महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, वाशिम जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम आणि SDRF नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सतर्क करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी मान्सून काळात अतिवृष्टी, पूरस्थिती, नद्या-नाल्यांना येणारे पाणी, वीज पडणे, झाडे कोसळणे यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत तात्काळ बचावकार्य कसे करावे, नागरिकांना सुरक्षित स्थळी कसे हलवावे, प्राथमिक उपचार कसे द्यावेत आणि आपत्तीच्या वेळी योग्य समन्वय साधून कार्यवाही कशी करावी, याबाबत या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. SDRF नागपूरच्या तज्ज्ञ पथकाने बचावकार्याची प्रात्यक्षिके दाखवली आणि उपस्थितांना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या साधनसामग्रीची माहिती दिली. पूरग्रस्त भागातील बचाव कार्य, दोरीच्या साहाय्याने बचाव, पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याच्या पद्धती तसेच लाईफ जॅकेट व बोटीचा वापर यावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगर परिषद कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथके, स्वयंसेवी संस्था आणि विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. आपत्ती काळात विविध विभागांमध्ये समन्वय राखून जलद प्रतिसाद देणे महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. मान्सूनपूर्व तयारीच्या या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, वाशिम जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम आणि SDRF नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सतर्क करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी मान्सून काळात अतिवृष्टी, पूरस्थिती, नद्या-नाल्यांना येणारे पाणी, वीज
पडणे, झाडे कोसळणे यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत तात्काळ बचावकार्य कसे करावे, नागरिकांना सुरक्षित स्थळी कसे हलवावे, प्राथमिक उपचार कसे द्यावेत आणि आपत्तीच्या वेळी योग्य समन्वय साधून कार्यवाही कशी करावी, याबाबत या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. SDRF नागपूरच्या तज्ज्ञ पथकाने बचावकार्याची प्रात्यक्षिके दाखवली आणि उपस्थितांना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या साधनसामग्रीची माहिती दिली. पूरग्रस्त
भागातील बचाव कार्य, दोरीच्या साहाय्याने बचाव, पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याच्या पद्धती तसेच लाईफ जॅकेट व बोटीचा वापर यावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगर परिषद कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथके, स्वयंसेवी संस्था आणि विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. आपत्ती काळात विविध विभागांमध्ये समन्वय राखून जलद
प्रतिसाद देणे महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. मान्सूनपूर्व तयारीच्या या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
- महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, वाशिम जिल्ह्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम आणि SDRF नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी एक दिवसीय विशेष प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम आणि सतर्क करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हा उपक्रम हाती घेतला आहे. दरवर्षी मान्सून काळात अतिवृष्टी, पूरस्थिती, नद्या-नाल्यांना येणारे पाणी, वीज पडणे, झाडे कोसळणे यांसारख्या विविध नैसर्गिक आपत्तींच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत तात्काळ बचावकार्य कसे करावे, नागरिकांना सुरक्षित स्थळी कसे हलवावे, प्राथमिक उपचार कसे द्यावेत आणि आपत्तीच्या वेळी योग्य समन्वय साधून कार्यवाही कशी करावी, याबाबत या प्रशिक्षणात मार्गदर्शन करण्यात आले. SDRF नागपूरच्या तज्ज्ञ पथकाने बचावकार्याची प्रात्यक्षिके दाखवली आणि उपस्थितांना आपत्कालीन परिस्थितीत वापरण्यात येणाऱ्या साधनसामग्रीची माहिती दिली. पूरग्रस्त भागातील बचाव कार्य, दोरीच्या साहाय्याने बचाव, पाण्यात अडकलेल्यांना बाहेर काढण्याच्या पद्धती तसेच लाईफ जॅकेट व बोटीचा वापर यावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग, नगर परिषद कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन पथके, स्वयंसेवी संस्था आणि विविध विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. आपत्ती काळात विविध विभागांमध्ये समन्वय राखून जलद प्रतिसाद देणे महत्त्वाचे असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पावसाळ्यात अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, नदी-नाले व धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. मान्सूनपूर्व तयारीच्या या प्रशिक्षणामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.4
