हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजीत दिपके यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली. या संघर्षामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. गोरेगाव येथे झालेल्या या आनंदोत्सवात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी "हा आंदोलनाचा विजय आहे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे" अशा जोरदार घोषणा देत जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या संघर्षाला हे यश समर्पित असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान गजानन कावरखे, नामदेव पतंगे, राहुल कावरखे, अमोल जाधव, अमोल एकशिंगे, रामेश्वर कावरखे, अलीम भाई आणि कोंडबाराव खटके यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजीत दिपके यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली. या संघर्षामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. गोरेगाव येथे झालेल्या या आनंदोत्सवात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी "हा आंदोलनाचा विजय आहे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे" अशा जोरदार घोषणा देत जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या संघर्षाला हे यश समर्पित असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान गजानन कावरखे, नामदेव पतंगे, राहुल कावरखे, अमोल जाधव, अमोल एकशिंगे, रामेश्वर कावरखे, अलीम भाई आणि कोंडबाराव खटके यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनात हिंगोलीचे भूमिपुत्र अभिजीत दिपके यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू असलेल्या या आंदोलनामुळे केंद्र सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्यांची दखल घ्यावी लागली. या संघर्षामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाल्याने विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. गोरेगाव येथे झालेल्या या आनंदोत्सवात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी "हा आंदोलनाचा विजय आहे, विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय आहे" अशा जोरदार घोषणा देत जल्लोष केला. विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झालेल्या संघर्षाला हे यश समर्पित असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान गजानन कावरखे, नामदेव पतंगे, राहुल कावरखे, अमोल जाधव, अमोल एकशिंगे, रामेश्वर कावरखे, अलीम भाई आणि कोंडबाराव खटके यांच्यासह अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- नागझरी येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी ह. भ. प. शिवाजी महाराज शेळके (नागझरी) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.1
- हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.1
- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील आठवडी बाजारात २५ जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त 'एक झाड विठ्ठलाचे' या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला आहे. पर्यावरण मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमांतर्गत वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. या वेळी आखाडा बाळापूर येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेशभाऊ गोयंका यांच्या वतीने टिगार्ड भेट देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास राजेंद्र प्रसाद अग्रवाल, अरुण कन्नावार, संतोष सापळीकर, किशोर सिंह बयास, प्रा. ओमप्रकाश बोंढारे, डॉ. अरुण सुर्यवंशी, शिवराज स्वामी, नामदेव बोंढारे, विजय कदम, माधवराव काळे, बालुसिंह ठाकुर, दशरथ पेंढारकर आणि मधुकर चेटप आदींसह पर्यावरण मित्र मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.1
- विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्याच्या आणि गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या सामाजिक उद्देशाने आधारवड फाउंडेशनच्या वतीने लालबहादूर शास्त्री विद्यालयातील २४ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, दप्तर आणि इतर आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. या मदतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासाठी प्रेरणादायी वातावरण तयार झाले आहे. या प्रसंगी आधारवड फाउंडेशनचे अध्यक्ष सचिन चव्हाण, कोषाध्यक्ष दत्ता कोरडे, सदस्य भानुदास टिपरकर तसेच लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे मुख्याध्यापक एल. के. बिराजदार, राजकुमार राऊत सर, बालाजी ढोबळे सर, घुगे सर, आळणे सर व मोरे सर उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांना नियमित अभ्यास करून चांगले शिक्षण घेण्याचा आणि समाजात आदर्श नागरिक बनण्याचा संदेश दिला. या उपक्रमाचे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी स्वागत करत संस्थेचे आभार मानले, तर फाउंडेशनने भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे शिक्षणाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला.1
- जनआंदोलनाच्या परिणामामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला असून हा संघर्षाचा विजय असल्याचे रवि सोनकांबळे यांनी म्हटले आहे. जनआंदोलनाचा झालेला हा परिणाम म्हणजेच चाललेल्या संघर्षाला मिळालेले मोठे यश असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.1
- आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वाशीम जिल्ह्यातील शेलूबाजार येथे भक्ती, श्रद्धा आणि सेवाभावाचा सुंदर संगम पाहायला मिळाला. या पर्वाचे औचित्य साधून उपवास करणाऱ्या भाविक व नागरिकांसाठी तब्बल १५० किलो फराळी उसळ तयार करून तिचे वाटप करण्यात आले. धार्मिक पर्वाला सामाजिक सेवेची जोड देण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला शेलूबाजारसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. फराळ वाटप सुरू होताच लहान मुलांपासून महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रसादाचा लाभ घेतला. यावेळी विठ्ठल-रुक्मिणीचे नामस्मरण आणि जयघोष करण्यात आल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. प्रत्येक भाविकापर्यंत फराळ पोहोचावा यासाठी आयोजक आणि कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध काम केले. धार्मिक सण-उत्सवांतून सामाजिक बांधिलकी, बंधुभाव आणि परस्पर सहकार्याची भावना जोपासली जावी असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून, नागरिकांनी या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले आहे.4
- प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या सेनगाव तालुक्यातील आजेगाव येथे आज आषाढी एकादशीनिमित्त भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे जाणे शक्य नसलेले भाविक प्रति विठ्ठल म्हणून ओळख असलेल्या केशवराजाच्या दर्शनासाठी आजेगावमध्ये दाखल झाले असून संपूर्ण गावात आषाढीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. आज पहाटे महापूजेनंतर प्राचीन प्रसिद्ध केशवराज महाराज मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळपासूनच गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील व बाहेर गावातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. यात्रेमध्ये छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली असून गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी चहा आणि फराळाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. आज सायंकाळी केशवराज महाराजांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात येणार असून यामध्ये गावकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.1