नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या..! नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या! भोटे कोशी नदीच्या महापुराने नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांसह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आणि नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आणि तातडीचे आवाहन केले आहे. नेपाळमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कोणताही नागरिक, पर्यटक किंवा नातेवाईक अडकले असतील अथवा त्यांच्याशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अधिकृत संकेतस्थळावर माहिती नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, सध्याचे ठिकाण, हॉटेलचा तपशील, प्रवासाची माहिती आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूक नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन संपर्क : 📞 जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२६८३ 📞 पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२४०० 📞 टोल फ्री : १०७७ 📱 मोबाईल : ७०२०४३५९५४ जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधून अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदविण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे.
नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या..! नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या! भोटे कोशी नदीच्या महापुराने नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांसह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आणि नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आणि तातडीचे आवाहन केले आहे. नेपाळमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कोणताही नागरिक, पर्यटक किंवा नातेवाईक अडकले असतील अथवा त्यांच्याशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अधिकृत संकेतस्थळावर माहिती नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, सध्याचे ठिकाण, हॉटेलचा तपशील, प्रवासाची माहिती आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूक नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन संपर्क : 📞 जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२६८३ 📞 पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२४०० 📞 टोल फ्री : १०७७ 📱 मोबाईल : ७०२०४३५९५४ जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधून अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदविण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे.
- नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या..! नेपाळमध्ये पूर संकट; बुलढाण्यातील नागरिक अडकले असल्यास तात्काळ माहिती द्या! भोटे कोशी नदीच्या महापुराने नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून, विविध देशांसह महाराष्ट्रातील अनेक पर्यटक आणि नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे आणि तातडीचे आवाहन केले आहे. नेपाळमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील कोणताही नागरिक, पर्यटक किंवा नातेवाईक अडकले असतील अथवा त्यांच्याशी संपर्क होत नसेल, तर त्यांच्या कुटुंबीयांनी तात्काळ अधिकृत संकेतस्थळावर माहिती नोंदवावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. माहिती नोंदविताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाईल क्रमांक, सध्याचे ठिकाण, हॉटेलचा तपशील, प्रवासाची माहिती आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक अचूक नमूद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन संपर्क : 📞 जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२६८३ 📞 पोलीस नियंत्रण कक्ष : ०७२६२-२४२४०० 📞 टोल फ्री : १०७७ 📱 मोबाईल : ७०२०४३५९५४ जिल्हाधिकारी डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी नागरिकांना घाबरून न जाता प्रशासनाशी संपर्क साधून अधिकृत माध्यमांद्वारे माहिती नोंदविण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून मदतकार्य सुरू आहे.1