- वाशीम येथील सावित्रीबाई फुले नर्सिंग विद्यालयातील मुलींनी उपोषण सुरू केले आहे. विद्यालयाच्या मुलींनी केलेल्या या उपोषणाने लक्ष वेधले आहे.1
- माहूर शहरातील कपिलेश्वर धर्मशाळेचे संचालक, 60 वर्षीय भारत बेहेरे यांचा 26 रोजी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी एका कारच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ते दररोज कपिलेश्वर धर्मशाळा ते न्यायालयापर्यंत मॉर्निंग वॉकला जात असत आणि आज सकाळी मॉर्निंग वॉकवरून परत येत असताना हॉटेल षडानन समोर त्यांना एका कारने मागून जोरदार धडक दिली. मनमिळावू स्वभावाचे असलेल्या भारत बेहेरे यांना धडक देणारा चालक धनाजी ज्ञानेश्वर देव (वय 30, रा. किशोर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) होता. तो आपली MH 09 CJ 7676 क्रमांकाची क्रिएटा कार घेऊन घरच्या मंडळींसह माहूर येथे दर्शनासाठी येत होता. सकाळची वेळ असल्याने चालकाला समोरून येणारे भारत बेहेरे दिसले नाहीत किंवा काही समजण्याआधीच त्यांच्या गाडीने बेहेरे यांना मागून जोराची धडक दिली. धडकेमुळे भारत बेहेरे रस्त्यावर पडून 30 ते 35 फूट फरफटत गेले, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला, तोंडाला आणि कमरेला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी भारत बेहेरे यांना त्याच कारमधून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कारचालक धनाजी देव यांना अटक करण्यात आली असून, माहूर पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी शरद घोडके, पो उप नी बाबू जाधव आणि पो का पवन राऊत हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. मनमिळावू स्वभावाच्या भारत बेहेरे यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.4
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- खामगाव शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्यांच्या संथ आणि नियोजनशून्य कामामुळे नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. या कामादरम्यान पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन वारंवार फुटत असल्याने शहरात लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. २५ मे रोजी सकाळी पुन्हा एकदा पाईपलाईन फुटल्याने जगदंबा चौक ते बरालिया ट्रेडर्स दरम्यानच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये प्रचंड पाणी साचले असून, या रस्त्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. सध्या शहरात कडक उन्हाळा असून पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, एकीकडे नगरपरिषद आणि स्थानिक प्रशासन नागरिकांना 'पाणी जपून वापरा' असे आवाहन करत असताना, दुसरीकडे रस्ता काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे रोज लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे आणि ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रस्त्याचे काम रेंगाळल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड धूळ उडत असून, यामुळे स्थानिक व्यावसायिक, पादचारी आणि वाहनचालकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. जगदंबा चौक ते बरालिया ट्रेडर्स या मुख्य मार्गावर सकाळपासूनच वाहतुकीचा मोठा अडथळा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, रस्ता काम करताना पाणीपुरवठा वाहिन्यांची योग्य काळजी का घेतली जात नाही, असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत. वारंवार पाईपलाईन फुटून होणारा पाण्याचा अपव्यय तात्काळ थांबवावा, फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरुस्त करावी आणि रस्ता कामाला गती देऊन नागरिकांची या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी परिसरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी केली आहे.1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील युवा उद्योजक सागर दत्तात्रय मारावार यांचे वयाच्या ५४ व्या वर्षी दुःखद निधन झाले आहे. सागर यांच्यावर दिल्ली येथील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सागर यांच्या निधनाची बातमी घाटंजीमध्ये येताच सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून, त्यांच्या मित्रपरिवारात शोककळा पसरली आहे.1
- आर्वी पोलिस स्टेशनने एक मोठी कारवाई केली आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1