Shuru
Apke Nagar Ki App…
आठवडी बाजारात घंटागाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय, नगरपालिका चा चुकीचा व्यवहार आहे
Zakir Khan Kadir Khan atar
आठवडी बाजारात घंटागाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय, नगरपालिका चा चुकीचा व्यवहार आहे
More news from महाराष्ट्र and nearby areas
- आठवडी बाजारात घंटागाडी येत नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास होतोय, नगरपालिका चा चुकीचा व्यवहार आहे2
- वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेता, महिला आणि मुलींनी स्वतःचे रक्षण स्वतः करण्यास सक्षम व्हावे, या उद्देशाने बुलढाणा शहरात 'मिशन परिवर्तन' अंतर्गत या प्रात्यक्षिक शिबिराची सुरुवात करण्यात आली आहेहे शिबिर बुलढाणा जिल्हा पोलीस दल, महिला व बालविकास विभाग, विश्व हिंदू बहुद्देशीय सामाजिक संस्था आणि स्वामीराज बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहेजिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवले जात आहे प्रशिक्षण आणि कालावधी: स्थळ: माडा कॉलनी परिसर, बुलढाणा कालावधी: १६ एप्रिल ते २६ एप्रिल (१० दिवस)प्रशिक्षण प्रकार: लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी आणि कराटे यांसारख्या मैदानी खेळांचे प्रशिक्षण दिले जात आहे या शिबिराचे उद्घाटन स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर यांच्या हस्ते करण्यात आलेसुनील अंबुलकर यांच्या हस्ते करण्यात आले [00:59]. या प्रशिक्षणात ६० पेक्षा अधिक महिला व मुलींनी सहभाग नोंदवला आहेहे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून, अधिकाधिक मुलींनी आणि महिलांनी याचा लाभ घेऊन स्वसंरक्षणाचे धडे गिरवावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे1
- खामगाव: तालुक्यातील बोरी अडगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘समाधान शिबिरा’चे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या शिबिराच्या माध्यमातून प्रशासन थेट जनतेच्या दारी पोहोचले असून विविध शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना देण्यात आला.यावेळी तहसीलदार सुनील पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत एग्रीस्टॅक, बळीराजा पानंद रस्ते योजना व इतर शेतकरीहिताच्या योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शेतरस्ते व सार्वजनिक कामांमध्ये अडथळे निर्माण करू नयेत आणि अतिक्रमण असल्यास ते स्वयंस्फूर्तीने दूर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच प्रशासक पूजाताई सदानंद वाघमारे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सुनील पाटील, भूमी अभिलेख अधीक्षक जे. एस. शिंदे, पुरवठा निरीक्षक रोशनी फुलझले, नायब तहसीलदार निखिल पाटील यांच्यासह मंडळ अधिकारी मनोहर भारसाकळे, कृषी मंडळ अधिकारी अनिल डाखोरे, मंडळ अधिकारी शिवाजी भरगडे, अशोक भिल, राजेश दीक्षित, महसूल अधिकारी अरुण देशमुख, संजय इंगळे, वैशाली घनोकार, सुरेश चराटे, सहाय्यक कृषी अधिकारी मिलिंद पाचपोर व ए. एन. देशमुख उपस्थित होते.या शिबिरात महसूल विभागाने सर्वाधिक २०७ प्रकरणे निकाली काढली. यामध्ये फेरफार, ७/१२ दुरुस्ती, डिजिटल सातबारा, ८-अ उतारे व विविध प्रमाणपत्रांचा समावेश होता. पुरवठा विभागाने १८ प्रकरणे हाताळली, तर संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत १४ लाभार्थ्यांना मदत देण्यात आली. कृषी, भूमी अभिलेख, आरोग्य तसेच महिला व बालकल्याण विभागांनीही आपापल्या योजनांद्वारे नागरिकांना सेवा पुरविल्या.शिबिरात शेकडो लाभार्थ्यांना उत्पन्न व जात प्रमाणपत्रे, ७/१२ उतारे तसेच नवीन रेशन कार्डचे वितरण करण्यात आले. याशिवाय श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनांच्या लाभार्थ्यांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली. पशुसंवर्धन विभागामार्फत काही लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.अडगाव व परिसरातील ग्रामस्थ, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून शासनाच्या सेवा थेट लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसून आले.1
- Post by Shaha News Marathi1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- गंगापूर शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना; परिसरात खळबळ गंगापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील गंगापूर शिवारात आज सकाळच्या सुमारास एक बिबट्या विहिरीत पडल्याची धक्कादायक घटना घडली. ही बाब स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात येताच परिसरात एकच खळबळ उडाली.1
- बरंजळा साबळे येथे आग लागून मकासह साहित्य जळून खाक ,शेतकऱ्याचे मोठे नुकसान1
- खामगाव/*नारी शक्ती वंदन विधेयक: खामगावात भाजपा महिला आघाडीचा भव्य जल्लोष.*1