- *अकोट मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न* *हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघाला भव्य जुलूस; ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी दुमदुमले अकोट शहर* अहेमद शेख / अकोट अकोट पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) यांच्या जयंतीच्या पावन प्रसंगी अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस मोठ्या जोश, शिस्त आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला. प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघालेल्या या ऐतिहासिक जुलूसने शहरात धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला. जुलूस दरम्यान ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी संपूर्ण अकोट शहर ईमानी उत्साहाने भारावून गेले. या भव्य जुलूसमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जुलूसमध्ये तयार करण्यात आलेली मस्जिद-ए-नबवीच्या हिरव्या घुमटाची सुंदर झांकी भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. फुलांनी सजवलेल्या विशेष बग्गीमध्ये प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब विराजमान होते. संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अकोट शहरातील सर्व सुन्नी मशिदींचे इमाम, विविध मदरशांचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भाविक या मुबारक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी अकोट शहरातील सर्व नगरसेवक, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहायक सैय्यद अहमद यांच्यासह अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील शौकत अली चौकातून सुरू झालेला हा जुलूस आपल्या नियोजित मार्गावरून पूर्ण शिस्तबद्धपणे जात पुन्हा शौकत अली चौकात पोहोचून शांततेत आणि वेळेवर संपन्न झाला. *जुलूस कमिटीतर्फे पोलीस प्रशासनाचा सन्मान* जुलूस शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल जुलूस कमिटीच्या वतीने अकोट पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. निखिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक, अकोट शहर पोलीस स्टेशन, श्रीधर गुठ्ठे पोलीस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, विष्णू बोडखे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी हिम्मत दांडी बीट जमादार, या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांचाही सन्मान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यात जुलूस कमिटीची महत्त्वाची भूमिका राहिली. कमिटीचे अध्यक्ष तौहीद खान कादरी, उपाध्यक्ष फजल सिद्दीकी, गफूर शाह, मोहम्मद हुसेन , सैय्यद अशफाक अली, सैय्यद खालिद अली, अब्दुल वाहिद रिझवी, साई सिकंदर, वसीम शाह, शेख रझिक, अजहर खान यांच्यासह सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सैय्यद मजहर अली यांनी केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे ईद-ए-मिलादुन्नबीचा हा जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला. *अकोट मध्ये ईद-ए-मिलादुन्नबीचा जुलूस मोठ्या उत्साहात आणि शांततेत संपन्न* *हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघाला भव्य जुलूस; ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी दुमदुमले अकोट शहर* अहेमद शेख / अकोट अकोट पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मद मुस्तफा (स.अ.व.) यांच्या जयंतीच्या पावन प्रसंगी अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा भव्य जुलूस मोठ्या जोश, शिस्त आणि शांततेच्या वातावरणात संपन्न झाला. प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांच्या नेतृत्वात निघालेल्या या ऐतिहासिक जुलूसने शहरात धार्मिक श्रद्धा, बंधुभाव आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश दिला. जुलूस दरम्यान ‘लब्बैक या रसूल अल्लाह’ च्या घोषणांनी संपूर्ण अकोट शहर ईमानी उत्साहाने भारावून गेले. या भव्य जुलूसमध्ये लहान मुले, तरुण, वृद्ध आणि समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. जुलूसमध्ये तयार करण्यात आलेली मस्जिद-ए-नबवीच्या हिरव्या घुमटाची सुंदर झांकी भाविकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र ठरली. फुलांनी सजवलेल्या विशेष बग्गीमध्ये प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब विराजमान होते. संपूर्ण मार्गावर विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत केले. अकोट शहरातील सर्व सुन्नी मशिदींचे इमाम, विविध मदरशांचे विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो भाविक या मुबारक जुलूसमध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी अकोट शहरातील सर्व नगरसेवक, अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांचे स्वीय सहायक सैय्यद अहमद यांच्यासह अनेक सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावून ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या. शहरातील शौकत अली चौकातून सुरू झालेला हा जुलूस आपल्या नियोजित मार्गावरून पूर्ण शिस्तबद्धपणे जात पुन्हा शौकत अली चौकात पोहोचून शांततेत आणि वेळेवर संपन्न झाला. *जुलूस कमिटीतर्फे पोलीस प्रशासनाचा सन्मान* जुलूस शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य दिल्याबद्दल जुलूस कमिटीच्या वतीने अकोट पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. निखिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट, किशोर जुनघरे पोलीस निरीक्षक, अकोट शहर पोलीस स्टेशन, श्रीधर गुठ्ठे पोलीस निरीक्षक, अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन, विष्णू बोडखे प्रभारी, स्थानिक गुन्हे शाखा एलसीबी हिम्मत दांडी बीट जमादार, या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या हस्ते प्रमुख धर्मगुरू हजरत मौलाना आमिर रजा साहेब यांचाही सन्मान करण्यात आला. हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यात जुलूस कमिटीची महत्त्वाची भूमिका राहिली. कमिटीचे अध्यक्ष तौहीद खान कादरी, उपाध्यक्ष फजल सिद्दीकी, गफूर शाह, मोहम्मद हुसेन , सैय्यद अशफाक अली, सैय्यद खालिद अली, अब्दुल वाहिद रिझवी, साई सिकंदर, वसीम शाह, शेख रझिक, अजहर खान यांच्यासह सर्व सदस्य आणि स्वयंसेवकांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन पत्रकार सैय्यद मजहर अली यांनी केले. नागरिकांच्या उत्स्फूर्त सहकार्याने आणि प्रशासनाच्या उत्कृष्ट व्यवस्थेमुळे ईद-ए-मिलादुन्नबीचा हा जुलूस अत्यंत शांततेत, शिस्तीत आणि बंधुभावाच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडला.2
- *अकोट शहरात ईद-ए-मिलादचा जल्लोष शांततेत, एकुण 23 मंडळांचा सहभाग, पावसाचा जोर तरीही उत्साह कायम, पोलीसांचा चोख बंदोबस्त* अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट शहरात 26 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असून सकाळपासूनच अकोट ग्रामीण भागात व शहरात पाऊस सुरू असतानाही, मुस्लिम समाजाच्या बालकांपासून ते आबाळ वृद्धांपर्यंत सर्वांचाच उत्साह पाहण्यास मिळत होता.रिमझीम पावसात ही मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध व पध्दतीने पार पडली.दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या मिरवणुकीत शहरातील एकूण 23 मंडळांनी या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला. सदर मिरवणूकीत झाकी ,आकर्षक देखावे आणि धार्मिक घोषणांनी अकोट शहर दुमदुमून गेले होते. विशेष म्हणजे पाऊस सुरू असताना ही अकोट शहर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे आणि अकोट शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे या मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नसल्याने तसेच मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गांवरून जाऊन या मिरवणुकीची शांततेत सांगता करण्यात आली. उत्साहात व सलोख्याने पार पडलेल्या मिरवणुकीचे अकोट शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.सदर मिरवणुक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. **अकोट शहरात ईद-ए-मिलादचा जल्लोष शांततेत, एकुण 23 मंडळांचा सहभाग, पावसाचा जोर तरीही उत्साह कायम, पोलीसांचा चोख बंदोबस्त* अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट शहरात 26 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असून सकाळपासूनच अकोट ग्रामीण भागात व शहरात पाऊस सुरू असतानाही, मुस्लिम समाजाच्या बालकांपासून ते आबाळ वृद्धांपर्यंत सर्वांचाच उत्साह पाहण्यास मिळत होता.रिमझीम पावसात ही मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध व पध्दतीने पार पडली.दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या मिरवणुकीत शहरातील एकूण 23 मंडळांनी या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला. सदर मिरवणूकीत झाकी ,आकर्षक देखावे आणि धार्मिक घोषणांनी अकोट शहर दुमदुमून गेले होते. विशेष म्हणजे पाऊस सुरू असताना ही अकोट शहर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे आणि अकोट शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे या मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नसल्याने तसेच मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गांवरून जाऊन या मिरवणुकीची शांततेत सांगता करण्यात आली. उत्साहात व सलोख्याने पार पडलेल्या मिरवणुकीचे अकोट शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.सदर मिरवणुक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. अकोट तालुका प्रतिनिधी.. अकोट शहरात 26 ऑगस्ट रोजी मुस्लिम बांधवांच्या वतीने 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' निमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली असून सकाळपासूनच अकोट ग्रामीण भागात व शहरात पाऊस सुरू असतानाही, मुस्लिम समाजाच्या बालकांपासून ते आबाळ वृद्धांपर्यंत सर्वांचाच उत्साह पाहण्यास मिळत होता.रिमझीम पावसात ही मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध व पध्दतीने पार पडली.दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्या मिरवणुकीत शहरातील एकूण 23 मंडळांनी या मिरवणुकीत आपला सहभाग नोंदविला. सदर मिरवणूकीत झाकी ,आकर्षक देखावे आणि धार्मिक घोषणांनी अकोट शहर दुमदुमून गेले होते. विशेष म्हणजे पाऊस सुरू असताना ही अकोट शहर पोलिसांनी आपले कर्तव्य बजावले. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे आणि अकोट शहरातील नागरिकांच्या सहकार्यामुळे या मिरवणुकीला कुठेही गालबोट लागले नसल्याने तसेच मिरवणुक शहरातील प्रमुख मार्गांवरून जाऊन या मिरवणुकीची शांततेत सांगता करण्यात आली. उत्साहात व सलोख्याने पार पडलेल्या मिरवणुकीचे अकोट शहरासह तालुक्यात कौतुक होत आहे.सदर मिरवणुक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी निखिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.4
- बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... बुलढाण्यातील चिखलीमध्ये रेशन दुकानात लाभार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवला जातोय असा गंभीर आरोप करण्यात येतोय... याचाच निषेध म्हणून लाभार्थ्यांनी संपूर्ण रेशनचा तांदूळ तहसीलदारांच्या केबीनबाहेर फेकलाय... प्रतिनिधी गजानन राऊत असा तांदूळ जनावरंही खात नाहीत असा संतापही त्यांनी व्यक्त केलाय...बुलढाणा ब्रेकिंग या राशन च्या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांच्या बायका पोरांसोबत खावी.. मग, आम्ही सुद्धा खाऊ हे तांदूळ आमची कोंबडी पण खात नाही . संतप्त लाभार्थ्यानी चिखली तहसीलदारांच्या कॅबिनसमोर फेकला निकृष्ट दर्जाचा रेशनचा तांदूळ राशन चे दुकानातून मिळालेल्या या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी त्यांचा बायका पोरांसोबत खावी मग आम्ही सुद्धा खाऊ अशा शब्दात आपला संताप व्यक्त करत सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या ढिसाळ कारभाराविरोधात चिखलीत लाभार्थी नागरिकांनी थेट तहसीलदार यांच्या केबिन समोर पोहोचले.. रेशन दुकानातून वाटप करण्यात आलेले निकृष्ट दर्जाचे तांदूळ हातात घेऊन त्यांनी चक्क तहसीलदारांच्या कॅबीनसमोरच ते ओतून देत या तांदळाची खिचडी तहसीलदारांनी बायका पोरांसोबत खावी; मग आम्ही सुद्धा खाऊ आमच्या कोंबड्या सुद्धा हा तांदूळ खात नाही, असे म्हणत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवला.. या अनोख्या आंदोलनामुळे महसूल तसेच पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. शिवाय राशन दुकानातून मिळणारा तांदूळ किती निकृष्ट आहे , यावर ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .. बुलढाणा जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून शासनामार्फत वितरित होणारे धान्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारी यापूर्वी अनेक नागरिकांकडून सातत्याने होत आहेत. याच पार्श्वभूमीवर चिखली शहरातील काही लाभार्थ्यी कुटुंबाला वितरित करण्यात आलेले तांदूळ खराब, चुरियुक्त आणि खाण्यायोग्य नसल्याचा आरोप करण्यात आला आहे .. संतापलेल्या नागरिकाने हे धान्य थेट तहसील कार्यालयात आणले आणि तहसीलदारांच्या कॅबीनसमोर ओतून आपला रोष व्यक्त केला.. जे धान्य जनावरेही खाणार नाहीत, ते माणसांच्या ताटात देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळणार का असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला.. बाईट - लाभार्थी .. बाईट - प्रियंका सोनकुसळे , निरीक्षण अधिकारी ..4
