Shuru
Apke Nagar Ki App…
मिरज येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा समितीने पुकारलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. महापालिकेने समितीच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, त्याबाबतचे मंजुरीचे पत्र साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भिमराव कृष्णा बेंगलोरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मिरज येथील ज्येष्ठ नेते भिमराव बेंगलोरे यांनी महापालिकेला अखेर गुडघ्यावर आणले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी समाज बांधव अत्यंत बहुसंख्येने उपस्थित होते.
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
मिरज येथील साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा समितीने पुकारलेले आंदोलन अखेर यशस्वी झाले आहे. महापालिकेने समितीच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून, त्याबाबतचे मंजुरीचे पत्र साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे पुतळा समितीचे अध्यक्ष भिमराव कृष्णा बेंगलोरे यांच्याकडे सुपूर्द केले आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून मिरज येथील ज्येष्ठ नेते भिमराव बेंगलोरे यांनी महापालिकेला अखेर गुडघ्यावर आणले आहे. या ऐतिहासिक प्रसंगी समाज बांधव अत्यंत बहुसंख्येने उपस्थित होते.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- शेवटी विज्ञानाने हार मानली असून देवाचे नामस्मरण केल्यानेच सर्व रोग बरे होतात. ईश्वराच्या नामाचा जप केल्याने आजार दूर होतात, असा ठाम दावा यात करण्यात आला आहे.1
- राज्याचे जलसंपदा मंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे शनिवार, दि. २५ जुलै रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्याची सुरुवात श्री क्षेत्र बिरोबा यांच्या पवित्र दर्शनाने होणार आहे. दर्शनानंतर टेंभू सिंचन योजनेअंतर्गत तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील सिंचनाशी संबंधित विविध प्रश्नांवर एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आढावा, प्रलंबित कामे, पाणी सोडण्यातील अडचणी, नवीन पाइपलाइनचे प्रस्ताव तसेच टेंभू योजनेशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा होणार आहे. लाभक्षेत्रातील सर्व गावांच्या समस्या मंत्रीमहोदयांसमोर मांडून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या जातील आणि त्यावर प्रभावी व तातडीने तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी, सिंचन व्यवस्थेच्या बळकटीसाठी आणि टेंभू योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.1
- ऑलंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या ७४ व्या पदक दिन समारंभाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले असून हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला आहे.1
- फलटण-सातारा मार्गावरील तडवळे फाटा ते वाठार निंबाळकर रस्त्याचे काम गेल्या तीन ते साडेतीन वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असल्याने अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम सुरू असतानाही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातच गेल्या १५ दिवसांपूर्वी कापशी आळजापूर येथील पुलाचे काम अर्धवट ठेवल्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला आहे. या ठिकाणी जुना पूल पूर्ण न काढताच त्याच्या दोन्ही बाजूंनी वाढ करण्यात आली आहे. तसेच पुलावर कामाचा राडारोडा तसाच राहिल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरील अर्धवट आणि धोकादायक कामे संबंधित ठेकेदाराने त्वरित पूर्ण करावीत, अशी जोरदार मागणी वाहनचालक व नागरिकांनी केली आहे.1
- पुण्याच्या बारामतीमध्ये लोकनेते अजितदादांच्या स्मृतीस्थळावर साधू बल्लाळ व अनिता गायकवाड यांनी पणती लावत श्रद्धांजली वाहिली आहे.1
- पुण्याच्या भोर शहरात आषाढ महिना सुरू झाल्यामुळे चिकन, मटण आणि माशांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. दुकानांमधील शिल्लक आणि विक्रीयोग्य नसलेले मांस उघड्यावर टाकले जात असल्याने सर्वत्र मोकाट कुत्र्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. या भटक्या कुत्र्यांनी शहरात उच्छाद मांडला असून नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच चौपाटी परिसरात शिरवळ येथे कामासाठी दुचाकीवरून निघालेल्या गोपीचंद संपत म्हस्के यांच्यावर कुत्र्यांच्या टोळीने अचानक हल्ला करून त्यांना जखमी केले. कामानिमित्त दुचाकीवरून जाणारे नागरिक आणि सायकलवरून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचाही कुत्र्यांचे हे कळप सतत पाठलाग करत आहेत. रात्री अपरात्री कुत्र्यांच्या भुंकण्याने आणि विव्हळण्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे चौपाटी परिसरासह संपूर्ण शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रशासनाने त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.1
- सांगली जिल्ह्यातील जल सिंचन योजनेची पाहणी करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील येणार आहेत. यासंदर्भातील माहिती मा. खासदार संजय पाटील यांनी दिली आहे.1
- बारामती-पाटस मार्गावर उंडवडी टोलनाक्यापुढे झालेल्या अपघातातील जखमीच्या मदतीसाठी युवा नेते जय पवार तात्काळ धावून आले. पुण्याकडे प्रवास करत असताना रस्त्यात अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी कोणताही उशीर न करता आपला ताफा थांबवला. जय पवार यांनी अपघातग्रस्त जखमीची विचारपूस करत तातडीने मदतीची व्यवस्था केली. तसेच जखमीवर योग्य उपचारासाठी त्यांनी स्वतःच्या स्वीय सहाय्यकालाही जखमीसोबत पाठवले. संकटाच्या क्षणी त्यांनी दाखवलेली ही तत्परता आणि माणुसकी सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरली आहे.1