ठेवणे हा स्पष्ट नियमभंग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे दूरवरून आलेल्या शेतकरी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. वेळ, पैसा व श्रम खर्च करून कार्यालयात आलेल्या नागरिकांची प्रत्यक्ष फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी संभाजी ब्रिगेड, मंठा तालुकाध्यक्ष शिवश्री बाळासाहेब भगवान खवणे यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे सविस्तर निवेदन सादर केले असून, सदर प्रकार हा केवळ निष्काळजीपणा नसून कर्तव्यातील गंभीर कसूर (Dereliction of Duty) असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच हा प्रकार शासकीय कार्यालयीन वेळेचा जाणीवपूर्वक भंग शासकीय सेवकांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तन) नियम, १९७९ चा भंग महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत शिस्तभंगास पात्र असा असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तालुका कृषी अधिकारी हे कार्यालयाचे प्रमुख असल्याने कार्यालयीन वेळेचे पालन, कर्मचारी उपस्थिती व कामकाजाची जबाबदारी त्यांचीच असल्याचेही निवेदनात अधोरेखित करण्यात आले आहे. सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंग कारवाई, तसेच भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी लेखी आदेश काढण्याची मागणी करण्यात आली आहे. जर ७ दिवसांत ठोस कार्यवाही झाली नाही, तर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांनुसार अहिंसक मार्गाने आंदोलन करण्यात येईल, तसेच हे प्रकरण वरिष्ठ व सक्षम प्राधिकरणांकडे मांडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.1
- Post by Md, Saleemuddin1
- *नांदेडमध्ये शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; मध्यरात्री १२ वाजता भव्य आतिशबाजीने आसमंत उजळला* नांदेड जिल्ह्या प्रतिनिधी शिवकुमार काळे नांदेड: गेला आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (शिवजयंती) आज नांदेड शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. १९ फेब्रुवारीच्या मुहूर्तावर, मध्यरात्री ठीक १२:०० वाजता शहरातील मुख्य चौकातील शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर भव्य आतिशबाजी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवप्रेमींनी पुतळा परिसरात गर्दी केली होती. "जय भवानी, जय शिवाजी" च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या झगमगाटात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. ठळक वैशिष्ट्ये: भव्य आतिशबाजी रात्री १२ वाजता झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीने नांदेडचा आसमंत उजळून निघाला होता. शिवप्रेमींची उपस्थिती तरुणांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वांनी या सोहळ्याला हजेरी लावली. पुतळ्याची सजावट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते. आज दिवसभर शहरात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भव्य मिरवणुकाही निघणार आहेत. प्रशासनाकडूनही या निमित्ताने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे4
- सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती, वसमत रोड खानापूर फाटा येथील भव्य मिरवणुकीसाठी शिवप्रेमींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन1