Shuru
Apke Nagar Ki App…
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून मतदारांसाठी मतदारयादीसंदर्भात विशेष आवाहन करण्यात आले आहे.
Digital media.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून मतदारांसाठी मतदारयादीसंदर्भात विशेष आवाहन करण्यात आले आहे.
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडून मतदारांसाठी मतदारयादीसंदर्भात विशेष आवाहन करण्यात आले आहे.1
- कर्जतमध्ये मेंढपाळांना मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांनी कर्जतमधून थेट इशारा दिला आहे.1
- ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी थेट इशारा देत स्पष्ट केले आहे की, जर आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्हाला हातात कुऱ्हाड घ्यावी लागेल.1
- आता या देशावर 'इंग्रज तरी बरे होते' असे म्हणण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य प्रा. लक्ष्मण हाके यांनी केले आहे. साप्ताहिक समृद्ध कर्जतचे राशीन प्रतिनिधी जावेद काझी यांनी हे वृत्त दिले आहे.1
- सोलापूर जिल्ह्यातील सांगोला परिसरातील रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाटंबरे येथील सर्व्हिस रोडवर काही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर ओला व सुका कचरा टाकला जात असल्याने कचऱ्याचा डेपो तयार झाला आहे. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून प्रवासी, नागरिक आणि स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या अस्वच्छतेमुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा सर्व्हिस रोड खंडोबा देवस्थान, गावठाण आणि एसटी बसथांब्याकडे जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो. याशिवाय सांगोला, सोलापूर, मिरज व कोल्हापूर या ठिकाणी ये-जा करणारे प्रवासीही याच मार्गाचा वापर करतात. राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर टोल वसुली केली जात असतानाही प्रवाशांच्या स्वच्छता व सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणची तातडीने स्वच्छता करून भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदाराला जाब विचारावा, अशी जोरदार मागणी नागरिक व प्रवाशांकडून केली जात आहे. या समस्येबाबत वाटंबरे ग्रामपंचायतीशी चर्चा करण्यात आली असून, रस्त्यावर ओला व सुका कचरा टाकणाऱ्या नागरिकांमुळे साचणाऱ्या या कचऱ्याच्या समस्येवर लवकरात लवकर योग्य तोडगा काढण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.2
- सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यासह भीमा नदीकाठच्या परिसरासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नीरा नदीतून सोडण्यात आलेले पाणी सध्या भीमा नदीमार्गे अरळी बंधाऱ्यात दाखल झाले असून, बंधारा आता भरू लागला आहे. पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पाण्यामुळे शेती, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि भूजल पातळी सुधारण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून, नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.1
- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बारामतीमध्ये मेलोडी वाटून जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला आहे. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर बारामतीत लोकांनी मेलोडी वाटून आपला आनंद व्यक्त केला.1
- कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील ग्रामसेवक कोरे यांनी जेम (GeM) पोर्टलवरून केलेल्या सिमेंट काँक्रेटच्या बेंच खरेदीत मोठा भ्रष्टाचार आणि काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बाजारभावानुसार केवळ ३,००० रुपये किंमत असणारे बेंच जेम पोर्टलवरून एकास ९,९९९ रुपये या दराने खरेदी करण्यात आले आहेत. अशा प्रकारे एकूण ९ बेंच तब्बल ८९,९९१ रुपयांना खरेदी करण्यात आले असून, या वस्तूंना सोन्याचे किंवा चांदीचे पॉलिश केले आहे का, असा उपरोधिक सवाल करत गटविकास अधिकारी (बीडीओ) कळंब व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी सुनावणी झाली असली तरी आजपर्यंत कोणतीही पारदर्शक कारवाई झालेली नाही. त्यामुळे बीडीओ कळंब यांनी जेम पोर्टलच्या नावाने चाललेला हा काळाबाजार बंद करून शासन व जनतेच्या पैशांची उधळपट्टी थांबवावी, दोषींवर कडक कारवाई करून त्यांना शिक्षा द्यावी आणि बाजारभावानुसारच खरेदी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.3