Shuru
Apke Nagar Ki App…
दिग्रसच्या वीरूगिरी आंदोलनाची आश्वासनानंतर चौथ्या दिवशी सांगता, इसापूर येथील श्याम गायकवाड याने सोमवारी दिग्रसच्या बीएसएनएल टॉवरवर चढून विविध मागण्यांसाठी वीरूगिरी आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी चौथ्या दिवशी रात्री तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. श्याम गायकवाड याने इसापूर ग्रामपंचायतसंदर्भात विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. सोमवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन चौथ्या दिवशी सायंकाळीदरम्यान सोडवण्यात आले. वादळी पावसातही आंदोलन सुरूच होते. दरम्यान गायकवाडवर मधमाश्यांनी हल्ला चढविला.
Sajid Patlewale
दिग्रसच्या वीरूगिरी आंदोलनाची आश्वासनानंतर चौथ्या दिवशी सांगता, इसापूर येथील श्याम गायकवाड याने सोमवारी दिग्रसच्या बीएसएनएल टॉवरवर चढून विविध मागण्यांसाठी वीरूगिरी आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी चौथ्या दिवशी रात्री तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. श्याम गायकवाड याने इसापूर ग्रामपंचायतसंदर्भात विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. सोमवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन चौथ्या दिवशी सायंकाळीदरम्यान सोडवण्यात आले. वादळी पावसातही आंदोलन सुरूच होते. दरम्यान गायकवाडवर मधमाश्यांनी हल्ला चढविला.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- इसापूर येथील श्याम गायकवाड याने सोमवारी दिग्रसच्या बीएसएनएल टॉवरवर चढून विविध मागण्यांसाठी वीरूगिरी आंदोलन सुरू केले होते. गुरुवारी चौथ्या दिवशी रात्री तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता झाली. श्याम गायकवाड याने इसापूर ग्रामपंचायतसंदर्भात विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले होते. सोमवारी सकाळी सुरू झालेले आंदोलन चौथ्या दिवशी सायंकाळीदरम्यान सोडवण्यात आले. वादळी पावसातही आंदोलन सुरूच होते. दरम्यान गायकवाडवर मधमाश्यांनी हल्ला चढविला.1
- दारव्हा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यवतमाळ आणि मुंगसाजी महाराज महाविद्यालय, दारव्हा यांच्या संयुक्त विद्यमाने २४ मार्च रोजी विशेष भर्ती अभियान यशस्वीरीत्या पार पडले. या उपक्रमात कैरोस ट्रेनिंग अकॅडमी, हैदराबाद व उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील चकवे होते, तर उद्घाटन डॉ. सौ. संगीताताई घुईखेडकर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून विराज घुईखेडकर, प्रशांत ढेपे व योगेश काकडे उपस्थित होते. या अभियानासाठी १६० युवक-युवतींनी नोंदणी करून मुलाखती दिल्या. त्यापैकी पात्र ठरलेल्या १९ उमेदवारांना ऑफर लेटर देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. सुनील डंभारे यांनी केले.1
- Post by Sayad anees1
- Post by Amravati News Update1
- शिवकुमार काळे सविस्तर वृत्त दिनांक ३ एप्रिल नांदेड: आज संपूर्ण देशभर मारुती रायाचा जन्मोत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा होत असताना, नांदेड जिल्ह्यातही या उत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच जिल्ह्यातील विविध हनुमान मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. 🛕 मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल जन्मोत्सवाचे औचित्य साधून शहरातील लहान-मोठ्या सर्वच मंदिरांना आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये भजन-कीर्तन, हनुमान चालीसा पठण आणि अभिषेक घालण्यात आला. अनेक ठिकाणी महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. 🎇 भव्य दिव्य शोभायात्रा उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी शहरातून काढण्यात आलेली भव्य शोभायात्रा. या शोभायात्रेत: * भव्य देखावे: रामायण काळातील प्रसंगांचे जिवंत देखावे रथांवर सजवण्यात आले होते. * भक्तांचा उत्साह: 'जय श्रीराम' आणि 'बजरंग बली की जय' च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. * वाद्यवृंद: पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या या यात्रेत तरुणाईचा मोठा सहभाग दिसून आला. या उत्सवामुळे नांदेड शहरात सर्वत्र चैतन्याचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.1
- Post by Mohammad Rafikh1
- खामगाव: एकमेव आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील पुरातन खंडोबा मंदिराचा यात्रा महोत्सव आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. गेल्या १५० वर्षांपासून जोपासली जाणारी '१२ गाड्या ओढण्याची' परंपरा यंदाही हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात पार पडली. बुलढाणा जिल्ह्यात विशेष महत्त्व आहे. नवसाला पावणारा खंडोबा अशी या मंदिराची ख्याती असून, सायंकाळी कमल सिंह गौतम चौकातून १२ बैलगाड्या ओढण्याचा थरारक सोहळा पार पडला. गडकरी भक्तगणांनी श्रद्धेपोटी आणि आपला नवस फेडण्यासाठी या बैलगाड्या ओढल्या. ही परंपरा अबाधित ठेवण्यासाठी गडकरी बांधवांचा यावेळी विशेष सन्मान व विधीवत पूजन करण्यात आले. या उत्सवासाठी ९ दिवस आधी खंडोबा मंदिरात घटाची स्थापना करण्यात आली होती. या काळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हनुमान जयंतीच्या दिवशी या महोत्सवाचा मुख्य सोहळा पार पडला. तत्पूर्वी मंदिरात गडकऱ्यांचा हळद लावण्याचा सोहळा आणि शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. खामगावच्या जगदंबा रोड, महात्मा बसवेश्वर चौक परिसरात हा उत्सव साजरा झाला. विशेष म्हणजे ऐतिहासिक शांती महोत्सवाच्या (मोठी देवी) परिसरातच हा महोत्सव होत असल्याने याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या महोत्सवात सर्व धर्मीयांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून खामगावच्या सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवले. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता खंडोबा यात्रा महोत्सव समितीच्या वतीने दर्शनासाठी मंदिर सलग २४ तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खामगाव शहरासह जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो भाविकांनी 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात खंडोबाचे दर्शन घेतले.खंडोबा मंडळाने ही दीडशे वर्षांची परंपरा आणखीही कायम ठेवली आहे.1
- Post by Amravati News Update1