Shuru
Apke Nagar Ki App…
नागझरी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ह. भ. प. शिवाजी महाराज शेळके (नागझरी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
वैजनाथ पावडे
नागझरी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ह. भ. प. शिवाजी महाराज शेळके (नागझरी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- नागझरी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ह. भ. प. शिवाजी महाराज शेळके (नागझरी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.1
- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजारात २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त 'एक झाड विठ्ठलाचे' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आखाडा बाळापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेशभाऊ गोयंका यांच्या वतीने टिगार्ड भेट देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास राजेंद्र प्रसाद अग्रवाल, अरुण कन्नावार, संतोष सापळीकर, किशोर सिंह बयास, प्रा. ओमप्रकाश बोंढारे, डॉ. अरुण सुर्यवंशी, शिवराज स्वामी, नामदेव बोंढारे, विजय कदम, माधवराव काळे, बालुसिंह ठाकुर, दशरथ पेंढारकर आणि मधुकर चेटप आदींसह पर्यावरण मित्र मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.1
- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजीत दिपके यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली. या संघर्षामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. गोरेगाव येथे झालेल्या या आनंदोत्सवात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी "हा आंदोलनाचा विजय आहे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे" अशा जोरदार घोषणा देत जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या संघर्षाला हे यश समर्पित असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान गजानन कावरखे, नामदेव पतंगे, राहुल कावरखे, अमोल जाधव, अमोल एकशिंगे, रामेश्वर कावरखे, अलीम भाई आणि कोंडबाराव खटके यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.1
- नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सांदिपानि पब्लिक स्कूलमध्ये आषाढी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध उपक्रम उत्साहात पार पाडले आहेत.1
- जनआंदोलनाच्या परिणामामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून हा संघर्षाचा विजय असल्याचे रवि सोनकांबळे यांनी म्हटले आहे. जनआंदोलनाचा झालेला हा परिणाम म्हणजेच चाललेल्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त हिंगोली तालुक्यातील घोटा देवी येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या पवित्र धार्मिक सोहळ्यात धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्या हस्ते विधिवत महापूजा करण्यात आली. या वेळी विठ्ठल-रुक्मिणीच्या मूर्तींना आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मंत्रोच्चार, आरती आणि हरिनामाच्या गजरात भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला. मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि वारकरी संप्रदायाने दिलेल्या भक्ती, समता, सेवा आणि मानवतेच्या संदेशाचे स्मरण करून समाजात प्रेम, बंधुभाव आणि अध्यात्मिक संस्कार जोपासण्याचे आवाहन केले. या सोहळ्याला धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांच्यासह ग्रामस्थ, वारकरी, महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर "पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" या नामघोषाने भक्तिमय झाला.1
- नांदेड येथील देगलूर नाका परिसरातील ईदगाह कब्रस्तानमध्ये एक अजब अन् धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कब्रस्तानमधील थडग्यांच्या बाहेर अचानक मानवी हाडे आणि कवट्या सापडल्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. कब्रस्तानच्या बाहेर अशा प्रकारे हाडे आणि कवट्या कशामुळे व कशा आल्या, याचा शोध आता नांदेड ग्रामीण पोलिसांकडून घेतला जात असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल तपासणी करत आहेत.1