- अकोल्यात ‘ऑपरेशन प्रहार’चा धडाका! हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर छापा; 4.98 लाखांचा मुद्देमाल जप्त अकोल्यात अवैध हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्रीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ‘ऑपरेशन प्रहार’अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नायगाव परिसरात छापा टाकला. या कारवाईत तब्बल 3,200 लिटर सडवा मोहामाल, 71 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि इतर साहित्य असा एकूण 4 लाख 98 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. अवैध दारूविरोधातील पोलिसांच्या या कारवाईची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. 📍 ठिकाण: नायगाव, अकोला 🚔 कारवाई: स्थानिक गुन्हे शाखा, अकोला 💰 जप्त मुद्देमाल: ₹4,98,600 👥 ताब्यात: 2 आरोपी India News R7 Marathi — अकोला आणि महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्यासोबत रहा. व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share ↗️ | Subscribe 🔔 करा.2
- अकोट शहर पोलिसांचा धडाका आठ चोरीच्या दुचाकींसह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त अकोला : अकोट शहर पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणाचा छडा लावत दोन आरोपींना ताब्यात घेत ८ चोरीच्या मोटारसायकली, दोन इंजिन, चेसीस व स्पेअर पार्ट असा तब्बल ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गजानन प्रभुदास रायबोले (२३) व अब्दुल जावेद अब्दुल जमील जमादार (३०), दोघेही रा. इंदिरानगर, येवदा, ता. दर्यापूर, जि. अमरावती, अशी आरोपींची नावे आहेत. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता अकोट शहर व परिसरातून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर जुनघरे व गुन्हे शोध पथकाने केली.1
- Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप Buldhana News : रस्त्यावरच महिलेची प्रसुती, ग्रामीण रुग्णालयातील स्टाफने मदतीस नकार दिल्याचा आरोप (गजानन राऊत बुलढाणा) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं होमटाऊन असलेल्या मेहकर मध्येच आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे उडवणारा धक्कादायक प्रकार काल घडला...! ग्रामीण रुग्णालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर त्या महिलेचा पती ऑटोरिक्षा आणण्याकरता गेला असता महिला घरात एकटीच होती. प्रसुती वेदना असह्य झाल्याने महिला घराच्या बाहेर रस्त्यावर आली व कुणाच्या मदततीची अपेक्षा करू लागली मात्र त्यातच अर्धवट प्रसुती झाली आणि विव्हळतच व तळमळत या महिलेच्या आवाजाने शेजारी योगेश सौभागे हे उठले. ते पत्नीसह या महिलेजवळ गेले असता महिलेची अर्धवट प्रस्तुती बघून ते हादरले ग्रामीण रुग्णालय पन्नास फुटावर असल्याने ते धावतच ग्रामीण रुग्णालयात गेले मात्र तेथील उपस्थित परिचारिकेने त्यांना त्या महिलेला रुग्णालयात घेऊन या असे फर्मावले... अशा परिस्थितीतही योगेश यांनी त्या परिचारिकेला विनंती केली . मात्र त्यांनी असमवेदनशीलता दाखवत मी येऊ शकत नाही असं फर्मावलं...4
- इन्स्टाग्रामच्या आक्षेपार्ह कमेंटने धार्मिक भावना दुखावल्याने तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रात्री गावाला छावणीचे स्वरूप... इन्स्टाग्रामच्या आक्षेपार्ह कमेंटने धार्मिक भावना दुखावल्याने तणाव; पोलिसांचा तगडा बंदोबस्त, रात्री गावाला छावणीचे स्वरूप... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : सोशल मीडियावरील आक्षेपार्ह कमेंटमुळे जामोद गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण जामोद गावाला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामोद येथील हरीष देविदास घाटोळे (वय २५) यांच्या फिर्यादीवरून कायमी अप क्र. 541/2026, कलम 299, 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादीच्या आरोपानुसार,‘ahsanshaikh8126’ व ‘mr_sameer_22’ या इन्स्टाग्राम आयडीवरून एका पोस्टवर धार्मिक भावना दुखावणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या. संबंधित मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने आपल्यासह सकल हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला.अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माछरे, जळगाव जामोद ठाणेदार सचिन बागुल, तामगाव ठाणेदार श्रीकांत निचळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, पीएसआय अमोल पंडित, पीएसआय नागेश खाडे, पीएसआय गणेश कायंदे यांच्यासह जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी तसेच आरसीपी पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून, संपूर्ण प्रकरण शांत करण्यात पोलिसांना यश आले.रात्री उशिरापर्यंत जामोद परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.दरम्यान, सोशल मीडियावर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असा मजकूर, पोस्ट अथवा कमेंट व्हायरल करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड करीत आहेत.1