Shuru
Apke Nagar Ki App…
जनआंदोलनाच्या परिणामामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून हा संघर्षाचा विजय असल्याचे रवि सोनकांबळे यांनी म्हटले आहे. जनआंदोलनाचा झालेला हा परिणाम म्हणजेच चाललेल्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
Sayad Jamil
जनआंदोलनाच्या परिणामामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून हा संघर्षाचा विजय असल्याचे रवि सोनकांबळे यांनी म्हटले आहे. जनआंदोलनाचा झालेला हा परिणाम म्हणजेच चाललेल्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
More news from Maharashtra and nearby areas
- जनआंदोलनाच्या परिणामामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून हा संघर्षाचा विजय असल्याचे रवि सोनकांबळे यांनी म्हटले आहे. जनआंदोलनाचा झालेला हा परिणाम म्हणजेच चाललेल्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1
- परभणी जिल्ह्यातील पाथरी तहसील कार्यालयावर दादा राव गवारे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला.1
- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.1
- नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील सांदिपानि पब्लिक स्कूलमध्ये आषाढी महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी एकत्र येत विविध उपक्रम उत्साहात पार पाडले आहेत.1
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस आणि लोकनेत्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री मा. ना. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी परळी तालुक्याच्या वतीने २२ ते २६ जुलै दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून २५/०७/२०२६ रोजी कन्हैया वारकरी शिक्षण संस्था, परळी वैजनाथ येथे वारकरी बांधवांना खिचडी वाटप करण्यात आले. या प्रसंगी आषाढी एकादशीनिमित्त निघालेल्या दिंडीत मान्यवरांनी सहभाग नोंदवत विठू नामाचा गजर केला. या कार्यक्रमाला परळी तालुका भाजपा अध्यक्ष राजेश गित्ते, कन्हैया वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह. भ. प. गोविंद महाराज मुंडे, भाजपा कोषाध्यक्ष भुराज बदने, भाजपा सचिव अनिल गुट्टे, कासारवाडीचे माजी सरपंच दशरथ (दादा) गुट्टे तसेच दैनिक परळी बातमीदारचे संपादक महादेव गित्ते यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. आयोजित या सर्व सामाजिक उपक्रमांचा समारोप 'आज एक पेड पंकजाताई के नाम...' या अभियानांतर्गत वृक्षारोपण करून होणार आहे.4
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या सामाजिक उद्देशाने आधारवड फाउंडेशनच्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालयातील २४ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आणि इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासाठी प्रेरणादायी वातावरण तयार झाले आहे. या प्रसंगी आधारवड फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन चव्हाण, कोषाध्यक्ष दत्ता कोरडे, सदस्य भानुदास टिपरकर तसेच लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिराजदार, राजकुमार राऊत सर, बालाजी ढोबळे सर, घुगे सर, आळणे सर व मोरे सर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करून चांगले शिक्षण घेण्याचा आणि समाजात आदर्श नागरिक बनण्याचा संदेश दिला. या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत करत संस्थेचे आभार मानले, तर फाउंडेशनने भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे शिक्षणाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेला विरोध दर्शवण्यासाठी नांदेडमध्ये आगामी ९ ऑगस्ट रोजी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या निर्णयाला अनुसूचित जातीतील ५९ जातींच्या संघटनांकडून विरोध केला जात असून, या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सर्व अनुसूचित जातींमधील नागरिकांना एकत्रित करून हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयटीआय चौकातील महात्मा फुले पुतळ्यापासून सुरू होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचून या मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर होणार आहे.1
- धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना कॉम्रेड माधुरीताई क्षीरसागर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. युवा शक्तीपुढे शेवटी मोदी सरकारला झुकावे लागले असून याच युवा शक्तीमुळे धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1